डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डिजिटल दीपमाला...

💐💐💐🌹🌹🌹🌸🌼🌻🌺🍂

*📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

*करोना काळात शिक्षकांच्या कार्याची  🪔" डिजिटल दीपमाला" 🏮.....* 

*सर्वप्रथम समूहामध्ये आपणा सर्वांचे मी प्रकाशसिंग राजपूत टीम डिजिटलच्या वतीने  हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. करोनाचा प्रभाव जसाजसा कमी होत आहे शाळा उघडण्याच्या बाबतीत निर्णय घेतल्या जात आहे.   आनंददायी बाब म्हणजे लवकरच सर्व शाळा चालू होतील ही आतुरता सर्वांना लागलेली आहे. यामुळेच यापुढे करोना काळात ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांनी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे त्याचा कुठेतरी उल्लेख महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी डिजिटल समुहाच्या वतीने यंदा डिजिटल  दीपमाला प्रकाशित करण्याचा मानस आहे यासाठीच आपणास व आपल्या कार्याचा गौरव होण्यासाठी आपणांस  समूहात सहभागी  करण्यात आलेले आहे.💐💐💐*

यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार व Ict पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री उमेश खोसेसर व शेख खुर्शीदसर दोघेही या समूहात सहभागी झालेले असून निश्चित त्यांच्या कार्याने महाराष्ट्र राज्याचा मोठा गौरव झालेला आहे . आदरणीय दोन्हीही   सन्मानमुर्तीचे  विशेष स्वागत 💐💐💐🌹🌹🌹

   

       *प्रकाशसिंग राजपूत*
          *समूहनिर्माता व    मुख्यप्रशासक*

   *श्रीमती लीना वैदय*
        *मुख्यप्रशासक*

      *श्रीमती राजश्री माने*
      *श्री अमोल वंजारी*
          *सहप्रशासक*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

कार घेतांना तुम्ही हे तपासले का?

आपल्या देशात कार घेणे प्रत्येकाचे मोठे स्वप्न असते.कारण संपूर्ण कुटुंबाला आपण त्यात प्रवासाला नेत असतो. आपल्याकडे कार घेतांना कंपनी, बजेट, मायलेज व यानंतर त्या गाडीचा मेंटेन्नस व अखेरीस तिचा रिसेल व्हॕल्यु या आधारित कार घेतल्या जाते.
अमूक कंपनीची कारच घेतली तर आपला निर्णय योग्य ठरेल ह्या गफलतीत आपण मुख्य बाब विसरतो ती म्हणजे सुरक्षितता.... < class="separator" style="clear: both;"> आपल्या देशात रोज अनेक जण रोड अपघातात जीव गमवितात यामागे अनेक कारणे असतात. परंतू कार घेतांना आपण निश्चित एक गोष्ट लक्षपुर्वक तपासावी ती म्हणजे आपण घेत असलेल्या गाडीचे ग्लोबल NCAP ची क्रॕश टेस्ट मध्ये गाडीने सुरक्षितता संदर्भात किती रेटींग घेतलेले आहे. ५ रेटिंग सर्वात सुरक्षित कार मानल्या जाते. ३ व त्यापेक्षा कमी असेल तर ती सुरक्षितेत कमी असते. मग ही टेस्ट नेमकी कशी घेतली जाते हे पहाण्यासाठी खालील व्हिडीओ अवश्य पहा. माहिती आवडल्यास या ब्लाॕगला फाॕलो व चॕनलला सबस्क्राईब करा. प्रकाशसिंग राजपूत


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खोसे सरांचे विचार....

डिजिटल समूह उस्मानाबादचे तंत्रस्नेही समूह सदस्य व यावर्षी तब्बल २ राष्ट्रीय  पुरस्काराने सन्मानित खरोखर आदर्श कार्य असलेले श्री उमेश खोसे सरांचे विचार वाचा....

