डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली|teacher transfer|

 शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा...

 राज्यातील विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली करता येणार आहे. यासाठी ८ जून २०२० ची नियमावलीतील सुधारणा व १ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार बदल्या होणार आहेत. न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ रोजी नियमबाह्य विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तुकड्यांवरून अंशतः अनुदानित, अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश दिला आहे. 

Teachers transfer


महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे.

 सरकारने ८ जून २०२० च्या सुधारणांच्या माहितीचा शासन निर्णय तब्बल दहा महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी काढला व अंमलबजावणी ८ जून २०२० पासून करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी नियमावलीतील सुधारणांना व १ मार्च २०२१ च्या शासन निर्णयाला स्थगिती देणारा अध्यादेश काढला. उच्च न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे विनाअनुदानवरून अनुदानितवर बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याने यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.


उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये यांची संचमान्यता आॕफलाईन...

उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत..

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करण्याबाबत दि.१६.०२.२०२४ च्या बैठकीमध्ये सुचित करण्यात आलेले आहे.

त्यानुषंगाने संच मान्यतेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. आपल्या जिल्हयातील तालुक्यांच्या दिनांका दिवशी आपण सकाळी १०.३० ते ६.०० यावेळेत उपस्थित राहुन आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन घ्यावी.

टप्पा क्रमांक :-१

१. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (माध्यमिक) जिल्हा परिषद पुणे/अहमदनगर/सोलापूर यांनी दिनांक ०७.०३.२०२४ पर्यंत आधार व्हॅलीड संख्येनुसार करण्यात यावी.

टप्पा क्रमांक :- २

१. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबधित जिल्हयाच्या सहा. शिक्षण उपनिरिक्षक

यांच्याकडुन शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अद्ययावत केलेले जनरल रजिस्टर प्रमाणे तपासून घ्यावीत. व त्याचे प्रमाणपत्र संबधित सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावा सोवत सादर करावेत. २

. सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी शाखानिहाय तुकडीनिहाय तपासलेली विद्यार्थी संख्या आणि सरल प्रणालीमध्ये नमुद केलेली विद्यार्थी संख्या एकसारखी असणे आवश्यक आहे.

३. संच मान्यतेसांवत शेक्षणिक वर्ष २०१३-१४,२०२१-२२ व २०२२-२३ ची संच मान्यतेची प्रत सादर करावी.

४. कनिष्ठ महाविद्यालयाचे शाखानिहाय वेळापत्रक सादर करावे,

५. विद्यार्थी निहाय/विषय निहाय शिक्षकांना दिलेला कार्यभाराचा तक्ता शिक्षकांच्या नावांनिशी व प्रकारानिशी सादर करावा. (परिशिष्ट-अ). (सोबत विहित नमुना जोडलेला आहे).

६. माध्यमिक विभागाकडील कार्यभार देऊन उच्च माध्यमिककडील पदे पुर्णवेळ करु नयेत, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विभागाकडील कार्यभार माध्यमिक विभागाकडे देऊ नये.

७. प्रस्तावा सोवत विद्यार्थी संख्या (सरल प्रणाली २०२३-२४ च्या हार्ड कॉपीसह सादर करावी, त्याशिवाय संच मान्यता केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

८. सन २०२३-२४ च्या संच मान्यतेसाठी सरळ प्रणालीमधील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या धरुनच संचमान्यता करण्यात येणार असल्याने ऑनलाईन आधार व्हॅलिड रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे.

९. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची संच मान्यता बाबत, कॉलेज निहाय डाटा व सांख्यिकी माहिती शासनास हवी असल्यामुळे प्रत्यक्ष शिबीराच्या ठिकाणी संगणकावर ऑनलाईन माहिती भरुन त्यानंतरच संच मान्यता प्रत प्रिन्ट काढावी. त्याकरिता आवश्यक ती सर्व माहिती घेऊनच उपस्थित रहावे.

१०. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेचे कार्यरत असलेले संचालक मंडळ त्यांचा कार्यकाल, व मा.धर्मादाया

आयुक्त, यांचे परिशिष्ट अ चो साक्षांकित प्रत / बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) प्रत सादर करावी. ११. शैक्षणिक वर्ष २०२३ ३ चोच्या पूर्णवेळ/अर्थवेळ/प्र.प.ता नियुक्तीवायत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचार्य यांनी सादर करावे.

१२. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुर्णवेळ / अर्थवेळ/प्र.घ.ता नियुक्तीबाबत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु असल्यास प्रकरण नियुक्ती/नियुक्ती रद्द करणेबाबत / संचालक मंडळातील यादायावत आहे याची थोडक्यात माहितीची प्रत सादर करावी

१३. संस्थेत बाद असल्यास सादर केलेल्या प्रस्तावातील सर्व माहिती ही बिनचूक / बरोबर असल्याबाबत

प्राचार्य यांनी हमीपत्र सादर करावे, त्याचप्रमाणे संस्थेतील बादामुळे प्राचार्य यांनी त्यांच्या अधिकारात

केलेल्या सर्व नियुक्त्यांवावत प्राचार्य व्यक्तिशः जवाबदार असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. १४. प्राचार्य यांनी सादर केलेल्या माहितीबाबत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण/तक्रारी उद्भवल्यास त्यार प्राचार्य व्यक्तिशः जवाबदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

१५. शिवीराच्या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने तयार केलेली संच मान्यता प्रत तपासल्यानंतरच अंतिम प्रती ०४८ काढण्यायावत आदेशित केले जाईल. (पटपडताळणी व संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०२३ ची विद्यार्थी संख्या ग्राहय धरावी)

१६. माहे फेब्रुवारी २०२४ पेड इन मार्च २०२४ चे वेतन देयकाची प्रत सोबत आणावी. तसेच खालील प्रपत्र अस मधील माहिती अचूक भरुन प्राचायांनी त्यांची पडताळणी करुन स्वाक्षरी व शिक्यासह सादर करावी.




