डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

काव्यरंग पुस्तका विषयी....

 🏵️🌼💐🙏🙏💐🌼🏵️

*कविमनाचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या काव्यरंग कवितासंग्रहाविषयी थोडसं* ...............

...................... *श्री एन बी वाघ.* 

.........................औरंगाबाद




मन असावे,,,,,,, 

तेलासारखे तरल, 

पाण्यासारखे पतळ,

बीजा सारखे संवेदनशील, 

आरशासारखे निर्मळ,

जिथं जातं तिथं एकरूप होतं मग

नुसत्या कल्पनेनं हेलावुनी जातं.

हे सगळं करतांना.........

त्यानं मातृभाषेशी इतकं समरस व्हावं की मायबोलीलाही आपला आभिमान वाटावा.

आसंच काहीसं..............

 *काव्यरंग* या कविता संग्रहाच्या रूपानं मनाच्या भावणेच्या विविध छटा शब्दबध्द करणारे *कविमनाचे शिक्षक आदरणीय प्रकाशसिंग राजपुत सर* .............

तसं पाहीलं तर वाचुन पाहण्यातील उशिर प्रतिक्रियेला दिरंगाई करून गेला त्याबद्दल क्षमस्व.

परंतु जेव्हा प्रत्यक्ष वाचन झाले आणि मग मन भरून आले.व मी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल लिहिता झालो.

 *अनेकाविध कविंच्या प्रतिभाशक्तितुन साकारलेल्या काव्यानं मराठी कविता समृध्द झाली हे सर्वास अवगत आहेच.* पण *बालमनाला आकार देतांना आपल्यातील काव्यगुण या कवितासंग्रहाच्या रूपाने एकरूप झाला हे विशेष म्हणावे लागेल.* शिक्षणासारख्या पवित्रा क्षेत्राशी आपली नाळ घट्ट ठेवतांना आपण केलेली निर्मिती कौतुकास्पद व विद्यार्थी प्रेरक राहील यात शंका *नसावी.

काव्यरंग हे पुस्तक खरेदी करण्यासाठी click here...

मन मारून जगण्यापेक्षा मनात आलं की व्यक्त होणं हीच खरी प्रतिभा* ती आपण जपली व आपल्या करिअरला साजेसं काम हाती घेतलं *छोट्यातला मोठा आशय शब्दबद्ध केलात* ही जमेची बाजु असुन आशीच नवनिर्मिती आपल्या हातुन होत राहो.हीच अपेक्षा ठेऊन *आपल्या यापुढील निर्मितीला भरभरून शुभेच्छा देतो.* 

असंख्य कामामुळे मला आजतागायत वेळ भेटला नाही.परंतु आज नांदेडशहरी मुक्कामास आसतांनाही न राहुन आपल्या काव्यसंग्रहाबद्दल मला थोडं व्यक्त होणं क्रमप्राप्त वाटलं.

.................. *आपला स्नेहांकित* 

..................... *श्री एन बी वाघ* 

.............................औरंगाबाद

🏵️🌼🙏🙏💐💐🙏🙏🌼🏵️

माझ्या मना.... नविन गाणे

 आपल्या बांधवाने कला क्षेत्रात या गीताच्या रुपाने पदार्पण  केलेले आहे. नक्कीच त्यांच्या यशस्वी भवितव्याचे आपण सारे साक्षीदार होऊ या. सर्वांना विनंती जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व सरांचे युटूब चॕनल सबस्क्राईब अवश्य करा.





https://youtu.be/ZUEfdqtdp00

 

मी प्रताप गीते माझे पहिले रोमँटिक सॉंग घेऊन आलेलो आहे तरी गाणं नक्की *like* करा माझं चॅनेल *subscribe*  आणि   व्हिडीओ जास्तीत जास्त *share* करा.


 *गीतकार /गायक* - *प्रताप्  गिते सर* 


 *संगीत संयोजन* - संजय पाठक 

 *सिनेमॅटोग्राफी* - कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


 *एडिटिंग* -कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


Lyrics – Pratap Gangadhar Gite

Music Director : Pratap Gangadhar Gite

Music Arranging & Recording Studios : Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Singer - Pratap Gangadhar Gite

Direction - Kailas Bhalekar 

Cast : Pratap Gite , Asha Gite , Athang Gite , Ojaswi Gite

Special Thanks : Sagar Labade ,  Naresh Sonawane , Mahesh Muke , Yogesh Khandagle , AC collection 

Music Credits Music Composer & Arranger : Pratap Gite - Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Video Credit - Direction - Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

DOP -  PRAPTI  PHOTOS & FILMS , Rushi Shinde , Mayur Gaikwad , Suyog More 

Editing – Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. 



