डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विद्यार्थ्यांना सुट्टी | students summer vacation|

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबत महत्त्वाचा आदेश....


संदर्भ:- शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र.जा.क्र.प्राशिसं/उन्हाळी/२०२४/३१५५. दिनांक १८.०४.२०२४.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत विनंती केली आहे.


२. वरील नमूद प्रस्तावाच्या अनुषंगाने मला असे कळविण्याचे निर्देश आहेत की, राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यासंदर्भात खालील सुचना देण्यात येत आहेत.


१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.


२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास. विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.


३) आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४. दिनांक २०.०४.२०२३ नुसार कार्यवाही करावी.


३. वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी.





लोकसभा निवडणूक | loksabha election 2024| how to vote|how to seal evm|

लोकसभा निवडणूक २०२४ मतदान सेवा बजावण्यासाठी उपयुक्त माहिती....




२०१९ नंतर निवडणूक प्रणालीत झालेले महत्त्वाचे बदल पहा... Vvpat यंत्र समावेश ते अभिरूप मतदान....

महत्त्वाचा व्हिडीओ पहा...


मतदान कक्षात असणारे बँलेट युनिट विषयी....




Evm कंन्ट्रोल युनीट, व्ही.व्ही.पॕट व बँलेट युनिट जोडणी....





व्ही. वी.पॕट मशीन वापर व विशेष माहिती....




Evm machine कंट्रोल युनिट वापर बाबत महत्त्वाची माहिती....






माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.... या website ला follow करा...

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २

 STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन सापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. 

सदर संकलित मूल्यमापन- २(PAT-3) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात येतील.


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक १२:०० ते १:०० या कालावधीत यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. संबधित शिक्षकांना याबाबतच प्रशिक्षण यु-ट्युबद्वार घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन २ (PAT - 3) vec 7 गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.qle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.


तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन) दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००


https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share


PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :


https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RIQhbVIj2D7qQqW5Zj6/view?usp=sharing


संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)


https://cqweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7.





Navodaya Result 2024 Maharashtra |District wise Selected list|

 नवोदय जिल्हा निहाय निकाल पहा....


Navodaya Result 2024 Maharashtra District wise Selected list



snoDistrictHeadquarters
1AhmednagarAhmednagar
2AkolaAkola
3AmravatiAmravati
4AurangabadAurangabad
5BeedBeed
6BhandaraBhandara
7BuldhanaBuldhana
8ChandrapurChandrapur
9DhuleDhule
10GadchiroliGadchiroli
11GondiaGondia
12HingoliHingoli
13JalgaonJalgaon
14JalnaJalna
15KolhapurKolhapur
16LaturLatur
17Mumbai City
18Mumbai SuburbanBandra (East)
19NagpurNagpur
20NandedNanded
21Nandurbar-1 – Nandurbar-2Nandurbar
22NashikNashik
23OsmanabadOsmanabad
24ParbhaniParbhani
25PunePune
26RaigadAlibag
27RatnagiriRatnagiri
28SangliSangli
29SataraSatara
30SindhudurgOros
31SolapurSolapur
32ThaneThane
33WardhaWardha
34WashimWashim
35YavatmalYavatmal
36Palghar

नवोदय निकाल | navoday result|nvs|

 नवोदय परीक्षा निकाल पहा....





नवोदय परीक्षा निकाल पहाण्यासाठी खाली क्लिक करा...







शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाइन अर्ज |online leave application|

 

 १ एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाइन अर्ज चालणार नाही; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाइन अर्ज



राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश आज (गुरुवारी) काढले आहेत.
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबीसंदर्भात ‘ई-एचआरएमएस’ (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या नवीन प्रणालीत करण्यात येत आहे. या प्रणालीवर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ३ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. या नवीन प्रणालीमध्ये सुटी (leave) या पर्यायात रजेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे.



आता ही नवीन प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकांनी त्यांच्याअंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना १ एप्रिलपासून त्यांच्या सर्व रजेचे अर्ज या नवीन प्रणालीमार्फतच करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात नमूद आहे.

रजेचा ऑफलाइन अर्ज चालणार नाही

सर्व विभागांनी त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाइन घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना राज्यातील सर्व शासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम- पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे रजेचा अर्ज ऑनलाइनच करावा लागणार आहे. यामुळे कोणता अधिकारी, कर्मचारी रजेवर आहे, हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे.



वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना|pat|

 नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत.


संदर्भ:

१. शासन निर्णय क्रमांक: आरटीई २०२२/प्र.क्र.२७६/एसडी.१ दि. ०७.१२.२०२३


२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT संमू-२/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४


उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क्र. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) (संकलित मूल्यमापन २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)


२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.


३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन - २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.

संकलित मूल्यमापन २ चे वेळापत्रक


विषय


दिनांक


इयत्ता निहाय परीक्षेचा वेळ (तीनही दिवसांसाठी)


अ. क्र.


प्रथम भाषा (सर्व माध्यम)


०४.०४.२०२४


१) तिसरी / चौथी स. ८.०० ते ९.३०



गणित (सर्व माध्यम)


०५.०४.२०२४


२) पाचवी / सहावी स. ८.०० ते ९.४५



३. इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या


संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या


इंग्रजी


०६.०४.२०२४


३) सातवी / आठवी - स. ८.०० ते १०.००



शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. ४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.


५. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


• इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः


२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.


४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.


५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.






मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय|eknath shinde|

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेपुर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री  यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.



👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय 


✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी


✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार


✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला


✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  


✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार


✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण 


✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल


✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.


✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना


✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार


✅ राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार


✅ ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान


✅ भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप


✅ संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार


✅ वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन


✅ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर


✅ श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

जिल्हा परिषदेच्या आदेशामुळे हाफडे थांबला |zp school latest update|

 दि.16 मार्च 2024 पासून शाळा पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ चालू ठेवणे बाबत.


वरील विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नसल्याने दि. 16 मार्च 2024 पासून शाळेची वेळ अर्धवेळ न करता पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ ठेवण्यात येत आहे. शाळेच्या वेळेत आपल्या स्तरावरुन कोणताही बदल करण्यात येवू नये.


तसेच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक / केंद्रप्रमूख यांच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव या कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावा. याची नोंद घेण्यात यावी असे आदेशात म्हटलेले आहे.




महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ/da hike/4%da/

 महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे 

भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 01/01/2024 E-II ( B) दिनांक 12 मार्च 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .

सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमुद ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेल्या 4 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत , व त्यानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..




शिक्षकांना ड्रेस कोड लागू /teacher dress code/

 राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत.

शासन परिपत्रक:-

दिनांक: १५ मार्च, २०२४.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-

) सर्व १ शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.

२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

शासन आदेश पहा....

१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

जागतिक किडनी दिन

 "जागतिक किडनी दिन"

 हा दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसन्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हाच आहे की, सर्वांनाच ह्या अवयवाविषयीची व आजारांची माहिती मिळावी, जेणे करून किडनीचे आजार टाळण्यासाठी किंवा आजार असल्यास त्याची योग्य काळजी घेण्यासाठी मदत मिळेल. यावर्षी हा दिवस आपण १४ मार्च रोजी साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे जागतिक किडनी दिनाचे ब्रीदवाक्य आहे "सर्वांसाठीच किडनीचे आरोग्य".



किडनी फेल होण्याची महत्त्वाची कारणे


> अनियंत्रित मधुमेह


>> अतिउच्च रक्तदाब


>> दुर्लक्षित मुतखड्याचा आजार


> लहान मुलांमधील मूत्रमार्गांचे आजार


>> पॉलिसिस्टीक किडनी डिसीज


>> दीर्घकालीन वेदनाशामक औषधांचे सेवन


किडनीचा आजार झाल्यास घ्यावयाची काळजी


काही विशिष्ट आजारांच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


किडनी रोगाची माहिती व प्राथमिक


निदान : चेहरा व पायावर सूज येणे,


उलटी मळमळ होणे, अन्नाची चव नसणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे, लघवीला त्रास होणे, रात्री वारंवार लघवीला जाणे, ही किडनीच्या आजाराची लक्षणे असू शकतात. असा त्रास असणाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. लघवीवाटे प्रथिने जाणे किंवा रक्तातील युरिया/ क्रिआटीनीनचे प्रमाण वाढणे हे किडनी विकाराचे लक्षण असते.


• उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी घ्यायची काळजी : वेळेवर औषधी घेणे, जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, वर्षातून एकदा लघवी व रक्त तपासणे. कमी वयात उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास किडनीची तपासणी करून घेणे.


• मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यायची काळजी : औषधे व पथ्य पाळून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, दर तीन महिन्यांनी लघवीतील प्रथिनांचे प्रमाण तपासून घेणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी होत असेल, तर किडनीच्या आजाराची शक्यता पडताळून पाहणे.


क्रोनिक किडनी फेल्युअरच्या रुग्णांनी घ्यायची काळजी


खाण्यातील पथ्ये पाळणे, नियमित औषधी घेणे व तपासणी करणे, जेणे करून डायलिसिस व किडनी प्रत्यारोपणाची गरज लांबणीवर टाकता येते.


• मुलांच्या मूत्रमार्गातील संसर्ग: वारंवार ताप येणे, वजन न वाढणे,लघवीमध्ये जंतुसंसर्ग होणे या लक्षणांची वेळेवर तपासणी करून योग्य उपचार केल्यास भविष्यातील किडनी फेल्युअर टाळता येते.


• मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथीची सूत्र योग्य तपासणी व औषधोपचार करून कि घेणे, गरज असल्यास शक्रि उपचार करून घेणे, मुतखडा वारंवार होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पा पिणे, खाण्यातील पथ्य पाळणे


अचानक किडनी फेल झाल्यास


अति प्रमाणात जुलाब, मलेरिया, रक्तातील जंतुसंसर्ग, अतिरक्तस्याव,मूत्रमार्गातील अडथळे हे किडनी अचानक फेल होण्याची मुख्य करणे आहेत. या आजारांवर वेळीच व योग्य उपचार केल्यास किडनी कायमची फेल होणे टाळता येते.


• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा

वापर : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय


वारंवार वेदनाशामक औषधे घेणे हे किडनी फेल होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही आयुर्वेदिक औषधांमधील जड धातू किडनीवर कायम स्वरूपाचे परिणाम करू शकतात, अशी औषधे टाळावीत.


किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय ?

ज्या व्यक्तीला किडनीचा आजार आहे म्हणजे क्रॉनिक किडनी स्टेज ५. अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये एका किड़नीदात्याकडून किडनी बसवली जाते.

share for care  


प्रवेशसाठी वय निश्चिती |rte admission age|

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.


शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई  शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. 

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18 / 9 / 2020 रोजीच्या वर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय



शालेय परिपाठ दिवस 190 वा

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस190 वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -९ मार्च २०२४

वार- शनिवार

तिथी- माघ कृ १४ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि १८ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शनिवार, 09 मार्च 2024

सूर्योदय 06:52, 

खगोलीय दुपार: 12:49, 

सूर्यास्त: 18:47,

दिवस कालावधी: 11:55, 

रात्र कालावधी: 12:05.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार


"तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असलात तरी हरकत नाही, पण मानसिकतेने गरीब राहू नका"


Good Thought


Trust yourself!You know more that you think you do.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

लेबनॉन देशाचा शिक्षक दिन


9 मार्च 1982 : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग


9 मार्च 1454: अमेरिगो वेस्पुची,इटालियन खलाशी यांचा जन्मदिवस.


9 मार्च1930 : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक यांचा जन्मदिवस


9 मार्च 1934: युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर यांचा जन्मदिवस (मृत्यू: 27 मार्च 1968)


special day


 

 Teacher's Day in Lebanon


 March 9, 1982: All the planets in the solar system are on the opposite side of the sun


 9 March 1454: Birthday of Amerigo Vespucci, Italian sailor.


 9 March 1930 : Dr.  U.  m.  Pathan – Birth anniversary of Vyasangi scholar of saint literature


 March 9, 1934: Birthday of Yuri Gagarin – the first astronaut to orbit the Earth (died: March 27, 1968)



🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी व तिचा अर्थ

रोज घाली शिव्या आणि एकदशीला गाई ओव्या

अर्थ:- एखाद्या दिवशी चांगले वर्तन ठेवणे.


English proverb


Better safe than sorry.


