डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढाल...

 ई-श्रम कार्ड पोर्टल




असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.


एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.

इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट म्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.

त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.

पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validate वर क्लिक करायचं आहे.

मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other details वर क्लिक करायचं आहे.

आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yes नसाल तर no वर टिक करायचं आहे.

त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.

पुढे पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.

त्यानंतर मग तुम्ही याठिकाणी किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. हे झालं की मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

आता शैक्षणिक माहीत भरायची आहे. इथं सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचं आहे आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडा निवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

शिक्षणाचा हक्क आंतरराष्ट्रीय स्वरूप #Righttoeducation,

 शिक्षणाचा हक्क एक  वैश्विक हक्क आहे.

 एक असा हक्क जो मानवी हक्क  म्हणून ओळखला जातो . आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वरील आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाचा हक्क म्हणजे सर्वांसाठी मुफ्त सक्तीचे प्राथमिक शिक्षण तसेच माध्यमिक शिक्षण सर्वांसाठी वापरण्याजोगे करावे म्हणून एक बंधन तसेच ज्या लोकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही कले,त्यांच्यासाठी पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षणाच्या हक्कात येते . कमीत कमी प्रमाण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सर्व पातळीवरील भेद्भ्व कमी करण्याच्या बंधनाचा शिक्षणाच्या हक्कात  समावेश होतो. 


 आंतरराष्ट्रीय कायदेशीर आधार -

  शिक्षणाचा  हक्क  हा मानवी हक्काचे वैश्विक प्रतिज्ञापत्र यातील २६ व्या लेखातील एक कायदा आहे . आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन यातील २०० वा  आणि १४ वा कायदा आहे  .१९६० मध्ये शिक्षणाचा हक्क    मानवी हक्कांचे उनेस्को अधिवेशन यांच्याकडून आणि १९८१ मध्ये स्त्रीयान्विरोधात सर्व प्रकारचे  भेदभाव हटवण्याचे  अधिवेशन  यात पुन्हा एकदा ठासून सांगितले आहे.. युरोपेमध्ये मानवी हक्कांवरील युरोपिअन अधिवेशन च्या पहिल्या मुल प्रतीच्या दुसऱ्या लेखानुसार शिक्षणाचा हक्क हा एक मानवी हक्क म्हणून ओळखला जातो आणि शिक्षणाचा अधिकार निर्माण करण्यासाठी समजला जातो .आंतरराष्ट्रीय  आर्थिक,  सामाजिक, आणि सांस्कृतिक करारानुसार .स्त्रौस्बेर्ग्मधील मानवी हक्कांचे युरोपियन न्यायालयाने हा नियम लागू केलेला आहे उदाहरणार्थ - बेल्गीम भाषाविषयक घटना ..युरोपमधील सामाजिक सानादेतील दहाव्या घटनेत स्वताच्या आवडीचे शिक्षण घेण्याच्या अधिकाराची हमी देते .  

