राज्यामध्ये विविध व्यवस्थापनामार्फत साधारणत १ लाख १० हजार शाळा चालविल्या जातात त्यापैकी सुमारे ६५ हजार शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविल्या जातात.
राज्यातील प्रत्येक मुलाला पूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, त्यासोबतच राज्यातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात राहील हा उद्देश राहील.
समूह शाळा निर्माण करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकाची पदे कमी करणे हा उदेश नाही तर गुणवतेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात त्याच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या पत्रासमवेत पानशेत जिल्हा पुणे यांचा समूह शाळेबाबत प्रस्ताव यासोबत उदाहरणादाखल उपलब्ध करून दिला आहे.