डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी

 एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.



या भरतीअंतर्गत प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्राध्यापकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. 

ज्यासाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत साइट esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील

या भरती प्रक्रिये अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 88 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांची 9 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 29 पदं आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 50 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

ESIC Recruitment 2022 : पात्रतेचे निकष

या भरीत अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत अधिक तपशील तपासू शकतात.

ESIC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना निकाल त्यांना ई-मेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील. तसेच, निकाल अधिकृत साइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.

ESIC Recruitment 2022 : अर्ज शुल्क

SC/ST/PDW/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना या भरती मोहिमेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 225 रुपये भरावे लागतील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार ESIC ची अधिकृत साइट पाहू शकतात.

महागाई भत्ता १ जानेवारीपासून मिळणार

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुधारणा करणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय.

 दिनांक -17 ऑगस्ट 2022

दिनांक 1 जाने्वारी 2022 पासून महागाई भता 31% वरून 34%,

 1जाने ते 31 जुलै 22 पर्यंतची थकबाकी रोखीने ऑगस्ट 22 मध्ये मिळणार 



भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन

शासकीय कर्मचाऱ्यांना 3 % DA वाढ

 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.



ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

शिंदे सरकार सत्तेवर विराजमान येताच दुसऱ्यांदा नव्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.