 व्याख्या - शिक्षण म्हणजे औपचारिक ,संस्थात्मक सूचना . साधारणपणे आंतरराष्ट्रीय साधने हा शब्द या अर्थाने वापरतात आणि आंतरराष्ट्रीय मानवी 
हक्क साधने यांच्याकडून  जतन केलेला शिक्षणाचा 
हक्क प्रथमिकपणे  एका अर्थाने वापरला जातो .
 १९६०  मध्ये युनेस्को प्रकरण शिक्षणाची व्याख्या खालीलप्रमाणे देते - शिक्षणाचे सर्व प्रकार आणि पटली त्यामध्ये शिक्षणाचे वापर प्रमाण आणि शिक्षणाचा दर्जा तसेच अटी ज्यांवर ते दिले गेलेले आहेत   एका मोठ्या अर्थाने शिक्षणाचे वर्णन खालीलप्रमाणे केले जाते -अशा सर्व हालचाली (क्रिया) ज्यामुळे एक मानवी समूह त्यांच्या वंशजांना एक ज्ञान आणि प्राविण्य देतात आणि एक नैतिक संकेत पण देतात  जे त्यांना  अस्तित्वात राहण्यास मदत करतात  .या अर्थाने शिक्षण म्हणजे पुढच्या पिढीला दररोजच्या जगण्याची कार्ये करण्याची कौशल्ये देणे आणि एका विशेष समूहाचे सामाजिक,सांस्कृतिक अध्यात्मिक आणि तात्त्विक मूल्ये देणे    शिक्षणाचा हक्क हा एक  वैश्विक हक्क आहे. एक असा हक्क जो मानवी हक्क  म्हणून ओळ-खला जातो . आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वरील आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाचा हक्क म्हणजे सर्वांसाठी मुफ्त सक्तीचे प्राथमिक शिक्षण तसेच माध्यमिक शिक्षण सर्वांसाठी वापरण्याजोगे करावे म्हणून एक बंधन तसेच ज्या लोकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही कले,त्यांच्यासाठी पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षणाच्या हक्कात येते . कमीत कमी प्रमाण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सर्व पातळीवरील भेद्भ्व कमी करण्याच्या बंधनाचा शिक्षणाच्या हक्कात  समावेश होतो.
मानवी हक्काचे युरोपिअन न्यायालय शिक्षणाची व्याख्या देते -शिक्वाने किंवा सूचना खास करून ज्ञान देणे आणि बौद्धिक विकास आणि थोड्या विस्तृत अर्थाने एक पूर्ण   प्रक्रिया  कोणत्याही  समाजात  ज्याने  प्रौढ  त्यांचे  मूल्ये युवाना  प्रसारित करतात. पूर्तेचे मूल्यमापन -       शिक्षणाच्या हक्काचे मूल्यमापन 4A च्या सहाय्याने केले जाते जे ठासून सांगतात कि शिक्षण एक अर्थपूर्ण हक्क बनवण्यासाठी ते AVAILABLE (उपलब्ध ),ACCESSIBLE (सुगम) ,ACCEPTIBLE  (स्वीकार्य) आणि ADAPTABLE (अनुकूल) असायलाच पाहिजे .हा 4A चा सांगाडा  माजी UN  REAPPORTEUR  TOMASEVELS   यांच्याकडून शिक्षणाच्या हक्कावर विकसित झाला होता .4A  चा सांगाडा सांगतो  कि  सरकारला एक सर्वात महत्वाचे कर्तव्याधारक म्हणून शिक्षण  AVAILABLE (उपलब्ध ),ACCESSIBLE (सुगम) ,ACCEPTIBLE  (स्वीकार्य) आणि ADAPTABLE (अनुकूल) बनवून शिक्षणाच्या हक्काचा आधार ,संरक्षण आणि पूर्तता करायला हवी. हा सांगाडा शिक्षण व्यावेस्थेतील आणखी लोकांना पण जबाबदारी देतो उदा.एक लहान मुल जो शिक्षणाच्या हक्काचा विशेष विषय आहे  त्याची जबाबदारी म्हणजे सक्तीच्या शिक्षणाच्या विनंतीस मान देणे .पालान्काची जबाबदारी म्हणजे पाल्याचा पहिले शिक्षक बनणे आणि व्यावहारिक शिक्षकांची जबाबदारी म्हणजे एक चांगले गुरु बनणे . . खालीलप्रमाणे 4A चे व्यवस्थित वर्णन केलेले आहे -
