डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण

 

शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे शालेय पोषण आहार योजना सुरू केली होती. 

 आता या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.



या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना 15 ऑगस्ट 1995 पासून राज्यात सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारने या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे करुन 2021-22 ते 2025-26 या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने योजनेच्या नावात बदल केला आहे. यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जाणार आहे.



देशातील बालकांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील कोट्यवधी बालकांना मोफत आहार दिला जाणार आहे. केंद्र सरकारची ही योजना सुरू करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की शाळांमध्ये मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणे आणि त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण विकसित करणे. या योजनेच्या माध्यमातून शाळेत शिकणारे विद्यार्थीही स्वावलंबी होणार असून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. या योजनेंतर्गत शाळांमध्ये प्राथमिक वर्गात शिकणार्‍या मुलांना केंद्र सरकारकडून पोषण आहार दिला जाणार आहे.

नेमके  योजनेचे स्वरूप कसे असणार  ?


गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांच्या मध्यान्नसाठी केंद्र सरकारनं अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लाखो गरीब मुलांना फायदा होणार आहे. या योजनेला केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव देण्यात आले. केंद्र सरकारच्या मते, देशातील जवळपास 11 लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार एक लाख 71 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.



तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?


 

तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोणी वाचत तर नाही ना?

 संदेशवहन  गतिमान करणारे ॲप म्हणजे व्हाट्सअप आणि या व्हाट्सअप मध्ये नवीन नवीन फीचर्स येत आहे. आत्ताच व्हाट्सअप  नवीन फिचर  दिलेले आहे की आता 32 जणांना आपण ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकतो यासाठी तुम्हाला तुमचं व्हाट्सअपचे  वर्जन अपडेट करून घ्यावे लागणार आहे .

याचबरोबर ग्रुपची सदस्य संख्या वाढली असून 1024 सदस्य आता ग्रुप मध्ये ऍड करता येणार आहे हे सर्व वापरत असताना तुमचा अकाउंट जर कोणी त्यांच्या डिवाइसला जोडून घेतला आहे का हे पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे.


व्हॉट्सॲपवेब आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट यासारख्या व्हॉट्सॲप फीचर्सचे नावे तुम्ही ऐकली असतील. तुम्ही त्याचा वापरही करत असाल. या ॲपच्या मदतीने, तुम्ही एकाच वेळी दोनपेक्षा अधिक डिव्हाइसवर  एकच व्हॉट्सॲप वापरू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन घेऊन दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन केले तर तो तुमचे संदेश सहजपणे वाचू शकेल. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर काही सेटींग्स करू शकता. ज्यामुळे तुमचे मॅसेज प्रायव्हेट राहतील.

तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?

एखाद्याने तूमच्या व्हॉट्सॲपवर लॉगइन केले होता का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला लिंक्ड डिव्हाइस Linked Deviceचा पर्याय मिळेल.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तूमचे व्हॉट्सॲप कोण कोणत्या डिव्हाइसला लॉग-इन केले आहे याचे डिटेल्स मिळतील. जर ऑनलाईन नसूनही तूमचे व्हॉट्सॲप लॉग इन दिसत असेल.तर,तूम्ही त्यातून लॉग आउट होऊ शकता.आजच्या युगात सावधगिरी बाळगणे यास शाहनपण म्हणता येईल...


   प्रकाशसिंग राजपूत 

   औरंगाबाद 


    


बदलीचे संदर्भात महत्त्वाचा आदेश

 

बदली संदर्भात आज मुख्यकार्यकारी अधिकारी Ceo सर्व यांना आज आदेश प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकाची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


२. शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच त्याकरिता दि.३१/०८/२०२२ पर्यंत सेवानिवृत्त / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे, त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा झालेल्या रिक्त जागा, तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर अद्ययावत करण्याचे संदर्भीय दि. १९/०९/२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे.

३. आता संदर्भीय दि. २१/१०/२०२२ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही माहे जानेवारी, २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी दि. ३१/१२/२०२२ पर्यंत सेवानिवृत्ती / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली / रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन, ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर रिक्त पदांचा तपशील अद्ययावत करावा. तसेच, डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावीत असे आदेशित करण्यात आलेले आहे. 


आजचे बदली आदेश पहा