मुलांच्या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी मंडळाच्या वतीने शिक्षकांना प्रश्न विचारले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी आणि याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यभरातील शिक्षकांकडून त्यांची मतं जाणून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तकातच लिहिण्यासाठी वह्यांची पानं लावण्याच निर्णय घेण्यात आला होता.

यामध्ये इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रमुख विषयांसाठी किती पानांच्या वह्या लागतात याची माहिती शिक्षकांना भरायची आहेत. त्यासोबतच आणखी प्रश्न या संदर्भात शिक्षकांची मत जाणून घेण्यासाठी विचारले आहेत.

शिक्षकांना खालील  प्रश्न विचारले जात आहेत...

कोणत्या इयत्तेपासून पाठाच्या नोंदी वह्यांमध्ये काढतात ?

वह्याची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यात विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल ?

वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यास वहीचा वापर थांबेल का ?

या योजनेचा लाभ वर्गातील किती टक्के विद्यार्थ्यांना होईल ?

वर्गात शिकत असताना विद्यार्थी या पानांवर महत्त्वाच्या नोंदी नोंदवतील का ?


या योजनेबद्दल आपण आपले मत नोंदवावे ?

आपण ही याबाबत आपला अभिप्राय नोंदवा...लिंक वरील माहिती भरण्यासाठी click here


याबाबत शासनाचा उद्देश -

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने

वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केली


चलो आझाद मैदान .... आदर्श समितीचे आंदोलन

 राज्यव्यापी लक्षवेधी धरणे आंदोलन'


प्रमुख मागण्या : 

दि. १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये. राज्यातील शिक्षकांना मुख्यालय वास्तव्याची अट रद करावी. 



राज्यातील उपशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक रिक्त पदे पदोतीने तात्काळ भरावे. 

राज्यातील डी. एड., बी. एड्.. उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी संधी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.

 राज्यातील सर्व इयतेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात याव्यात. 

वस्तीशाळा शिक्षकांची मुळे नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा. 

सर्व प्रकारच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. 

सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी.

 शिक्षकांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( १०:२०:३० ) लागू करावी. 

विहित मुदतीत MSCIT उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांकडून होत असलेल्या वसुली थांबवावी.

वसुलीस तात्पुरती स्थगिती न देता MSCIT चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावी व विनाविलंब पद निर्मिती करून सर्व पात्र शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी. 

सर्व प्रकारचे अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना शिकवू द्या, मराठी शाळा टिकवू द्या. 

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा. नगर पालिका शाळांमध्ये कला / क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्वा तात्काळ करण्यात याव्यात. 

विधान परिषदेतील शिक्षक आमदार मतदार या संघात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा.

 जिल्हा परिषद प्रशालेतील माध्यमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात याव्यात. 

केंद्रीय शाळांची नव्याने पुनर्रचना करून प्रत्येक केंद्रीय शाळेत संगणक ऑपरेटर. लिपीक व शिपाई पदे भरण्यात यावीत.

 सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ मिळावा.



 राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी. 

उपशिक्षण अधिकारी पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या मुलाखती घेऊन नियुक्त्या देण्यात याव्यात.

 राज्यातील आंतर जिल्हा बदली प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करावी व जिल्हा अंतर्गत बदली करिता जिल्हा स्तरावर सॉफ्टवेअर कार्यान्वीत करून प्रक्रिया राबवावी, वर्ष वर्षभर सुरू असलेला माहितीचा गोंधळ थांबवावा. राज्यातील शिक्षण विभागाला या कामी वर्षभर गुंतवून ठेवून नये. पूर्वी प्रमाणे जिल्हा स्तरावर प्रक्रिया राबवावी.

अशा प्रमुख मागण्या मांडत आदर्श शिक्षक समिती धरणे आंदोलन घोषीत केलेले आहे.

औरंगाबाद खंडपीठाने सचिवांना बजावली नोटीस

 गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शासन निर्णयास आव्हान देणारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र व्ही.घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए देशमुख यांनी राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.



 याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी अॅड. सईद एस शेख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

 तर मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल साडेआठ हजार शिक्षकांचे घरभाडे भत्ता थांबवण्यात आला आहे.

 म्हणून याप्रकरणी शिक्षक संघटनेने न्यायालयात धाव घेतली असून, शिक्षकांवर तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असल्याचं याचिकेत म्हटले त्यामुळे आता याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

बदली सुधारित आदेश पहा....

त्यामुळे आता याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

सणावर आधारित निबंध लेखन

 *निबंध लेखन नमूना*




*माझा आवडता सण ....दिवाळी*



दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी येताच लोक आपल्या घराची साफसफाई करायला लागतात. नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खातात, दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी व गणपतीची पूजा केली जाते.


दिवाळी या सणाची हिंदू धर्माचे लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडता सण आहे. दिवाळी हा भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला पूर्ण देशात प्रत्येक वर्षी साजरे केले जाते. रावणाला पराजित केल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान राम आपले राज्य अयोध्येला परत आले होते. त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी दिवाळी साजरी करून त्यांचे स्वागत केले होते. 




आज सुद्धा लोक या दिवसाला त्याच उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा दिवस एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. शीख धर्माच्या लोकांद्वारे हा सण त्यांचे सहावे गुरू श्री हरगोविंदजी यांची जहांगीर बादशहाच्या कैद मधून सुटका झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो.



या दिवशी बाजाराला नववधू सारखे सजवले जाते. अनेक प्रकारचे लाईट, कंदील, फटाके, घर सजावटीचे साहित्य, मिठाई, मेणबत्या, गिफ्ट इत्यादी गोष्टींना विशेष प्रमाणात विकले जाते. बाजारात पण या सणादरम्यान विशेष गर्दी असते. लोक आपल्या घराला स्वच्छ करतात. आणि उत्सव येण्याच्या काही दिवस आधी रंगबिरंगी उजेडाने सजवतात. 

हिंदु कॅलेंडर नुसार सूर्यास्त नंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणेश भगवान ची पूजा करतात. ते आशीर्वाद, आरोग्य, धन आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. गोड मिठाई बनवल्या जातात. लोक या दिवशी चांगले संकल्प करतात व वाईट सवयींना त्यागतात.

दिवाळी चा पहिला दिवस धनत्रयोदशी चा असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी ची पूजा केली जाते. लोक सोन्याची खरेदी देखील करतात. देवी लक्ष्मी ची पूजा व आराधना केली जाते. दिवाळी चा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो. या दिवसाला भगवान कृष्ण ची पूजा केली जाते. भगवान कृष्ण ने याच दिवशी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. 

तिसरा दिवस दिवाळी चा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला संध्याकाळी नातेवाईक, मित्र, शेजारी व जळणाऱ्या फटाक्या सोबत मिठाई आणि भेट वस्तू देत देवी लक्ष्मी ची पूजा करत साजरे केले जाते. चौथ्या दिवशी भगवान कृष्ण ची पूजा करून गोवर्धन पूजेचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर पूजा करून शेनापासून गोवर्धन पर्वत बनवतात. पाचवा दिवस भाऊबीजचा असतो. या दिवसाला भाऊ बहीण साजरा करतात. बहिण आपल्या भावाला आरती ओवाळते व भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तु देतो. 


आशा पद्धतीने अतिशय आनंदात, संपूर्ण कुटुंबासोंबत दिवाळी चा हा सण साजरा केला जातो. दिवाळी च्या काळात शाळा कॉलेज ला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या असतात. ज्यामुळे दिवाळी सणाचा आंनद आणखीनच वाढून जातो. आणि म्हणूनच इत्यादि अनेक कारणांमुळे माझा आवडत सण दिवाळी आहे.

बदली सुधारित आदेश

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार निर्गमीत करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार असल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र. ४ येथील दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र रद्द करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.

सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.

आजचे सुधारित पत्र पहा.... 








बदलीचा आदेश निर्गमित

 जिल्हातंर्गत बदली बाबत आज दि २० आॕक्टोबरला पत्र आले असून बदली बाबतचे वेळापत्रक व संपुर्ण कार्यवाही स्पष्ट करण्यात आलेली आहे.

