डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

उन्हाळी सुट्टी घोषित..... पहा सविस्तर

 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते ९ वी व इ. १२ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या .



 संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून पुढील

प्रमाणे शासन निर्णय / परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

 १) सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.


२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी तो समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.


(३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात सांगण्यात आले.


४) आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुस-या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विधाता जून महिन्यातीलचसोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल शाळा सुरू होतील.


 उपरोक्त बाबी विचारात घेवून वरील प्रमाणे उन्हाळी सुट्टी बाबत शासन निर्णय/

परिपत्रक पहा.... Click here



राज्यातले सर्व निर्बंध गुढीपाडव्याला उठणार...

 महाराष्ट्रातही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला होणाऱ्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे



गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. असे मुख्यमंत्री म्हणाले. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचसोबत मास्क घालणं ऐच्छिक असेल. त्यावर कुठलीही सक्ती केली जाणार नाही असं राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार 

राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना आता तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरु तो 31 टक्क्यांवर नेला आहे.


राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली असून तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महागाई भत्ता वाढ 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपध्दती आहेत त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

दरम्यान, केंद्राने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता राज्य सरकार हा निर्णय कधी घेतंय याची उत्सुकता राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लागली होती. आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी ते जून 2022 पर्यंतसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.

महागाई भत्यात नव्याने वाढ....

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 30 मार्च रोजी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता DAवाढवून 34 टक्क्यांपर्यंत  केला आहे.


 कर्मचाऱ्यांच्या DAमध्ये 3 टक्के वाढ 

मोदी सरकारनं आज सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा DA तीन टक्क्यांनी वाढवून 34 टक्के करण्याची घोषणा केली. 

मागील DA वाढींवर एक नजर 

जुलै 2021 मध्ये केंद्रानं महागाई भत्ता आणि महागाई सवलत 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवली.

कोरोना व्हायरसमुळं केंद्र सरकारनं जवळपास दीड वर्षांपासून DA बंद केला होता. 

ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा DA 3 टक्क्यांच्या आणखी वाढीसह 31 टक्क्यांपर्यंत वाढला. 
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित DA जुलै 2021 पासून लागू झाला आहे. 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तादेखील 31 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

DA कसा मोजला जातो?

 महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराचा एक घटक आहे, ज्याचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणं आहे. वाढत्या महागाई दराला तोंड देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वेळोवेळी सुधारणा केली जाते. DA दरवर्षी दोनदा सुधारित केला जातो - जानेवारी आणि जुलैमध्ये. DA हा राहणीमानाच्या खर्चाशी संबंधित असल्यानं, तो प्रत्येक कर्मचार्‍यानुसार बदलतो.

ते शहरी भागात राहतात, निमशहरी भागात काम करतात की ग्रामीण भागात राहतात, यावर हे अवलंबून असतं.
 2006 मध्ये फॉर्म्युला बदलण्यात आला 2006 मध्ये, केंद्र सरकारनं केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता मोजण्याचं सूत्र बदललं. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी: महागाई भत्ता % = (अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) गेल्या 12 महिन्यांसाठी -115.76)/115.76)*100. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी: महागाई भत्ता % = ((गेल्या ३ महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100)-126.33)/126.33)*100 

महागाई भत्त्यात वाढ: मग किती वाढेल पगार? 

केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्याला 18,000 रुपये दरमहा मिळतात, त्याच्या टेक-होम पगारात 3 टक्के वाढ मिळेल. 34 टक्के DA सह, त्याचा पगार दरमहा 6,120 रुपयांनी वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनाशी जोडलेला असल्यानं, DA वाढल्यानं केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या मासिक भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीच्या रकमेतही वाढ होईल. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पीएफ, प्रवासी भत्ता आणि ग्रॅच्युइटी वाढणार आहे.

बदली संदर्भात संपुर्ण माहिती भरतांना....

 ✒️✒️✒️✒️✒️

सदरील फाॕर्म या साईटवर या पोस्टमध्ये खाली पीडीएफ  स्वरुपात उपलब्ध आहे....

 *🗳️  बदली माहिती फाॅर्म  🗳️*

४२ स्तंभात आपल्या नावासमोरील ओळीत असलेली माहिती (एक्सल शीट मध्ये ४२ स्तंभ इंग्रजी मध्ये आहेत.

 मूळ व योग्य अर्थ लावण्यासाठी इंग्रजीत असणारी नोंद अधिकृत ग्राह्य धरावी.)