Meaning: It is better to be precautious than to have regrets later on.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

दोन बोटांचा रस्ता

त्यावर चाले रेल्वे

लोकांसाठी आहे उपयोगाची

क्षणात आग लावते


उत्तर:-आगपेटी


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

1 तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय?

उत्तर:-


2 तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते?

उत्तर:-


3 तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय?

उत्तर:- 


4 वारकऱ्यांनी संत तुकाराम यांना कोणती उपाधी दिली आहे?

उत्तर:-


5 संत तुकाराम यांचे गुरू कोण होते ?

उत्तर:-



General knowledge

 1 What is the full name of Tukaram Maharaj?

 -


 2 Which is the birthplace of Tukaram Maharaj?

 -


 3 What is the name of Tukaram Maharaj's famous book?

 -


 4 What is the title given to Saint Tukaram by Varkaras?

 -


 5 Who was Saint Tukaram's Guru?

 -


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


बोधकथा

खऱ्या खोट्याची पारख


एका सोनाराच्या मृत्यूनंतर  त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."


मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”


दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते  शिकू लागला.


थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.


एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."


आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?

  

मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.


काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"


तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.


पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."


सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.|teacher transfer|

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.


०२. शासन निर्णय दि. २१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी तरतूद आहे. नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे. याअनुषंगाने नमूद करण्यात येते की, शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ मधील अ.क्र.२ अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक २१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामधील नमूद अ.क्र. २ अनुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.पत्रात करण्यात आली.


आदेश पहा...





शालेय परिपाठ दिवस 189

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस189 वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -७ मार्च २०२४

वार- गुरूवार

तिथी- माघ कृ ११ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि १६ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुरुवार, 07 मार्च 2024

सूर्योदय 06:53, 

खगोलीय दुपार: 12:49, 

सूर्यास्त: 18:46, 

दिवस कालावधी: 11:53, 

रात्र कालावधी: 12:07.


सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो.

Good Thought

Wasted time spoils our future


दिनविशेष

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

special day

 1876: Alexander Graham Bell received a patent for the telephone.


म्हण/proverb

A fireband in the hand of madman -माकडाच्या हाती कोलीत


कोडे

चुरूचुरू बोलते

      आंबट, गोड सांगते

      तोंडाच्या खोलीत

      वळवळत बसते .


जीभ


सामान्य ज्ञान

०१) हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

- महात्मा गांधी


०२) भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली ?

- गोपाळ कृष्ण गोखले


०३) गीताई हा ग्रंथ कोणी लिहला ?

- विनोबा भावे


०४) सेवासदन ची स्थापना कोणी केली ?

- रमाबाई रानडे 


०५) एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला ?

- न्या.रानडे


बोधकथा


🌻हिऱ्यापेक्षा जनता श्रेष्ठ 🌻


एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''

🌹तात्पर्य 🌹

आपल्या हाती सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पाहणे इष्ट ठरते

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा|result|

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर  मूल्यांकन करण्यात आलेले आहे.


या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवरील व राज्याच्या राजधानी मुंबई मधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (वित्त), मा. उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ मार्च २०२४ रोजी करण्यात येणार आहे. 

तरी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात राज्यस्तरावर, विभाग स्तरावर राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रांमधील विजेत्या नमूद ६६ शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास या विजेत्या शाळांमधील प्रत्येकी कमाल १० व्यक्ती उपस्थित राहू शकतील.



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा निकाल





कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार|Ops|nps|

 १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सरकारी-निमसरकारी कर्मचारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार


निधन झालेल्या कर्मचा-यांना


६० टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार


सुधारित योजनांची जबाबदारी पूर्ण करण्याकरिता कायमस्वरुपी विशेष राखीव निधी (Sinking Fund)


१८ वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर कर्मचारी-शिक्षकांना मिळाला दिलासा ! त्याबद्दल शिंदे सरकारचे आभार


