डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अर्जित रजा म्हणून संप कालावधी मान्य

 संप कालावधी अर्जित रजा म्हणून करण्याचा आजचा शासन आदेश...

राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ ते २० मार्च, २०२३ या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


केंद्रप्रमुख विभागीय भरती प्रक्रिया


शालेय शिक्षणात आता पहिलीपासूनच क्रेडिट सिस्टीम पॅटर्न

 विद्यापीठ परीक्षांमध्ये असलेली क्रेडिट पद्धती आता पहिलीपासून सुरू करण्यात येणार आहे. 

विद्यापीठांत पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन श्रेयांक पद्धतीनुसार होते. या पद्धतीत विद्यार्थ्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम निवडण्याची सवलत दिलेली असते. आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या माध्यमातून शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन श्रेयांकन पद्धतीने केला जाणार आहे.

आता शालेय तसेच महाविद्यालयीन आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण एकाच छताखाली आणण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे.

नेमकी ही पद्धती कशी असणार ?

इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. या 1200 शैक्षणिक तासांसाठी 40 क्रेडिट्स दिले जातील. 800 तासांसाठी 27 क्रेडिट आणि 1000 शैक्षणिक तासांसाठी 33 क्रेडिट्स दिले जातील. विद्यार्थ्यांना मिळालेल्या क्रेडिट्सनुसार रँक दिले जाणार आहेत. पहिलीच्या वर्गापासून ते पीएचडी पर्यंत शिक्षणाची आठ स्तरांमध्ये विभागणी केली आहे, शालेय स्तरावर चार आणि उच्च शिक्षण स्तरावर चार अशा प्रकारची करण्यात आली आहे.



शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षण व पहिले ते आठवीचे शिक्षणाचा व माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचा समावेश केला आहे. आतापर्यंत केवळ काही राष्ट्रीय संस्था तसेच ओपन स्कुलिंगची सुविधा देण्याऱ्या संस्थांकडून श्रेयांक पद्धतीचा वापर केला जात असे. आता कौशल्य आधारित तसेच व्यावसायाभिमूख शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.


शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण केल्यावर गुण क्रेडिट केले जातील. क्रेडिट गुण अकॅडमिक बँक्स ऑफ क्रेडिट मध्ये सात वर्षांपर्यंत वैध राहतील. चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टम पद्धती नागपूर विद्यापीठासह देशातील विविध विद्यापीठांत लागू आहे.



विद्यापीठ अनुदान आयोग, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशनच्या ११ सदस्यीय समितीद्वारा हा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे.

क्रेडिट पद्धती म्हणजे गुणांची परिमाणता निश्चित करणे. एखाद्या व्हिडीओ गेममध्ये विविध लेवल असतात. एक लेवल पूर्ण केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

तशी पद्धती  या नव्या क्रेडिट सिस्टममध्ये असेल. नवी क्रेडिट पद्धती अवलंबल्यावर विद्यार्थ्यांना आंतरशाखीय शिक्षणाची मुभा मिळेल.

 सध्याच्या पारंपरिक टक्केवारी पद्धतीत हे शक्य नव्हते . नव्या शैक्षणिक धोरणातील एक्झिट पॉलिसीदेखील यामुळे सोपी होईल. भारतात प्रथमत:च शालेय शिक्षणात ही पद्धत वापरली जाणार आहे.







भिमाच साम्राज्य #newsong,


*भिम जयंती 132 गाजणार आणि चौका चौकात वाजणार तर फक्त हेच गाण पहाडी आवाजात मार्केट गाजवणारे उमेश गवळी यांच्या त्याच स्टाईल मधे घेऊन आलो आहोत ऐक धमाकेदार भिमगीत* 🔥🔥🔥💙💙💙💙🔥🔥🔥🔥🔥🔥





                   भिमाच ...साम्राज्य ....



*गीतकार:- दिपक गायकवाड*


*गायक :- उमेश गवळी*


*संगीत:- उमेश गवळी*


*संगीत संयोजक:- सारंग गवळी*


https://youtu.be/VkbKX0KwrOo


*वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून गाण ऐका आणि या डॅशिंग गाण्या बद्दल कमेंट नक्कीच करा सोबतच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरु नका*

संप कालावधी सेवा खंडित न करण्याबाबत आजचा शासन आदेश




राज्य शासकीय  कर्मचाऱ्यांच्या  पुकारण्यात आलेल्या दि. १४ मार्च, २०२३ ते दि. २० मार्च, २०२३ या कालावधीत आपल्या अधिपत्याखालील कार्यालयातील "संपात" सहभागी झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र.संघटना- १५२२/प्र.क्र.३६/१६-अ, दि. २८ मार्च २०२३ अन्वये सेवेतील खंड न समजता "असाधारण रजा" म्हणून नियमित करण्यात यावा असे आदेशात म्हटलेले आहे.

 तसेच सदर असाधारण रजेचा कालावधी हा शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दि. १४.०१.२००१ च्या आदेशास अपवाद करुन सेवेतील खंड न समजता निवृत्तीवेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राहय धरण्यात यावा,


आदेश पहा 👇






महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील काव्यरचना


महाराष्ट्रात समता न्याय प्रस्थापित करून अवघ्या भारत देशात स्त्री शिक्षण सुरू करणाऱ्या महान मानवास माझा काव्यमय मुजरा....


 ज्योतिबा.....


दीव्य तेजस्वी रचली समता,

न्याय हक्क शिक्षण घरोदारी...,

घडला राज्य कल्याणकारी ,

ज्योतिबा तुम्ही आद्य क्रांतीकारी....



लेकीच्या शिक्षणाची पेटवली मशाल,

कार्य बनले तुमचे आज विशाल,

शोषित जनतेला लढण्या बनला ढाल,

आसूड शेतकऱ्यांचा शोभते लेखणीची माळ,



सावित्रीबाईच्या हाती शिक्षण  ज्योती तेवत,

 रचिला इतिहास होऊन शिल्पकार भारी,

जगण्याचा हक्क साऱ्यांना कळला,

जातीयवात मिटवीत सहिष्णुतेचे पुजारी,



उध्दार कित्येक जन्माचा कर्माने केला,

समतेचा स्थापून किल्ला अभेद दिला,

महात्मा  पहिले या राष्ट्राचे ठरला,

त्रिवार वंदन आपल्या कार्याला....





महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐


जयज्योती... जयक्रांती......


   प्रकाशसिंग राजपूत

       छ. संभाजीनगर 

📲  9960878457