मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना.....
🚨 🚓सदरक्षणाय...🚓🚨
सदरक्षणास मिळत नवं बळ,
खलनिग्रहणास बनत काळ,
या जन्मी होत अशी जनसेवा ,
लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा...
दिवस रात्र सदैव उभे राहती ,
शांती समाजास तेव्हाच लाभती,
येता संकट कसलेही जेव्हा,
खाकीत शोभूनी वीर हे लढती...
( सदरक्षणास मिळत नवं बळ,
खलनिग्रहणास बनत काळ,)
सक्त घडत यांचा असा पहारा,
वाटत कठोर जरी यांचा दरारा,
मन आतुन असतेच कोमल,
मानवी सेवेत स्वतःस ठेवे जहाल,
( सदरक्षणास मिळत नवं बळ,
खलनिग्रहणास बनत काळ,)
अतिरेक्यांशी लढला उभ्या छातीने,
दिसे फक्त जनकल्याण खाकीने,
धावूनी देत जीव ओवाळून,
प्रेम असे मायभुचे मृत्यूस कवटाळून...
( सदरक्षणास मिळत नवं बळ,
खलनिग्रहणास बनत काळ,)
*🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*
औरंगाबाद
9960878457
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.