*✒️ (1) SALUTATION :*

     श्री/श्रीमती/कुमारी इत्यादी


 *✒️ (2) TEACHER NAME :*

      संपूर्ण नाव (नाव, उपनाव, आडनाव)


*✒️ (3) DOB :*

        जन्मतारीख मूळ सेवा पुस्तकातील प्रमाणित नोंदीनुसार DD/MM/YYYY / तारीख महिना वर्ष 


*✒️ (4)GENDER :*

            लिंग


*✒️ (5) MARITIAL STATUS :*

      विवाहित/अविवाहित 


*✒️ (6) CELL NO :*

        भ्रमणध्वनी - आधार

कार्डशी लिंक असलेला 


*✒️ (7) Adhaar Number :* 

   आधार क्रमांक - भ्रमणध्वनीशी लिंक असलेला 


*✒️ (8) PAN_NO:*

      पॅन - आधार कार्ड सोबत लिंक असलेले 


*✒️ (9) EMAIL ID :* 

      ई-मेल आय डी 


*✒️ (10) SHALARTH ID :* 

    शालार्थ आय-डी (शालार्थ वेतन पत्रकात असलेला ) 


*✒️ (11) date of Appointment :*

      सेवेत प्रथम रुजू तारीख 


*✒️ (12) EMP SERV END DT :* 

     निवृत्ती/सेवा समाप्ती तारीख 


*✒️ (13) UDISE_CODE :*

   शाळेचा यु डायस कोड 


*✒️ (14) DESIG DESC :* 

        पदनाम {सहायक शिक्षक, विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक } 


*✒️ (15) DESIGNATEACHINGON TEACHINGTYPE :* 

  शिक्षक/शिक्षकेत्तर - सर्वांनीच Teaching नोंदवावे. 


*✒️ (16) Current school name :* पदस्थापना असणाऱ्या कार्यरत शाळेचे नाव


*✒️ (17) STATE NAME :* 

            राज्य 


*✒️ (18) DISTRICT NAME :*

         जिल्हा 


*✒️ (19) TALUKA NAME :*

       तालुका 


*✒️ (20) VILLAGE :*

     कार्यरत शाळेचे गाव 


*✒️ (21) QUALIFICATION :*

        शैक्षणिक अर्हता SSC/HSC/BA,MA etc 


*✒️ (22) MORE QUALIFICATION :*

         व्यावसायिक अर्हता D.Ed, B.Ed, M.Ed, M.Phill etc 


*✒️ (23)ADDRESS BUILDING :*

      निवासाचा पत्ता घर क्रमांक 


*✒️ (24) ADDRESS_STRRET :* 

      रस्ता ओळख 


*✒️ (25) LANDMARK :* 

      निवासस्थानाजवळची ओळख चिन्ह/खूण (मंदिर, दवाखाना,इत्यादी } 


*✒️ (26) LOCALITY :*

           मु. पो. ता. जि. 


*✒️ (27) PINCODE :*

   निवासस्थान असलेल्या क्षेत्राचा पिन कोड 


*✒️ (28) Saral ID :*

         सरल आय- डी 


*✒️(29) Cast Category :* 

        जातीचा संवर्ग SC, ST, SBC, VJ, NT, OBC, OPEN etc { नियुक्ती प्रवर्गाचा संबंध नाही. नियुक्ती कोणत्याही प्रवर्गात असो केवळ आपली जात कोणत्या संवर्गात येते ते नोंदवायचे आहे.} 


*✒️ (30) Teaching Medium -* 

  मराठी, हिंदी, उर्दू (सेमी इंग्रजी नोंदवायची गरज नाही. } 


*✒️ (31) Teacher Type :*

    सहाय्यक शिक्षक, विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी

मुखाध्यापक 


*✒️ (32) Teacher Specialization :*

   विषय पदवीधर बाबतीत {Language भाषा, Math-Science गणित-विज्ञान, Soc. Science सामाजिक शास्त्र) 


*✒️ (33) Appointment Category :*  

नियुक्तीचा संवर्ग (SC,ST, SBC, VI, NT, OBC, OPEN etc) 


 *✒️ (34) Service Type :*

     स्थायी/अस्थायी (35) Confirmation Date : सेवेत

स्थायी केल्याची तारीख 


*✒️ (36) Total Service Years :*  

३१ मे २०२२ रोजी एकूण सेवा वर्षात 


*✒️ (37) Last Transfer Category :*  

यापूर्वी झालेली Online बदली कोणत्या विशेष संवर्गात झाली e.g.- विशेष संवर्ग-१, २, ३, ४ etc 


*✒️(38) Last working date in difficult area :* 

  अवघड क्षेत्रात सेवा केल्याची शेवटची तारीख 


*✒️ (39) Current School Joining date :*  

सध्या पदस्थापना असलेल्या शाळेत रुजू तारीख 


*✒️(40) Current school UDISE :*

कार्यरत शाळेचा यु-डायस कोड 


*✒️ (41) Current district joining date :* 

 सध्या कार्यरत जिल्ह्यात रुजू तारीख { आंतरजिल्हा बादलीने नियुक्त झालेल्यांनी बदली झालेल्या जिल्ह्यात रुजू तारीख नोंदवावी आणि इतरांनी मूळ प्रथम

नियुक्ती तारीख नोंदवावी.) 