१० वी नंतर डिप्लोमा प्रवेश | diploma course after 10th|

 अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदविका प्रवेशप्रक्रिया जाहीर....

अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून; अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला होणार प्रदर्शित... (diploma admission)

दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वास्तूकला प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवारपासून ता. २९ मे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तूकला पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशासाठी ई-स्क्रूटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटीनी याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 'कॅप' अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तसेच 'कॅप'व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे, या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ) सुरू ठेवल्या जाणार आहेत.

diploma


प्रत्यक्ष स्क्रूटीनी पद्धतीसाठी सुविधा केंद्रांची यादी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही केंद्रे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.


विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना 

राज्यमंडळामार्फत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना शैक्षणिक पात्रता तपशीलात स्वतःचा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा, राज्य मंडळातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले गुण राज्य मंडळाकडून थेट घेण्यात येतील आणि ते संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येतील.

प्रवेशाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे


ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.

कालावधी

२९ मे ते २५ जून


कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे


२९ मे ते २५ जून


विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २७ जून


तात्पुरत्या यादीवर तक्रार व हरकती नोंदविणे  २८ ते ३० जून


अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २ जुलै


अर्ज सादर करण्यासाठी सुविधा - 

संकेतस्थळ : 

https://poly24.dtemaharashtra.gov.in/


- मोबाइलवर 'DTE Diploma Admission' हे अॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येईल











इयत्ता पहिलीत प्रवेश वय|1st standard admission age|

 

इयत्ता पहिलीत प्रवेश...वाचा नर्सरी ते इयत्ता पहिली पर्यंत प्रवेशासाठी आवश्यक वयोमर्यादा...



 शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले गेले असून या वयोगटातील बालकांवर अभ्यासाचा किंवा इतर शैक्षणिक गोष्टींचा जास्तीचा ताण येऊ नये याकरिता 31 डिसेंबर 2024 रोजी ज्या बालकांचे वयाचे सहा वर्ष पूर्ण होणार आहेत अशा बालकांना यावर्षी पहिलीमध्ये ऍडमिशन करता येणार आहे.

१ ली प्रवेश नंतर पहिल्याच दिवशी आनंदी बालके


सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अशा बालकांना आता दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. विशेष म्हणजे आरटीईनुसार बघितले तर अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची मुख्य जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार

आहे.कारण जर आपण पाहिले तर कमी वयामध्ये जर विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश केला गेला तर त्यावर शैक्षणिक गोष्टींचा अभ्यासाचा जास्त ताण येतो

व त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासूनच ते वंचित राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता त्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना खाजगी असो किंवा शासकीय शाळा असो त्यामध्ये प्रवेश देता येणार आहे.

कोणत्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना यावर्षी 

मिळेल   पहिलीत प्रवेश?

या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देताना सर्व शाळांना एक जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत ज्या बालकांचा किंवा ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्यांनाच यावर्षी पहिलीत प्रवेश देता येणार आहे. कारण या कालावधीप्रमाणे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संबंधित विद्यार्थी हे सहा वर्षाचे होतील व त्यांना पहिलीत प्रवेश देता येणे शक्य आहे.

नर्सरी ते इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळण्याचे वय -

1- नर्सरीकरिता वयाची तीन वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

2- जूनियरकेजीकरिता वयाचे चार वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

3- सिनियरकेजीकरिता वयाची पाच वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

4- इयत्तापहिलीकरिता 31 डिसेंबर २०२४ पर्यंत वयाचे सहा वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

10 वी निकाल ssc result | sscresult 10th result|

आता दहावीच्या निकालाची (10th result) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे घोषणा केली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

10 th result


विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर निकाल पाहता येणार :

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.or


शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

अतिशय प्रेरणादायी  नक्कीच वाचा...

इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश |Maharashtra Education News|

 

Maharashtra Education News: राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमाबाबत (School Syllabus) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश करण्यात येणार आहे. भाषा विषयात यांचा समावेश करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात अनेक माध्यमांच्या शाळा आहेत. आपल्या मुलांना परंपरेची ओळख करुन त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने आक्षेप आणि सूचना मागविल्या आहेत. SCERT ने (State Council of Educational Research & Training) विद्यार्थ्यांना भगवत गीता आणि मनाचे श्लोक यांचा पाठ करायला लावावे असे सूचवले आहे.



SCERT ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना (Student) देशाची परंपरा आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक आणि

भगवत गीतेचा बारावा अध्याय पाठ करायला लावावा असे एससीईआरटीने सुचविले होते. त्यानुसार आता इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 ते 25 मनाचे श्लोक, 6 वी ते 8 वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9 वी ते 12 वीसाठी भगवत गीता पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. भगवत गीतेमधील बारावा अध्याय विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी द्यावा असे सांगितले आहे.

भगवत गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. तो शाळांमध्ये शिकविण्यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांचा विरोध होऊ शकतो.

आराखड्या नमूद केले आहे की...

भारतीय ऋषींची दिनचर्या, भगवतगीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, गुरुशिष्य परंपरा, ऋषींचा आहार कसा होता याची ओळख विद्यार्थ्यांना करुन द्यावी. तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश गणित व विज्ञान विषयात करावा असे एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्यात म्हटले आहे.

अतिशय प्रेरणादायी नक्कीच वाचा...

जिद्द अशी की नशीबी आलेल्या परिस्थितीवर मात|motivational|

 जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी...


जन्मतः अंध असल्याने आई- वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करीत माला ही एमपीएससीच्या 'लिपिक 'गट क' मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

साधारण २० वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती. पोलिसांनी आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशान्वये पोलीसांनी तिला वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारुन माला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले. त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी कागदपत्राची पुर्तता करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ, बेवारस, दिव्यांग १२५ मुला-मुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले.