१. ACCEPTIBILITY - (उपलब्धता )- सरकारकडून निधी दिलेले शिक्षण हे वैश्विक , मुफ्त आणि सक्तीचे आहे . विध्यार्थ्यांसाठी  जेथे ते शिकतात तेथे आधारभूत संरचना आणि सुविधा ,पुरेशा पुस्तके आणि साहित्ये असली पाहिजेत . २.ACCESSIBILITY - (सुगमता)-सर्व मुलांना लिंग , जात , धर्म ,जातीयता  सामाजिक किंवा आर्थिक स्थितीची परवा केल्याविना सुगमता  असायला हवी .कुठल्याही प्रकारची विलगता किंवा कुठल्याही विध्यार्थ्याला वापरण्याला विरोध होऊ नये .बालकामगार आणि बालकांना प्राथमिक शिक्षण घेण्यापासून रोखणे या शोषणाच्या  विरोधात योग्य कायदे आहेत कि नाही याची खात्री करण्याचाही समावेश यात होतो .समाजातील मुलांसाठी शाळा एका योग्य अंतरावर असायला हवी नसल्यास वाहतूकव्यवस्था पुरवली जावी खासकरून ज्यांना जे खेडेगावातून आहेत .पुस्तके ,गरजा ,आणि गणवेश मुलांना काही अधिक पैसे न देता पुरवायला हवे आणि शिक्षण सर्वाना परवडणारे असावे . विशेष मुलांना शिक्षण हक्क आहे ३.ACCEPTIBILITY -(स्वीकार्यता) -दिले गेलेले शिक्षण हे भेदभाव मुफ्त ,प्रासंगिक आणि सांस्कृतिक अशा सगळ्या विध्यार्थ्यांसाठी उपयोगी असायला हवे. विध्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा वैचारिक मतांशी जुळल्यास अपेक्षा करू नये . शिकवण्याची पद्धत निपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ असावी. आणि उपलब्ध साहित्य एक विस्तृत विश्वास आणि विचारांची रचना प्रतिबिंबित करायला हवे.शाळामध्ये स्वच्छता आणि सुरक्शावर भर दिला गेला पाहिजे .यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शिक्षा करणे याचाही समावेश होतो .शिक्षकांची  व्यावसायिकता राखायला हवी . ४.ADAPTABILITY -(अनुकुल्नियाता)-शिक्षणाचे उपक्रम लवचिक आणि सामाजिक बदलानुसार आणि गरजानुसार  जुळवून घेण्यासारखे आहे . धार्मिक किंवा सांस्कृतिक सुत्त्यांशी  जुळवून घेण्याचा शाळांकडून आदर झाला पाहिजे.तसेच विकलांग मुलांना पुरेशी मदत झाली पाहिजे .                                                                      ऐतिहासिक सुधारणा -युरोपमध्ये १८व्या  आणि १९व्या शतकातील प्रबोधानापूर्वी शिक्षण ,आई ,आणि वडील हि चर्चची जबाबदारी होती . फ्रेंच आणि अमेरिका क्रांतीच्या सोबतच शिक्षण पण एक सार्वजनिक कार्य म्हणून घोषित केले गेले .असा विचार केला गेला होता कि शिक्षणाच्या क्षेत्रात एक सक्रीय भूमिका पार पडण्याची मदत ,शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध आणि वापरण्याजोगे करण्यात मदत होईल .त्यामुळेच शिक्षण हे आधी केवळ वरच्या वर्गालाच उपलब्ध होते आणि सार्वजनिक शिक्षण हे  एक समतावादी विचार निर्माण होण्याचे साधन होते त्या दोन्ही क्रांतीमधील                                                                                                                                                                                                                                                        पालक हे कर्तव्य पार पडतात कि नाही हे पाहणे हे राज्याचे बंधन होते आणि भरपूर राज्यांनी शाळेतील हजेरी सक्तीचे करून हा कायदा मानला .त्यानंतर बालाकाम्गराचे  नियम सुधा पाळले गेले आणि मुलानो शाळेत यावे म्हणून त्यांनी किती तास काम करावे हे ठरवण्यात आले .राज्य अमेरिका  पण शाषण नियामवली मध्ये समाविष्ट झाले आणि शिक्षणाचे कमीत कमी प्रमाणे निर्माण केली.लीबेर्त्य जोहन स्तुअर्त मिल्ल मध्ये लिहिले आहे कि राज्यांद्वारे स्थापन केलेले शिक्षण केवेल अस्तित्वात असायला हवे .१९व्या शतकातील उदारमतवादी विचाराचे लोकांना धोक्यांपेक्षा जास्त इशारा शिक्षणाकडे केलेला आहे .परंतू राज्याचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा हक्क त्यांच्या स्वतःच्या आई-वडिलांपासून वाचवण्यासाठी रक्षा करत होते .१९व्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षेचा हक्क घरघुती हक्कांमध्ये समाविष्ट केला गेला .

१० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

 पुणे – नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका (question papers)  घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली.



दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली असून ‘द बर्निंग’ टेम्पो थरार येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत हे टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ मधून भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याला येत होते. बुधवारी पहाटे टेम्पो चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर आला असता पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला.

मनीष चौरसिया व रामविलास राजपूत यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रयत्न अपुरे पडत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  घटनास्थळी दाखल झाले. 

त्यापाठोपाठ संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून नाशिक – पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे. पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्या टेम्पोला आग लागल्याचे समजताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार....

 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.



 नवीन पेन्शन योजना, रिक्त पदे तातडीने भरणे यासह अन्य मागण्यांविरोधात सरकारी कर्मचारी संप करत असल्याचे समोर आले आहे.

कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने उदासीन राहिल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सोमवार, २१ फेब्रुवारी रोजी दिला.


 शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.


 यापूर्वी 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 रोजी तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर या आंदोलनानंतर सातवा वेतन आयोग लागू झाला.  मात्र, इतर विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.


 त्यामुळे राज्य सरकारने जानेवारी 2019 मध्ये वित्त राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती.  या समितीच्या काही बैठका झाल्या.  परंतु नवीन पेन्शन धोरण रद्द करायचे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.


 केंद्र सरकारने, यथास्थिती, राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे.  याबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचा आरोप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला.  त्यामुळे त्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


 इतर प्रलंबित मागण्या


 बक्षी समितीचा दुसरा खंड प्रकाशित व्हावा


 केंद्र सरकारनुसार सर्व भत्ते द्या आणि सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरा


 बिनशर्त अनुकंपा नियुक्तीसाठी योजना तयार करा


 सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत हे उपक्रम होणार ....



शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार....





 दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रा संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. 

त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत....

 शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे,

 वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, 

विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे.

 या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत .


●खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे


अ. शालेय स्तरावर विद्यार्थ्यासाठी आयोजित करावयाचे उपक्रम

या फोटो अपलोड करावा. वैज्ञानिक रांगोळी दिलेल्या विज्ञानातील संकल्पना विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.



इयत्ता पहिली ते पाचवी


१. चित्रकला २. पोस्टर निर्मिती


१. माझी पृथ्वी. २. परिसरातील मित्र/सोबती.


चित्रकला / पोस्टर निर्मिती:


दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र /

पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा लागणार . 


निबंधलेखन:- 


इयत्ता सहावी ते आठवी


१. निबंध लेखन 

२. वैज्ञानिक रांगोळ्या


१. स्वयंपाकघरातील विज्ञान.



२. भविष्यातील दळणवळण.


३. माझी शाश्वत जीवनशैली. 

४. विज्ञानातील संकल्पना,


इयत्ता नववी व अकरावी


१. निबंध लेखन 

२. फोटोग्राफी/ व्हिडिओनिर्मिती



निबंध लेखन विषय :

१. माझा आवडता संशोधक.

२. भविष्यवेधी विज्ञान 

३. विज्ञानातील सफर.

४. जैवविविधता.

५. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन


दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. फोटोग्राफी/व्हिडिओ निर्मिती : गमतीजमती. दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ 


प्राथमिक,

१. वैज्ञानिक

१. समाजोपयोगी विज्ञान

 २. शाश्वत विकास


वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी निर्मिती दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक | प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची लिहून त्याचा फो |व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे.


प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी


१) प्रतिकृती निर्मिती 


२. वैज्ञानिक खेळणी निर्मिती




प्रज्ञानंधाने जगातील १ नंबर कार्लसनला केले पराभूत

 एअरथिंग्ज मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीदरम्यान, त्याने जागतिक विजेत्या मॅग्नस कार्लसनला केवळ 39 चालींमध्ये हरवून कार्लसनचे सलग तीन विजय संपुष्टात आणले.



 प्रज्ञांनधाने 31 वर्षीय कार्लसनला पराभूत केले - सध्या जगातील नंबर 1 - काळ्या तुकड्यांसह ताराश विविधता गेममध्ये.

 कार्लसनने सलग तीन विजय मिळवले, परंतु प्रज्ञानंधाकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर, नॉर्वेजियन खेळाडू काल लीडर बोर्डवर 11 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर राहिला.