🙏 *मनःपूर्वक धन्यवाद व आभार* 🙏
         *कृतज्ञ मी, कृतार्थ मी*

🙏 *विद्यार्थी हेच दैवत मानून गेली 14 वर्षे झाली शिक्षण सेवेचा वसा घेऊन काम करत आहे. यात जि.प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब व जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर कडदोरा या दोन शाळेत कार्य केले,करत आहे. जे काही करायचे ते विद्यार्थी व शाळा विकासासाठी करायचे हे ध्येय ठेवून सातत्याने काम करत आहे. हे करत असतानाच  30 जून 2021 रोजी राष्ट्रीय आय.सीटी.पुरस्कार जाहीर झाला व 18 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.*
         *खरे तर 30 जून रोजी आय.सीटी. पुरस्कार जाहीर झाल्यापासून सातत्याने प्रत्यक्ष भेटून, सोशल मिडियाद्वारे, पत्राद्वारे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाद्वारे, अभिनंदन, कौतुक व सन्मान होत आहे. त्याच वेळी आभार प्रदर्शन व्यक्त करावे वाटत होते परंतु राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मुलाखती सुरू होत्या आणि मनाला पक्का विश्वास नव्हे खात्री होती की यावेळी आपल्याला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळेल व त्याच वेळी आपण दोन्ही पुरस्काराचे आभार व्यक्त करूया. ( खर तर हे चुकीचे होते ) पण सातत्याने सर्वांनी सन्मान करत असल्याने गेली साडे तीन महिने कसे गेले ते समजलेच नाही. आभार व्यक्त करायला नक्कीच उशीर झाला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काम असताना सतत एकच विचार मनात राहायचा तो म्हणजे*
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*कष्ट इतके शांततेत करा की*
*यशाने गोंधळ घातला पाहिजे.*
*जे पाहिजे ते एका दिवसात होणार नाही*
*परंतु एक दिवस नक्की होणार आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖

      *यापूर्वीही मी 2 वेळा प्रयत्न केला व दिल्लीपर्यंत सादरीकरण करून यश आले नव्हते. परंतु अपयशाने खचून जान्यासारखे काहीच नव्हते. कारण अजून 25 वर्षे सेवा शिल्लक आहे असे समजायचो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी कोणाला तरी प्रतिनिधित्व करण्याची संधी देत असतो. कारण शिक्षक संख्या खुप जास्त आहे, पुरस्कार संख्या देशातून 45 व महाराष्ट्रात मागील 3 वर्षे एकच मिळत होता. त्यामुळे सर्व शिक्षक बांधवांचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला लाभले आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*चांगले विचार आणि चांगले लोक तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖

*जुन 2007 सालापसून काम करत असताना विद्यार्थी विकासासाठी जे जे करता येईल ते ते करत आलो. यामध्ये बेळब तांडा व कडदोरा गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक महिला, तरुण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहकारी शिक्षक यांनी माझ्यापेक्षाही जास्तीचे योगदान दिले. उमरगा तालुक्यातील शिक्षक मित्र परिवार यांचे प्रोत्साहन नक्कीच अविस्मरणीय आहे.*
      *खर तर राष्ट्रीय स्तरावरील एक पुरस्कार मिळावा हे शिक्षकांच्या आयुष्यात स्वप्न असते. पण निःस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची पावती म्हणजे एकाच महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार जाहीर झाले. आणि गेली साडे तीन महिने झाले सातत्याने आपले प्रेम मिळत आहे, सन्मान मिळत आहे, कौतुक करत आहात. नक्कीच जीवनातील सर्वोत्तम काळ जगत आहे. यातच कडदोरा ग्रामस्थ व जगदंब प्रतिष्ठण यांनी बैलगाडीतून काढलेली मिरवणूक व उमरगा तालुका शिक्षक समिती परिवाराच्या वतीने केलेला सन्मान हा जीवनातील अत्युच्च आनंद देणारे प्रसंग होते.*
       *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 व राष्ट्रीय आय.सीटी पुरस्कार 2018 हे  पुरस्कार मी माझ्या शाळेतील बालकांना समर्पित केलेले आहेत. तसेच हे पुरस्कार महाराष्ट्र व उस्मानाबाद जिल्ह्यातील, उमरगा तालुक्यातील, माझ्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे. माझ्या बेळब व कडदोरा गावाच्या  प्रत्येक बालक व पालकांचा व ग्रामस्थांचा आहे . मला शिक्षक म्हणून घडविणाऱ्या गुरुजनांचा आहे.  मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक मित्रांचा आहे.  शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अधिकार्‍यांचा, पदाधिकाऱ्यांघा आहे. शिक्षणाला समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मिडीयाचा आहे. मला जन्म देणाऱ्या माझ्या जन्मदात्यांचा हा सन्मान आहे. सोबतीने साथ देणाऱ्या धर्म पत्नीचा आहे. मी तर केवळ एक प्रतिनिधी आहे.*