हे पत्र आपण खाली पाहू शकता.👇






बदली अपडेट

 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत डिजिटल स्कूल समूह  महाराष्ट्रावर गेल्या आठवड्यामध्ये दिलेली बातमी तंतोतंत खरी उतरली असून ग्रामविकास विभागाचे परवानगी आता बदलींसाठी प्राप्त झालेली आहे .

!

यापुढे आता बदलीची सर्व प्रक्रिया चालू होणार आहे जे बांधव 2018 19 मध्ये लांब गेले होते त्यांना जवळ येण्याची संधी आता प्राप्त होणार आहे .शैक्षणिक क्षेत्रातील  तःतोतंत बातमी भेटण्यासाठी  डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र असे वेब मध्ये सर्च करा.

याबाबत डिजिटल समूहाची बातमी पहा...

🔅Breaking News🔅

❄️ *बदली इच्छुक बंधू भगिनीसाठी आनंदवार्ता.* ❄️


*जिल्हातंर्गत बदली फाईलवर ग्रामविकास मंत्री महोदयांची स्वाक्षरी झाली असून बदली प्रक्रिया सुरू होईल.*

👉 मा.गिरीश महाजन साहेबांनी बदली फाईलवर स्वाक्षरी केली असून सचिव वळवी साहेब यांना पोर्टल सुरू करण्यास सांगितले आहे.कदाचित उद्या पोर्टल सुरू होईल.

💥 असे वृत्त हाती येत आहे.💥

वाबळेवाडीला शिक्षणमंत्री जाणार

  लोकवर्गणीतून मोठ्या दिमाखात उभ्या झालेल्या  जागतिक दर्जाच्या वाबळेवाडी शाळेवर बहिष्काराची वेळ आणणा-या पुणे जिल्हा परिषद प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणमंत्री यांनी लवकरच शाळेवरील बहिष्कार मागे घेण्यासाठी स्वत: वाबळेवाडीत येत असल्याचे आजच्या मुंबई येथील बैठकीत जाहीर केले .



दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने झालेल्या तातडीच्या बैठकीत मंत्री केसरकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना समज दिली व आपल्या वाबळेवाडे 

दौ-यावेळी आयुष प्रसाद यांना हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे .



शुक्रवारी  वाबळेवाडी शाळेतील सर्व पालकांनी एकत्र येवून शाळेवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.

 शाळा उभारणी केलेले मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे सव्वा वर्षांपूर्वी केलेल्या निलंबनानंतर ग्रामस्थांवर कारवाई करायला निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शाळा बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तातडीने वाबळेवाडीत ग्रामस्थांची बैठक घेवून तेथूनच शिक्षणमंत्री केसरकर यांची बैठक घेतली .

शाळेत घेतलेला उपक्रम खूपच अफलातून ... पहा कोणती शाळा

संध्याकाळी सात ते रात्री नऊपर्यंत झालेल्या या बैठकीत केसरकर यांनी वाबळेवाडीकरांकडून सर्व माहिती घेतली व प्रशासनाची बाजु जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक  संध्या गायकवाड यांचेकडून फोनवर समजून घेतली. यावेळी त्यांनी लोकवर्गणी आणि वेगळे उपक्रम शाळांना प्रोत्साहनऐवजी त्रास दिला जात असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे थेट सांगितले. या शिवाय शासकीय कर्मचारी यांचे प्रतिनिधी म्हणून सीईओ आयुष प्रसाद हे असताना त्यांनी शाळेत न येताच कारवाया सुरू करणे यामुळे आपण त्यांचेवर प्रचंड नाराज असल्याचे त्यांना तात्काळ कळविण्यास सांगितले.


शालेय शिक्षणमंत्री राजस्थान दौऱ्यावर

 शिक्षण मंत्री दीपक केसरकर  हे राजस्थानची शिक्षणातील प्रगती जाणून घेण्यासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत.



शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेवर पालक, शिक्षक, शिक्षण तज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, डॉक्टर या सगळ्यांनी टीका केली. मुलांच्या आणि पालकांच्या मनावर रोजच्या अभ्यासामुळे आणि कालबाह्य परीक्षा पद्धतीमुळे जे मानसिक आणि बौद्धिक ओझं निर्माण होतं, ते आधी कमी करायला हवं, अशी मागणी त्यावेळेला केली गेली होती. या मागणी नंतर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला होता की, त्याबद्दल निर्णय अजून व्हायचा आहे. 

