डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळावे शिक्षणमंत्री

 राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे.




बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या.


सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

प्रशांत बंब व शिक्षक आमने सामने पहा ... Click here

मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्यात यावा अशा सूचना करुन शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्येच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे.

 त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात यावा.


 हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा अभ्यासही करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



छ. संभाजीनगर ढगफुटी...

 छत्रपती संभाजीनगर मध्ये बाप्पाच्या आगमनांसह मुसळधार पाऊस  झाला .

अगदी जोरदार पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात शेतकरी पाऊस नसल्यामुळे चिंताग्रस्त झाला होता. परंतु गणेश आगमनासह पाऊस अगदी ढगफुटी समान पाऊस झाल्याने एकदम आनंदाचे वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहे .

पावसाचा जोर इतका होता की अनेक ओढे भरभरून  वाहून  निघाले .

आपण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पाऊस किती जोरदार होता. आपण अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण लगेच या चॅनलला सबस्क्राईब करावं.

 गणेश आगमनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!


जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

बाप्पा आला .... पाऊस झाला...
https://youtu.be/zaarr1Td1mY



शाळेत पत्रकार आले खाली हात गेले....

साफल्य नविन काव्यरचना

मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे. मराठी काव्य मनास मंत्रमुग्ध करणारा प्रकार मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ ...


आता Flipkart वर माझे पुस्तक खरेदी करा... आपल्या प्रियजनास भेट देण्यास उत्तम...खास १०%सवलती दरात




साफल्य.....



जगण्याची प्रीत ह्या जीवना,

राखूनी मनी किती वेदना,

असह्य काळ जरी टळेना,

सौदार्य स्वतःशी दावेना,



उरात दाटे अवेहलना,

कीर्तीचे नातं हे कळेना,

फिरुनी जगी मन भरेना,

साफल्य कधी लाभेलना,



अंतकरणास रुप भावेना,

 उदासी अखेर मिटेलना,

दीव्यत्वाची ओढ मना,

तेज कर्तुत्वाचा उभारेलना....



सोडीत ज्वलंत भावना,

कुणास का मी कळेना,

विराम माझ्याच जीवना,

प्रिये तुला मी दिसेना.....



   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद

व्याजाचे खोके एकदम ओके

 पैठणी ते पार पडलेली शिक्षक व संस्थेच्या आमसभेमध्ये व्याजाचे खोके एकदम ओके,

 कमिशनचे खोके एकदम ओके अशा घोषणा देत विरोधी गटाने पतसंस्थेच्या संचालक मंडळ आला चांगलेच धारेवर धरले ,

याबाबतचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी  या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .

कॉमेंट मध्ये नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.




शिक्षकांनी आता आवाज बुलंद केलाय ...✊

 *शिक्षकांनी आता आवाज बुलंद केलाय ...✊*


नांदेड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये दोन पत्रकार शिक्षक बांधवाकडून निधी मिळविण्यासाठी गेले होते. वास्तविक शिक्षक अशा परिस्थितीत काम करतात की अनेकदा विद्यार्थ्यांना वही पेन या प्राथमिक शैक्षणिक साहित्याची ही कमतरता असते. तेव्हा अनेक शिक्षक अशा विद्यार्थ्यांना या साहित्याची मदत करतात.

     हा विषय वास्तविक व्यक्त करण्याचा नसून पण आज समाजात जे काही शिंतोडे शिक्षकांवर उडविल्या जात आहे ते पाहून नक्कीच हा काळ सावित्रीबाईंना ज्याप्रमाणे त्या काळात त्रास सहन करून स्त्री शिक्षण या देशात सुरू  केले जणू तिच व्यवस्था शिक्षणांस धारेवर धरु पहात आहे का? 

शिक्षकाचे कार्य हे कोणत्या मोजपट्टीत मोजता येत नसून ते केवळ प्रगत समाजाच्या प्रतिबिंबात झळकून येथे. आजचा समाज जो काही प्रगत दिसून येतो तेच या सामाजिक अभियंत्याचे नवनिर्माण असून याचे कुठलेच एमबी किंवा आॕडीट कधीच होऊ शकत. शिक्षक देशाचा खरंतर मुख्य  स्तंभ आहे. परंतू त्यास या राजकीय व्यवस्थेने पायमल्ली करण्याचे काम केलेले आहे.

   लोकप्रतिनिधी मुख्यालय  राहणे शिक्षकांना अत्यावश्यक सेवा नसतांना एकूणच अपमानकारक शब्द वापरून संपूर्ण शिक्षकांवर लगाम लावण्याची भाषा करतात.  

    नांदेड जिल्ह्यात नेमके कायच घडले हे खालील व्हिडीओ  मध्ये पहा....




https://youtu.be/RLyKx79__Fg

शिक्षक मुख्यालय एबीपी माझावर लाईव्ह चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

 मुख्यालय व शैक्षणिक गुणवत्ता 

ABP माझा वर live चर्चा. मुख्यालयाच्या प्रश्नावर 

आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या समोरासमोर

 *मुख्यालय व शैक्षणिक गुणवत्ता* याबाबत डिबेट ( चर्चा )झाली. 

