डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...#अक्षरगट

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...


इयत्ता पहिली 

विषय- मराठी


अक्षरगट निहाय निर्मित शैक्षणिक साहित्य विषयीं थोडसं ...


मित्रांनो, अक्षरगट का असावी याची माहिती देण्यापूर्वी थोडं माहिती करून घेऊया. पुर्वी शिक्षक वर्णमालेतील वर्णाच्या क्रमाने मुलांना शिकवित असत. काहीतर वर्णमालेचं तक्ता भिंतीला टांगून ठेवायची आणि मुलांना अ अननस आ-आगगाडीचा या पद्धतीने शिकवायची. याप्रमाणे संपूर्ण वर्णमालेतील अक्षरे शिकवून झाल्यावर स्वरचिन्ह लावून अक्षरं शिकविली जात असे. तेव्हा बाराखडी. त्यामुळे मुले उशिरा शब्द वाक्य वाचायला शिकायची.




अक्षरगट का असावी याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजनानुसार अक्षरगटातील काही अक्षरे व काही स्वरचिन्ह परिचय करून मुलांना प्रारंभिक स्तरावरच स्वरचिन्हविरहित शब्द, वाक्ये व स्वरचिन्हयुक्त शब्द, वाक्य वाचनाचा सराव व्हावा यासाठी अक्षरगट असावे लागते. एका दृष्टीक्षेपात शब्द वाचन करता येणं हे खूप महत्त्वाचे असते. तसेच वाक्यांचा सुद्धा आहे. मुले वाक्य वाचन करताना एका दृष्टीक्षेपात वाक्य वाचायला हवं, असं जर होत नसेल तर वाक्य वाचन करताना त्या वाक्याचा अर्थ निसटून जाण्याची शक्यता असते त्यामुळे समजपुर्वक वाचनात अडथळा निर्माण होत असते. एक दोन अक्षरगट झाली की, त्यावर तयार होणारे वाचन पाठ वाचता यावे हेसुद्धा अपेक्षित आहे त्यानुसार पाठ्यपुस्तकात वाचनपाठाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता पहिलीत ४ वाचनपाठात एकूण ९ अक्षरगट आहेत. जसजसे पुढे जाऊ तसतसे मुलांचे शब्द ज्ञान वाढत असते. त्या त्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह व पुर्वीच्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह घेऊन शब्द वाक्य तयार करून मुलांना वाचन व लेखन सराव करावा हे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकात वाचन लेखनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मोजके शब्द वाक्यांचा समावेश असतो. पण शिक्षकांना भरपूर शब्द व वाक्यांचा वाचन लेखन सराव द्यावे लागते.

आपण यासाठी गडचिरोलीसह महाराष्ट्रातील पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नवोपक्रमाने दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती करून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे वाचन लेखन विकास व्हावा यासाठी अक्षरगट निहाय शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. सदर साहित्य शिक्षक लॅपटॉप, प्रोजेक्टर, संगणक, टॅब, स्मार्ट मोबाईल व मुद्रित साहित्य वापरता येईल.

शैक्षणिक साहित्य निर्मिती
 
श्री. वाल्मीक वन्नेवार
जि.प.प्रा. शाळा, कसुरवाही पं.स.- जि. गडचिरोली



 इयत्ता १ ली अक्षरगट डाऊनलोड करा....


अ.क्र.अक्षरगट क्रमांक डाऊनलोड 

1

अक्षरगट १   

Download  


2

अक्षरगट २  

Download


3

अक्षरगट ३  

Download


4

अक्षरगट ४  

Download


5

अक्षरगट ५ 

Download


6

अक्षरगट ६ 

Download


7

अक्षरगट ७  

Download










इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे....#school open



आता इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६




२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी असे आदेश काढण्यात आले. 



(i)  शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.


ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. 


iii) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.


(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.


(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे  विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविंडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.


२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.


२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 


२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.


३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील •अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.


४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशा सुचना देण्यात आल्या  आहे.


५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करण्याच्चे सुचविले आहे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावयाचा आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावयाचे आहे. 


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६



HammerHead अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित आहे का.....

 अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित  आहे का..... 


हॕमरहेड  Hammerhead worm हा एक विषारी प्राणी आहे परंतु याचा मानवाला थेट धोका नाही,


पृथ्वीवर करोडो जीव आहेत असे काही जीव आहेत त्यांना आपण कधीच पाहिलेले नसते  किंबहुना अचानक पहिल्यांदा नजरी पडल्यास आपण त्याबद्दल माहित करून घेण्यासाठी फार उत्सुक होऊन जातो. 
तर आज आपली उत्सुकता व माहिती वाढवणारी पोस्ट घेऊन आलो आहोत.




 Earthworm ची मोठ्या प्रमाणात शिकार करत असल्यामुळे  Earthworm हे वनस्पती साठी उपयुक्त आहे.


 आणि त्यांची संख्या hammerhead worm मूळ जर कमी झाली तर पर्यावरण संकटात येऊ शकते .


तसेच हा प्राणी संभाव्य अमर आहे. 


           याबद्दल व्हिडीओत अधिक माहिती पहा...

            

हा मला दोन चार दिवसापूर्वी सिल्लोड परिसरात आढळला होता. मला सुरुवातीला त्याची ओळख नव्हती नंतर त्याची ओळख झाली आणि त्याविषयी थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे सविस्तर माहिती आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता.


       लेखन व व्हिडीओ निर्मिती 

                श्रीकृष्ण बडकसर 

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना...#Obc student #education

 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना


ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ "शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना" सुरू होणार आहे.



   ज्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना होणार


 असून यासाठी  जवळपास ६ कोटीचा निधी तरतुद करण्यात आला आहे. याबाबत माहिती इ.मा.बहूजन कल्याण मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

   या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना राज्य अंतर्गत , देशातील तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यावरील शिक्षण करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.


या योजनेची राज्य व देश अंतर्गत शिक्षण घेण्याची कर्ज मर्यादा ही  महत्त्तम १० लाख तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिक्षण कर्ज मर्यादा २० लाख इतकी असणार आहे.


      या योजनेत बॕकेचा जास्तीत जास्त १२ % व्याज परतावा नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे.

१ ली च्या अभ्यासक्रमात होणार असा महत्वाचा बदल जाणून घ्या...... #द्विभाषिक पुस्तक

राज्यात मराठी भाषेतून शिक्षण सक्तीचे आहे.  मात्र, शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी व्हावे आणि लहानपणापासूनच इंग्रजी तसेच इंग्रजीची संकल्पना मुलांना समजावी, यासाठी राज्यातील सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये येत्या शैक्षणिक 
वर्षापासून  एकात्मिक आणि द्विभाषिक अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इयत्ता १ ली च्या अभ्यासक्रमात महत्त्वाचा बदल होणार आहे. 





      मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी  विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच मराठीचे शब्द आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  
या बैठकीत श्री  विवेक गोसावी,  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाइन उपस्थित होते.
   मा. शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, हा प्रयोग प्रथम ४८८ आदर्श विद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचा पहिल्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.  या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहून तो मराठी शाळांमध्ये राबविला जाणार आहे.  त्याचप्रमाणे राज्य पाठ्यपुस्तक विकास आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाला इतर शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि इंग्रजी भाषेतील शब्द, दैनंदिन शब्द, संकल्पना, मराठी शब्दांव्यतिरिक्त सोपे इंग्रजी शब्द आणि वाक्ये शिकता येतील. स्पष्टपणे समजून घ्या.  पाठ्यपुस्तके आकर्षक, जागतिक दर्जाची असावीत, असे ते म्हणाले

२६/११ शहीदांना काव्यमय मानवंदना....#police #brave

मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना.....





 🚨 🚓सदरक्षणाय...🚓🚨


सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,

या जन्मी होत अशी जनसेवा ,

लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा...


दिवस रात्र  सदैव उभे राहती ,

शांती समाजास तेव्हाच लाभती,

येता संकट कसलेही जेव्हा,

खाकीत शोभूनी वीर हे लढती...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


सक्त घडत यांचा असा पहारा,

वाटत कठोर जरी यांचा दरारा,

मन आतुन असतेच कोमल,

मानवी सेवेत स्वतःस ठेवे जहाल,

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


अतिरेक्यांशी लढला उभ्या छातीने,

दिसे फक्त जनकल्याण खाकीने,

धावूनी  देत जीव  ओवाळून,

प्रेम असे मायभुचे मृत्यूस कवटाळून...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


      *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*

            औरंगाबाद 

       9960878457

सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर, १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळेतील मुलांची शाळा सुरू होणार... #School open #primary open

 सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर ...

१ डिसेंबर २०२१ पासून प्राथमिक शाळेतील मुलांसह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत.


 सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.




मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.  राज्य शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच कोविड प्रोटोकॉलसह तपशीलवार मानक कार्यप्रणाली  (S.O.P) जारी केली जाणार आहे..


 ऑक्टोबरपासून, 

  • शहरी महाराष्ट्रातील शाळा 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 
  • ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु झाल्या होत्या.


 'राज्य मंत्रिमंडळाने आज राज्यभरातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ४ थी वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  बालरोग टास्क फोर्स आणि इतरांशी सलग चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  आम्ही शाळा आणि पालकांसाठी तपशीलवार एसओपी तयार करण्यासाठी काही दिवस मागितले आहेत आणि म्हणून 1 डिसेंबरपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,शिक्षणमंत्री  म्हणाल्या .  या वर्षाच्या सुरुवातीला या टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती जेव्हा तज्ञांना भीती होती की संभाव्य तिसऱ्या लहरीमुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो.

 कोविड-19 साथीच्या आजाराने राज्यात मार्च 2020 पासून शाळांमधील प्रत्यक्ष  वर्ग बंद केले होते.  12 जुलैपासून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीच्या वर्गासाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले होते. 4 ऑक्टोबर रोजी शहरी भागातील शाळा 8 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या, तर ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत.


 शिक्षणमंत्री  म्हणाल्या  की, राज्य सरकारने निर्णय घेण्यापूर्वी दिवाळीनंतर 15 दिवस कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवले.  सणासुदीनंतर राज्यातील दैनंदिन प्रकरणे वाढू शकतात, अशी चिंता होती, परंतु सुदैवाने तसे झाले नाही.


 प्राथमिक विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात येणाऱ्या अडचणी मान्य करताना गायकवाड म्हणाले की, हे एक आवश्यक पाऊल आहे.  'इयत्ता 1 ते 4 मधील विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आणि शारीरिक अंतर राखण्याची सक्ती करणे कठीण आहे कारण ते खूपच लहान आहेत.  पण त्यांना पुन्हा शाळेत आणणेही आवश्यक आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून ते घरीच असल्याने हळूहळू ते मुख्य प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता आहे,असे गायकवाड यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.  


 विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे.  हे लक्षात घेऊन एसओपीमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिकाही निश्चित केली जाईल,असेही त्या म्हणाल्या.  पुढील सहा दिवसांत, शाळा, पालक आणि मुलांना शारीरिक वर्गांमध्ये सुरक्षितपणे बदलण्यासाठी अनुकूल करण्यावर भर दिला जाईल, कारण जवळपास दोन वर्षांपासून वर्गखोल्या बंद आहेत, अशा त्या म्हणाल्या.

पेन्शन संघर्ष यात्रा दिवस ३ रा.....#pension #dcps #nps

 *जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती..!*


( *निमंत्रक : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना* )

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

( २४ नोव्हेंबर २०२१, बुधवार )





*१. सिन्नर : स्वागत* 


सिन्नर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेची आपली टीम तसेच शिक्षक संघ ( थोरात गट) यांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी संघर्ष यात्रेचे सिन्नर नगरीत स्वागत केले. 


*२. संगमनेर येथील स्वागत, पायी रॅली व सभा :* 


संगमनेर शहरातील घुलेवाडी फाटा पासून गाड्यांची रॅली पंचायत समिती पर्यंत पोहचली. तिथे रॅलीच स्वागत BDO साहेब यांनी केले. तिथून रॅली १ किमी चालत सभास्थळी पोहचली. 


संगमनेर मध्ये जोरदार, धडाकेबाज, आकर्षक नियोजन टीम ने केले होते. आमदार सुधीर तांबे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष दत्ताजी ढाकणे, लिपिकवर्गिय संघटनेचे सचिव जोर्वेकरजी यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी आपल्या टीम सह उपस्थित होते. 

या संपूर्ण उत्तम सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, सचिन नाबगे, शिवाजी आव्हाड, अमोल साळवे, विश्वस्त बाजीराव मोढवे सह सर्व तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार. सर्वच टीमचे अभिनंदन..! यासोबतच आपल्या तालुक्यातील  सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*३. राजगुरुनगर (खेड, पुणे ) येथील सभा :*


इंकलाब जिंदाबाद करून हसत फासावर लटकलेल्या ध्येयवेड्या शहीद राजगुरू यांच्या जन्मभूमीत  आजची झालेली सभा अतिशय उत्तम रित्या पार पडली.


प्राध्यापक, वन , आरोग्य आदी या सह शिक्षक संघटनेचे विविध स्तरीय पदाधिकारी, पेन्शन शिलेदार यावेळी उपस्थित होते. 


सदरची सभा देखील दणक्यात पार पडली. या आजच्या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सभागृहाच्या जवळपास ५०% महिला भगिनी या वेळी उपस्थित होऊन पेन्शन विरोधात एल्गार करत होत्या. 


या उत्तम सभेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, वैभव सदाकाळ, योगेश ठोसर, विनायक शिंदे, सोमनाथ कुदळे यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*४. पुणे मनपा टीम कडून प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम :*


दिवसभराच्या धावपळीतून काहीतरी वेगळे करत आपले विविध प्रेरणादायी विचार व्यक्त करणारे पुणे मनपा टीमचे जितूजी फापाळे, प्रणव काळे आदी पदाधिकारी यांनी केले.


*उपस्थित जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती सहकारी 

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

वितेश खांडेकर - राज्याध्यक्ष, मधुकर काठोळे

समन्वयक - सर्व शिक्षक संघटना, शैलेश भदाने - वनरक्षक वनपाल संघटना सचिव, गोविंद उगले - राज्य महासचिव, श्री. प्राजक्त झावरे पाटील - राज्य कार्याध्यक्ष, श्री. आशुतोष चौधरी - राज्य कार्याध्यक्ष, श्री. सुनिल दुधे - राज्य सल्लागार, श्री. शैलेश राऊत - कार्यालयीन चिटणीस, संजय सोनार - राज्य संघटक, श्रीमती दीपिका एरंडे मॅडम - राज्य मीडिया प्रमुख, श्री. नदीम पटेल - विश्वस्त, श्री. अनिल वाकडे - विभागप्रमुख नागपूर, अतुल खांडेकर - तालुकाध्यक्ष उमरेड, नागपूर, अनिल पत्रे - तालुकाध्यक्ष मौदा, नागपूर


सहकाऱ्यांनो,

भक्कम पाठबळ आणि प्रेम असेच राहू द्यात.


*कायम आपलाच,*

श्री. प्राजक्त झावरे पाटील

राज्य कार्याध्यक्ष

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

______________________________

मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...#robotics #robotcar

 


मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...


https://youtu.be/FfJ93rVAg2s



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही आता तंत्रज्ञान क्षेत्राची गोडी लागत आहे.  औरंगाबाद तालुक्यातील मुरूमखेडावाडी अतिशय दुर्गम डोंगर भागात असलेली एक प्राथमिक शाळा आहे. 





अवघड क्षेत्रात शाळा असताना सुद्धा येथे अनेक बदल पाहायला दिसून येतात.यापूर्वीही

  •  रोबोसेपियन डेमो ,
    ड्रोन प्रात्यक्षिक, 
    ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
    सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
    करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
     हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
     १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • ड्रोन प्रात्यक्षिक, 
  • ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
  • सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
  • करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
  •  हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
  •  १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • सुंदर माझी शाळा


 असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग घेण्यात आले आहे.

 याच बरोबर विद्यार्थ्यांनी श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोट कार ची जुळवणी करत ही कार ठरवलेल्या ट्रॕकववर कशी चालते याचे प्रात्यक्षिक ही सादर केले आहे.

ही कार  स्वतः ठरलेल्या मार्गावर चालते आणि लवकरच यावरच आधारित एक उपयुक्त नवीन मॉडेल तयार करणार आहे. ज्याचा उपयोग निश्चितच एक मार्गदर्शक असा ठरणार आहे. अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्ष गंगुबाई विष्णू बचाटे शाळेतील शिक्षक  श्री  प्रकाशसिंग राजपूत दिलीप आढे, , वैजिनाथ साबळे, काशिनाथ बचाटे, सुदाम बचाटे , धरमसिंग बालोद, गजानन साबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

एस टी कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी...#st #Pagar #salary

 

एस.टी. कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी ....



राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता मोठी भरघोस वाढ होणार आहे.


 ज्याच्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.

 त्यानंतरची आता ही मूळ वेतनात वाढ होणार आहे .त्याच्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

 कर्मचाऱ्यांच्या सेवा नुसार या वेतनामध्ये वाढ होणार आहे ज्याप्रमाणे

  •  एक ते दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनामध्ये 5000 ची वाढ होणार आहे.
  • १० ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मध्ये 4000 ची वाढ होणार आहे.
  •  तर 20 पेक्षा जास्त वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मधील 2500/-  ची वाढ होणार आहे.

 2021  झालेली ही वाढ एस.टी.  कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची  बातमी असणार आहे

🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू... #unicef covid

 राष्ट्रीय स्तरावरील आयोजित स्पर्धेत...

 जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी , केंद्र / बीट करमाड , ता/ जि. औरंगाबाद  या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना या संकटापासून वाडीला वाचविण्यासाठी शोधलेला हा उपाय खूपच महत्त्वाचा व वाडीच्या लोकांना आरोग्य व स्वच्छतेचा संदेश देणारा ठरणार आहे. 



जगभरामध्ये पसरलेल्या करणामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे . लोकांचा बाहेर जाणे येणे  थांबवता येत नाही. पण घरी येताना त्यांनी जर स्वच्छतेची काळजी घेतली तर निश्चित या संकटापासून वाचण्यासाठी पूरक असा उपक्रम मुरूमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे .त्यांना या कामासाठी शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलेले आहे.



वर स्टोरी पहा 

 शालेय जीवनात मुलांना मिळालेला हा अनुभव पुढील आयुष्यामध्ये त्यांना निश्चितच आरोग्यदायी दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. समाजाविषयी एक नागरिक म्हणून आपले काय देणे असते याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांना टाळता येते याची जाणीव सुद्धा त्यांना यामुळे होणार आहे. हे करत असतांना विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस याबाबतीत विचार करण्यास सुरुवात केली त्यांना मुख्यतः खालील समस्या या सतावत होत्या.




१) लोक वारंवार बाहेरगावी जातात.
२) हात पाय न धुता तसेच घरात येतात.
३) लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहीत नाही.
४) डोंगर खोर्‍यात वाडी असल्याने सुरक्षित आहे पण सतत जाणारे-येणारे धोका वाढवीत आहे.

       या सर्व समस्यांवर विचार करत त्यांनी *🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू...*

    या उपक्रमाची स्वतः आखणी केली . वाडीतील मोठया मुलांच्या सहकार्याने वाडीत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर त्यांनी शाळेसमोर हात पाय धुण्यासाठी नळ व वटा निर्माण केला व तेथे हँण्डवाँश लिक्विड उपलब्ध करुन दिले. 

             एक प्रकारचा थांबा निर्माण करत लोकांना बाहेरून येतांना हात पाय धुवून वाडीत येण्याविषयी प्रबोधन केले व हात धुण्याची योग्य पद्धत ही समजावली.

       "small things make big change"

       याप्रमाणे या उपक्रमाचा फायदा खालीलप्रमाणे होणार आहे.

१) लोक बाहेरून येतांना हात पाय स्वच्छ करुन येणार असल्याने कुटूंबाला तसेच पर्यायाने समाजाचा कोरोना पासून बचाव होणार आहे.

२) हात धुण्याची योग्य पद्धत ही लोकांना माहित होणार आहे.

३) जेव्हा शाळा उघडातील तेव्हा शाळेत येतांना व शाळेतून जातांना विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.


           *विद्यार्थी सहभागी टीम*


जयपाल बालोद,पार्थ बचाटे,  साक्षी बचाटे , कल्याणी बचाटे, सागर बालोद, प्रतिक्षा बचाटे.*

                *मार्गदर्शक*

        *प्रकाशसिंग राजपूत*

            

               *सहकार्य*

    *श्री दिलीप आढे*

*अर्जून बालोद व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य*


Share for care....

▶️ *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🎞️


आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....

 आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....


जगभरात आलेले संकट हे खरंच आव्हानात्मक आहे. भारत देश विकसनशील राष्ट्र असून आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या संमातर बाबी आहेत. पण अशा परिस्थितीत दोन्हीही संकटात आहे. 

       शिक्षण व्यवस्थेत आपण कधीच या परिस्थितीचा विचार केलेला नाही. एकवेळ आरोग्य साधने आपण लवकर निर्मित करुन उभारणी करु शकतो ,परंतु  शिक्षणात असे करणे आवाहनात्मक असणार आहे.

       तरी पण सोशल मिडिया व डिजिटल साधने सर्वत्र पसरले असल्याने आपण बहुतांशी कार्य किंवा  शैक्षणिक आव्हान पेलु शकतो.माञ १००% प्राप्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल .




       आपली शिक्षण पद्धती  ही आजवर शाळा व शिक्षण या स्वरुपातच बंधिस्त राहीलेली आहे. 

शाळेतच शिक्षण होईल याच पद्धतीने आपण राहीलो आहे त्यामुळे पण अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून लांब झालेले दिसतात. शिक्षक हा गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या पद्धतीने कार्य करत आलेला आहे. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर शिक्षण प्रवास सुरु होतो तर पुढे त्याची शैक्षणिक प्रगती व आर्थिक परिस्थिती यावर त्याचे शिक्षण कसे होईल हे अवलंबून असते.साधारणतः हीच परिस्थिती  पुढे त्याला त्याच्या क्षमतेचा, कौशल्याचा व आवडीचा विचार न करत वाहत नेत असते. 

         कोरोना विषाणूने आलेला आजार एकूणच संपुर्ण शिक्षण प्रवाहाला थांबवून टाकतोय, खरं तर अशा परिस्थितीचा कोणत्याही शैक्षणिक धोरणात किंवा अभ्यासक्रम निर्मितीत विचार केलेला नाही. त्यामूळे आज समोर येऊन ठेपलेला हा कोरोना राक्षस आपल्या शैक्षणिक प्रगतीला थांबवून मागे आणू शकतो. आपण पुस्तक छापायचे व तोच अभ्यास विद्यार्थ्यांनी आत्मसात करत त्या आधारे गुणवत्ता तपासणी करायची हे ही त्या विद्यार्थ्यांची आवड किंवा अभिरुची न बघता. पुस्तकात बंद असलेले ज्ञान हेच त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार.

     गेल्या काही दिवसात दिक्षा अँप निर्मिती झाली व पुस्तकात क्यु आर कोडचा समावेश झाला व आपली पुस्तके छपाई सह डिजिटल स्वरूपात बनु शकली आहे.

        *डिजिटल व आँनलाईन शिक्षण स्वरूप*

📄 डी.एड /बी.एड शिक्षणात आदर्श पाठ सादरीकरण केल्या जाते ,त्याचप्रमाणे पाठयघटकातील प्रत्येक प्रकरणाचे आदर्श अध्यापनाचे व्हिडीओ जर पुस्तकात क्यु आर कोड स्वरुपात करण्यात आले तर फक्त अशा संकटातच नव्हे तर अनेकदा विद्यार्थी आजारपणाने गैरहजर राहीला किंवा पालकांचे अंशकालीन स्थलांतर होत असेल तर या नविन पद्धतीने त्या घटकांचे ज्ञान प्राप्त करु शकेल. व अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे अध्यापन सहज उपलब्ध होईल. पाठयक्रम रचना करतांना संबंधित अभ्यासगट अथवा राज्यातील विद्या प्राधिकरण यामार्फत १००% आदर्श पाठ त्या संपुर्ण घटकांचे बनवत क्यु आर कोडच्या साहाय्याने समाविष्ट करणे खूप हिताचे ठरेल.




🌐 बालक - पालक या स्वरूपात  व्हाटसअप समूह अथवा ब्राँडकास्ट लिस्ट बनवून एकञित इ कन्टेट देवाण घेवाण करणे.

▶️ अध्ययन निष्पती आधारित व्हिडीओंचे संकलन इयत्ता निहाय करत ते विद्यार्थ्यांना अध्ययन करिता नियोजनबद्ध पोहोच करणे.


📲दिक्षा अँपचे नियोजनबद्ध वापर तसेच अनेक शैक्षणिक  बोलो अँप, खुट इ. प्रभावी वापर करणे.


📲   क्लाऊड मिटींग, झुम अँप किंवा स्कायपी गुगल मीट या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी व्हिडीओ काँन्फरिंग करत अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतीमान करणे.


🧾 आँनलाईन टेस्टचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी प्राप्त क्षमतेचे मुल्यमापन करत आवश्यक असलेले अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करत वरील माध्यमातून तयारी करणे.

📱 मोबाईल एस.एम.एस पद्धतीने ज्यांच्याकडे अँण्ड्राईड किंवा मल्टिमिडिया फोन नाहीत अशा विद्यार्थ्यांना अध्ययन स्वरूप समजावत स्वयंअध्ययनास प्रवृत्त करत लघुत्तम कन्टेट एस एम एस द्वारे पाठवणे.

📱आँडीओ काँन्फरस काँल माध्यमातून शिक्षक एकञित सुचना अथवा श्राव्य अध्यापन ही शक्य होऊ शकते.

या सर्व क्रिया जलद होण्यात काही अडचणी आहेत त्या म्हणजे ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन नसणे, मोबाईल नेटवर्क जलद नसणे, नेटवर्क असले तरी महागडे इंटरनेट पँक, पालकांचा विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यातील उदासिनता.

       याबरोबरच या संपूर्ण प्रक्रियेत शाळा, तालुका व जिल्हा समन्वय राहण्यासाठी  शिक्षक बहुतांशी तंञस्नेही नसल्याने निर्माण होणारी अडचण, तथा पालकांचे पुर्ण सहकार्य या सर्व गोष्टी  आँनलाईन व डिजिटल शिक्षण यावर प्रभाव टाकणारे आहेत.


     *प्रकाशसिंग राजपूत*

          सहशिक्षक 

जि.प.प्रा,शा.मुरुमखेडावाडी

  


    आँनलाईन व डिजिटल शिक्षण - तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे.


If combined Child orphan and old age home

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.




     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.



          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....



        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....

जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा... #4k #Ultra hd

🍂🍁🥀🌺🌸☘️🌿🥀🍁🍂

*🔮 सोशल मिडियावर पहिल्यांदा  अशी पोस्ट येत आहे .....*🔮


*_जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा..._*




*Ultra Hd असा रेझ्युलेशन फाॕरमॕट ज्याला आपण 4k फाॕरमॕट म्हणून ही ओळखत असतो. 

आज Led tv घेतांना किंवा महागडे फोन घेतांना हा सपोर्ट आहे की नाही हे पाहिल्या जाते.*



    *आपल्या जिल्हा परिषद शाळा या डिजिटल युगात मागे नाहीत ..... जास्तीत जास्त शेअर करा....*

      *प्रकाशसिंग राजपूत*
              सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,

कें. करमाड, ता/ जि,औरंगाबाद 

व्हिडीओ पहातांना Quality - advance setting 1080 + पुढे पहा......

आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?... #school opening #digital portal.

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥



आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....



आपल्याला काय वाटते ते वर नोंदवा.......   

हा फक्त एक  समावेशक विचार आहे. हा कुठलाही निर्णय नाही किंवा त्या निर्णयास कारण नाही .
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....

            डिजिटल समूह हा अनेक  वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालवत आला आहे. हा फक्त जनमनाचा कौल आहे. हा फक्त समूहाच्या शैक्षणिक कार्यास पुरक असणार आहे.

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

Digital seva ज्याने कोणी लिहिलं त्याला २१ तोफांची सलामीच....

लेख खूपच आवडण्यासारखा......


*ज्यांचा जन्म १९५५,१९५६, १९५७,१९५८, १९५९, १९६०, १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९ १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५  ,१९८६ , १९८७ , १९८८ , १९८९ , १९९० साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख*



ही पीढ़ी आता 3० ओलाडून ६२ कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....


१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.


ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....


*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. 


*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. 


कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला  नव्हता. 


*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. 


*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि 

कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते. 


*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी. 


वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी* ही पिढी. 


दोन दिवस जरी मित्र 

शाळेत नाही आला तर 

शाळा सुटल्या सुटल्या

दप्तरासकट 

त्याच्या घरापर्यंत जाणारी

ती पीढी..


कुणाचेही बाबा शाळेत 

आले की..मित्र कुठेही

खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने *"तुझे बाबा आलेय चल लवकर* "

ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी


पण गल्लीत *कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी. 





*कपील, सुनिल गावसकर  , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते  राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख  माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*


भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.


*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी. 


कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी

ज्याने कोणी लिहिलं त्याला २१ तोफांची सलामीच....

*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी. 


ज्यांच्या  शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी.  हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.      कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...


ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी. 


पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी, 


दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी


लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.


पुन्हा डोळे झाकुया ?


दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ 


*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण  आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार  असं  मानणारी ही पिढी ?*


धन्य ते जीवन जे खर आपणच  जगलोय !!!


 *सर्व मित्रांसाठी*....✍

रसायन जगण्याचे..... सुंदर कविता नक्कीच वाचा.... #Song #poem

 रसायन जगण्याचे..... सुंदर कविता



*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*





*रसायन जगण्याचे...*



आयुष्य  हे निर्भर नात्यांवर,
बनत रसायन जगण्याचे,
फौल ठरते कधी सार्थक,
निभाव होऊन साफल्याचे,


तरीही कोणी कसं जगावं,
अजबं ठरत हे रसायन,
पीडा या मनाच्या कशाच,
सरत्या क्षणावर अच्छादन,


तोडगा नसे गुंतागुंतीचा,
प्रभाव तुमचा विसरून,
जगी हिनवावं का? कुणाला,
तुमच्या प्रगतीस अडवून..,


शल्य कधी वलय नवे जीवनी,
विसंगत नातं हे जुळवून,
चित्कार ना येत काळजाचा,
घडतोय जीवन असं विसंबून,


भावनेला ही का सारावं,
विनाव नवा बंध  रंगवून,
नात्याबाहेर ही मन रमावं,
जगावं जरा दुःख  हरवून.....



   *प्रकाशसिंग राजपूत*

          औरंगाबाद 
       9960878457 

*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*

digital Seva Save money on medicine #tata 1 mg #onlinemedicine

 

Save money on medicine


आप के दवाईओ पर होने वाले मे खर्च मे आप बचा सकते हो 20 - 25 % तक 



हा दोस्तो हर महिने होनेवाला आपका खर्च बचाकर आप अन्य चिजो के खरीद पर इस्तेमाल कर सकते हो.....पुरी जानकारी के लिए निचे दिऐ हुआ व्हिडीओ अवश्य देखे.


Save money on medicine


आपको पैसे बचाने के लिए Tata 1 mg app डाऊनलोड करना होंगा निचे अॕप डाऊनलोड बटण दिया है इसपर जाकर अॕप डाऊनलोड करनेपर आपको 50 रु 1 mg cash मिलनेवाला है....



दोस्तो यह आप ज्यादा से जादा शेअर कर कही परिवारो को महगाई के दौर मे राहत दिला सकते हो.....





digital portal marketing New Book launch in Global market Kavyrang #best book #poetry book

 🌈💫🪶🪶🪶💫🌈


Book launch 


*माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून तो लवकरच जगभरातील 150 देशात  30000 stores वर उपलब्ध होणार असून भारतात Amazon व Flipkart वर लवकरच 2-3 दिवसात उपलब्ध होणार आहे. सदरील काव्यसंग्रह Isbn प्रमाणित असल्याने तो उच्चतम दर्जा दर्शवितो.*

         *आज माझे खूप मोठे  स्वप्नं पुर्ण झाले . मला यासाठी सदैव प्रोत्साहन देणारे माझे कुटुंबीय तथा सर्व मित्र परिवार यांच्या शुभेच्छा मुळे हे यश मला प्राप्त होऊ शकले आहे.*

Purchase Now     

Book launch 

Amazon वर पुस्तक उपलब्ध झालेले आहे.😊🪶


 *प्रकाशसिंग राजपूत*

         औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - 2021 #awardnomination #awards

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - 2021
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम 


मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे.


महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. 21,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उपरोक्त दोन्ही क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे. 

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय 31 डिसेंबर 2021 अखेरीस 35 वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले - 9860740569 या क्रमांकावर अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे व युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

युवा सामाजिक पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/7ayCo2bEobyjjYUM7

युवा क्रीडा पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/n5AaqFdVXNZ4MtJp9

Digital portal news कुस्तीत महाराष्ट्राची धणकेबाज कामगिरी.... #Sports #maharashtra

कुस्तीत महाराष्ट्राची धणकेबाज कामगिरी

सुवर्ण पदकाचा अनेक वर्षाचा कित्ता गिरवत व महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मागील २ वर्षातील नियोजनबद्ध प्रयत्नाने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला घवघवीत यश ... 

१२५ किलो 

शिवराज राक्षे - सुवर्ण पदक 



 आज दिनांक १३. ११. २०२१ रोजी गोंडा उत्तर प्रदेश येथे पारपडलेल्या  राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष , ग्रीको रोमन  व वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या  संघाला घवघवीत यश , अंतिम पदक तक्ता खालील प्रमाणे 

वरिष्ठ ग्रीको रोमन :-

७७ किलो 

गोकुळ यादव  - कास्य पदक 

वरिष्ठ पुरुष :-

७४ किलो 

नरसिंग यादव - कास्य पदक 

८६ किलो 

वेताळ शेळके -कास्य पदक 

९७ किलो 

हर्षवर्धन सदगीर -रोप्य पदक 

१२५ किलो 

शिवराज राक्षे - सुवर्ण पदक 

वरिष्ठ महिला :-

५३ किलो 

स्वाती शिंदे - रोप्य पदक 

५७ किलो 

सोनाली मंडलिक - कास्य पदक 

 ५९ किलो 

 भाग्यश्री फंड  - कास्य पदक 

६२  किलो 

सृष्टी भोसले - कास्य पदक 

तसेच भारतीय रेल्वे संघाकडून 

१)आबासाहेब अटकले - रेल्वे -५७किलो फ्री स्टाईल - कास्य 

२) विक्रम कुराडे - रेल्वे -६०किलो  ग्रिको रोमन - कास्य

३) प्रीतम खोत - रेल्वे - ६७किलो ग्रिको रोमन - कास्य

भारतीय सेना दल 

९२ किलो 

पृथ्वीराज पाटिल - कास्य पदक


कुस्तीत महाराष्ट्राची धणकेबाज कामगिरी

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे पंच प्रमुख प्रा. दिनेश गुंड यांनी पंच प्रमुख म्हणून महत्वाची जवाबदारी पार पडली . 

सदर स्पर्धे चे प्रशिक्षक पै. दत्ता माने , पै . संदीप वांजळे , पै. संदीप पटारे यांनी महत्वाची भूमिका पार पडली 


 सर्व पदक विजेत्या कुस्तीगीरांचे , त्याच्या पालक व सन्मानीय प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील दैदिप्यवान वाटचालीस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या व संपूर्ण कुस्ती परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा ... 

आजादी का अमृत महोत्सव Azadi ka....




आजादी का अमृत महोत्सव 

  आझादी का अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध उपक्रम व स्पर्धा यांनी साजरा करणेबाबत.
आजादी का अमृत महोत्सव एका दृष्टिक्षेपात...


✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *१२ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३* या दरम्यान साजरा करण्यात येत आहे .

✍️केंद्र शासनाचा सर्वात महत्त्वकांक्षी कार्यक्रम.

✍️राज्याच्या  पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव *१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत* जिल्हास्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे निर्देश.

✍️हा अमृत महोत्सव भारताचा स्वातंत्र्य संग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती, अंमलबजावणी या बाबींचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करणे अपेक्षित.

✍️जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, छात्राध्यापक, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य, अध्यापकाचार्य, आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हास्तर यावर आयोजित या उपक्रमामध्ये सहभागी होणे अपेक्षित.

 ✍️संपूर्णतः Non budgetary असा हा कार्यक्रम.

✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.


 *जिल्हा स्तरावर करावयाची कार्यवाही-* 


✍️जिल्हास्तरावर फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कला क्रीडा विभागाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासाठी प्रत्येक डायटनिहाय एक समन्वयक अधिकारी, कला व क्रीडा विभाग यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सदर समन्वयक अधिकारी यांचे नाव https://tinyurl.com/activityreport1   या लिंक वर नमूद करण्यात यावे.


http://bit.ly/3HDVOA3

✍️ सदर समन्वयक अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत वेळापत्रकातील स्पर्धांची  दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करावी. यासंदर्भात आपल्या अधिनस्थ तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करावे .यासंदर्भात आवश्यक पत्रव्यवहार करावा. तसेच सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत कार्यालयास arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल वर सादर करावी.


आजादी का अमृत महोत्सव  

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक  तालुका स्तरावर विषय साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात यावी. जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी दरमहा तालुक्यातून राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल संबधित विषय साधन व्यक्ती यांच्याकडून जिल्हास्तर यावर  संकलित करावा. आणि हा संकलित अहवाल

  https://tinyurl.com/activityreport1

या लिंक वर दर महिना अखेरीस भरण्यात यावा.दरमहा अहवाल नियमितपणे भरण्याची जबाबदारी डायट जिल्हा समन्वयक यांची असेल.

✍️ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध नाही,हे विचारात घेऊन Non budgetary activities चा समावेश करण्यात आला आहे,याची नोंद घ्यावी.त्यामुळे खर्चिक उपक्रमांचा समावेश करण्यात येवू नये .

✍️ज्या स्पर्धा या अंतर्गत राबवल्या जातील ,त्या स्पर्धेतील विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात यावे .

✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.तसेच वेळापत्रकातील स्पर्धा  नियोजित महिन्याच्या कोणत्याही तारखेला घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा समन्वयक अधिकारी यांना असेल.

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रमांची  समाजमाध्यम याद्वारे जसे facebook, twitter,Instragram,whats app याद्वारे  व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी .या पोस्टची लिंक  अहवाल लेखनात नमूद करावी .

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत उपक्रमआयोजन,नियोजन,अंमलबजावणी व सनियंत्रण  यांची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची असेल तर प्रशासकीय समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक ) यांची महत्वाची जबाबदारी असेल.