येथील विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा. प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली. येथील युनिक अकेडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एमपीएससी परीक्षेची तयार केली.

तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला एवढ्यावरच थांबायचे नाहीतर युपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे.



निवृत्त शिक्षकांना का? करावे लागले आंदोलन....

राज्यात rte घोटाळा |rte scam|

 राज्यामध्ये RTE घोटाळा....

गरजू वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु केली. मात्र याच आरटीई योजनेचा गैरवापर करून आपल्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून खोटी कागदपत्रं जमा करून वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Rte घोटाळा
Rte घोटाळा 


नागपुरात जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स बनवून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटीई अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सिताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला.

प्रत्येक शाळेत निवडक जागा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र, याच जागांवरील प्रवेशात मोठा घोळ केला जात असल्याचे नागपुरात समोर आले आहे.या योजनेअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय केली आहे.

मात्र नागपुरात 'आरटीई रॅकेट'सक्रिय असल्याचे समोर आले. आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना पालक बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती.पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात 17 पालकांविरोधात तर सदर पोलीस ठाण्यात 2 पालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या मागण्या सी.ई. ओ. ना सादर |teachers protest|

जि.प. सेवानिवृत्त शिक्षक थेट धडकले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.अमरावती यांच्या दालनात....


          जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक आपल्या प्रलंबित मागणी साठी दिनांक 6 मे 2024 वार सोमवारला  आपल्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्ते रक्कम सह इतर मागणी साठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांची भेट घेतली असता. मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासना कडून मिळाल्यावरही प्रशासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम न मिळाल्यामुळे इतर मागणी सह आज दिनांक 20 मे 2024 वार सोमवारला सेवानिवृत्त शिक्षक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अमरावती यांच्या दालनात मोठ्या प्रमाणात धडकले होते.



मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मा. शिक्षणाधिकारी साहेब , जि.प. अमरावती यांना त्वरित सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आदेश दिले असून 24 मे 2024 वार गुरुवारला  सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्या खालील प्रमाणे होत्या.

प्रमुख मागण्या या होत्या....

1) सेवा निवृत्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम त्वरीत वितरीत करण्यात यावी. 

2) सेवानिवृत्त शिक्षकांच्या  सातव्या वेतन आयोगाच प्रलंबित हप्ते रक्कम परत गेल्याने काही सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम मिळणार नाही . अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम मागणी त्वरीत करून लवकरात लवकर वंचित राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रक्कम मिळण्यात यावे .

3) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना गटविमा योजना रक्कमेच्या लाभापासून वंचित आहेत . त्यांना त्वरीत गटविमा योजनेचा लाभ त्वरीत मिळण्यात यावा. 

4) सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेस मिळण्यात यावे.

5) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपदान रक्कम मिळाली नाही. करीता उपदान रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.

6)अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी मिळाली नाही.त्यांना सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती नंतरची भविष्य निर्वाह निधी रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.

7) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना 1  जुलै ची काल्पनिक वेतन न लागून त्यांना वेतन वाढ फरकाची रक्कम मिळाली नाही. त्यांना त्वरीत वेतनवाढ फरकाची थकबाकी रक्कम मिळण्यात यावी.

8) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना महागाई भत्याची एरीअर्स रक्कम मिळाला नाही. त्यांना महागाई भत्याची एरीअर्स त्वरीत मिळण्यात यावा.

9) प्रत्येक पंचायत समिती स्तरावर प्रत्येक महिन्यात निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालत चे आयोजन करण्यात याव.   याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.



10) प्रत्येक महिन्यात जिल्हा स्तरावर निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात यावे. त्याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.

11) मा . शिक्षपाधिकारी (प्राथमिक विभाग ) जि .प . अमरावती यांच्या कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम हे एकाच टेबलावर आहे. पण जिल्हातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक या दोघांचे काम सांभाळण्यासाठी वेगवेगळे क्लार्क आहेत . त्याच प्रमाणे मा.शिक्षणाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी एक वेगळ्या क्लार्क ची व्यवस्था करावी . कार्यरत शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी दुसऱ्या क्लार्क ची व्यवस्था करावी सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांचे काम एकाच क्लार्क कडे देण्यात येवू नये . त्यामुळे कामाचा गोंधळ निर्माण होत आहे .

12) जि . प . शिक्षक यांना सेवानिवृत्ती च्या दिनांकास सेवानिवृत्ती चे सर्व लाभ मिळणे बाबत .


     जिल्हा प्रशासनाने सेवा निवृत्त शिक्षकांच्या वरील समस्या न सोडविल्यास जिल्हातील जि .प . सेवानिवृत्त शिक्षक दि 30 मे 2024 वार गुरुवारला जिल्हा परिषद अमरावती समोर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन सत्याग्रह करतील . मा . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब , जिल्हा परिषद , अमरावती यांनी दि 24 मे 2024 ला सभेचे आयोजन करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे . आजच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर समश्या मांडण्या करीता सत्येंदु अभ्यंकर सर, प्रभाकर देशमुख सर, विनोद कुऱ्हेकर सर, श्याम पाटील सर, ॲड .सौ .निता प्रफुल्ल कचवे मॅडम , सौ अश्विनी देशमुख मॅडम, श्रीमती शोभा मेहरे मॅडम ,अजमत उल्ला खान सर, मिलींद लबडे सर, अरविंद महल्ले सर, वासुदेव रेचे सर ,प्रकाश डोंगरे सर, मुनेश्वर उमप सर, कु सुनंदा चांगोले मॅडम , मनोहर चर्जन सर, जावेद अहमद खान सर, प्रशांत गुल्हाणे सर, हरी कपले सर, अरुण धांडगे सर, साहेबराव काळेमघ सर, प्रमोद डहाणे सर, चंद्रकांत शंके सर , राजेंद्र खरकाळे सर, सौ अनिता कापडे मॅडम , सुरेश रायपुरे सर, दिनेश कनेटकर , भास्कर गजभिये सर, संदीप मेहरे सर , राहुल शेंडे सर, उद्धव दहाट सर , . डि. व्ही. राऊत सर , रणजीत नितनवरे सर , रामचंद्र गजभीये सर, सौ कुल्हे मॅडम , सौ . नलिनी लंगटे मॅडम , सुनंदा गोहत्रे मॅडम, शालीनी नागपुरे मॅडम , दिपक मुळे सर , राजु खरकर सर , पुंडलीक वितोंडे सर, देविदास उमप सर, मो . शकील मो रहेमान सर, आर . बी . नितनवरे सर, सौ . इंद्रकला गजभीये मॅडम , मसुद अहमद सर , आर एन . पापळीकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , धनराज साखरे सर, विलास गावनेर सर, निरंजन राऊत सर, संजय कुकटकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , अनिल ढोके सर , दिलीप चौधरी सर , सुरेश राहाटे सर , राजु भाकरे सर व शेकडो सेवानिवृत्त शिक्षक हजर उपस्थित होते .

शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....


वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत महत्त्वाचे

 वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी बाबतच्या न्यायालयीन निर्णयाच्या...

 कोर्टाच्या अवमान बाबतची कार्यवाही  करण्यात येऊ नये सचिवस्तरावरून औरंगाबाद खंडपीठ येथे त्याबाबतचे पत्र सादर करण्यात आले आहे.

वेतनत्रुटीबाबतचा प्रस्ताव दि.०६.०५.२०२४ रोजी अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती, वित्त विभाग यांचेकडे सादर करण्यात आला आहे.

तरी सदर प्रकरणी मा. न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येवू नये, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे.






जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....



१२ वी परीक्षेचा निकाल संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी |hsc result|

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत


मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृ‌तु 27 संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


१. mahresult.nic.in


२. http://hscresult.mkcl.org


३. www.mahahsscboard.in


४. https://results.digilocker.gov.in


५. www.tv9marathi.com


६. http://results.targetpublications.org


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्यर्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....


जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....




शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू|teacher transfer intra district|

 शिक्षक  अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्ती शिक्षकांच्या बदली बाबत ...

सुधारीत अटी लागू करणे बाबत असून सदरील शासन निर्णयात २) जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी.

 समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याबाबत सूचना प्राप्त आहेत.

उपरोक्त सर्व शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी विस्थापित झालेले तसेच शासन निर्णयातील निकषाच्या अनुषंगाने बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी विहित नमुन्यात आपल्याकडे अर्ज सादर करणे बाबत या कार्यालयाचे संदर्भीय पत्र क्रमांक ५ अन्वये कळविण्यात आले होते. संदर्भीय पत्र क्रमांक ६ अन्वये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. तथापी दिनांक २६/०४/२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत विनंती बदलीची माहिती मागविण्यात आली होती. आपण सादर केलेल्या माहितीच्या आधारे जिल्हांतर्गत बदली बाबत प्राप्त अर्जाची संवर्ग-१ व संवर्ग-२ निहाय तसेच सर्वसाधारण अशी यादी तयार करण्यात आली आहे. सदर यादीत खालील बाबीची खात्री करावी.

संदर्भीय शासन निर्णय २ मध्ये नमुद १.८ विशेष संवर्ग भाग-१ मध्ये १.८.१ ते १.८.२० या प्रमाणे संवर्ग मधील शिक्षकांच्या नोंदी घेताना यादीमध्ये बाब नमुद करुन त्या बाबत आवश्यक अभिलेख्यावरुन -१ खात्री करावी. तसेच शासन निर्णयात नमुद ४.२.८ मध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करावी. तसेच ४.२.७ मध्ये नमुद नुसार विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदली साठी अर्ज करता येणार नाही या बाबत आपल्या तालुक्यातुन प्राप्त अर्जाबाबत खात्री करावी. तसेच संवर्ग-१ मध्ये बदली पात्र असतांना नकार दिला असल्यास संबधिताने लाभ घेतला आहे असे गृहीत धरुन आवश्यक ती कार्यवाही करावी.

संदर्भीय शासन निर्णय २ मध्ये ४.३ मध्ये नमुद नुसार जे शिक्षक विशेष संवर्ग भाग २ मध्ये मोडतात त्यांनी विवरण पत्र क्रमांक ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघाच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्या तालुक्यातील भाग २ मध्ये अर्ज सादर करत असलेल्या शिक्षकांकडून स्वयंघोषीत प्रमाणपत्र घेण्यात यावे. तसेच मुद्या क्र ४.३.६ नुसार विशेष संवर्ग २ खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमुद आहे. तीन वर्ष कालावधी पूर्ण होण्याआधी पती किंवा पत्नीने एकत्रीकरणाचा लाभ घेतला असल्यास संबंधितास यावर्षी विनंती बदलीचा लाभ घेता येणार नाही. त्यानुसार प्राप्त अर्जाची खात्री करावी. संवर्ग १, २ इतर, विस्थापीत व न्यायप्रविष्ठ निर्णयातील शिक्षक vec 6 आंतर जिल्हा बदलीने या जिल्हा परिषदेमध्ये हजर झाल्याचा दिनांक हा प्रथम नेमणुक दिनांक गृहीत धरावा.

तसेच आपल्या तालुक्यातुन बदल्यामध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या प्राप्त अर्जाची विस्थापीत असल्याबाबतची खात्री करावी व वर्षे नमुद करुन बदलीसाठी विहीत केलेला कालावधी पुर्ण केला किंवा नाही याची खातरजमा करावी.