*✒️ (42) STATUS :* 

  { सध्या काहीही लिहिण्याची गरज नाही.)


*सर्वांच्या माहितीसाठी......*



पी.डी.एफ डाऊनलोड करु शकता....




आपसी आंतर जिल्हाबदली झालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता...


 

 आॕनलाईन बदली प्रक्रिया संदर्भात महत्वाचा जी,आर,



आपसी आंतर जिल्हाबदली झालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता जिल्हा अंतर्गत बदली 2022 साठी धरण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक -२५/३/२०२२


जी.आर.डाऊनलोड करा.....





शाळापुर्व तयारी आवश्यक साहित्य....

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व गुरुमाऊली संयुक्तपणे 

सादर करत आहोत.....

 🙋🏻‍♂️ *शाळापूर्व तयारी अभियान महत्त्वपूर्ण माहिती*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पहिलीत येणार्‍या मुलाच्या परिपूर्ण तयारीसाठी शासनाने राबवलेले अभियान


▪️ *बॅनर व पोस्टर्स*

https://www.gurumauli.in/2022/03/blog-post_23.

▪️ *आयोजकांसाठी नोट/माहिती*

https://www.gurumauli.in/2022/03/blog-post_28.html

▪️ *रिपोर्ट कार्ड (विकास पत्र)*

https://www.gurumauli.in/2022/03/blog-post_24.html

▪️ *शाळेतले पहिले पाऊल*

https://www.gurumauli.in/2022/03/blog-post_38.html

▪️ *आयडिया कार्ड-12*

https://www.gurumauli.in/2022/03/blog-post_94.html

▪️ *वर्कशीट-12*

https://www.gurumauli.in/2022/03/worksheet-for-school-readiness.html

▪️ *स्वयंसेवक सहभाग प्रमाणपत्र*

https://www.gurumauli.in/2022/03/blog-post_56.html


🎯 *सर्व शैक्षणिक ग्रुपला शेअर करा*

शिक्षक बदली प्रक्रियेत 31/03/ पर्यत करावयाच्या बाबी

 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिक्षकांच्या बाबतीत staff portal वरील खालील सर्व बाबी दि. ३१.३.२०२२ पर्यंत पुर्तता करणे अपेक्षित असणार आहे... 



शिक्षकाचा प्रदान केलेला डेटा प्रकाशित करणे, 

डेटा सत्यापित करणे, 

आक्षेपांसाठी कॉल करणे, 

सर्व बाबतीत शिक्षकांचा डेटा योग्य आहे याची खात्री करण्यासाठी डेटा दुरुस्त करणे, 

विशेषत: (सूचक यादी आणि संपूर्ण

चेकलिस्ट नाही)


x एकूण शिक्षकांची संख्या जिल्ह्यात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांच्या प्रत्यक्ष संख्येशी जुळली पाहिजे, त्यात सध्या निलंबित असलेल्या शिक्षकांचाही समावेश असावा. जर ते जुळत नसेल तर कृपया आवश्यक त्या दुरुस्त्या करणे.


* शिक्षकाचा शालार्थ आयडी बरोबर असणे आवश्यक आहे आणि नाव स्पेलिंगशी जुळणे आवश्यक आहे. * आधार आणि शालार्थवर असल्याने शिक्षकांचे पूर्ण व उपलब्ध

करून देणे आवश्यक आहे. जर ते जुळत नसतील, तर ते जुळतील अशा पध्दतीने दोन्हीमध्ये दुरुस्त्या करणे आवश्यक आहे.


* प्रत्येक शिक्षकाचा स्वतंत्र मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि तो मोबाईल एसएमएस द्वारे (ओटीपी) प्राप्त करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. हा क्रमांक आधार कार्डशी


जोडावा. x आधार क्रमांक शिक्षकांच्या मालकीचा आहे याची पडताळणी/ खात्री करणे आवश्यक आहे. सर्व बाबतीत योग्य


असणे आवश्यक आहे आणि ते मोबाइल आधार क्रमांकाशी


जोडणे आवश्यक आहे


पॅन क्रमांक शिक्षकाचा आहे का? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. सर्व बाबतीत योग्य असणे आवश्यक आहे आणि ते शिक्षकांच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे.


