डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आंतरजिल्हा बदलीबाबत...

 सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत...

दि.०१.०४.२०२३ ते दि. १५.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि. १६.०४.२०२३ ते दि.३०.०४.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी असे आदेशात म्हटलेले आहे.  





मराठी राजभाषा दिननिमित्त

राजभाषा दिनानिमित्त माझी काव्यरचना....

अल्बम ऐकण्यासाठी चित्रावर क्लिक करा व नंतर गाण्याच्या नावावर...  

 


*विषय - मायमराठी*


*शिर्षक- माय ही या श्वासाची...*


माय ही या श्वासाची,

शब्द हीचे आहे मधुर ,

स्वर बनुनी उमटतात,

श्रोते होतात अधीर,



बोलीभाषेची हीच जडण,

अहिरणी,वऱ्हाडी वा मालवणी,

नटवून हीस चढवितात साज,

घडतात हीचीच कास धरुनी,



शब्दाचा अखंड हीचा भंडार,

ग्रंथ बनुनी होते साठवण ,

या महाराष्ट्राचा आहे,

भाषा म्हणून तुच प्राण,



बांधणी हिची स्वर व्यंजनाची,

 शब्द नी शब्द हीचा खास,

सह्याद्रीच्या सावलीत,

घडवते स्वराज्याचा इतिहास ,



बनून ओळख या मातीची,

बनली जननी या महाराष्ट्राची,

विणला आहे हिच्यात आपलेपणा,

ही भाषा आहे स्पष्टपणाची,



गंध हीचा मज फुलवितो,

करतो वंदन मनातून ,

माय मराठीची आम्ही लेकरं,

उमटले भाव कंठातून ....


*प्रकाशसिंग राजपूत*

  *🚩 छ.संभाजीनगर🚩*

📲 9960878457

बिहार राज्य करणार 3 लाखांहून अधिक शिक्षक भरती!

 बिहार राज्य करणार 3 लाखांहून अधिक शिक्षक भरती!

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी शिक्षण (education department)  विभागात ३ लाख शिक्षकांच्या नियुक्तीला मंजुरी दिली  आहे. सातव्या टप्प्यासाठी शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.



शिक्षणमंत्र्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी सातव्या टप्प्यातील शिक्षक नियोजन नियमावलीवर स्वाक्षरी केली आहे, आता ती कॅबिनेटकडे जाईल. 2023 मध्ये शिक्षण विभागात 3 लाखांहून अधिक नोकऱ्या (teacher jobs) उपलब्ध होतील. महाआघाडी सरकारने दिलेल्या 10 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत आणि ते पूर्ण करू.

बिहारमधील शिक्षकांच्या (teachers) पुनर्स्थापनेसाठी उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या पुनर्स्थापनेची मागणी ते सातत्याने करत आहेत. या सगळ्यात शुक्रवारी शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली. आघाडी सरकारने दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनावर आम्ही उभे आहोत आणि ते पूर्ण करू, असेही ते म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी राज्यात 20 लाख भरतीबद्दल बोलले होते. या 20 लाखांपैकी साडेतीन लाख भरती शिक्षण विभागात होणार असल्याचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले होते. दुसरीकडे, आंदोलक उमेदवारांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून ७ व्या टप्प्यातील शिक्षक पुनर्स्थापना रखडली आहे. त्यांना तोंडी घोषणा करण्याऐवजी अधिकृत अधिसूचना आवश्यक आहे.