सदंभीय शासन निर्णय २ मधील १.७ मध्ये नमुद केल्यानुसार सन २०२२ मध्ये घोपीत केलेल्या अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली असेल अशा शिक्षकांना बदल्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. त्यानुसार अशा शिक्षकांची नोंद आपल्या यादीत सेवा कालावधीसह नमुद करावी. कार्यरत शाळेत ५ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक हे विनंती बदलीस पात्र ठरतील. 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संबधिताच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत निर्णय घेण्यासाठी संबधित शिक्षकांचे नाव सदरच्या यादीत संवर्गनिहाय सेवाजेष्ठतेनुसार नाव समाविष्ट करण्यात येवून शेरा रकाना मध्ये मा. न्यायालयीन प्रकरण असे नमुद करावे. (सोबत यादी)

आपल्या तालुक्यात बदली साठी प्राप्त झालेल्या बदली विनंती अर्जाचे आपण सादर केलेले प्रपत्र मध्ये नमुद असलेले सर्व बाबी काळजीपुर्वक आवश्यक अभिलेख्या आधारे तपासणी करुन आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरीत यादी सादर करावी. यादी प्रसिध्द केल्यानंतर येणाऱ्या आक्षेप दुरुस्तीसह अदयावत यादी रिक्त पदाच्या अहवालासह दिनांक २०/०५/२०२४ रोजी दुपारी २.०० पर्यत समक्ष सादर करावी. सदरच्या यादीत काही त्रुटी राहिल्यास त्या बाबत आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.






शिक्षक बदली बाबत निवेदन |teachers transfer |

 सार्वत्रिक बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया राबवा...

 शिक्षक समितीची मागणी                                                                                     छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलांची लगीन घाई चालू झाली असून माहिती संकलित करणे याद्या बनवणे अर्ज मागवणे पडताळणी करणे ही कामे सध्या जोरात चालू आहे .

15 जून च्या आत बदल्या होतील असे वाटते परंतु या बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदल्या करणार नाही अशी शिक्षण विभागातून समजते ही बदली प्रक्रिया राबवतांनी शिक्षकांना जर सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाली नाही तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने होत नाही . शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने चालते बदली हा शिक्षकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून या बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया राबवली नाही तर ज्या शिक्षकांना तालुक्यामध्ये राहायचे परंतु बदली पात्र असल्यामुळे दुसऱ्या शाळेमध्ये बदली करून घ्यायची या प्रक्रियेमुळे त्या शिक्षकाची बदली होणार नाही शिक्षकांना सोयीच्या पदस्थापना मिळणार नाही पर्याय न अध्यापनाचे पवित्र काम समाधानकारक होणार नाही तेव्हा शिक्षक समितीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांना विनंती केली आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया अध्यापन चांगले होण्यासाठी राबवा या असे आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय साळकर नितीन नवले शाम राजपूत शालिग्राम खिस्ते सुनील धाटवळे साळवे केडी मगर अशोक डोळस बबन चव्हाण विलास चव्हाण दीपिका एरंडे मंगला मदने वर्षा देशमुख अर्चना गोरडे जयश्री राठोड प्रीती जाधव आदींनी दिले आहे,




दिवेरचे युद्ध व महाराणा प्रताप यांचा विजयी संघर्ष

 पार्श्वभूमी -

हल्दीघाटीची लढाई


महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांच्यातील युद्धाचे नाव होते "हल्दीघाटीची लढाई".  या युद्धाचा काळ इ.स.1576 होता.  मुघल साम्राज्याच्या विस्तारादरम्यान, अकबराने महाराणा प्रताप यांचे बहुतेक राज्य मेवाड ताब्यात घेतले.  याला महाराणा प्रताप यांनी विरोध केला आणि हल्दीघाटी येथे लढाईचे ठाणे होते.

दिवेरचे युद्ध -

मेवाडचे राजे महाराणा प्रताप आणि मुघल साम्राज्य यांच्यात संघर्ष झाला.  या युद्धात महाराणा प्रताप यांनी  मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तर अकबराने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.  हे युद्ध भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, ज्यामध्ये महाराणा प्रताप यांच्या शौर्य आणि धैर्याची गाथा अमर आहे.



1576 च्या हल्दीघाटीच्या लढाईनंतरही अकबराने 1577 ते 1582 या काळात महाराणांना पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी सुमारे एक लाख सैन्य पाठवले होते, अशी इतिहासात नोंद आहे.  इंग्रज इतिहासकारांनी लिहिले आहे की हल्दीघाटीच्या लढाईचा दुसरा भाग, ज्याला ते 'दिवेरची लढाई' म्हणतात, मुघल सम्राटाचा दारुण पराभव ठरला.

कर्नल टॉड यांनीही त्यांच्या पुस्तकात हल्दीघाटीला 'मेवाडचा थर्मोपल्ली' असे संबोधले आहे, तर दिवेरच्या लढाईचे वर्णन 'मेवाडची मॅरेथॉन' असे केले आहे. पर्शियाचे ज्यामध्ये ग्रीसचा विजय झाला होता, या युद्धात ग्रीसने अतुलनीय शौर्य दाखवले होते), कर्नल टॉड यांनी लिहिले आहे की महाराणा आणि त्यांच्या सैन्याचे शौर्य आणि लढाऊ कौशल्य स्पार्टाच्या योद्ध्यांइतकेच शूर होते आणि ते स्वतःहून अधिक चांगले होते. रणांगणात चारपट मोठ्या सैन्यालाही ते घाबरत नव्हते .

दिवारच्या लढाईची योजना महाराणा प्रताप यांनी अरवली येथे असलेल्या मानकियावासाच्या जंगलात केली होती.  भामाशाहकडून मिळालेल्या पैशातून त्यांनी मोठी फौज तयार केली होती.  खडबडीत जंगले, विस्कटलेले डोंगरी रस्ते, भिल्ल, राजपूत आणि स्थानिक रहिवाशांच्या गनिमी सैन्याचे सततचे हल्ले आणि साहित्य आणि शस्त्रास्त्रांची लूट यामुळे मुघल सैन्याची स्थिती बिघडत चालली होती.