X यूडीआयएसई कोडमध्ये काम करताना शिक्षकाला योग्य स्थानी दाखवले पाहिजे. शिक्षक दुसऱ्या शाळेत प्रतिनियुक्तीवर असल्यास त्याचीही सोय करावी.


 शिक्षकांच्या नावाचे स्पेलिंग बरोबर आहे..


जन्मतारीख योग्य असावी आणि सेवापुस्तकातील नोंदीशी जुळणे आवश्यक आहे.


* शिक्षकाचा प्रकार दर्शविणे अनिवार्य प्राथमिक शिक्षक, . पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक इ.


गहाळ डेटा योग्यरित्या प्रविष्ट केला जातो.. 

प्रदान केलेले इतर तपशील बरोबर आहेत.


चालू शैक्षणिक वर्षात बदलीसाठी पात्र आहेत की नाही, हे विचारात न घेता सर्व शिक्षकांची माहिती बदली पोर्टलमध्ये भरावी लागणार आहे.





गुरुजी आता विदेश वारीवर पहा नेमके काय.....काय

कोरोनाने अनेकांचे हाल केले. अनेकांचा रोजगार बुडाला. तर अनेक उद्योगधंद्याना त्याचा फटका बसला. असाच फटका राज्यातील शिक्षणाला बसला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नभरता येणारे नुकसान झाले.


विद्यार्थ्यांचे भविष्य हे अंधार जाऊ नये म्हणून राज्यशासनाने पावले उचलत ऑनलाईन शिक्षण सुरू केले. पण यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला होता. ज्यामुळे शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा अशी मागणी होत आहे. तर शालेय शिक्षण विभागाची अशीच मागणी ही आहे. त्यानुसार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक शिक्षकांसाठी असून शिक्षकांना परदेशात मिळणार प्रशिक्षण आहे. 

शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड आणि ऑस्ट्रेलिया  या देशांमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.


राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देतेय असं नाही तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरु असल्याचेही गायकवाड यांनी सांगितलं. तर निजामकालीन शाळांसाठी 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी प्रस्तावित करण्यात आले असून पुढल्या वर्षीसाठी 300 कोटी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक जिल्ह्यात ई-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर  आणि लँग्वेज लॅबची  सोय करण्यात येणार आहे असेही माहिती त्यांनी दिली. त्याबरोबर विद्यार्थ्यांना good touch आणि bad touch याचं शिक्षण दिले जाईल असही त्यांनी सांगितले.



लवकरच केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य कायदा आणणार....

 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांनी नवीन राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या मसुद्यातील विविध तरतुदींना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.




मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यापूर्वी सल्लामसलत करण्यासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवला जाईल, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. नवीन मसुद्यात अनेक परिस्थितींचा अभ्यास केलेला आहे. 

यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची तरतूद देखील आहे. राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा २०१७ पासून कार्यान्वित आहे. हा कायदा मंजूर झाला की तो १२५ वर्षे जुना महामारी रोग कायदा, १८९७ ची जागा घेईल. जैविक हल्ला, नैसर्गिक आपत्ती, रासायनिक आणि आण्विक हल्ल्यांमुळे सार्वजनिक आरोग्य आणि आपत्कालीन परिस्थिती देखील या कायद्यांतर्गत कव्हर होणार आहे.

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाचे नेतृत्व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करण्याचा प्रस्ताव आहे. याचे नेतृत्व राज्यांचे आरोग्य मंत्री करतील. जिल्हाधिकारी पुढील स्तरावर नेतृत्व करतील आणि ब्लॉक युनिट्सचे नेतृत्व ब्लॉक वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधिक्षक करतील. या अधिकाऱ्यांकडे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे अधिकार दिले जातील. मसुद्यात आयसोलेशन, क्वारंटाईन आणि लॉकडाऊन यांसारख्या विविध उपायांची व्याख्या केली आहे. कोविड व्यवस्थापनासाठी केंद्र आणि राज्यांनी मोठ्या प्रमाणावर लागू केली आहेत. लॉकडाउनच्या व्याख्येत सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी व्यक्तींच्या हालचाली किंवा एकत्र येण्यावर निर्बंध समाविष्ट आहेत. त्यात कारखाने, संयंत्रे, खाणकाम, बांधकाम, कार्यालये, शैक्षणिक संस्था किंवा बाजारपेठेतील कामकाजावर प्रतिबंध घालणे देखील समाविष्ट आहे.