ती एबीपी माझावर लाईव्ह चर्चेतील महत्त्वाचे  मुद्दे 

संघटनेच्या मान्यवर प्रतिनिधींनी  भुमिका मांडली. मुख्यालयाचा मुद्दा आमदार प्रशांत बंब (prashant bamb)

     शिक्षकांनी चर्चेत बंब यांना घेरले👇





अशैक्षणिक कामे काढा 👇




आमचा पगार शासन ठरवेल 👇



शिक्षण कोठे घेणे घटनात्मक अधिकार...👇








"त्यांची बदली ही प्रणाली" द्वारे होणारच..

 अवघड क्षेत्र -


2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीप्रमाणे शिक्षकांची मागील सेवा विचारात घेतली जाईल. व बदली प्रक्रियेत पर्याय निवडताना 2022 नुसार प्रसिद्ध केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांची यादी विचारात घ्यावी लागेल.

सर्वसाधारण क्षेत्र-


वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडते.

बदली वर्ष -


शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे बदली वर्ष म्हणजे ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष परंतु 2022 रोजी काढलेल्या पत्रा हे वतली वर्ष 30 जून पर्यंत वाढवलेले आहे बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 30 जून पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा शिक्षक जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शाळेचे प्राथमिक शिक्षक अथवा मुख्याध्यापक

बदली प्राधिकारी -


शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र एकमेव शाळाकेंद्रित समूह ...Go Digital, Go Green, Use Solar

बदलीचे अधिकार पात्र शिक्षक-


या शिक्षकांशी विद्यमान शाळा ही अवघड क्षेत्रात आहे व त्यांची तेथील सलग सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे बदली अधिकार मात्र शिक्षक आहेत.

विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग 2 -


या संवर्गात कोणते शिक्षक येतील याची माहिती शासन निर्णय नमूद केली आहे .शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जाते.

बदली पात्र शिक्षक -


ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे .आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे. अथवा ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक दहा प्लस पाच वर्ष कुठल्याही क्षेत्रात म्हणजेच अवघड असल्यास उगम क्षेत्रात पूर्ण झालेली असेल तर तो शिक्षक बदली पात्र आहे "त्यांची बदली ही प्रणाली"  द्वारे होणारच.. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथमिक भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन दहा वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या असल्यास त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची निवड होईल. त्याला विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट लागू होणार नाही.

बदली प्रक्रिया कशी राबवली जाईल याचा क्रम -


👉प्रक्रिया सुरू करण्याअगोदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याद्वारे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील यादी प्रसिद्ध केली जाईल.

👉त्यानंतर शिक्षण अधिकारी बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करतील.

👉गटशिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या तालुक्यातील  तालुका निहाय व शाळा निहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित कराव्यात समानिकरण करण्यासाठी भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाही. हे रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याद्वारे प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी पोर्टलवर अर्ज भरायचा आहे.

👉त्यानंतर विशेष संवर्ग एक व दोन बदली पात्र तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील.

👉शासन निर्णयाप्रमाणे उपरोक्त नमूद याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी अर्ज करावयाचा होता व शिक्षण अधिकाऱ्यांना सात दिवसात निकाल द्यायचा होता तसेच शिक्षकांना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णय अमान्य असेल तर ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज पुढील पाच दिवसात करू शकतील व मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निकाल देऊ शकतील परंतु टप्पा क्रमांक एक मध्ये आधीच आपण शिक्षकांच्या प्रोफाईलवर सार्वजनिक आक्षेप ही सुविधा दिली होती.
त्यामुळे आरटीडीने 29 जून 2022 रोजी जाहीर केलेल्या पत्रात उपरोक्त नमूद याद्यांवर आक्षेपाची प्रक्रिया संक्षिप्त केलेली आहे याद्या प्रसिद्ध झाल्यापासून शिक्षक दिन दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतील व शिक्षण अधिकारी चार दिवसात निर्णय देऊ शकतील तसेच शिक्षकांना हा निर्णय मान्य नसेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुढील दोन दिवसात अर्ज करू शकता व मुख्य कार्यकारी अधिकारी तीन दिवसात आपला निकाल जाहीर करू शकतात.

पसंतीक्रम विशेष संवर्ग भाग १


सर्वात प्रथम विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल कमीत कमी १ शाळा व जास्तीत जास्त ३० शाळांचे पसंती क्रम देणे आवश्यक आहे. शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर त्यांना बदली नको असेल तर ते शिक्षक विशेष संवर्ग भाग एक मधून अर्ज करू शकता शिक्षकांनी या अंतर्गत बदलीचा लाभ घेतल्यानंतर पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी ते अर्ज करू शकत नाही. शासन निर्णयात विशेष संवर्ग भाग एक साठी नमूद केलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणेच तसेच सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य दिले जाईल प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल. शिक्षकांना त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल या अंतर्गत शिक्षकांची बदली बदली पात्र शिक्षकांच्या जागी होईल .