 आठ फेऱ्यांनंतर आठ गुणांसह प्रज्ञानंधा संयुक्त 12व्या स्थानावर आहे.  याआधीच्या फेऱ्यांमध्ये,  आणि त्याने लेव्ह अरोनियनवर फक्त एकट्याचा विजय, दोन ड्रॉ आणि चार पराभवांचा समावेश केला.


 किशोरने अनिश गिरी आणि क्वांग लीम ले यांच्याविरुद्ध बरोबरी साधली आणि एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन-क्रिझस्टोफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव्ह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

 Airthings Masters हा 16 खेळाडूंचा खेळ आहे ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला प्राथमिक फेरीत विजयासाठी तीन आणि अनिर्णित राहण्यासाठी एक गुण मिळतो.  प्राथमिक टप्प्यात आणखी सात फेऱ्या आहेत.


 नेत्रदीपक खेळ म्हणजे प्रज्ञानंधाचा कार्लसनविरुद्ध बुद्धिबळाच्या कोणत्याही प्रकारातील पहिला विजय.


 " प्रज्ञानंधाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ला सांगितले की तो विजय कसा साजरा करणार आहे .


 बुद्धिबळातील प्रगल्भ, ग्रँडमास्टरची पदवी मिळवणारी प्रज्ञानंधा ही पाचवी सर्वात तरुण व्यक्ती आहे.  2018 मध्ये त्याला विजेतेपद मिळाले.

वाॕटर पार्क येथे अपघात शिक्षिकेचा मृत्यू

 पिकनिकसाठी आले होते विद्यार्थी आणि शिक्षक...



 हरियाणाच्या अंबालामध्ये आज वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात घडला. येथे एका खासगी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी पिकनिकसाठी आले होते. यादरम्यान वॉटर पार्कमध्ये तयार केलेल्या झोपाळ्यावर शिक्षक आणि विद्यार्थी बसले तर केबिनचा ग्रिल तुटला. 23 वर्षीय शिक्षिकेसह 3 विद्यार्थी खाली पडले.


खाली पडल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली, शिवाय विद्यार्थ्यांनाही जबर मार लागला आहे. हे ही जी आई होऊन जेवू घालत होती, तिचीच केली हत्या; व्यसनापायी तरुणाने सर्व संपवलं,

वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी केली अटक... 


अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. त्यावेळी 23 वर्षीय रिया गर्ग हिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अधोई गावातील जय पब्लिक शाळेत काम करीत होती. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा अपघात H2O पार्कमध्ये झाला. शिवाय वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराज वरील भाषण...

 संस्कृती अवघ्या साडे तीन वर्षाची. तिचे पुर्ण नाव संस्कृती प्रशांत दळवी असून ती रायगड येथे राहते.

 इतक्या लहान वयातील तिची वकृत्वशैली नक्कीच तिला खूप यशस्वी करणार....




शिवराय..... राजं हे दैवत ....नविन गीत...

 स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्रातील तमाम जनमनात ज्यांचा आदर्श आहे, क्षत्रिय कुलावंतस, जनकल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले माझे गीत .... शिवजयंती निमित्त राजेंना गीत वंदना 🚩🚩🚩





*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*


*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां सारेच गडकिल्ले....*

*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*

*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*


*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*

*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*

*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*

*ताठ उभा मराठी मुलख  आजवर..*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*उभारला आदर्श...राज्य  कल्याणकारी,*

*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*

*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*

*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*

*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*

*आई भवानीचा,मिळून  आशीर्वाद ,*

*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*

 *संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*

*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा  झुकविलात,*

*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


   *✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️

           *औरंगाबाद*

         9960878457

एप्रिलमध्ये होणार 'शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२२'

 एप्रिलमध्ये होणार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२

शिक्षक भरतीसाठी (teachers appointment )  उमेदवारांना 'शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' २०१७ मध्ये बंधनकारक करण्यात आली. 

                         

त्याचवर्षी ही परीक्षा (examination)  झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. 



शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२' एप्रिलमध्ये घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) सांगण्यात आले आहे.

 त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडत चालली आहे. 

प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी अनेकजण मागणी  करत आहेत.