🙏 *या गेल्या साडे तीन महिन्यात नक्कीच आपल्याला प्रतिसाद देणे शक्य झाले नसेल, एखादा कॉल घेणे शक्य झाले नसेल. बोलताना किंवा लिहताना कोणाचे आभार मानायचे राहून गेले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.*

💐 *आपण वेळात वेळ काढून मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळल्याबद्दल अभिनंदन केलात, कौतुक केलात, सन्मान केलात त्याबद्दल आजच्या या शुभ दिनी दसऱ्याच्या दिवशी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. यापुढेही आपले प्रेम व आशीर्वाद असेच मिळत राहो हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो.*

🌳 *आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

✍️ *श्री.उमेश रघुनाथ खोसे*
     राष्ट्रीय आय.सीटी पुरस्कार 2018
    राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021
     मराठवाडा रत्न पुरस्कार 2021

https://www.ukguruji.in/2021/10/blog-post_15.html?m=1

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आकारिक चाचणी प्रथम सत्र

आकारिक चाचणी प्रथम सत्र

 सौजन्य - मच्छिंद्र कदमसर



इयत्ता १ ली 
===========================

इयत्ता २ री 

===========================
इयत्ता ३ री


===========================
इयता ४ थी



इतर वर्गाच्या लवकरच पाठवत आहोत...
या साईट ला फाॕलो करा.... धन्यवाद 

आकारिक चाचणी प्रथम सत्र

जागतिक अन्न दिन....१६ आॕक्टोंबर...

"भुकेलेल्यांना मिळो पोटभर घास,
नांदो जग सुख समृद्धी ने खास,
देवा तु दे भरभरून धनधान्याची रास,
उपाशी कौणीही न झोपो हीच आस..."
   
       प्रकाशसिंग राजपूत 


१९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेच्या स्थापनेच्या तारखेच्या स्मरणार्थ जागतिक अन्न दिन हा दरवर्षी जगभरात १६  ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे.  जागतिक अन्न कार्यक्रम आणि कृषी विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधी.  डब्ल्यूएफपीला उपासमारीचा सामना करण्यासाठी, संघर्ष क्षेत्रात शांततेत योगदान देण्यासाठी आणि युद्ध आणि संघर्षासाठी शस्त्राच्या स्वरूपात भुकेचा वापर थांबवण्यात अग्रणी भूमिका बजावल्याबद्दल २०२० साठी शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. 


 जागतिक अन्न दिवस...

 संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी दिनांक १६ऑक्टोबर या दिवसाला जागतिक अन्न म्हणून मान्यता दिलेली आहे.

 मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020....


"शिक्षण रुपी पंख सजले आता नवे,

घेऊ उंच आता ही भरारी आसमानी,

सिद्ध करण्या स्वतःस पुन्हा आम्ही सज्ज ,

उणीव न ठेवू तेव्हाच होऊ स्वाभिमानी..."


    प्रकाशसिंग राजपूत 

     औरंगाबाद 

    9960878457 


शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.21 व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून 34 वर्ष जुन्या1986 च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र,बहू शाखीय,21 व्या शतकाच्या गरजाना अनुरूप करत भारताचे चैतन्यशील प्रज्ञावंत समाज आणि जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या क्षमता पुढे आणण्याचा या धोरणाचा उद्देश आहे.