हल्दीघाटीनंतर ऑक्टोबर १५८२ मध्ये दिवेरची लढाई झाली.  अकबराचा काका सुलतान खान याने या युद्धात मुघल सैन्याचे नेतृत्व केले.  तो विजयादशमीचा दिवस होता आणि महाराणाने आपल्या नव्याने संघटित सैन्याचे दोन भाग केले आणि युद्धाचा गजर केला.  एका तुकडीचे नेतृत्व स्वत: महाराणा प्रताप करत होते, तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व त्यांचा मुलगा अमर सिंह करत होता.

महाराणा प्रताप यांच्या सैन्याने महाराज कुमार अमर सिंह यांच्या नेतृत्वाखाली दिवारच्या शाही ठाण्यावर हल्ला केला.  हे युद्ध इतके भयंकर होते की प्रतापचा मुलगा अमरसिंह याने मुघल सेनापतीवर भाल्याने असा हल्ला केला की भाल्याने त्याच्या शरीराला आणि घोड्याला छेद दिला आणि तो जमिनीवर पडला आणि सेनापती पुतळ्यासारखा एका जागी अडकला.

बहलोल खानचा वध -

दुसरीकडे महाराणा प्रताप यांनी बहलोल खानच्या डोक्यावर एवढा वार केला की घोड्यासह त्याचे दोन तुकडे झाले.  स्थानिक इतिहासकारांचे म्हणणे आहे की या युद्धानंतर "मेवाडचे योद्धे एकाच फटक्यात घोड्यासह स्वाराचा वध करतात" अशी एक म्हण निर्माण झाली.

त्यांच्या सेनापतींची ही अवस्था पाहून मुघल सैन्यात घबराट पसरली आणि राजपूत सैन्याने अजमेरपर्यंत मुघलांचा पाठलाग केला.  भयंकर युद्धानंतर उर्वरित 36,000 मुघल सैनिकांनी महाराणासमोर शरणागती पत्करली.  दिवारच्या लढाईने मुघलांचे मनोधैर्य खचले.  दिवारच्या लढाईनंतर प्रतापने गोगुंडा, कुंभलगड, बस्सी, चावंड, जव्हार, मदरिया, मोही, मांडलगड ही महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेतली.

दिवेरची लढाई वरील अप्रतिम गीत पहा...




१२ वी निकाल 21मे ला |MSBSHSE 12th Result 2024 Date Soon|

  MSBSHSE 12th Result 2024 Date Soon  :

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.  बोर्डाकडून बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सकुता लागून राहिली आहे. या निकालासंदर्भात सूत्रांच्या आधारे एक माहिती मिळाली आहे. बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबतची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल 21 मे ला जाहीर होणार...


  

सीबीएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या निकालानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार आहे.यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

आता या निकाला संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  बारावीच्या निकालाची तारीख 21 मे जाहीर हो आहे.  बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

  त्यानुसार येत्या आठवड्याभरात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.   

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :

बारावी निकाला संदर्भात अधिक माहितीसाठी आणि प्रत्यक्ष निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेटू देऊ शकता.  

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hsc.mahresults.org.in

hscresult.mkcl.org

results.gov.in.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक माॕकपोल व संपूर्ण प्रक्रिया |election mock poles|evm machine|

 Mock Pole / अभिरुप मतदान


मतदानाला सुरुवात करण्याच्या दिड तास अगोदर Mock Pole / अभिरुप मतदानाला सुरुवात करावी. जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर 15 मिनिटे वाट पहावी. केवळ 2 मतदान प्रतिनिधी उपस्थित असतील किंवा नसतील तरिही सकाळी 5.45 वाजता Mock Pole / अभिरुप मतदानाला सुरुवात करावी.




EVM ची जोडणी करा


BU3 ची केबल BU2 ला BU2 ची केबल 

BU1 ला  BU 1 ची केबल VVPAT ला-VVPAT ची केबल CU ला जोडा.


(VVpat, BU च्या डाव्या बाजूला ठेवा)

1 BU + VVPAT मतदान कक्षामध्ये व CU मतदान अधिकारी 3 च्या टेबलवर ठेवा VVPAT चा नॉब उभा (Vertical) करा 1 CU चा Switch On करा


BVC हा क्रम लक्षात ठेवा


Mock Pole / अभिरुप मतदान ला सुरुवात करा


सुरुवातीला VVPAT मध्ये निघालेल्या 7 Paper Slip असल्याची खात्री करा व त्या बाहेर काढा 1 CU वरील Clear बटण दाबा C-R-C करुन घ्या


1 Total बटण दाबून '0' मतांची खात्री करा व VVPAT मध्ये Paper Slip नसल्याचे म. प्रतिनिधींना दाखवा  BU वर म. प्रतिनिधींना सर्व उमेदवारांना समसमान मते देण्यास सांगा किमान 50 मते द्या 1 दिलेल्या मतांची मतदान अधिकाऱ्यांनी उमेदवार निहाय नोंद घ्यावी

 1 CU चे Close बटण दाबा 

 CU चे Result बटण दाबा 

1 VVPAT च्या ड्रॉप बॉक्स मधील स्लीप बाहेर काढा

 1 उमेदवारनिहाय स्लीप मोजणी करा


Mock Pole Result चा ताळमेळ घ्या


Paper Slip Count = CU Result Count = म. प्रतिनिधींनी केलेल्या मतदानाची उमेदवारनिहाय नोंद