राजस्थान मधील शिक्षण देशात उत्कृष्ट -


 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ईटीव्ही भारतने राजस्थान मध्ये धडे गिरवण्या बाबत कारण विचारले असता त्यांनी खुलासा केला, आम्ही राजस्थानमध्ये शिक्षणाचे झालेले प्रयोग पाहण्यासाठी जात आहोत. मी स्वतः आणि शिक्षण विभाग देखील सोबत असणार आहे. आम्ही प्रथम जयपुर येथे जाणार आहोत जेथे शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य झालेलं आहे. आम्ही ते समजून घेणार आहोत. त्यानंतर चंदीगड, हरियाणा असा दौरा करून मग महाराष्ट्रात परतणार आहोत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणार आहोत. त्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरणार आहे.

महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे नाही राहिलं पाहिजे:

राजस्थानमध्ये जाण्याचं कारण असं की राजस्थानामधील सिक्कर-झुंझुनू व जयपूर हे असे जिल्हे आहेत जेथील सरकारी शाळा ह्या सर्वोत्तम श्रेणीमध्ये गणल्या जातात.

 केंद्र सरकारच्या 2020 च्या शालेय शिक्षणा संदर्भात अहवालात राजस्थान देशात प्रथम क्रमांकावर होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिक्षण विभाग तेथून धडे गिरवून आल्यानंतर राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विषमता किती दूर करतात, राज्याला गुणात्मक दृष्ट्या किती प्रगतीपथावर नेतात, हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र त्यासाठी शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ञांनी यांना यावर लक्ष ठेवावंच लागणार.



किल्ले बनवा स्पर्धा

 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई कुबेर* येथे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंद उत्साह होता दोन दिवसाच्या प्रचंड मेहनतीने छोट्या मावळ्यांनी दगड माती चिखल कालवून छोटी छोटी किल्ले बनवली छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा वारसा जपण्याचा या उपक्रमातून एक अनोखी प्रेरणा लेकरांना मिळाली यामुळे त्यांच्यातील

*योग्य नियोजन*

*एकीची भावना*

*शिवरायांबद्दलचा प्रचंड आदर*

*सामूहिक श्रमदान* 

*ऐतिहासिक प्रसंगाची अनुभूती*

या वर्षा अनेक मूल्याची रुजवणूक झाली 

किल्ले बनवताना मुले प्रचंड उत्साही आनंदी आणि दोन वर्षाचया करोना काळानंतर यावर्षीच्या मुक्त वातावरणात मुलांनी दगड माती विटा जमा करून स्वतः बनवलेले किल्ले यातून त्यांना एक वेगळाच आनंद मिळाला यावेळी शाळेतील आमचे सर्व शिक्षक सहकारी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी ही किल्ले पाहण्यासाठी व लेकरांचे कौतुक करण्यासाठी आले होते गेल्या पंधरा वर्षापासून करुणा काळ वगळता मी ज्या ज्या शाळेवर असतो त्या शाळेत हा दिवाळीच्या सुट्टी पूर्वीचा माझा खूप आवडता व विद्यार्थ्यांचा प्रचंड आवडता उपक्रम आहे शिवरायांच्या कार्याला या माध्यमातून  प्रचंड आदर ठेवून त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी जी गड किल्ले राखली व संवर्धन केली त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा

🙏 *कालिदास रणनवरे*

    जि.प.प्रा. शा. गेवराई कुबेर

केंद्र करमाड , ता/ जि.औरंगाबाद 





हात धुण्याचा शोध....

 हात धुण्‍याचा शोध....इतिहास 


"स्वच्छ धुवून वारंवार हात...
       रोगांची येणार नाही साथ..."


    जगात हात धुण्याचे महत्त्व करोनानंतर नक्कीच सर्वत्र पटलेले आहे. परंतु याबाबतीत जगात नेमकी केव्हा कशी ओळख झाली हे पाहणे आपल्यासाठी रंजकदार होणार आहे.

      युरोपमध्‍ये सन इ.स.1840 मध्‍ये डॉ.ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्‍यू होत होता. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना स्‍त्रीला हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळ-जवळ 50% नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍याच्‍या मार्फत घरा-घरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
     हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे.

आपण सारे हात धुऊ .... नविन जबरदस्त गीत....