महत्वाचे मुद्दे:

शालेय शिक्षण

शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावर सार्वत्रिक प्रवेश संधी सुनिश्चित करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शालेय पूर्व ते माध्यमिक अशा सर्व स्तरावर शालेय शिक्षणाला सार्वत्रिक संधी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.पायाभूत सुविधा सहाय्य, शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे, विद्यार्थी आणि त्यांच्या अध्ययन स्तराचा मागोवा, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण पद्धतींसह शिक्षणाचे अनेक मार्ग सुलभ करणे, शाळांसमवेत समुपदेशक किंवा उत्तम प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांची सांगड, एनआयओएस आणि राज्यातल्या मुक्त शाळा याद्वारे 3, 5, आणि 8 व्या इयत्तेसाठी खुले शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम,प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्ध करणारे कार्यक्रम या मार्गाने हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सुमारे 2 कोटी शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात आणली जाणार आहेत.

नवा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखड्यासह बालवयाच्या सुरवातीलाच काळजी आणि शिक्षण

बालवयाच्या सुरवातीलाच काळजी आणि शिक्षण यावर भर देत 10+2 या शालेय अभ्यासक्रम आकृती बंधाची जागा आता 5+3+3+4 अभ्यासक्रम आराखडा अनुक्रमे 3-8,8-11,11-14,14-18 वयोगटासाठी राहील. यामुळे 3-6 वर्ष हा आतापर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमा अंतर्गत येईल, जगभरात हा वयोगट, बालकाच्या मानसिक जडणघडणीच्या विकासा साठी अतिशय महत्वाचा मानला जातो. नव्या पद्धतीत तीन वर्षे अंगणवाडी/ शाळापूर्व वर्गांसह 12 वर्ष शाळा राहणार आहे.

एनसीईआरटी, बालवयाच्या सुरवातीची काळजी आणि शिक्षण यासाठी 8 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा विकसित करणार आहे.अंगणवाडी आणि पूर्व शालेय सह विस्तृत आणि बळकट संस्थांच्या माध्यमातून ई सी सी ई देण्यात येईल.ई सी सी ई अभ्यासक्रमात प्रशिक्षित शिक्षक आणि आंगणवाडी कार्यकर्ते यासाठी असतील.मनुष्य बळ विकास,महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालय ई सी सी ई नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.

पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य करणे

पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण ही शिक्षणाची पूर्व अट आहे हे जाणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये एम एच आर डी कडून पायाभूत साक्षरता आणि संख्याशिक्षण राष्ट्रीय मिशन स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व प्राथमिक शाळेत सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य करण्यासाठी राज्ये अंमलबजावणी आराखडा तयार करतील.देशात राष्ट्रीय ग्रंथ प्रोत्साहन धोरण आखण्यात येईल.

शालेय अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा

21 व्या शतकाची प्रमुख कौशल्ये , आवश्यक शिक्षण आणि चिकित्सात्मक विचार वाढवण्यासाठी अभ्यासक्रम कमी करणे आणि अनुभवातून शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा शालेय अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीचा उद्देश असेल. विद्यार्थ्यांची लवचिकता आणि विषयांचे पर्याय वाढतील. कला आणि विज्ञान, अभ्यासक्रम आणि अवांतर उपक्रम, तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक शाखा यांच्यात कुठल्याही प्रकारचे कठोर विभाजन असणार नाही.

शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण 6 वी पासून सुरू होईल आणि त्यात इंटर्नशिपचा समावेश असेल.

एनसीईआरटी द्वारे एक नवीन आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम रूपरेषा -एनसीएफएसई 2020-21 विकसित केली जाईल.

बहुभाषिकता आणि भाषेची ताकद

या धोरणामध्ये किमान इयत्ता 5 वी पर्यंत आणि प्राधान्याने 8 वी आणि त्यानंतरही मातृभाषा / स्थानिक भाषा / प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावे यावर भर देण्यात आला आहे. शालेय आणि उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांना तीन-भाषांच्या सूत्रासह संस्कृतचाही एक पर्याय दिला जाईल. भारतातील इतर अभिजात भाषा आणि साहित्य देखील पर्याय म्हणून उपलब्ध असतील. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत इयत्ता 6--8 साठी ‘भारताच्या भाषा’ विषयावरील मजेदार प्रकल्प / उपक्रमात विद्यार्थी सहभागी होतील. माध्यमिक स्तरावर विविध परदेशी भाषांचा पर्याय देखील दिला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वापरण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल) संपूर्ण देशभरात प्रमाणित केली जाईल आणि राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम सामुग्री विकसित केली जाईल. कुठल्याही विद्यार्थ्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही.