मतदान केंद्राध्यक्ष यांचे सोपे कार्य


Result Tally झाल्यावर Clear बटण दाबून CU मधील Mock Pole डेटा क्लीअर करा


पुन्हा Total बटण दाबून '0' मतांची खात्री करा व VVPAT च्या ड्रॉप बॉक्स मध्ये Paper Slip नसल्याचे उपस्थित मतदान प्रतिनिधीना दाखवा


CU चा Switch Off करा


CU मतदानाकरिता सील करा


हिरवी AB सील + स्पेशल टॅग अॅड्रेस टॅग गुलाबी पेपर सील यावर म.प्रतिनिधी / PRO यांनी सही करा

VVPAT च्या ड्रॉप बॉक्स अॅड्रेस टेंग ने सील करा


Mock Pole च्या वेळेस निघालेल्या सर्व पेपर स्लीप च्या मागे Mock Pole Slip असा शिक्का मारा

सर्व पेपर स्लीप तुम्हाला दिलेल्या काळ्या पाकिटात ठेवा. पाकीट गुलाबी सील ने सील करा

काळ्या पाकिटावर मतदान केंद्र नाव, क्रमांक, मतदानाचा दिनांक, म. प्रतिनिधी व PRO सही इ. तपशील भरा


Mock Pole प्रमाणपत्र अभिरुप मतदान प्रमाणपत्र अचूक तयार करा

जोडपत्र -5: केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 अभिरुप मतदान प्रमाणपत्र

CU चे Switch On करा व EVM मतदानाकरीता तयार व्हा

सर्व पेपर स्लीप तुम्हाला दिलेल्या काळ्या पाकिटात ठेवा. पाकीट गुलाबी सील ने सील करा काळ्या पाकिटावर मतदान केंद्र नाव, क्रमांक, मतदानाचा दिनांक, म. प्रतिनिधी व PRO सही इ. तपशील भरा

Mock Pole प्रमाणपत्र अभिरुप मतदान प्रमाणपत्र अचूक तयार करा


जोडपत्र -5: केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 अभिरुप मतदान प्रमाणपत्र

CU चे Switch On करा व EVM मतदानाकरीता तयार व्हा


सकाळी ठिक 7.00 वाजता मतदानाला प्रारंभ करा


सुरुवातिला भरायची विविध प्रमाणपत्रे


मतदारयादीला चिन्हांकीत प्रत म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र तयार करा जोडपत्र- 4


मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र तयार करा जोडपत्र 6: भाग 1


मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी भरायला घ्या जोडपत्र 7


मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी ज्ञापन: जोडपत्र 10


मतदान प्रतिनिधी / कार्यमओचक प्रतिनिधी यांचे ये-जा नोंदपत्रक जोडपत्र 11




मतदान प्रतिनिधीला द्यायचा प्रवेश पत्राचा नमुना जोडपत्र 12




मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेला प्रवेशपत्रांचा हिशोब जोडपत्र 13


मतदान केंद्राध्यक्ष याचे सोपे कार्य


मतदान पूर्ण झाल्यावर करायची कार्यवाही...


मतदान पूर्ण झाल्यावर


संध्याकाळी 06.00 नंतर रांगेतील शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर

CU मधील Total Button दाबून एकूण मतांच्या संख्येची नोंद करा

(17C मध्ये अनुक्रमांक 6 वर व केंद्राध्यक्षांची दैनंदिनी मध्ये अनुक्रमांक 10 (4) वर व इतर आवश्यक ठिकाणी)



CU चे Close Button दाबा

जोडपत्र- 5 : मतदान केंद्राध्यक्षांचे अहवाल भाग 3 तयार करा

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्लोज CLOSE बटण दाबणे

मतदान संपल्यावर CU च्या डिसप्ले वरील Poll End Time याची नोंद घ्या

जोडपत्र 6: केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग 3 तयार करा

मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र

CU चे Switch बंद करा

VVPAT चा नाँब आडवा (Horizontal) करा

BU व VVPAT ची केबल काढा

CU, BU व VVPAT Carrying Case मध्ये ठेवा


Carrying Case ला Address Tag ने Seal करा


जोडपत्र 6: केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग 4 तयार करा


मतदानयंत्र मोहोरबंद केल्यानंतरचे घोषणापत्र

जोडपत्र 8: नमुना 17क: भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब बनवायला घ्या

जेवढे मतदान प्रतिनिधी असतील तेवढे 3 जादा 17क जोडपत्र बनवा

सर्व मतदान प्रतिनिधींना फॉर्म 17क द्या


आता निवडणूक कागदपत्रे पाकीटे मोहोरबंद करायला घ्या. दिल्याप्रमाणे 6 पाकिटे तयार करा.

आवश्यक ती पाकिटे मोहोरबंद करा बाकी तशीच ठेवा. केंद्रावर साहित्य पोहोच करा व घरी जा


मतदान केंद्राध्यक्ष यांचे सोपे कार्य

रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आणि झेडपी गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा




 जास्तीत जास्त जणांनी यामध्ये सहभाग घेऊन  आकर्षक असे प्रमाणपत्र प्राप्त करावे.







 प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खालील टॅबला क्लिक करा....












शिक्षक जिल्हाअंतर्गत प्रक्रिया 2024 |नमुना अर्ज,|पात्रता|,निकष

 जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासुन कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पा नुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, असे निर्देश आहेत.

