डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रखडलेल्या शिक्षक बदल्या आता मार्चनंतर.... #Teacher #transfer

 शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. 



यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.




शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.

खिन्न प्रवास भावनांचा.... नविन काव्यरचना... #Poem

 *खिन्न प्रवास भावनांचा*






खिन्न प्रवास भावनांचा....


विनी वेळ दुःख जणू जीवनास,

आता होत खिन्न प्रवास भावनांचा,

सामर्थ्य  हे उरत काट तरण्यास,

जागवी ध्यास मनास या साधनांचा



प्रफुल्लित होते ते ही काही क्षण 

उत्साही होते हे किती माझे मन,

नैराश्याशी होतो  जीवनी हा समर,

विचार आता तेथेच  गोते खात अन्



फिरलो जरा ध्येयापासुन अलगद 

वेचत होतो विजयाची सुमने अनंत,

तोल या जगण्याचा डगमगला जरी,

तग धरण्या ध्येर्य बांधले चिरंत,



हुरुप सदासर्वदा कसाच जागतो,

न मानुनी हार लढण्या जगतो,

सांभाळून बाजू असली जरी उणी,

स्वतःस लढाऊ बनवून तारतो....


       कवी

🖊️प्रकाशसिंग राजपूत🖊️

            औरंगाबाद  


माझे काव्यरंग पुस्तक Flipkart /Amazon  वर उपलब्ध ....नक्कीच खरेदी करा

Buy now


गीत अलंकारवर माझ्या रचना ऐकण्यास उपलब्ध चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...


युटूब चॕनल पहा.....



अशाच नवनविन काव्य रचना आपणांस उपलब्ध राहण्यासाठी लवकरच गीत अलंकार वेबसाईट उपलब्ध करून देत आहोत.... 




अनाथ झालेल्या १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ... #Exam fees

 शैक्षणिक प्रगतीस अडथळा न येऊ म्हणून  फी माफ केलेली आहे....



महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून, कोविड मुळे आपले पालक गमावलेल्या आणि  2021 - 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी आणि १२ वी परीक्षेत बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही माहिती शालेय शिक्षण मंत्री मा.प्रा.  वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली.  



   शैक्षणिक प्रगतीस अडथळा न येऊ म्हणून  फी माफ केलेली आहे....


   देशभरात  नव्हे तर संपूर्ण जगात  कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात असलेले पालक किंवा कायदेशीर पालक,दत्तक पालक गमावले आहेत.  आर्थिक अडचणींमुळे, अशा विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा (दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) फी भरण्यात अडचण येऊ शकते.  त्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षा नाकारल्यास त्याची शैक्षणिक प्रगती खुंटून त्याचा पुढील प्रवास खुंटण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत राज्य शासनाने  त्यामुळे, महाराष्ट्र राज्यातील अशा वंचित विद्यार्थ्यांचे मोठे हित लक्षात ठेवून , महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्यास मान्यता दिली आहे. गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, 1742 मुले कोरोनामुळे अनाथ झाली.

   नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात सुप्रीम कोर्टात अनाथ मुलांची माहिती सादर केली होती.  आकडेवारीनुसार, मार्च 2020 पासून देशात एकूण 1742 मुले अनाथ झाली आहेत.  एन सी पी सी आर च्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या काळात देशातील सुमारे 7464 मुलांनी त्यांच्या पालकांपैकी एकास गमावला आहे.