मूल्यांकन सुधारणा

एनईपी 2020 मध्ये सारांशात्मक मूल्यांकनाकडून नियमित आणि रचनात्मक मूल्यांकनाकडे वळण्याची कल्पना मांडली आहे जी अधिक योग्यता-आधारित आहे , शिक्षण आणि विकासाला उत्तेजन देणारी आहे आणि विश्लेषण, चिकित्सात्मक विचार प्रक्रिया आणि वैचारिक स्पष्टता या सारखी उच्च कौशल्ये तपासते. इयत्ता 3, 5 आणि 8 वी मध्ये सर्व विद्यार्थी शालेय परीक्षा देतील जी योग्य यंत्रणेद्वारे घेण्यात येईल. इयत्ता 10 आणि 12 वी साठी शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा सुरूच राहतील मात्र समग्र विकासाच्या उद्देशाने त्यांची पुनर्र्चना केली जाईल. दर्जा निश्चिती संस्था म्हणून पारख (समग्र विकासासाठी कामगिरी मूल्यांकन , आढावा आणि ज्ञानाचे विश्लेषण ) हे एक नवे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाईल.

न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण

जन्माच्या वेळेची परिस्थिती किंवा अन्य पार्श्वभूमीमुळे कोणताही मुलगा शिकण्याची आणि उत्कृष्टतेची संधी गमावणार नाही हे एनईपी 2020 चे उद्दीष्ट आहे . लिंग, सामाजिक-सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख आणि अपंगत्व समाविष्ट असलेल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटांवर (एसईडीजी) विशेष भर दिला जाईल. यामध्ये लिंग समावेश निधी आणि वंचित प्रदेश आणि गटांसाठी विशेष शैक्षणिक क्षेत्र स्थापन करण्याचा समावेश आहे. दिव्यांग मुले प्रशिक्षण , संसाधन केंद्रे, राहण्याची सुविधा , सहाय्यक उपकरणे, योग्य तंत्रज्ञान-आधारित साधने आणि त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या अन्य सहाय्यक साधनांच्या मदतीने पूर्व-प्राथमिक टप्प्यापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या नियमित शालेय शिक्षण प्रक्रियेत पूर्णपणे भाग घेण्यास सक्षम असतील. प्रत्येक राज्य / जिल्ह्यात कला-संबंधित, करिअरशी संबंधित आणि खेळाशी संबंधित उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी एक खास डे-टाइम बोर्डिंग स्कूल म्हणून "बाल भवन्स" स्थापन करायला प्रोत्साहन दिले जाईल. सामाजिक चेतना केंद्रे म्हणून मोफत शालेय पायाभूत सुविधा वापरता येतील.

मजबूत शिक्षक भरती आणि करिअर मार्ग

शिक्षकांची भरती सक्षम पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल. बढती गुणवत्तेवर आधारित असेल ज्यामध्ये बहु-स्रोत नियमित कामगिरी मूल्यांकन आणि उपलब्ध प्रगतीचे मार्ग याद्वारे शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षक होता येईल. एनसीईआरटी, एससीईआरटी, शिक्षक आणि विविध पातळी व प्रदेशातील तज्ज्ञ संघटना यांच्याशी विचारविनिमय करून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद 2022 पर्यंत शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके (एनपीएसटी) विकसित करेल.

शालेय प्रशासन

शाळा संकुले किंवा समूहांमध्ये आयोजित केल्या जाऊ शकतात जे प्रशासनाचे मूलभूत घटक असतील आणि पायाभूत सुविधा, शैक्षणिक ग्रंथालये आणि बळकट व्यावसायिक शिक्षक समुदायासह सर्व संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करेल.