शासन निर्णयनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे. तसेच लोकसभा निवडणूक 2024 बाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त संदर्भिये आदेशानुसार कार्यबाही पुर्ण करणे आवश्यक असल्याने आपले गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील विनंती बदलीचे अर्ज दिनांक 14/05/2024 ते दिनांक 16/05/2024 अखेरीस आपल्या कार्यालयात सादर करण्याबाबत सर्व शिक्षकांना सुचित करावे त्यानुसार दिलेल्या विहीत नमुन्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या प्रकारचा विनंती अर्ज स्विकारण्यात येऊ नये तसेच संबधित अर्जदारानी विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 अंतर्गत विनंती अर्ज सादर केला असल्यास त्याबाबतचा पुरावा / दाखले/प्रमाणपत्र यांची झेरॉक्स प्रत सोबत असणे आवश्यक राहिल याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे. सदर प्रक्रियेसाठी विशेष संवर्ग भाग-1, 2, 3, व 4 साठी पात्रता निकष हे संदर्भ क्र.। च्या शासन निर्णयातील तरतूदी नुसार आवश्यक असतील. बदली इच्छुक पात्र शिक्षकांना विनंती अर्ज सादर करण्याबाबत आदेशित करतांना पात्रता विषयक पुढील बाबी विचारात घ्याव्यात व त्त्यानुसारच अर्ज स्विकारले जावे

  1. विशेष संवर्ग भाग-1 सदर संवर्गातंर्गत वय वर्षे 53 पुर्ण करिता संदर्भ दिनांक 30/06/2024 राहिल या व्यतिरिक्त संदर्भ क्र.। च्या शासन निर्णयात नमूद पात्रता निकष लागू राहतील. सध्या कार्यरत शाळेतील सलगसेवा दिनांक
  2. 30/06/2024 रोजी 3 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल. 2. विशेष संवर्ग भाग-2 सदर संवर्गातंर्गत दोन्ही कर्मचारी एकाच जिल्हयात कार्यरत असणे आवश्यक असेल तसेच

दोन्ही कर्मचारी यांच्या कार्यालयातील अंतर 30 कि.मी. पेक्षा जास्त असेल. सध्या कार्यरत शाळेतील सलगसेवा दिनांक 30/06/2024 रोजी 3 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल. सदर निकष पूर्ण करणा-या पती पत्नी यापैकी एक शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असल्यास अशा शिक्षकांना सदर संवर्गात पात्र गणन्यात येईल. 3. विशेष संवर्ग भाग-3 सध्या कार्यरत असलेल्या अवघड क्षेत्रातील सलगसेवा दिनांक 30/06/2024 रोजी 3 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल.

  1. संवर्ग-4 सध्या कार्यरत असलेल्या सर्वसाधारण क्षेत्रातील सलगसेवा 10 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त व सध्या कार्यरत असलेल्या शाळेतील सलग सेवा 5 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त (दिनांक 30/06/2024 रोजी) असणे अनिवार्य असेल,
  2. ज्या शिक्षकांच्या बदली प्रकियेबाबत मा. उच्च न्यायलयात न्यायालयीन प्रकरणे सुरु आहेत असे शिक्षक सदर प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही. मात्र मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (परवानगी नुसार) अशा शिक्षकांचा समावेश सदर प्रक्रियेत करण्यात येईल.
  3. जिल्हयातील सर्व गटांचे संकलित अहवाल प्राप्त झाल्यानंतर बदली पात्र शिक्षकांची अंतरिम यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिध्द करण्यात येईल. सदर यादी प्रसिध्द केल्यानंतर यादीतील शिक्षकांच्या पात्रतेबाबत हरकत आक्षेप नोंदविणे करता दोन दिवसांचा कालावधी देण्यात येईल. तसेच या दरम्यान दिनांक 30/06/2024 रोजीची तालुका निहाय / पदनिहाय / माध्यम निहाय रिक्त पदांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. रिक्त पदांची यादी व अंतरिम यादी प्रसिध्द केल्यानंतर अर्ज केलेल्या शिक्षकांपैकी जर एखादया शिक्षकांस अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास गटशिक्षणाधिकारी यांचेकडे संबधितानी विनंती अर्ज सादर करावे, अशा प्रकारे प्राप्त विनंतीत अर्ज व प्राप्त हरकती व आक्षेप यांची तपासणी करुन बदली पात्र शिक्षकांची अंतिम यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिध्द करण्यात येईल.
  4. अंतिम यादीत पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्र.1 मध्ये नमूद तरतूदी नुसार टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येईल. याप्रक्रियेसाठी जिल्हयातील दिनांक 30/06/2024 अखेरची सर्व रिक्त पदे समुपदेशन प्रक्रियेअंतर्गत समाविष्ठ करण्यात येतिल. मात्र समतोल तत्वानुसार जिल्हास्तरीय रिक्त पदांच्या प्रमाणात गटातील पदसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्यागटातील रिक्त पदे भरली जाणार नाही. तसेच प्रत्येक टण्याचीबदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यातील रिक्त जागा पुढील बदली टप्यातील शिक्षकांन साठी उपलब्ध करुन देण्यात येतिल. यानुसार संपूर्ण बदली प्रक्रिया समुपदेशन पध्दतीने पूर्ण करण्यात येईल.

उपरोक्त नमूद पात्रता निकष धारण करणा-या आपल्या गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे प्राप्त सर्व विनंती अर्ज आपले स्तरावरुन संकलित करुन त्यांचा एकत्रित अहवाल यादीसह या कार्यालयास दिनांक 21/05/2024 रोजी सादर करावा. तसेच यापूर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर या कार्यालयात विनंती बदलीसाठी अर्ज सादर केले आहेत ते विचारात घेण्यात येणार नसल्याबाबत कळविण्यात यावे.

तसेच दिनांक 30/06/2024 अखेर शिक्षकांची शाळा निहाय / पटसंख्येनिहाय मंजूर/कार्यरत / रिक्त पदांची अचूक माहिती सोवत सादर करावी.

विनंती बदली नमुना अर्ज




राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात| nps|

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत.


जी.आ.र पहा....







जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात | old pension| |nps|

 १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या व १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या करिता १९८२  ची जुनी पेंशन लावतांना कारायवयाची अंमलबजावणी.


शासन परिपत्रक :

ज्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-


राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा. विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक २ अनुसार दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावेत.


नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करुन त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी.असे आदेशात म्हटलेले आहे.

संपूर्ण शासन आदेश पहा....

nps