पसंती क्रम विशेष संवर्ग भाग २


विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळांचे पसंती क्रम देणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकाच या संवर्गासाठी अर्ज करू शकतो शासन निर्णयात विशेष संवर्ग भाग दोन साठी नमूद केलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे तसेच सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य दिले जाईल शिक्षकांनी   या अंतर्गत बदलीचा लाभ घेतल्यानंतर पुढील तीन वर्ष बदलीसाठी त्यांना अर्ज करता येणार नाही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल असं ती क्रम बदली अधिकार पात्र बदली अधिकार पात्र शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल त्यांना ती शाळांचा पसंती क्रम देणे आवश्यक आहे सेवा जेष्ठता बसल्यास या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येतील या शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही आणि हे शिक्षक बदलीस पात्र शिक्षक नसते तर त्यांची बदली होणार नाही बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल पसंती क्रम बदली पात्र सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून बाकी सर्व शिक्षकांना त्यांचा पसंती क्रम भरण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य देऊन पसंतीप्रमाणे बदली होईल या शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाईल या शिक्षकांनी किमान 30 अथवा आधीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य आहे पसंती क्रम विस्थापित शिक्षक सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून उरलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी अथवा बदलण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल या शिक्षकांनी 30 अतिरिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य आहे सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य देऊन बद ली या शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही अथवा प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्या तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाईल बदली आदेश सर्व प्रक्रिये नंतर प्रणालीद्वारे जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवली जाईल व शिक्षकांचे बदली आदेश प्रकाशित केले जातील अशा प्रकारे संपूर्ण जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवली जाईल त्यांना शासन निर्णय अथवा ऑलरेडीने वेळोवेळी जाहीर केलेली पत्रके महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे शिक्षकांना कुठल्याही मुदतीबद्दल अथवा तारखे बद्दल अथवा जिल्हा अंतर्गत प्रक्रियेबद्दल शंका असतील किंवा प्रश्न असतील त्यांनी या संकेतस्थळावर जाऊन सर्व शंकांचे निवारण करून घ्यावे ,

 प्रकाशसिंग राजपूत 
(समूहनिर्माता) 
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 
औरंगाबाद 

सर्जारं ... तु... माझ्या राजारं....

खास बैलपोळा निमित्त माझी लिखित सर्जारं ... तु... माझ्या राजारं....आपणासाठी व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे गायन केले आहे अंकुश नागरगोजे लेखन केले आहे प्रकाश सिंग किसन सिंग राजपूत आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा

 सर्जारं ... तु... माझ्या राजारं....




https://youtu.be/7Uo-K2ExbWg


गीत आवडल्यास लाईक शेअर करा...

जिल्हातंर्गत बदली प्रारंभिक माहिती

 आंतरजिल्हा बदलीचा टप्पा क्रमांक दोन यशस्वी झाल्यानंतर आता ऑनलाईन बदली प्रक्रिया जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सज्ज होत आहे.

आंतरजिल्हा बदली यादी पहा.... Click here

 यासाठी प्रारंभिक माहिती चा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे यानुसार आपण जिल्हा अंतर्गत बदली करिता प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे ते यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

बदली संदर्भात अपडेट राहण्यासाठी डिजिटल समूह youtube चॕनल सबस्क्राईब करा....









बदली झाल्याची अथवा न झाल्याची कारणे जाणून घेण्यासाठी

 आंतरजिल्हा बदली करिता फॉर्म भरलेल्या शिक्षकांनी आपल्या बदली झाल्याची अथवा न झाल्याची कारणे जाणून घेण्यासाठी AuditLog कसा बघावा यासंदर्भातील PPT.














पूर्ण शुल्क राज्य सरकार भरणार

 कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य सरकार भरणार आहे. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.



कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली, याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. 

आंतरजिल्हा बदली यादी पहा....

आतापर्यंत 931 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, 200 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि 228 पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना 2 कोटी 76 लाख 84 हजार 222 रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

अमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परीणामाबाबत शपथ घेणेबाबत..


 नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो, मुंबई यांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या पत्रानुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्व युनिटसना त्यांच्या हद्दीतील सरकारी कार्यालये, शाळा, महाविदयालये अशा ठिकाणी 

अमली पदार्थाच्या दुष्परीणामाबाबत जनसामान्यात जागृती निर्माण होणे कामी तसेच त्याचा मुकाबला करण्यास सज्ज होण्याकरीता अमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परीणामाबाबत E pledge घेवुन जनजागृती करण्याबाबत कळविले आहे.


  सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र बोलावुन मौखीक शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करावे.

असे सुचविण्यात आलेले आहे.

आंतरजिल्हा बदली यादी पहा....

 सदर शपथ ऑन लाईन पध्दतीने घेण्याबाबत सविस्तर माहिती देवून प्रतिज्ञा घेतलेले एकुण अधिकारी / कर्मचारी शाळा एकूण संख्या शिक्षक व विदयार्थी एकुण संख्या व सर्व शाळांमध्ये सदर प्रतिज्ञा घेण्याचा उपक्रम राबवून विदयाथ्र्यांनी प्रतिज्ञा घेतानाचे फोटो सह माहिती सादर करायची आहे.


ऑन लाईन पध्दतीने शपथ घेण्यासाठी

 https://pledge.mygov.in/fightagainstdrugabuse 

ही लिंक देण्यात आलेली आहे.



आंतरजिल्हा बदली यादी जिल्हा निहाय

 आंतरजिल्हा बदली यादी पहा आता जिल्ह्यानिहाय...




डिजिटल समूह महाराष्ट्राच्या वतीने बदली झालेल्या तमाम शिक्षकांना मनापासून शुभेच्छा आपण स्व जिल्ह्यात जात आहात याचा निश्चितच मोठा आनंद आपल्या कुटुंबीयांना असणार आहे. व आपल्या कर्तृत्वाला आपल्या जिल्ह्यात नवीन भरारी मिळेल या नव्या उमेदीने आपण आपल्या जिल्ह्यात जाणार आहात सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!!!


  प्रकाशसिंग राजपूत 

    समूहनिर्माता 

    औरंगाबाद 


अहमदनगर

नागपूर

अकोला

नांदेड

अमरावती

नंदुरबार

औरंगाबाद

नाशिक

बीड

उस्मानाबाद

भंडारा

परभणी

बुलढाणा

पुणे

चंद्रपूर

रायगड

धुळे

रत्नागिरी

गडचिरोली

सांगली

गोंदिया

सातारा

हिंगोली

सिंधुदुर्ग

जळगाव

सोलापूर

जालना

ठाणे

कोल्हापूर

वर्धा

लातूर 

वाशिम

मुंबई उपनगर

यवतमाळ

मुंबई शहर

पालघर

आता होणार ४ हजार बदल्या

 शिक्षक बदली प्रक्रियेमधील ऑनलाइन बदलीचा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर म्हणजे आंतरजिल्हा बदली मध्ये 4000 शिक्षकांच्या बदल्या होणार असून .




या बदलांमध्ये अनेक शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यामध्ये जाता येणार आहे.

 उद्यापर्यंत बदल्या जाहिर होणार आहेत .

 ऑनलाइन बदली मध्ये सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेली ही मोठी बदली ठरणार आहे .

सर्व बदली प्रक्रियेमध्ये जलद करण्यात येण्याचे  प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून या बदल्यांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.

 खूप शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्व जिल्हा जाण्याची संधी त्यांना या बदली प्रक्रियेमधून प्राप्त होणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा ...

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 



विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं आज 20 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नोकरी नाही म्हणून विद्यार्थ्यांची डी.टी.एडकडे पाठ फिरवली

दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.


एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी

 एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.



या भरतीअंतर्गत प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्राध्यापकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. 

ज्यासाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत साइट esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील

या भरती प्रक्रिये अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 88 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांची 9 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 29 पदं आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 50 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

ESIC Recruitment 2022 : पात्रतेचे निकष

या भरीत अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत अधिक तपशील तपासू शकतात.

ESIC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना निकाल त्यांना ई-मेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील. तसेच, निकाल अधिकृत साइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.

ESIC Recruitment 2022 : अर्ज शुल्क

SC/ST/PDW/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना या भरती मोहिमेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 225 रुपये भरावे लागतील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार ESIC ची अधिकृत साइट पाहू शकतात.

महागाई भत्ता १ जानेवारीपासून मिळणार

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुधारणा करणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय.

 दिनांक -17 ऑगस्ट 2022

दिनांक 1 जाने्वारी 2022 पासून महागाई भता 31% वरून 34%,

 1जाने ते 31 जुलै 22 पर्यंतची थकबाकी रोखीने ऑगस्ट 22 मध्ये मिळणार 



भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन

शासकीय कर्मचाऱ्यांना 3 % DA वाढ

 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.



ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

शिंदे सरकार सत्तेवर विराजमान येताच दुसऱ्यांदा नव्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.

थोरांच्या आठवणी लोकमान्य टिळक

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️



🇮🇳 *अमृत महोत्सवी स्वातंत्र्य  निमित्त ....*🇮🇳



*थोरांच्या आठवणी....*


           भाग १


🔮  *लोकमान्य टिळक*🔮




https://youtu.be/XORH0lm1oNE



*वाचक स्वर  - श्रीमती भारती डहाळे*

     ठाणे


*व्हिडीओ व प्रसारण*


*प्रकाशसिंग राजपूत*

     औरंगाबाद 


*विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा....👍🏻*

Gpf पहा घरी बसल्या digitalgpf

 आता आपल्याला छ. संभाजीनगर   जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला ज्याचा त्याचा जी.पी.एफ कधीही कुठे ही पहाता येणार आहे.  ही पोस्ट संग्रहित ठेवा.

digitalgpf असे सर्च करुन कधीही आपण Gpf पाहू शकता. 

जीपी.एफ पहाण्यासाठी खाली क्लिक करा...



या लिंकवर क्लिक करा व आपला जिपीएफ नंबर टाका...जसे आपला भनीनि E......टाकून प्रिंट ला क्लिक करणे.

तसेच मागील वर्षाच्या पावत्या वर्ष बदलून काढू शकता.

Digitalgpf

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या 

सौजन्याने आपल्यास GPF पहाण्यास उपलब्ध  



http://gpfzpaurangabad.in/



शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल

 देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.



देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या आणि शहिदांच्या आत्मत्यागाला सलाम करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

संरक्षण मंत्रालयासोबतच्या सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शिक्षण मंत्रालय शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथांचा समावेश करेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भारतातील वीरांचा सन्मान करण्यापेक्षा अमृत महोत्सवाचा दुसरा चांगला उत्सव असू शकत नाही. वीरगाथा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. ते म्हणाले की देशभक्तीची तीव्र भावना आणि आपल्या शूरवीरांप्रती कृतज्ञतेची भावना विकसित करण्याची ही गुरुकिल्ली आहे.

आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून, मुलांना शौर्य कृत्यांची प्रेरणा आणि माहिती देण्यासाठी वीर गाथा आयोजित करण्यात आली होती. 


21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना रेखाचित्रे, निबंध, कविता आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यामधून 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि मूल्यांकनाच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांना “सुपर 25” म्हणून घोषित करण्यात आले.

मुलांमध्ये लहानपणापासूनच ‘राष्ट्राप्रती जबाबदारी’ची भावना दृढ करण्यासाठी शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून आपल्या सैनिकांचे शौर्य आणि गेल्या 75 वर्षांतील भारताची वीरगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे काम करेल असंही केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. त्यामुळे आता लवकरच विविध वीरांची यशोगाथा मुलांना लवकरच शालेय अभ्यासक्रमात शिकायला मिळणार आहे.