आपण सारे हात धूवूया..या रे या सारे.
साबण लावून हात धूवूया..जंतू घालवू सारे..//धृ//

साबण लावा हाता वरती..
चोळा त्याला मागे पुढती...
हात चोळूनी फेस करा रे..जंतू जातिल सारे......(1)

बोटांच्या या...फटीत जंतू...
घासून त्यांना...मारून टाकू...
घासा..रगडा..पाणी टाका..स्वच्छ हात धूवा रे .....(2)

हात पूसाया...रूमाल घ्यावा..
हात पूसूनी...स्वच्छ करावा..
उरले सुरले..सर्वही जातिल...स्वच्छ हात धूवा रे...(3)

हात धूण्याचा...ध्यास धरा रे...
आरोग्याचा...हा मंत्र खरा रे...
कास धरूनी सूदृढतेची...करा संकल्प नवा रे....(4)

शपथ घेवूया..हात धूण्याची...
अस्वच्छतेला...संपवण्याची...
रोगराईला विराम देवू...निश्चय हाच हवा रे...(5)


हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू...




       आमच्या मुरुमखेडावाडी शाळेने सन २०२० मध्ये तर करोना परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन फॉर चेंज अंतर्गत शाळेच्या समोर वाडीच्या लोकांना बाहेरून आल्यावर हात धुण्यासाठी व्यवस्था केली व हात धुण्याबाबतीत सतत प्रात्यक्षिक ही दिले. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या दिड वर्षात करोना वाडीत आलेला नाही.


पुष्‍कळ लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहितीच नाही. हात धुण्‍याचे पाच टप्‍पे आहेत. सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्‍हणजे नखे ही स्‍वच्‍छ होतील व पाणी वापरुन हात धूवून घ्‍यावेत.
   

१५ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस


हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
       
खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे
दुषित पाणी किवा अन्नातून ,आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास...अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास अनेक सुक्ष्म विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच फुफ्फुस्, यकृताचे  आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
               
या रोगांचा प्रसार रोखता येतो  तो म्हणजे नियमित स्वच्छ हात धुवून


   
    स्वच्छ हात धुण्याची पद्धत
१)प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी.   
२) हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा.

३)दोन बोटांमधील बेचक्या तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी.
४)हात धुतांना साबण कमीत कमी 20 सेकंदापर्येत ठेवणे आवश्यक आहे.
५)हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे.
       
          हात कितीवेळा व कधी धुवावे...




दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर
जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी
शौचालयाचा वापर केल्यानंतर
पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर
सापसफाई केल्यानंतर
आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर
बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर

हात धुण्यासाठी निश्चित संख्या नाही फक्त ती एक सवय व्हावी जेणेकरून आजारांना आळा बसून येईल.

       प्रकाशसिंग राजपूत
          औरंगाबाद 


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

देवा सुखाने शिकवू कधी...

 देवा सुखाने शिकवू कधी....



शाळेची वाजत घंटा रोज चालत होती  भारी,

व्हाटसअप आल्यापासून बिघडली  सारी,

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



कोरोनाने विणला  होता मोठा सापळा,

शाळेला लागला होता भला मोठा ताळा...

सांग सांग देवा  सुखाने शिकवू

 कधी....



प्रयोगाची बनली आॕनलाईनची शाळा,

नेटवर्क नव्हता मोबाईल खिशात बाळा,

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



करोनाला बसली एकदाची दातखिळी,

शिक्षण देतांना रोजच परिपत्रकाने भरे शिक्षकांची झोळी,

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



वैतागून सोडते व्हाटसअप वरील दरारा,

साहेब 🫴 म्हणी वरच्या साहेबांचा  आदेश करारा

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



शाळेला लागली आता पटसंख्येची चिंता,

शिक्षण झरा लागला आटायला पटसंख्या गिणता...

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



 *🖋️प्रकाशसिंग राजपूत🖋️*

9960878457 

      औरंगाबाद




सुट्टी झाली कमी...

 औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या पत्रामुळे शिक्षकांच्या तब्बल आठवडाभराच्या सुट्ट्या कमी झालेल्या आहेत.

 प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्टीचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर इतका होता परंतु आमदारांनी पत्र दिल्यामुळे या सुट्ट्या कमी करून 22 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर अशा करण्यात आलेले असून याबाबतीत औरंगाबादचे शिक्षक श्री महेश लबडे यांनी प्रत्यक्ष आमदारांना फोनवर याबाबतीत विचारणा केली .