गतवर्षी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संप करुन, १७ लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षितेकडे शासनाचा लक्षवेध करुन घेतला होता. शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचे धोरण स्विकारुन संघटनेशी वाटाघाटी केल्या. त्यामुळे सौहार्दाचे वातावरणात शासनाने या १७ वर्षे प्रलंबित प्रश्नाचा गांभिर्याने विचार करुन, कर्मचा-यांना दिलासा मिळेल अशा शिफारशी प्राप्त होतील या उद्देशाने "सुबोधकुमार अभ्यास समितीची स्थापना केली. सदर अभ्यास समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. याबाबत संघटना प्रतिनिधींशी, अपर मुख्य सचिव स्तरावर, दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी शिक्षकांवर १० टक्क्यांच्या अंशदानाची सक्ती असू नये अशी भूमिका सादर करण्यात आली. कमी सेवा असणाऱ्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कमीत कमी रु. १०,०००/- पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांस पुरेशी पेन्शन, उपदान, गट विमा, रजा रोखीकरण या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत, असा रास्त आग्रह धरण्यात आला. या सुचीत मुद्यांवर विचार केला जाईल असे यावेळी शासनाच्यावतीने आश्वस्त करण्यात आले.


आज विधीमंडळात शासनाने जुन्या पेन्शन प्रमाणे, जुन्या पेन्शन इतक्या रक्कमेची, म्हणजेच कर्मचारी- शिक्षकांच्या निवृत्ती दिनांकी असलेल्या मूळ वेतनाच्या ५० टक्के अधिक तत्कालीन महागाई भत्ता, देण्याविषयक धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस सुध्दा ६० टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महत्वाचा निर्णय घेताना अंशदानाचा (Contribution) शासनाचा वाटा १४ टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा १० टक्के ही बाब कायम ठेवण्यात आली आहे.


सिकींग फंड, शासनाचे अंशदान १४ टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा १० टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी-शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे. अंशदान संचयाच्या या योजनेतूनच सरकारी कर्मचा-यांना पेन्शन दिली जाणे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या वाढीव खर्चामुळे शासन डबघाईस येईल या अंदाजाला सपशेल मुठमाती देणे होय. शासनाच्या १४ टक्के कर्तव्य वाटयात व आमच्यासाठी आम्ही दिलेल्या १० टक्के वाटयातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातूनच "जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन" हा जटील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोनही बाजूंसाठी हितकारक आहे. आर्थिक संकटाचा बाऊ करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे.

आज जनमानसात लोकप्रिय स्थान प्राप्त केलेल्या "मा. एकनाथराव शिंदे" सरकारने विधीमंडळात जो निर्णय घोषित केला आहे त्यामुळे कर्मचारी-शिक्षकांना १८ वर्षानंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत.


१.


सद्या कार्यरत असणाऱ्या कर्मचा-यांपैकी ज्यांना NPS प्रणाली मध्ये निवृत्तीवेतन घ्यायचे आहे किंवा राज्य


शासनामार्फत सुरु होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल. २. राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञेय राहील.


३. २० वर्षापेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल.


४. सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांस कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केले जाईल. (महागाई भत्त्यासह)


५. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्युनंतर त्याला निश्चित होणा-या निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता.


६. या योजनेसाठी संचालक, लेखा व कोषागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल.


७. राजीनामा दिलेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील.


८. असेल. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला


९. ज्यांना पेन्शन नको असेल, अशा कर्मचा-यांना एकरकमी देण्याचाही पर्याय सरकारने खुला ठेवला आहे.


१०. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर,


११. अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय.


१२. गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय.


सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक श्री. विश्वास काटकर यांनी शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या निर्णयाचे सावधतेने स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने कर्मचाऱ्याच्या संचित १० टक्के अंशदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. निवृत्त होणा-या संबंधित कर्मचा-यास या १० टक्के संचित रक्कमेतून जीवन वेतन म्हणून किमान ६० टक्के परतावा मंजूर करणे न्यायाचे ठरेल. सदर परताव्याची रक्कम मिळविणे ही मागणी पुढील संघर्षास कारणीभूत ठरु शकते.


जय संघटना.


विधासभाटक (विश्वास काटकर)


निमंत्रक, समन्वय समिती, महाराष्ट्र-सञ्ज्य तथा सरचिटणीस, मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र मोबा. ९८२१००४२३३


शालेय परिपाठ दिवस १८४ वा/school assembly/good thoughts/moral story/

चला सोपा करूया परिपाठ

दिवस184वा



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -१मार्च २०२४

वार- शुक्रवार

तिथी- माघ कृ ६ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि १० फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

शुक्रवार, 01 मार्च 2024

सूर्योदय 06:58, 

खगोलीय दुपार: 12:51, 

सूर्यास्त: 18:44, 

दिवस कालावधी: 11:46, 

रात्र कालावधी: 12:14.

