डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आंतरजिल्हा बदली यादी जिल्हा निहाय

 आंतरजिल्हा बदली यादी पहा आता जिल्ह्यानिहाय...




डिजिटल समूह महाराष्ट्राच्या वतीने बदली झालेल्या तमाम शिक्षकांना मनापासून शुभेच्छा आपण स्व जिल्ह्यात जात आहात याचा निश्चितच मोठा आनंद आपल्या कुटुंबीयांना असणार आहे. व आपल्या कर्तृत्वाला आपल्या जिल्ह्यात नवीन भरारी मिळेल या नव्या उमेदीने आपण आपल्या जिल्ह्यात जाणार आहात सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!!!


  प्रकाशसिंग राजपूत 

    समूहनिर्माता 

    औरंगाबाद 


अहमदनगर

नागपूर

अकोला

नांदेड

अमरावती

नंदुरबार

औरंगाबाद

नाशिक

बीड

उस्मानाबाद

भंडारा

परभणी

बुलढाणा

पुणे

चंद्रपूर

रायगड

धुळे

रत्नागिरी

गडचिरोली

सांगली

गोंदिया

सातारा

हिंगोली

सिंधुदुर्ग

जळगाव

सोलापूर

जालना

ठाणे

कोल्हापूर

वर्धा

लातूर 

वाशिम

मुंबई उपनगर

यवतमाळ

मुंबई शहर

पालघर

आता होणार ४ हजार बदल्या

 शिक्षक बदली प्रक्रियेमधील ऑनलाइन बदलीचा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर म्हणजे आंतरजिल्हा बदली मध्ये 4000 शिक्षकांच्या बदल्या होणार असून .




या बदलांमध्ये अनेक शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यामध्ये जाता येणार आहे.

 उद्यापर्यंत बदल्या जाहिर होणार आहेत .

 ऑनलाइन बदली मध्ये सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेली ही मोठी बदली ठरणार आहे .

सर्व बदली प्रक्रियेमध्ये जलद करण्यात येण्याचे  प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून या बदल्यांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.

 खूप शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्व जिल्हा जाण्याची संधी त्यांना या बदली प्रक्रियेमधून प्राप्त होणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा ...

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 



विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं आज 20 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नोकरी नाही म्हणून विद्यार्थ्यांची डी.टी.एडकडे पाठ फिरवली

दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.