राज्याचे मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर..#maharashtra,

 राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.



त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

श्री  राधाकृष्ण विखे-पाटील - 

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

------------------------------------------------------------

सुधीर मुनगंटीवार- 

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

------------------------------------------------------------

चंद्रकांत पाटील- 

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

------------------------------------------------------------

डॉ. विजयकुमार गावित- 

आदिवासी विकास

------------------------------------------------------------

गिरीष महाजन- 

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

------------------------------------------------------------

गुलाबराव पाटील-

 पाणीपुरवठा व स्वच्छता

------------------------------------------------------------

दादा भुसे-

 बंदरे व खनिकर्म

------------------------------------------------------------

संजय राठोड- 

अन्न व औषध प्रशासन

------------------------------------------------------------

सुरेश खाडे- 

कामगार

------------------------------------------------------------

संदीपान भुमरे- 

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

------------------------------------------------------------

उदय सामंत- 

उद्योग

------------------------------------------------------------

प्रा.तानाजी सावंत- 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

------------------------------------------------------------

रवींद्र चव्हाण - 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

------------------------------------------------------------

अब्दुल सत्तार-

 कृषी

------------------------------------------------------------

दीपक केसरकर-

 शालेय शिक्षण व मराठी भाषा

------------------------------------------------------------

अतुल सावे-

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

------------------------------------------------------------

शंभूराज देसाई- 

राज्य उत्पादन शुल्क

------------------------------------------------------------

मंगलप्रभात लोढा- 

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर...

भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन... किरण भावठाणकर यांच्या लेखणीतून

 मॅकोलेप्रणित शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी लादल्याने पारंपरिक भारतीय शिक्षण व्यवस्थेचे न भरुन निघणारे असे नुकसान तर झालेच. पण, दुर्देव असे की, स्वातंत्र्योत्तर कालखंडातही शिक्षण पद्धती मुळापासून बदलण्याचे प्रयत्न सरकारकडून झाले नाही.



आता 'राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020' मुळे मात्र शिक्षणक्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन करणारा हा लेख...

रुदेव रविंद्रनाथ टागोर म्हणतात,'"Highest education is that which does not merely give us information but makes our life in harmony with all existence.' जे. कृष्णमूर्ती म्हणतात की, जीवनाचे समग्र आणि एकात्म दर्शन ज्याच्याद्वारे घडू शकते तेच खरे शिक्षण!


शिक्षण पद्धतीमध्ये पठण, मनन व चिंतन अशा बाबींना अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही देशाच्या शिक्षणपद्धतीवर त्या देशातील धार्मिकतेचा, संहितेचा, वातावरणाचा खूप मोठा पगडा असतो. 19व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आपल्या देशात गुरुकुल पद्धतीचा अवलंब होत असे. अर्थात, ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली होती. कालानुरुप त्यात आवश्यक ते बदल होत गेले. साधारणत: वयाच्या सातव्या वर्षापासून या शिष्याची गुरुगृही पाठवणी होत असे. गुरुच्या घरी राहून त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांना राहावे लागे.

घरातील पडेल ती कामे करून गुरुकडून विद्या ग्रहण केली जाई. कुटुंबातील एक सदस्य म्हणून राहात असल्याने साहजिकच घरातील सर्वच कामे करावी लागत. झाडझूड, धुणीभांडी, बाजारहाट इत्यादी कामांमध्ये त्याने सहभाग नोंदवावा, हे अपेक्षित असे. व्यक्तित्व विकासाच्या दृष्टीने हे ईष्ट ठरत असे. उच्च-नीच, श्रीमंत- गरीब असा भेदभाव नसल्याने त्यांची मानसिक, अध्यात्मिक व शारीरिक जडणघडण व्यवस्थित होत असे आणि याव्यतिरिक्त विविध विषयांतील शिक्षण गुरुंकडून मिळे.

साधारणत: 12 वर्षे हे शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडे व नंतर यथायोग्य गुरुदक्षिणा तो गुरुंना देत असे. त्यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात यथायोग्य योगदान दिले जाई. धार्मिक, बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांना कार्य करण्याची संधी मिळे. गुरुगृही राहून केलेला विद्याभ्यास, शास्त्राभ्यास, योगाभ्यास व शस्त्राभ्यास हा व्यक्तिगत आणि समाजाच्या उन्नतीसाठी कारणीभूत ठरे.

साधारणत: 16व्या शतकापासून विज्ञानक्षेत्रात बर्याृपैकी संशोधन सुरू झाले होते. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक अवस्थेतून बाहेर पडून त्यास विशिष्ट आकार येण्यास सुरुवात झाली. भारतीय शिक्षण पद्धतीवर भारतीय जीवन पद्धतीचा खूप मोठा प्रभाव होता. अनेक विद्वान, पंडित, शास्त्रकार यांच्या पुढे भारतीय संस्कृती ही पुष्ठ, प्रबळ आणि संस्कारी बनली होती. इंग्रज अधिकारी आणि वरिष्ठ यांनी या सर्व प्रक्रियेचा व्यवस्थित अभ्यास करून भारतीयांवर वर्चस्व गाजविण्यासाठी त्यांची शिक्षण पद्धती मोडकळीस आणणे आवश्यक आहे, हे जाणले होते.