सुविचार

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.


Good Thought

If you believe in yourself, everything is possible.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१९५८: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात


१९८३: भारतीय बॉक्सर मेरी कॉम यांचा जन्म.


1958: Commencement of construction of Koyna Hydroelectric Project


 1983: Birth of Indian boxer Mary Kom.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

म्हणी

आठ हात काकडी नऊ हात बी

अर्थ एखाद्या गोष्टीची भरपूर स्तुती करणे


Proverb

Don’t bite the hand that feeds you.


Don’t treat badly the person or people on whom you depend on, or who take care of you in some way.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे

लाल गाय लाकुड खाय,

पाणी प्याय मरुन जाई.


⇒ उत्तर: आग


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


सामान्य ज्ञान

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग


त्र्यंबकेश्वर नाशिक

घृष्णेश्वर औरंगाबाद

भीमाशंकर पुणे

परळी वैजनाथ बीड

औंढा नागनाथ हिंगोली

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा


दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली.‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फ़ाशीची शिक्षा फ़र्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फ़िरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फ़र्मावलेली फ़ाशीची शिक्षा रद्द केली.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शालेय परिपाठ दिवस 183/school assembly/

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस183वा*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२९फेब्रुवारी २०२४

वार- गुरूवार

तिथी- माघ कृ ५ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि ९ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024

सूर्योदय 06:59,

 खगोलीय दुपार: 12:51, 

सूर्यास्त: 18:44, 

दिवस कालावधी: 11:45, 

रात्र कालावधी: 12:15.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

ज्ञान तिथे मान.


Good thought

Courage to continue matters more than success or failure.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

जन्म:

१८९६ - मोरारजी देसाई (चित्रीत), भारताचे माजी पंतप्रधान.

१९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

२०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.

२०१२: ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.

special day

 Born:

 1896 – Morarji Desai (pictured), former Prime Minister of India.

 1996: The Kenyan team, known as a new and underdog team in the cricket world, recorded a historic victory by defeating the two-time world champions West Indies by 73 runs in the Cricket World Cup.

 2000: Sasikiran becomes India's 5th Grandmaster.

 2012: Construction of the world's tallest tower (not a building), the Tokyo Sky Tree at 634 meters, is completed.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी/proverb

The wearer best knows where the shoe pinches -ज्याचे जळते त्यालाच कळते/जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

पिवळसर चॉकलेटी रंग

मी आहे एक अद्भुत कडधान्य

अन्नधान्यात पूरक मी

तेलही माझे उपयोगी

रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो

आरोग्य चांगले राखायला मदत करतो


सोयाबिन

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

- श्रीमती प्रतिभाताई पाटील.


०२) भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

- श्रीमती इंदिरा गांधी.


०३) भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष (स्पीकर) कोण ?

- मीरा कुमार.


०४) भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण ?

- सरोजिनी नायडू.


०५) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

- सुचिता कृपलानी.(उत्तर प्रदेश)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

general knowledge

 01) Who is the first woman President of India?

 - Mrs. Pratibhatai Patil.


 02) Who was the first woman Prime Minister of India?

 - Mrs. Indira Gandhi.


 03) Who is India's first woman Lok Sabha Speaker (Speaker)?

 - Meera Kumar.


 04) Who was the first woman Governor of India?

 - Sarojini Naidu.


 05) Who was the first woman Chief Minister of India?

 - Suchita Kripalani.(Uttar Pradesh)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

*गर्विष्ठ मेणबत्ती*

एकदा एका माणसाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते. ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला. आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्यावेळी व ज्या ठिकाणी चंद्र सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही, त्यावेळी व त्या ठिकाणी माझा प्रकाश पडू शकतो. चंद्रसूर्य ही माझ्यापुढे शूद्र वाटतात." तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली.त्यातला एकजण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली आणि मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटवली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, "अग वेडे आता तरी प्रकाश दे. एवढ्या झुळकेने विझतेस? चंद्र सूर्याला शूद्र समजतेस?त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस? चंद्र सूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने भिजून गेले आहेत का?"