खाली आपण काॕल ऐकू शकता.




शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीचे निषेध


विद्यार्थ्यांनी शेळया वळायला मागितले

 

'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या', अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.



इगतपुरी  तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिक  जिल्हा परिषदेवर  निघाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करू नये म्हणून ऑगस्ट महिन्यात देखील इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन केले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात शाळा बंद करणार नाही असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर पालक सभेत शाळा बंद करण्याचे पत्र वाचून दाखविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली. तेव्हापासून ही शाळा बंद आहे.

येथील 43 विद्यार्थी हे पालकांकडून किंवा एकमेकांना शिकून शाळेचा विसर पडू देत नाही.

दरम्यान आता येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाची मशाल घेतली असून हे विद्यार्थी नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. 'आम्हाला शाळा नको, शेळ्या वळायला द्याव्यात' अशी अनोखी मागणी घेऊन 43 विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयाकडे निघाले आहेत. आपले दप्तर पाठीला लावून आणि सोबत शेळ्या घेऊन विद्यार्थी घोषणा देत आहेत. प्रशासनाचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून दप्तर जमा करण्यात येणार आहे. यासोबतच आम्हाला शाळा नको आता शेळ्या द्या अशी मागणीही केली.

नेमके  प्रकरण काय ?

दरेवाडी गावानजीक भाम धरण बांधण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना विस्थापित करण्यात आले. येथून जवळच म्हणजेच चारशे ते पाचशे मिटर अंतरावर गाव विस्थापित करण्यात आले. 

त्याचबरोबर येथील शाळा देखील त्या गावात उभारण्यात आली. मात्र येथील 30 ते 35 कुटुंबांनी विस्थापित होण्यास नकार दिला. परिणामी 43 विद्यार्थी देखील जुन्या गावात राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला इथेच शाळा असायला हवी. मात्र सर्व शिक्षा अभियानानुसार एक किलोमीटर परिघात शाळा असणे अनिवार्य आहे. त्यानुसार संबंधित 43 विद्यार्थ्यांसाठी विस्थापित गावात शाळा उभारण्यात आली आहे. ही शाळा या गावापासून अवघी चारशे ते पाचशे मीटरवर आहे, मात्र तरी देखील 43 विदयार्थ्यांची मागणी आहे कि शाळा इथंच पाहिजे.


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीने निषेध



NMMS 2022-23 परीक्षा बाबत सूचना

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ प्रसिद्धी निवेदनाबाबत आजचे पत्र .


 परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर

२०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

आजचे आदेश पहा....


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीचे निषेध






१०,२०,३० आश्वासित बाबत महत्त्वाचा आदेश

  ज्या कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि. ०१.०१.२०१६ पूर्वीच पहीला लाभ मंजूर केला आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांची १२८ अशी २० वर्षाची सेवा, ही दि. ०१.०१.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. ०१.०१.२०१६ पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल." या उपपरिच्छेदाखालील तक्त्यामध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. सदर प्रकरणी आता सदर तक्त्यात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


पहा सविस्तर आदेश....




जिल्हातंर्गत बदली बाबत आजची अपडेट

जिल्हातंर्गत बदली अपडेट

  जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा शुभारंभ आता ग्रामविकास मंत्रालय आदेशानंतरच होणार आहे .



एक प्रकारे बदली प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली असून याबाबत पुढील निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी आता मात्र  मंत्रालयीन परवानगी  स्वरूपाचे असल्याने यामुळे बदली प्रक्रिया थांबलेली आहे.

 जिल्हा परिषदेच्या स्तरावरील यादी प्रसिद्ध करणे , रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे याच बरोबर अवघड क्षेत्राची यादी घोषित करणे या प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेल्या असून केवळ मंत्रालयीन आदेशाची आता वाट पाहिल्या जात आहे .

एकदा जर  आदेश प्राप्त झाल्यास  जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

 एक विचार केल्यास सहा महिन्याच्या अंतरात मध्ये दोन वर्षाच्या बदल्या होणार आहे 2022- 23 च्या बदल्या या दिवाळीत होणार तर 2023- 24 च्या बदल्या या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे एकूणच या कालावधीमध्ये सर्वाधिक शिक्षकांच्या बदल्या या होणार आहेत .

