डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
आदर्श शिक्षक पुरस्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आदर्श शिक्षक पुरस्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?

 'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?


श्याम नाडेकर यांच्या लेखणीतून

(लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर )

 'तुम्हाला आम्ही पुरस्कार देतो, त्यासाठी तुम्हीच प्रस्ताव पाठवा', असे म्हणणे आणि प्रस्ताव पाठवल्यावरही 'छाटणी करून पुरस्कार देऊ', असा प्रकार करणे म्हणजे शिक्षकाचा आणि त्याच्या सेवेचा अपमानच नव्हे का? असाच काहीसा प्रकार 'आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीत होत असल्याची चर्चा शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्तुळात रंगायला लागली आहे.

शिक्षक दिनाच्या पर्वावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. मात्र, यासाठी स्वतः शिक्षकांना स्वतःच्या कार्याचा गवगवा करणारे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावे लागते.

केलेले अथवा करत असलेले उल्लेखनीय कार्य प्रखरतेने दिसत असताना, त्या कार्याची दखल स्वतः घेण्याऐवजी शिक्षकालाच स्वत:विषयी प्रस्ताव पाठवण्यास सांगणे, योग्य ठरते का? हा प्रकार म्हणजे, पुरस्कार भिकेमध्ये देण्यासारखे किंवा शासनाकडून खैरात वाटण्यासारखाच असल्याची खंत जिल्ह्यातील अनेक स्वाभिमानी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

संपुर्ण लेख वाचा....




राज्य शिक्षक पुरस्कारात वर्धा जिल्ह्याला स्थगिती.

 राज्य शिक्षक पुरस्कारात वर्धा जिल्ह्याला स्थगिती....


क्रांतियोती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022-23 साठी निवड प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी राज्यातील शिक्षकांना राज्य गुणगौरव पुरस्कार दिला जातो. निवड समितीने निवड केलेल्या नावाला विरोध करीत न्यायालयात दाद मागण्यात आली असता न्यायालयाने या प्रक्रीयेलाच स्थगिती दिल्याने शिक्षकांचा 5 सप्टेंबर रोजी होणारा गुणगौरव कार्यक्रम होणार नाही. 




शिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येक जिल्ह्यातून एका शिक्षकाची निवड केली जाते. शिक्षकाची निवड करण्यासाठी जिल्हा निवड

समितीकडून निवड प्रक्रिया राबवून प्रत्येक गटातून राज्य निवड समितीकडे तीन शिक्षकांच्या नावांची शिफारस केली जाते. यावर्षी वर्धा जिल्ह्यातून जिल्हा निवड समितीने निवड प्रक्रिया राबविताना शरद ढगे प्राथमिक शिक्षक यांना निवड प्रक्रियेत अपात्र ठरविले.

जिल्हा निवड समितीचा निर्णय अन्यायकारक असल्यामुळे ढगे यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. उच्च न्यायालयाने जिल्हा निवड समितीने ढगे अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. वर्धा जिल्हा प्राथमिक गटातून पुरस्कारासाठी केली जाणारी निवड पुढील आदेशापर्यंत करता येणार नाही.