त्यानुसार आपण भारतीयांना पाहिजे तसे वागवू, हे धूर्त इंग्रजांनी जाणले. इंग्रज राजवटीचा पगडा भारतीय जीवन पद्धतीवर पडला आणि साहजिकच शिक्षण पद्धतीवर त्याचा परिणाम होऊ लागला. या योजनेचा प्रणेता होता मेकॉले. भारतीयत्व नाहीसे करून 'काळे इंग्रज' निर्माण करण्याचे खूप मोठे कुटील कारस्थान रचले गेले, हे आपण जाणतोच.

प्रस्तुत लेखाचा मुख्य विषय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शिक्षण क्षेत्रातील 75 वर्षांचे सिंहावलोकन करणे हा होय. स्वातंत्र्यपूर्व काळात अल्पावधीत मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीची पाळेमुळे खोलवर रुजली गेली होती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही मेकॉले शिक्षण पद्धती समूळ उखडण्यासाठी काही कालावधी जाणे आवश्यकच होते. या पद्धतीमध्ये व्यावसायिक शिक्षणापेक्षा केवळ पुस्तकी शिक्षण देण्याचा प्रघात सुरू झाला.

स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 'राष्ट्रीय शिक्षण' हे प्राधान्य क्रमाने होतेच. वास्तविक पाहता, गेल्या 75 वर्षांपासून म्हणजेच 20वे शतक ओलांडून 22 वर्षे झाली तरी अपेक्षित असणारे बदल, परिवर्तन हे पाहिजे तसे झाले नाही, असे मानावे लागेल. स्वातंत्र्योत्तर काळात गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या अनेक प्रतिकूल गोष्टी समूळ उखडणे हे म्हणावे तितके सोपे निश्चितच नव्हते. भारतीय संस्कृतीची ओळख पुनर्स्थापित करणे, हे प्रमुख उद्दिष्ट असावयास हवे होते. तसा प्रयत्न झालाही. परंतु, त्यांची अंमलबाजवणी पाहिजे तशी झाली नाही हे ही तितकेच खरे!

अगदीच स्वातंत्र्यानंतरचा आढावा घ्यायचा झाला, तर 1948 साली. डॉ. राधाकृष्णन आयोगाने नैतिक शिक्षणावर भर दिला, तर 1952-53 मध्ये मुदलियार आयोगाने नैतिक व अध्यात्मिक शिक्षणास प्राधान्य दिले. श्री. प्रकाश आयोगानेही याच गोष्टींवर भर दिला. 1964 साली. डॉ. गणपतसिंग कोठारी आयोगाने मात्र या गेल्या 16-17 वर्षांतील पूर्वीच्या आयोगांच्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी यांचा अभ्यास करून खूप आमूलाग्र बदल सुचविले. विज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड, त्यातून होणारा विकास आणि जीवनमूल्ये यांचा योग्य समन्वय घालण्यावर भर दिला.

वास्तविक पाहता आजवर सर्व शिक्षणतज्ज्ञांनी अनेक अपेक्षित आणि उपयुक्त अशाच सूचना दिल्या आहेत. परंतु जाणवते असे की, मेकॉलेचा पगडा हा अत्यंत तीव्र असल्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता तो बदलू शकला नाही, हे दुर्देव! यातील आकडेवारी, तांत्रिकता आपण बाजूला ठेवूनच काही गोष्टींचा उहापोह करूया.

आज आपण पाहतो की, पदवीधारक उदंड झाले. पण, परिणामशून्य या शिक्षण पद्धतीमुळे विद्वान पंडितांची संख्या वाढली. परंतु, या शिक्षितास राष्ट्रीय भावना, सामाजिक कर्तव्ये याबद्दलची जाणीवजागृती नाही, असे दिसून येते. भारतीय संस्कृतीबद्दल आदराची भावना जाणवत नाही. तसे पाहता जबाबदार राष्ट्रभक्त नागरिक हेच शिक्षणाचे मूळ आणि खरे उद्दिष्ट आहे.

स्त्रीशिक्षणाची सकारात्मक बाजू

प्रस्तुत लेखाचा उद्देश हा गेल्या 75 वर्षांचा आढावा घेणे हा आहे. त्यामुळे काय व कसे असले पाहिजे, या गोष्टीवर आपण भर दिलेला नाही. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रीशिक्षण! महात्मा फुले, महर्षी कर्वे इत्यादींच्या प्रयत्नाने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ती मात्र आज फोफावल्याचे दिसून येते. समाजाच्या सर्वच घटकांमध्ये स्त्रियांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असे म्हणण्यापेक्षा काकणभर सरसच अशी कामगिरी आज स्त्रियांच्या हातून होते आहे. प्रतिभाताई पाटील आणि नुकत्याच राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू या दोन महिला याचे द्योतक आहेत. उल्लेख करावयाचा झाला, तर महिला आणि त्यांनी पादाक्रांत केलेली क्षेत्रे सांगण्यास कित्येक पाने लागतील. विस्तारभयास्तव टाळूया. आज एकही क्षेत्र असे नाही की, ज्यात महिलांचे अस्तित्व नाही ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

जागतिक पातळीवर भारताचे स्थान यावर विचार केला, तर विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण या क्षेत्रात भारताचा दबदबा आहे. अनेक देशांतून भारतीय डॉक्टर्स, इंजिनिअर्स व कुशल कामगार/तंत्रज्ञान जगभर मागणी आहे. अवकाश क्षेत्रातसुद्धा भारताने भरीव प्रगती केली आहे. परंतु, राष्ट्रभक्ती अभावानेच आढळते. परदेशी विद्यापीठांमधून शिक्षण घेण्याची स्पर्धा वाढतेच आहे. 'दिव्याखाली अंधार' अशीच काहीशी ही अवस्था नव्हे काय? एक जबाबदार नागरिक म्हणून जे वर्तन अपेक्षित असते, त्याबाबतीत दुर्देवाने व्यस्त प्रमाण जाणवते.

