डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे हे अन्नपदार्थ... #Foods,

 रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न

अन्न शरीराचे सामर्थ्य देणारे व सजीव शरीरास कार्यान्वित ठेवणारे मुख्य जीवनावश्यक घटक आहे. याचा योग्य संयोग आणखीन उपयोगी कसा पडू शकतो हे आज जाणून घेणे आपल्यासाठी रंजक व माहिती वर्धक ठरणार आहे. मी आपला डिजिटल मित्र प्रकाशसिंग राजपूत या लेखात ही माहिती घेऊन आलो आहे. 

शेवगा (Drumstick) - 

शेवगा हे सुपरफूडपैकी एक आहे जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि कोणत्याही व्हायरसच्या वाढी विरोधात एक ढाल म्हणून काम करते.


लिंबू सह नारळ पाणी - नारळाचे सेवन

पाणी नेहमी ताजे असावे. ताज्या नारळाच्या पाण्यात अर्धा लिंबू घातल्यास व्हिटॅमिन सी 10 पट वाढते. दररोज एकदा, पुढील काही दिवस, लिंबू सह नारळ पाणी घेणे आवश्यक आहे. (टीप: किडनीच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये)




लसूण, कांदा आणि हळद

लसूण, कांदा आणि हळद हे तिन्ही नैसर्गिक सुपरफूड आहेत जे आपल्यामध्ये वाढणारे वाईट बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात. अनेक रोगांना होण्यापासून नियंत्रित ठेवतात.


भोपळ्याच्या बिया - 

दररोज फक्त 3-4 चमचे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला निरोगी , मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात मिळू शकतात जे रोगप्रतिकारक कार्यांसाठी आवश्यक आहेत.



लाल शिमला मिरची - 

लाल शिमला मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी संत्र्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन सीपेक्षा 3 पट जास्त असते. आठवड्यातून  जेवणामध्ये लाल शिमला मिरची असण्याची खात्री करा.

१५ ते १ वयोगटातील लसीकरणबाबत जाणून घ्या...

तुमचा ब्राऊझर वर सेव्ह पासवर्ड ही धोक्याचा ठरु शकतो.... #Password, browser

 आपल्या फोनमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. फोनमध्ये आपण आपले अनेक पासवर्ड देखील सेव्ह करतो.


 हे पासवर्ड गुगल क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज सारख्या ब्राउझरवर सेव्ह होतात आणि आपल्यापैकी प्रत्येकजण ते करतंच. परंतु तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.




काही IT संशोधकांनी इंटरनेट वापरकर्त्यांना, विशेषत: घरून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एक चेतावणी दिली आहे, की ब्राउझरवर सेव्ह केलेला त्यांचा लॉगिन-पासवर्ड हॅक होऊ शकतो. अलीकडेच, सुरक्षेच्या उल्लंघनामुळे एका कंपनीचा डेटा लीक झाला आहे. 

या कंपनीत काम करणारे कर्मचारी घरून काम करायचे. काम करण्यासाठी ते एक उपकरण वापरत होते, जो इतर लोक देखील वापरत होते. या उपकरणात रेडलाइन स्टीलर नावाचा मालवेअर लपलेला असल्याची माहिती त्यांना नव्हती.

मालवेअर कंपनीच्या व्हीपीएनमध्ये प्रवेश करण्यासाठी संवेदनशील खाते तपशील आणि पासवर्ड चोरतो. त्यानंतर हॅकर्स या डेटाचा वापर कंपन्यांच्या खासगी डेटाची हेरगिरी करण्यासाठी करतात.

अँटीव्हायरस देखील काम करत नाही

यामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असले तरीही हा मालवेअर कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश करु शकतो. मालवेअरबद्दल बोलताना तज्ज्ञांनी सांगितले की, खाते ब्राउझरमध्ये क्रेडेन्शियल्स सेव्ह करणे खूप सोयीचे असले तरी, जर हा मालवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये घुसला तर खाते क्रेडेंशियल्स धोक्यात येईल.

यापासून बचाव करता येईल ....

  • अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी सामान्य वापरकर्त्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांनी नेहमी अधिकृत ऍप्सचाच वापर करावा.
  • अॕण्ड्राईड वर्जन अपडेट करत राहणे. जेणे करून फोन सुरक्षितता भक्कम राहते.
  •  त्यांनी आपल्या अधिकृत कामासाठी असे कोणतेही उपकरण वापरू नये, जे इतर लोकही वापरत असतील जसे पेनड्राईव्ह.
  •  अनेक वेळा असे अॕप्स प्ले स्टोअरवरही आढळतात, ज्यामध्ये मालवेअर दडलेले असते.
  •  अॕप डाउनलोड करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी अतिरिक्त काळजी घ्यावी आणि त्याची पार्श्वभूमी तपासावी.

नविन वर्षात होणार मेगाभरती....jobs, state government

 राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण 34 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. 

काही पदांची भरती 'एमपीएससी'च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. 




त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे. वित्त विभागाने  विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे Covid राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला.

 त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारच्या   काळात जवळपास 70 हजार पदांची मेगाभरती  होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्‍तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केलेला आहे.

'एमपीएससी'कडे प्राप्त मागणीपत्र...

  • विभाग : भरती होणारी पदे

  • सार्वजनिक आरोग्य : 937

  • कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924

  • उद्योग, ऊर्जा, कामगार : 279

  • अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62

  • पाणी पुरवठा व स्वच्छता : 16

  • सामान्य प्रशासन : 957

  • मराठी भाषा : 21

  • आदिवासी विभाग : 7

  • बृन्हमुंबई महापालिका : 21

  • पर्यावरण : 3

  • गृह : 1159

  • वित्त : 356

  • वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572

  • उच्च व तंत्रशिक्षण : 35

  • शालेय शिक्षण, क्रीडा : 105

  • सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32

  • कौशल्य विकास, उद्योजकता : 171

  • महसूल व वन : 104

  • ग्रामविकास व पंचायतराज : 32

  • नगरविकास : 90

  • मृदा व जलसंधारण : 11

  • जलसंपदा : 323

  • विधी व न्याय : 205

  • नियोजन : 55


नववर्षात होणाऱ्या मेगाभरतीचे नियोजन...

  • राज्य शासनाच्या 25 विभागातील 15 हजार 511 रिक्‍त पदांची होणार भरती

  • सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील रिक्‍त पदे

  • सामान्य प्रशासन विभागाकडून 'एमपीएससी'कडे सात हजार 460 पदांचे मागणीपत्र

  • गट अ, ब आणि क प्रवर्गातील पदांची होणार भरती; तीन महिन्यात पदभरती होईल पूर्ण

  • राज्य सरकारच्या घोषणेनुसार अजून 8 हजार 61 पदांचे जाणार आयोगाला मागणीपत्र