ऑनलाईन बदली मध्ये होऊ घातलेल्या या सर्व बदल्या एक प्रकारे भरपूर काही बदल शिक्षण क्षेत्रामध्ये घडून आणणार आहेत.

 निश्चितच लवकरच बदली प्रक्रिया गती घेण्यासाठी  जिल्हांतर्गत बदलीचा शुभारंभाचा आता केवळ मंत्रालयीन आदेश येणे  बाकी आहे.

  प्रकाशसिंग राजपूत

   समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 


शाळा बंद करण्याचा असा केला छातभारतीने निषेध




१०० पेक्षा जास्त गाड्यांना पोस्टर लावून छात्रभारतीने केला शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध

 

शिंदे गटाच्या  मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.


"शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका "

"जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा"

"एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती"

"बसला भरले १० कोटी , शिक्षण नेले मागे आश्वासन खोटी"

अशा आशयाचे स्टीकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्याध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




लवकरच मेगाभरती शासन आदेश आला.

 शासन निर्णय अधिक्रमित करुन पदभरतीबाबत खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत.


(१) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.


(२) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत, त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर किमान एक पद भरता येईल.

शासन निर्णय क्रमांका पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क.


(३) कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत दि.०४.०५.२०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध



करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२२१००३११०३१९१७०५ असा आहे.



मुरुमखेडावाडीचे सुपर हिरोज...

 दूर डोंगर भागात असलेल्या मुरूमखेडावाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे विजेच्या समस्यावर मार्ग  काढला व त्याबद्दल जी स्टोरी तयार करण्यात आलेली डिझाईन फॉर चेंज अंतर्गत ची स्टोरी आमचा अभ्यास कट्टा ....

  विद्यार्थ्यांनी अचानक लाईट गेल्यावर अभ्यास होत नसायचा त्यावेळी या समस्येवर  उपाय म्हणून मारुतीच्या मंदिरासमोरील सोलार वीज दिवा वाडीतील मोठ्या मुलांचे सहकार्याने अंगणवाडीच्या वटयावर बसविला होता.

 तेथे सर्वजण अभ्यासाला संध्याकाळी बसायला  येऊ लागली,

 यामुळे त्यांचं एकत्र येऊन गटामध्ये अभ्यास चांगल्या प्रकारे झाला व गुणवत्तेची प्रगती ही दिसून आली.

 आपण खालील व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टोरी पाहू शकता सन 2019 मध्ये शाळेतील हा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवून डॉट इन स्टोरीमध्ये बक्षीस सुद्धा जिंकलेले आहे




इयत्ता ६ वी संकलित चाचणी

 

इयत्ता ६ वी संकलित चाचणी




इयत्ता ५ वी संकलित चाचणी

 

इयत्ता ५ वी संकलित चाचणी




इयत्ता ४ थी संकलित चाचणी

 

इयत्ता ४ थी संकलित चाचणी 




इयत्ता ३ री संकलित चाचणी

 

इयत्ता ३ री संकलित चाचणी




इयत्ता १ ली संकलित चाचणी

 

इयत्ता १ ली संकलित चाचणी




इयत्ता २ री संकलित चाचणी

इयत्ता २ री संकलित चाचणी




 

१ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणी

 १ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणी




संकलित चाचणी प्रथमसत्र नमूना चाचणी

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व शिक्षक मित्र समूह नगर यांच्यातर्फे संकलित मूल्यमापन प्रथम सत्र नमुना चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.



 इयत्ता पहिली ते चौथी सेमी माध्यम तसेच इयत्ता पहिली ते सहावी मराठी माध्यम नमुना दाखल ही चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आपल्या वर्गासाठी आपण आवश्यक त्याप्रकारे चाचणी तयार करावी.  


१ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणी



इयत्ता १ ली संकलित चाचणी




इयत्ता २ री संकलित चाचणी




इयत्ता ३ री संकलित चाचणी




इयत्ता ४ थी संकलित चाचणी



इयत्ता ५ वी संकलित चाचणी



इयत्ता ६ वी संकलित चाचणी



इयत्ता ७ वी संकलित चाचणी



इयत्ता ८ वी संकलित चाचणी






आकारिक चाचणी डाऊनलोड करा....




विशेष सहकार्य 
श्री मच्छिंद्र कदमसर

संकलन 
प्रकाशसिंग राजपूत 
समूहनिर्माता 
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

टीम डिजिटल व शिक्षक मित्रसमूह