मनुष्यनिर्माण हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट, परंतु व्यक्तिगत प्रगतीपुढे राष्ट्रीय प्रगती गौण मानली जात आहे. म्हणजेच शिक्षणाचा पाया हा सर्व बाजूंनी परिपूर्ण नसावा, असे वाटते. जयप्रकाश नारायण म्हणत, 'माणूस परग्रहावर जाऊ शकतो. पण, आपल्या ग्रहावर कसे राहावयाचे, हे शिकू शकत नाही.' भारतीय शिक्षणाचा विचार करता, अनेक त्रुटीही आढळतात. एक म्हणजे जीवन पद्धती आणि शिक्षण याचा सुयोग्य ताळमेळ असल्याचे दिसत नाही. मूल्यशिक्षणाचाही खूप अभाव दिसतो. शिक्षण क्षेत्रात राजकीय आणि सरकारीकरणाचा अनावश्यक पगडा असल्यामुळे त्याचे व्यापारीकरण झाले आहे.

ग्रामीण शिक्षण

ग्रामीण भागातील शिक्षणाबद्दलचे असणारे एकंदरीत औदासिन्य ही देखील तितकीच चिंतेची बाब आहे. आजही देशाच्या लोकसंख्येपैकी 65 ते 70 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यापैकी 85 टक्के ते 90 टक्के लोक कायमस्वरुपी ग्रामीण भागाचे रहिवासी असतात. त्यांना पूरक अशा बाबींचे शिक्षण मिळावयास हवे. त्यांचे जीवन, राहणीमान, संस्कृती व व्यवसाय यांची जवळीक असणारे शिक्षण त्यांना मिळणे आवश्यक आहे. आज दर्जेदार शिक्षण, भौतिक सुविधा या शहरी भागातील विद्यार्थ्यांनाच उपलब्ध होतात.

भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. कृषी क्षेत्रात भारताची भरीव प्रगती आहे, हे नाकारता येणार नाही. पण, त्यामध्ये गुंतलेले मनुष्यबळ अत्यल्प आहे. शिक्षणाच्या कागदी उपलब्धीवर भर दिला जात असल्याने कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणासाठी लागणारा प्रचंड खर्च हा सामान्यांचे डोळे पांढरे करणारा आहे. ग्रामीण भागातील उत्पन्न आणि क्रयशक्ती यांच्या मेळ घालता, त्या लोकांसाठी हे अशक्यप्राय असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैफल्याची जाणीव निर्माण होते. शेतीतून होणारे नगण्य उत्पन्न, त्यातून गरजांची पूर्तता होऊ शकत नाही आणि परिणामी आत्महत्या!

खरे पाहता, ग्रामीण भागातही अनेक बुद्धिमान विद्यार्थी आहेत. परंतु, त्यांच्यासाठी कोणत्याच सोयी उपलब्ध नसतात. ज्यांना शक्य आहे ते गाव सोडून, घरदार विकून शहरात येतात. पण, शहरात सर्वांनाच चांगले अनुभव येतात असे नाही. त्यामुळे 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांची होते.

त्याचबरोबर शासन स्तरावर शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा म्हणावा तसा सकारात्मक नाही. परंतु, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020च्या अनुषंगाने बर्याहपैकी चित्र पालटेल, अशी अपेक्षा आहे. सर्व नियोजनामध्ये केवळ तांत्रिकतेवर भर दिल्यामुळे आत्मारहित व भावनारहित शिक्षण पद्धती दिसून येते. भारतीय शिक्षण पद्धतीत हा दिखाऊपणा वाढल्याचे दिसते. भौतिक संपन्नतेत वाढ, प्रचंड जागा, टोलेजंग इमारती, आधुनिक साधनसामग्री, 'हाय-फाय' संस्कृती यामध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार संस्कृती इत्यादींच्या मागमूसही दिसत नाही. शिक्षण हासुद्धा एक व्यवसाय-उद्योग बनल्याचे दिसते. 'शिकवणी उद्योग' हा नवीन उद्योग सुरू झाला आहे. कोटा, लातूर या ठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

गुणवत्तेचे मोजमाप हे केवळ प्राप्त गुणांवर होत असल्यामुळे राष्ट्रभक्ती वगैरे गौण समजून व्यक्तिगत आर्थिक उन्नतीकडेच केवळ लक्ष दिले जाते, ही बाब चिंतेची आहे. टॅलेंट आहे, ते उद्योग जगतात वापरले जाते. त्यासाठी जबर मूल्य मोजले जाते. पण, यामध्ये समाजोन्नती, संस्कृती, बंधुत्व, भावना यास थारा नाही. परस्पर संबंध हे ही यांत्रिक-रोबोटिक बनत असल्याचे दिसते. त्यामुळे आर्थिक संपन्नतेच्या आधारे उच्चभ्रू समाज आणि सर्वसामान्य यांच्यातील अंतर वाढून माणुसकीची भावना लोप पावत चालली आहे.