तात्पर्य:- आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Mdm back date data | fill mdm data| \mdm login\

शालेय पोषण आहार

MDM Back dated daily attendance data entry....




_माहे एप्रिल 2023 ते माहे फेब्रुवारी 2024 या कालावधीतील Back dated daily attendance data entry सुविधा MDM PORTAL मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे......._


_सदर सुविधा दिनांक 27/02/2024 ते दिनांक 06/03/2024 या कालावधीत उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी....._

 खालील लिंक वर जाऊन आपण आपली माहिती भरू शकता 

http://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/

सदर संधी अंतिम असेल याची नोंद घ्यावी....

शालेय परिपाठ दिवस 181

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस181वा*




💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२७फेब्रुवारी २०२४

वार- सोमवार

तिथी- माघ कृ ३शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि ७फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024

सूर्योदय 07:00, 

खगोलीय दुपार: 12:51, 

सूर्यास्त: 18:43, 

दिवस कालावधी: 11:43, 

रात्र कालावधी: 12:17.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

*प्रकाश पसरवण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर मेणबत्ती व्हा किंवा तिचे प्रतिबिंब दिसणारा आरसा व्हा. किरण सूर्याचा असो वा आशेचा, तो जीवना तील सर्व अंधार दूर करतो.*


Good Quote


“Many of life’s failures are people who did not realize how ddxr xxx exxx xrxdx d they were to success when they gave up.” – Thomas A. Edisonrddxxxx

Cccc

"आयुष्यातील बरेचसे अपयशी असे लोक आहेत ज्यांना हे समजले नाही की त्यांनी हार पत्करली तेव्हा ते यशाच्या किती d आहेत."  – थॉमस ए. एडिसन


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

मराठी राजभाषा दिवस

Ytc

मdddrdxाठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या भारतातील राज्यांमध्ये साजरा xdxxdxrdxxxrdxकेला जातो. हा दिवस राज्य सrxरकारद्वारे नियंत्रित केला जातो. प्रख्यात मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.


२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी



१४८५: बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म.


१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)



मृत्यूदिन

१८८७: आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (जन्म: ३१ मार्च १८६५)




special day

 Marathi Official Language Day


 Marathi Language Day is celebrated every year on February 27 in the Indian states of Maharashtra and Goa.  This day is controlled by the state government.  It is celebrated on the birth anniversary of famous Marathi poet Kusumagraj.


 2001: Successfully test-fired indigenously developed surface-to-air missile 'Akash' at Chandipur base.



 1485: Birth of Chaitanya Mahaprabhu, a Vaishnava saint and cult promoter in Bengal.


 1899: Birth of Charles Herbert Best, biochemist, inventor of insulin.  (Death: 31 March 1978)



 death anniversary

 1887: Anandibai Gopalrao Joshi – India's first woman doctor (Born: March 31, 1865)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

म्हणी व त्याचा अर्थ

अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय. – जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त ते आचरणात आणले पाहिजेत.


English Proverb

Better late than never

It is better to do something late than not do it at all.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे

आजीबाईच्या शेतात

 एका सुपात बारा कणसं

त्याचे 30-31 दाणे

 अर्धे काळे अर्धे पांढरे

असे हे जीवन गाणे 

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर:- एका वर्षातले बारा महिने प्रत्येक महिन्यात असलेले 30 किंवा 31 दिवस आणि काळे पांढरे दाणे म्हणजे दिवस व रात्र

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान

1) मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा करण्यात येतो?

:- मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.


2) 27 फेब्रुवारीला कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस असतो?

वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज


3) मराठी राजभाषा दिनाचे दुसरे नाव काय आहे?

:- मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते.


4) मराठी भाषा कोणत्या राज्यांची अधिकृत राजभाषा आहे?

:- महाराष्ट्र आणि गोवा


5) मराठी ही भारतातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे?

:- मराठी ही लोकसंख्येनुसार भारतातील तिसऱ्या आणि जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा


एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."


तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मराठी भाषा दिन कविता 


माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, 

हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा

हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात

ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर, कधी मागायास दान

स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान

हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही

हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन

स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी

चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर

येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान

हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा