डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या (FLN) सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत.

 आपल्या मेंदूचा बहुतेक विकास बालपणात होतो.   बालपणात काळजी आणि शिक्षण, जे खरोखरच सर्वसमावेशक आहे,  सर्वांगीण विकास आणि आरोग्याला चालना देण्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक आहे.

 म्हणूनच शासन लहानपणापासूनच शिकण्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर सुधारण्यावर भर देत आहे.  2025 पर्यंत, उद्दिष्ट आहे की 3-9 वयोगटातील प्रत्येक मुलाकडे गणिताची क्रिया वाचण्याची, लिहिण्याची आणि करण्याची मूलभूत क्षमता असणे आवश्यक आहे.  यासाठी शाळेतील आणि शाळेबाहेर लक्ष्यित हस्तक्षेप आवश्यक आहेत

  मुलांच्या पहिल्या शिक्षिका असलेल्या मातांचे सामुदायिक सहभाग आणि सक्षमीकरण हे उच्च दर्जाचे बालपण काळजी आणि शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून शासन या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

  पहिले पाऊल मिशनमध्ये 2.5 लाखांहून अधिक मातांचे गट सामील झाले.  असे आणखी गट तयार केले जातील आणि त्यांना घरबसल्या आणि मजेदार क्रियाकलापांसह मुलांच्या मूलभूत शिक्षणाला पूरक म्हणून संसाधने प्रदान केली जातील. ते त्यांच्या मुलाच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आठवड्यातून एकदा भेटतील.

 शाळा, शिक्षक आणि गाव गट त्यांना या उपक्रमात मदत करतील.  दर महिन्याला, मातांच्या गटांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल चर्चा करण्यासाठी शाळेत बोलावले जाईल.  या मातांच्या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा वेळोवेळी मेळावे आणि कार्यशाळा आयोजित करतील.








 #mothersgroups #education 

जिल्हांतर्गत बदली शासनाचे आजचे परिपत्रक..

  जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आज राजकीय शासनाने शासन आदेश काढलेला आहे ,

या शासनादेशामध्ये बदली प्रक्रिया संबंधी संपूर्ण वेळापत्रक स्पष्ट करण्यात आलेला आहे.


राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निकष

राज्य आदर्श पुरस्कार सविस्तर पहा...

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यातील समर्पित शिक्षकांचे सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निकषांना अधिक शिक्षकाभिमुख केले आहे. तसेच या सन्मानाला घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्याचे ठरविले आहे. 



राज्य पुरस्कार मार्गदर्शक व्हिडीओ पहा...▶️ चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा


   संपूर्ण निकष खालीलप्रमाणे 











#thankyouteachers

सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत अभ्यास करण्याकरिता समिती स्थापन.*

 राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी ) च्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करुन शिफारस करण्याकरिता पुढीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात येत आहे.


१) आयुक्त, शिक्षण    अध्यक्ष


(२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य    सदस्य


३) संचालक, विद्याप्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सदस्य

४) सह सचिव / उप सचिव (शिक्षक व शिक्षकेतर), मंत्रालय, मुंबई   सदस्य


५) सह सचिव / उप सचिव (ग्रामविकास विभाग), मंत्रालय, मुंबई   सदस्य


६) सह संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे   सदस्य सचिव








शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा

 बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील एका शाळेतील तब्बल 15हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे.



यांतील दोघेजण गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.खिचडीत (पुलाव) शनिवारी दुपारी भोजनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटात पाल आढळून आली.

ही बाब समजेपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्‍ली होती. ज्याच्या ताटात पाल आढळली, तो सातव्या वर्गातील पृथ्वीराज वाघमारे यास उलट्या, चक्‍कर आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्याने पालकांनी त्यास लोहगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तद्नंतर एकामागून एक विद्यार्थी येत गेल्याने संख्या 15 च्या वर गेली.

कोल्हेबोरगाव येथील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना मळमळ होणे, उलट्या होणे व चक्‍कर येण्याचा त्रास होत असल्याने सदरील विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना जास्तीचा त्रास असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.


बदली संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक

गणिताशी गट्टी मासिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा क्र. ६

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहसदस्य श्री अजित तिजोरेसर निर्मिती असलेली ....


 *गणिताशी गट्टी मासिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा क्र. ६*


परीक्षेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://forms.gle/ruwegrKWJcp6fffe6


१) या परीक्षेत *काळ व वेग* या घटकावर दहा MCQ प्रश्न विचारले जातील.

२) परीक्षा दहा गुणांची असेल.

३) परीक्षेची वेळ : रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ७:०० ते ८:००

४) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.

५) प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या सदस्यांची नावे गणिताशी गट्टी फेसबुक पान तसेच व्हाट्सअप समूहावर प्रसिद्ध केली जातील.

६) रात्री आठनंतर येणाऱ्या प्रतिसादांचा क्रमांकासाठी विचार केला जाणार नाही.

७) परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल.


सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!💐



*#गणिताशीगट्टी*

राजर्षी शाहू महाराज जयंतीविषयी


 राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या सर्वांना  शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐 

         *जन्म : २६ जून १८७४*

(लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल)

         *मृत्यू : ६ मे १९२२*

                  (मुंबई)

        *अधिकारकाळ*

     इ.स. १८८४ - इ.स. १९२२

          *अधिकारारोहण*

          एप्रिल २, इ.स. १८९४

राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा

राजधानी : कोल्हापूर

पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले

पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)

राजाराम ३

उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले

वडील : आबासाहेब घाटगे

आई : राधाबाई

पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजघराणे : भोसले

राजब्रीदवाक्य : जय भवानी

प्रकाशसिंग राजपूत यांनी काढलेले महाराजांचे स्केच


                             शाहू महाराज भोसले  छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

💁‍♂️ *जीवन*

          शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

🔸 *कार्य*

              शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.


त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.


‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.


                  त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.


स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे


महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.


अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.


मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.


त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.


तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.


गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.


शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.


महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.


💎 *जातिभेदाविरुद्ध लढा*

         राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.


📖 *शैक्षणिक कार्य*

             शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा 


🏤 *शैक्षणिक वसतिगृहे*

       शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.


१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)


            वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.


🔮 *इतर कार्ये*

          शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. 


🤹‍♂️🎭 *कलेला आश्रय*

              राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.


🇮🇳 *स्वातंत्रलढ्यातील योगदान*

     महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.


🙋🏻‍♂️ *पारंपिरिक जातिभेदाला विरोध*

            शाहू महाराजांनी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.


📚 *शाहूंवरील प्रकाशित साहित्य*

'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)

राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)

शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).

बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.

राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)

राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)

कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)

राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)

राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)

राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)

समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)

‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)

लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)

🎞️📺 *चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका*

'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका

राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

📜 *पुरस्कार*

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

🗽 *सन्मान*

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या,  स्वरुपात दिला जातो.


          🇮🇳 जयहिंद ...जयमहाराष्ट्र... 🇮🇳


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

         

              माहिती स्त्रोत ~ Wikipedia

पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार

 राज्यात दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमांवर घेतल्या, तर प्रात्यक्षिकांसाठी ४० टक्के अभ्यासक्रम समाविष्ट होता.


 पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती, मात्र २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे.

आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली धोरण...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे शाळा सलग सुरू नव्हत्या. अनेक ठिकाणी शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले, मात्र अपुरी इंटरनेट सुविधा, नेटवर्क नसणे, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसणे, अशा विविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आल्या. यावर उपाय म्हणून एससीईआरटी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे या इयत्तांच्या परीक्षा या ७५ टक्के अभ्यासक्रमावरच घेण्यात आल्या. यंदाचे शैक्षणिक वर्ष हे वेळेवरच सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या शाळा या नियमित पद्धतीने, पूर्ण वेळ सुरू आहेत. विदर्भातील शाळाही येत्या २७ जूनपासून सुरू होणार असल्याने सद्य:स्थितीत शाळांच्या वेळेत किंवा तासिकांत कोणताही अडथळा नसून त्या त्या योग्य पद्धतीने सुरू असल्याने अभ्यासक्रम पूर्ववत म्हणजे १०० टक्के करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.


कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग मंदावला होता. शिवाय बऱ्याच कालावधीनंतर परीक्षांना सामोरे जाणार होते. 

त्यामुळे राज्य मंडळाने विशेष बाब म्हणून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार १५ ते ३० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. मात्र यापुढे परीक्षेसाठी कोणताही अधिक कालावधी राहणार नाही. त्यानुसार विद्यार्थ्यांना १०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी राहणार असल्याचे  स्पष्ट करण्यात आले आहे.


यंदाचे शैक्षणिक वर्ष "शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष" म्हणून साजरे होणार

 कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही  शिक्षकांनी शिक्षण विद्यार्थ्यांचा दारी पोहोचवण्याचे महान कार्य केले.ही यशोगाथा पुढे सुरू रहावी यासाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष "शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष" म्हणून साजरे होणार.

या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे तपशील.....












मिशन झिरो ड्रॉप

 शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना शाळेत परत आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिशन झिरो ड्रॉप ( mission zero Drop) आऊटची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.




शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती

शिक्षणाचा हक्क लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी 'मिशन झिरो ड्रॉप आउट' नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्यातील शाळांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. 'मिशन झिरो ड्रॉप आउट' मोहिमेची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी राज्य सरकारने हे अभियान सुरू केले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महामारीमुळे शिक्षणातील असमानता वाढली असेल, परंतु प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गळती झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना शाळेत परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील शाळा गळतीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत साथीच्या रोगामुळे शिक्षण सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणता येईल. माध्यमे आणि समाजाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

 कोरोनाचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. 

शिक्षक बदली तीन टप्पे वेळापत्रक ....

शाळा आता आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा

 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आदर्श शाळा योजनेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना हे नाव देण्याबातत निर्णय झालेला  आहे .

 शासन निर्णय पहा...




राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेमध्ये लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत भरघोस वाढ

 अपघातग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेमध्ये लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे.

  खाली शासन आदेश पहा...








बदलीबाबत महत्त्वाचे परिपत्रक

 सन २०२२ मध्ये करावयाच्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या ऑनलाईनद्वारे बदल्या करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार याबाबतची कार्यवाही फेब्रुवारी २०२२ पासून सुरु आहे.

 या बदल्या करतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वेळोवेळी संदर्भाधीन पत्राद्वारे सुचना दिलेल्या आहेत. बदल्या करतांना येणाऱ्या अडचणीवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी नोडल अधिकान्याची नियुक्ती करण्याची तरतुद आहे. मा.न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेल्या प्रकरणी कशी कार्यवाही करावी तसेच अवघड क्षेत्र घोषित करणे याबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.


१.समन्वयकाची नियुक्ती करणे :


सन २०२२ मधील बदल्या करण्याच्या संपूर्ण कार्यवाहीत सहभागी असलेल्या कोणत्याही जिल्हा परिषद / सॉफ्टवेअर कंपनी / कोणतीही संस्था यांना येणाऱ्या अडचणींना योग्य ते मार्गदर्शन तात्काळ करण्यासाठी खालीलप्रमाणे नोडल / समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे असे स्पष्ट करण्यात आले.

(अ) राज्य समन्वयक (१) श्री. सचिन ओंबासे भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा (२) श्री. विजय गोडा भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.


(ब) विभागीय समन्वयक संबंधित महसूल विभागाचे उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय. (क) जिल्हा समन्वयक संबंधीत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) २. मा.न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेले शिक्षक :


(अ) "बदलीस पात्र शिक्षक" व "बदली अधिकार प्राप्त शिक्षक" असेल किंवा नसेल मात्र, ज्या शिक्षकाची मा. न्यायालयाने विवक्षितपणे 'अ' शाळेवरुन 'ब' शाळेत बदली करण्याचे आदेश दिले असल्यास, अशा शिक्षकाची ऑफलाईनद्वारे संबंधीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी बदली करावी.


(ब) मा.न्यायालयाचे बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले असतील व तो बदलीस पात्र शिक्षक ( एका जिल्ह्यात १० वर्षे व त्यापैकी एका शाळेत ०५ वर्ष सेवा) व बदली अधिकार पात्र शिक्षक (एका जिल्ह्यात १० वर्षे य त्यापैकी घोषित अवघड क्षेत्रात एका शाळेत किमान ०३ वर्ष सेवा) हे बदलीसाठीच्या निकषांची पूर्तता करीत असल्यामुळे या शिक्षकांचाच नियमानुसार ऑनलाईनद्वारे होणान्या सिस्टीममध्ये समावेश होत असल्यामुळे अशा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनद्वारे कराव्यातअसे आदेशात म्हटलेले आहे.


(क) वरील (य) मध्ये नमुद केल्याप्रमाणे, बदली पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नसेल अशा शिक्षकांचा सध्या विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरच्या सिस्टीममध्ये समावेश होऊ शकणार नाही. याकरिता सिस्टीममध्ये सुधारणा करण्यासाठी २-३ आठवड्यांचा आणखी कालावधी लागेल असे सॉफ्टवेअर कंपनीने स्पष्ट केले आहे.

सेतु पुर्व चाचणी पेपर डाऊनलोड करा...

सन २०२२ या वर्षातील बदल्या करण्यास आधीच विलय झालेला असुन मुलांच्या शाळाही सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे आणखी विलंब करता येणार नाही. त्यामुळे बदलीस पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नाही मात्र, मा. न्यायालयाने बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रकरणे असल्यास, अशा शिक्षकांच्या बदल्या संबधीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शेवटच्या टण्यात ऑफलाईनद्वारे कराव्यात असे स्पष्ट केले आहे .


३. अवघड क्षेत्र घोषित करणे

 आतापर्यंत दिनांक २७.२.२०१७ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार घोषीत केलेल्या अवघड क्षेत्रानुसार बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत / असाव्यात. कोरोना-१९ च्या महामारीमुळे मागील २०२१ या वर्षी बदल्या होऊ शकल्या नाहीत. दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या सुधारित शासन निर्णयातील तरतूदीनुसार अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले नसावे. तसेच याच शासन निर्णयातील तरतुदीनुसार दर ०३ वर्षांनी अवघड क्षेत्राचे पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्यामुळे दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सुधारित अवघड क्षेत्र घोषित करुन यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी व सुधारित यादी अपलोड करावी. जेणेकरुन या वर्षीच्या बदल्या करतांना. पुर्वी अवघड क्षेत्रात ०३ वर्षे काम केलेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करतांना पूर्वीची यादी सहज उपलब्ध होईल. मात्र, सध्या सुगम क्षेत्रात असलेली शाळा, दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्यास अशा शाळेतील शिक्षकाची सेवा ही अवघड क्षेत्र घोषित केल्यापासून किंवा त्या शाळेत नियुक्ती स्विकारल्याच्या दिनांकापासून यापैकी जे नंतरचे असेल तेव्हापासून अवघड क्षेत्रातील सेवा असल्याचे गणण्यात येईल. त्यामुळे असा शिक्षक अवघड क्षेत्र घोषित केल्याबरोबर बदली अधिकार पात्र शिक्षक होणार नाही, याची नोंद घ्यावी असे सुचित केलेले आहे.


४. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरु असून त्याअंतर्गत शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याच्या कार्यवाहीची (टप्पा-१) मुदत आज दिनांक २०.६.२०२२ रोजी संपुष्टात येत आहे. तथापि, सदर प्रणालीमध्ये आणखी बऱ्याच शिक्षकांची माहिती अद्ययावत करावयाची असल्याची बाब मे विन्सीस आयटी कंपनीने निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे सदर कार्यवाहीस दिनांक २७.६.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.


आदेश पहा...








आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली धोरण २०२१

 आॕनलाईन बदली धोरण सन २०२१ जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली बाबतीत महत्त्वाच्या  बाबी जाणून घ्या....






व्हिडीओ पहाण्याआधी डिजिटल स्कूल समूह हे युटूब चॕनल सबस्क्राईब  करा...






आंतरजिल्हा बदली धोरण...



जिल्हा अंतर्गत बदली धोरण...

सुधा मुर्ती यांची शाळेला देणगी....

 इन्फोसिस फाउंडेशनच्या सुधा मूर्ती यांनी नुकत्याच  मराठी कोण होणार करोडपती या शोमध्ये हजेरी लावली व पंचवीस लाख जिंकून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील पावणादेवी शिक्षण संस्थेला ते पैसे दान दिले .



ग्रामीण भागातील या शाळेची उभारणी करण्यात पदाधिकारी ग्रामस्थांसह सिंहाचा वाटा आहे तो सुधा मूर्ती 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर जिंकलेली संपूर्ण रक्कम रु. २५ लाख, सुधा मूर्तीनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावच्या श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ या संस्थेच्या यशवंतराव राणे शाळेला देणगी देणार आहेत. 

या संस्थेची व शाळेची स्थापना २०११ साली झाली. गावातील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी रोज दहा किलोमीटर प्रवासाची पायपीट करावी लागत होती. एसटीची सोय होती, पण गावच्या कित्येक गरीब कुटुंबाला रोज दोन वेळच्या जेवणाची चिंता असते. त्यात हा खर्च कसा करावा? असा प्रश्न होता. म्हणून गावातच माध्यमिक शाळा असावी, असा संकल्प पुढं आला.

बापर्डे गावातील घाडी बंधूंनी आपली दोन एकर जागा शाळेसाठी संस्थेला विना मोबदला दिली. त्यानंतर गावातील लोकांनी एकत्र येऊन माजी आमदार अमृतराव राणे यांच्या नेतृत्वाखाली शाळेसाठी एक समिती नेमली आणि मग सुरू झाला शाळेच्या निर्मितीसाठीचा संघर्ष. गावातील एक दानशूर व्यक्ती धोंडबाराव राणे यांनी संस्थेसाठी पंधरा लाख रुपये देण्याचं मान्य केलं. परंतु शाळेच्या निव्वळ इमारत बांधणीसाठीच ४०-५० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी बापर्डे गावच्या मुंबईकर मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. काही दानशूर मंडळींनी प्रत्येक वर्ग खोलीचे एक लाख याप्रमाणं पैसे दिले. काहींनी दहा हजार, पाच हजार अशी रक्कम जमा करून संस्थेला मदत केली. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ सुहास राणे यांच्या साहाय्याने सुधा मूर्ती यांच्या इन्फोसिस फाउंडेशनपर्यंत पोहोचता आले आणि इमारतीसाठी कमी पडत असलेली १० लाख रुपये इतकी रक्कम देऊन सुधा मूर्तीं भक्कमपणे संस्थेच्या पाठीशी २०१२साली उभ्या राहिल्या.

शासकीय कर्मचाऱ्यांना गुगलच्या या सेवांना मुकावे लागणार...

एकीकडे इमारतीचं बांधकाम सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात छोट्या खोल्या उभारून शाळा सुरू करण्यात आली. इमारतीचं बांधकाम स्वतः नियामक समिती मधील मंडळींच्या देखरेखीखाली अतिशय दर्जेदार आणि उच्च दर्जाचं आणि ठरलेल्या किमतीपेक्षा कमी खर्चात झालं. एकीकडं इमारतीचं बांधकाम सुरू होतं, तर दुसरीकडं शाळेच्या मान्यतेसाठी सरकार दरबारी अर्ज, विनंत्या सुरू होत्या. महाराष्ट्र सरकारनं पुढील दहा वर्षांसाठी शैक्षणिक धोरण तयार केलं होतं, त्याप्रमाणं नवीन शाळांचे अर्ज शासनाने मागवले होते. अगदी नियमानुसार २०१२ साली शाळेच्या मान्यतेसाठी आणि शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासन दरबारी अर्ज सादर करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षाच्या बृहत आराखड्यातही संस्थेचे नाव जाहीर झालं.

सेतूच्या पूर्व चाचणी कालावधी वाढविला

 सेतूच्या पूर्वचाचणी आता पुढे ढकलल्या....


करोना काळातील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून ३० दिवसांचा सेतू अभ्यासक्रम दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी राबविणे बंधनकारक केलेले आहे. 

आता या अभ्यासक्रमासाठी चाचणी घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. १७ आणि १८ जून रोजी घेण्यात येणारी पूर्व चाचणी घेण्यासाठी आता एससीईआरटीकडून २० जून ते २५ जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. 


सेतु अभ्यासक्रम व चाचणीची गरज का?

विद्यार्थ्यांना ऑनलाईन व काही काळ ऑफलाईन अभ्यासाच्या मागील वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत अध्यापनाचे आकलन किती व कसे झाले आहे, याची नोंद पूर्व चाचण्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

सेतू पुर्वचाचणी पेपर डाऊनलोड  करा...

 पूर्व चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नमुनाधारित सर्वेक्षण घेऊन माहितीचे विश्लेषण करून, त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली.

बदली आजचे अपडेट...

 *शिक्षक बदली पोर्टल अपडेट  दि. 18/06/2022* 



1)*शिक्षण सेवक वगळता उर्वरित सर्व शिक्षक यांना बदली हवी असेल अगर नसेल ,  परंतु प्रत्येकाने आपले प्रोफाईल अपडेट आजच करायचे आहे* 


2) ज्यांचे प्रोफाईल BEO लाॕग इन वरुन verify करुन परत पाठवले आहे ,त्यांनी verification accept करा. 

*Accept केलेला screenshot केंद्रप्रमुख यांना शेअर करा* केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शिक्षकांचा follow up घ्या. 

3) तालुक्यातील सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल अपडेट करुन तो screenshot केंद्रप्रमुख यांना पाठवायचा आहे.




प्रत्येक शिक्षक यांनी प्रथम स्वतःचे  प्रोफाईल खात्रीपूर्वक  update करणे. 


⬇️



पोर्टलवरील सर्व सूचना सतत लाॕग इन करुन तपासणे. 


⬇️


BEO LOG in वरुन आपले प्रोफाईल verify केल्यानंतर आपल्याला text मेसेज / मेल येईल. टेक्स्ट मेसेज /मेल सतत चेक करा. यावेळी तिथे केशरी रंगाचे प्रश्नचिन्ह येईल.


⬇️


कार्यालयाकडून /बदलीचे काम करणाऱ्या शिक्षकांचे फोन रिसिव्ह करावेत. आवश्यक माहिती,आपले अर्ज इ. सूचनांनुसार कार्यालयाकडे तात्काळ सादर करा. 

 सेतू अभ्यासक्रम  पुर्व चाचणी येथून डाऊनलोड करा....

⬇️

 आपल्याला verification   text message /mail  आल्यानंतर आपण पुन्हा पोर्टलवर जाऊन आपले प्रोफाईल accept करा. त्यानंतर आपल्या नावापुढे हिरवी टिक येईल. 

⬇️


आपले प्रोफाईल अपडेशन  हिरवी टिक आल्यानंतर पूर्ण झालेले आहे. 


⬇️

ज्यांनी  लिंकवरुन दुरुस्ती कळवली आहे , त्यांनी आधार नंबर update झाले नसेल तरीही प्रोफाईल update करा. याव्यतिरिक्त (जन्मदिनांक ,mail id दुरुस्ती दिसत नसेल तर पोर्टलवर तपासत रहा. बदल झाल्यानंतर प्रोफाईल update करा) 

⬇️

आता गुगलच्या या सुविधा शासकीय कर्मचाऱ्यांना वापरता येणार नाही

 पारदर्शकता, अचूकतेसाठी सर्वच गोष्टी ऑनलाइन व्हाव्यात, असं सरकारचं धोरण आहे. त्यानुसार शासकीय विभागांमध्येही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 

इंटरनेट वापरताना गुगलच्या विविध सुविधांचा वापर केला जातो,पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन  या सुविधा वापरता येणार नाहीत. कारण सरकारकडून यासंबंधी नविन आदेश काढण्यात आलेला  आहे.



सुरक्षा स्थिती सुधारणं हा या आदेशामागचा उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

 महत्त्वाची शासकीय कागदपत्रं गुगल ड्राइव्हसारख्या प्लॅटफॉर्मवर सेव्ह केल्यास सुरक्षेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण होऊ शकतात. 

ही बाब लक्षात घेऊन इंडियन काॕम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम  आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या वतीनं एक नवा आदेश काढण्यात आला आहे.

या आदेशानुसार, खासकरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन या सुविधांचा वापर करता येणार नाही.

डाऊनलोड करा. सेतू २०२२-२३ :- अभ्यास व पूर्व चाचणी

 डाऊनलोड करा.

सेतू २०२२-२३ :-  अभ्यास व पूर्व चाचणी 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तयार करण्यात आलेला सेतु अभ्यास यासाठी ची पुर्व चाचणी ....


 इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे👇



State Council Of Educational Research And Training, Maharashtra

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 (Bridge Course 2022-2023) - Download Download

मराठी माध्यम

विषय - मराठी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - गणित

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - इंग्रजी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - विज्ञान

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - सामाजिक शास्त्रे

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ री परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थी परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वी परिसर अभ्यासDownload DownloadEVS-1 Download | EVS-2 Download
4.इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्रDownload DownloadHistory Download | Geography Download
5.इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
6.इयत्ता ७ वी भूगोलDownload DownloadGeography Download
7.इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
8.इयत्ता ८ वी भूगोलDownload DownloadGeography Download
9.इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
10.इयत्ता ९ वी भूगोलDownload DownloadGeography Download
11.इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्रDownload DownloadHistory Download
12.इयत्ता १० वी भूगोलDownload DownloadGeography Download

इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या उर्वरित विषयांच्या pdf लवकरच अपलोड केल्या जातील.

Medium : English

Subject : English (Higher Level)

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

Subject : Mathematics

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ री Download Download
2.इयत्ता ३ री Download Download
3.इयत्ता ४ थी Download Download
4.इयत्ता ५ वी Download Download
5.इयत्ता ६ वी DownloadDownload
6.इयत्ता ७ वी DownloadDownload
7.इयत्ता ८ वी DownloadDownload
8.इयत्ता ९ वी DownloadDownload
9.इयत्ता १० वी DownloadDownload

Subject : Science

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
5.इयत्ता 7 वी-DownloadDownload
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
6.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download-
7.इयत्ता १० वी-Part 1सेतू अभ्यास Download-
8.इयत्ता १० वी-Part 2सेतू अभ्यास Download-

Subject : Social Science

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता 3 रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता 4 रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता 5 थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ७ वी Geographyसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वी Historyसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता 8 वी Geographyसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता 8 वी Historyसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता 9 वी Geographyसेतू अभ्यास Download 
10.इयत्ता 9 वी Historyसेतू अभ्यास Download 
11.इयत्ता 10 वी Geographyसेतू अभ्यास Download 
12.इयत्ता 10 वी Historyसेतू अभ्यास Download 

उर्दू माध्यम

विषय - उर्दू भाषा

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - गणित

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थी--
3.इयत्ता ५ वी--
4.इयत्ता ६ वी--
5.इयत्ता ७ वी--
6.इयत्ता ८ वी--
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
8.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
----

विषय - विज्ञान

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास DownloadDownload Download

Your IP : 2409:4042:2e13:1a59:1824:d82b:aa07:e526
You are visitor Number : Web Counter