मागील उतार्याूत म्हटल्याप्रमाणे, शासन स्वयं अर्थसाहय्यित संस्थांना उत्तेजन देऊन स्वत:वरची जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे हा नवीन 'बिझनेस' सुरू होत आहे. सर्वच बाबींची उपलब्धी, पण आत्मारहित व भावनाशून्य! विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे भौतिकवादाचा भस्मासूर आपणा सर्वांना खाऊन टाकत आहे. भारतासहित अनेक विकसनशील व विकसित देशांमध्ये याची लागण झाली आहे. तरीपण अंधारवाटेमध्ये टिमटिमणार्याव दिव्याप्रमाणे अनेक संस्था आज काम करताना दिसतात. ही एक सकारात्मक बाजू आहे. परंतु, याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे त्याची परिणामकारकता ही दृष्य स्वरुपात समोर येत नाही.

शिक्षणाचे भारतीयीकरण

भारताला खूप प्राचीन असा इतिहास असल्यामुळे गेली कित्येक सहस्र वर्ष तिचा प्रसार-प्रचार संपूर्ण जगभर होत होता. परंतु, 19व्या शतकापासून हा पगडा समूळ नष्ट करण्यामध्ये इंग्रज काहीअंशी यशस्वी झाले, असेच दुदैवाने म्हणावे लागेल. मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीच्या दुदैवी फेरा गेल्या 75 वर्षांत कमी झालेला दिसत नाही. राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्राधान्यक्रमाने असलेल्या शिक्षणविषयक धोरणांना केवळ विरोध म्हणून गौण समजू लागले आहेत.हजारो वर्षे भारतीय शिक्षण संस्कृती व सभ्यता यांचा प्रभाव जगभर होता. म्हणजेच ते टिकाऊ होते, मग ते पुनर्स्थापित केले, तर अपेक्षित गोष्टी साध्य होतीलच ना!

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ इंदुमती काटदरे म्हणतात की, 'शिक्षणाचे भारतीयीकरण कशासाठी? शिक्षण भारतीयच हवे!' 'भारतीयीकरण' किंवा 'भारतीयत्व' याकडे अनेकजण पूर्वग्रह दुषित बुद्धीने पाहतात. वास्तविक पाहता भारतीयीकरण म्हणजे जुन्या बुरसटलेल्या कल्पना पुढे आणणे, धर्माचा विचार पुढे करणे, संस्कृत भाषेचाच वापर व विचार, विज्ञान-तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष आधुनिकतेकडे पाठ असे मुळीच नाही. याउलट एकेकाळी भारतीय शिक्षणाचाच बोलबाला सर्वत्र होता. ज्यामध्ये भारतीय संस्कृती, मानसशास्त्र, नीतीमूल्ये, विज्ञान विविध भाषेतीलल साहित्य, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास अपेक्षित आहे. सुरुवातील उल्लेख केल्याप्रमाणे अनेक शिक्षण आयोगांनी भारतीय अध्यात्माचा वारसा पुढे चालू ठेवण्यांसंबधी सूचना देण्याचे दिसते ते याचेच द्योतक नव्हे काय?

या लेखाला शब्दसंख्येचा संकोच असल्यामुळे हा खूप मोठा विषय असतानाही थोडक्यातच मांडणे इष्ट.

आता 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020'च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. गेल्या 75 वर्षांत अनेक आयोग स्थापन झाले. त्यात अनेक पूरक बाबी सूचविल्या गेल्या. परंतु, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर यात अपेक्षित बदल घडवून आणला जात आहे.

आपल्या शिक्षणाचा केंद्रबिंदू हा पाश्चिमात्य राष्ट्रांकडे झुकला होता, तो पुनर्स्थापित करण्याचे स्तुत्य प्रयत्न सुरु आहेत, ही चांगली बाब. 'जीडीपी'च्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करण्याचे सरकारने ठरविले आहे. अर्थात, यात वाढ हवी. केंद्र सरकारने पुरेसा निधी उपलब्ध केला, तर राज्य सरकारे त्याची अपेक्षित अंमलबजावणी करतील, अशी शक्यता दिसते. हा खूप विस्तृत विषय आहे. राज्य सरकारांनी आपला अभिनिवेश (राजकीय)बाजूला ठेवून देशाला वैभवाकडे नेण्यासाठी हातात हात घालून चालण्याची गरज आहे. 'सा विद्या या विमुक्तये' च्या उक्तीत अनुसरुन धोरण हवे.

भारतीयांची धर्मविषयक कल्पनेची सर्वसमावेशकता समजून घेऊन पुढे चालले पाहिजे. त्यासाठी यामागचे सोयीस्कर विकृतीकरण थांबणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महर्षी योगी अरविंद म्हणतात, 'भारतीय जीवन पद्धतीने मानवास संतोष दिला. तसेच, संयम पण शिकविला.' यातून भारतीयत्वांचे रुढीकरण होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शैक्षणिक प्रगतीचा बृहद् आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून पुढे आला आहेच. त्याच्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आपल्याला अपेक्षित प्रगती दिसेल व साधारण: 2030 -40 या दशकामध्ये त्याचे द़ृष्य स्वरुप पाहावयास मिळेल. तसेच, भारतीयत्वाची पुनर्स्थापना झाल्याचे दिसून येईल.

सर्वकाही चांगले होईल, अशी अपेक्षा करूया!

किरण भावठाणकर