शालेय शिक्षणासाठी मानक-निश्चिती आणि मान्यता

एनईपी 2020 मध्ये धोरण आखणी , नियमन, संचलन आणि शैक्षणिक बाबींसाठी स्पष्ट, स्वतंत्र यंत्रणेची कल्पना केली आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र राज्य शालेय मानक प्राधिकरण (एसएसएसए) स्थापन करतील. एसएसएसएनने ठरवलेल्या सर्व मूलभूत नियामक माहितीचे पारदर्शक सार्वजनिक स्वयं-प्रकटीकरण सार्वजनिक प्रतिष्ठा आणि दायित्वासाठी प्रामुख्याने वापरले जाईल. एससीईआरटी सर्व हितधारकांशी सल्लामसलत करून शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता रूपरेषा (एसक्यूएएएफ) विकसित करेल.

उच्च शिक्षण

2035 पर्यंत जीईआर 50 टक्क्यां पर्यंत वाढवणे

व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणामध्ये सकल नोंदणी गुणोत्तर 26.3 टक्के (2018) वरून 2035 साला पर्यंत 50 टक्के पर्यंत वाढवण्याचे एनईपी 2020 चे उद्दिष्ट आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये 3.5 कोटी नवीन जागा वाढवण्यात येतील.

समग्र बहु शाखीय शिक्षण

या धोरणात व्यापक आधारभूत, बहु-शाखीय , लवचिक अभ्यासक्रमासह सर्वसमावेशक पदवी शिक्षण अभ्यासक्रम , विषयांचे सर्जनशील संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण आणि योग्य प्रमाणीकरणासह बहू प्रवेश आणि निर्गम टप्प्यांची कल्पना केली आहे. पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांचे असू शकते आणि या कालावधीत अनेक निर्गमन पर्याय आणि योग्य प्रमाणीकरण असू शकतात. उदाहरणार्थ, 1 वर्षा नंतर प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर प्रगत पदविका, 3 वर्षांनंतर बॅचलर डिग्री आणि 4 वर्षानंतर बॅचलर विथ रिसर्च.

वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्थांकडून मिळवलेल्या शैक्षणिक उपलब्धी डिजिटली संग्रहित करण्यासाठी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट ची स्थापना केली जाईल जेणेकरून माहिती हस्तांतरित करता येईल आणि अंतिम पदवी मिळवल्यावर त्याची गणना केली जाईल.

बहुशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठांची स्थापना (MERU)- ही आयआयटी, आयआयएमच्या तोडीची देशातील जागतिक दर्जाच्या सर्वोत्कृष्ट बहुशाखीय शिक्षणासाठी आदर्शवत म्हणून स्थापित केली जातील.

नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली जाईल, या सर्वोच्च संस्थेच्या माध्यमातून प्रबळ संशोधन संस्कृती आणि उच्च शिक्षणामध्ये संशोधन क्षमता वृद्धींगत करण्यात येईल.

नियमन

भारतीय उच्च शिक्षण आयोगाची (HECI) स्थापना करण्यात येईल, वैद्यकीय आणि कायदेशीर शिक्षण वगळता उच्च शिक्षणाशी संबंधित एकमेव उच्च संस्था असेल. एचईसीआयचे 4 स्वतंत्र घटक असतील- नियमनासाठी, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद (एनएचईआरसी), दर्जात्मक व्यवस्थेसाठी जनरल एज्युकेशन कौन्सिल (जीईसी), निधीसाठी उच्च शिक्षण अनुदान परिषद (एचईजीसी) आणि मुल्यांकनासाठी राष्ट्रीय मुल्यांकन परिषद (नॅक) असेल. एचईआयसी तंत्रज्ञानाच्या मदतीने हस्तक्षेप (फेसलेस इन्टरव्हेशन) करेल आणि एचईआयसीला नियम आणि मानदंडांचे पालन न करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना दंड करण्याचे अधिकार असतील. सार्वजनिक आणि खासगी उच्च शिक्षण संस्था याच नियम, मुल्यांकन आणि शैक्षणिक मानदंडांद्वारे संचालित केल्या जातील.

तर्कसंगत संस्थात्मक संरचना

उच्च शैक्षणिक संस्थांचे रुपांतर विशाल, उत्तम स्रोत असलेल्या, सळसळत्या बहुविषयी संस्थांमध्ये केले जाईल. यात उच्च गुणवत्तेचे शिक्षण, संशोधन आणि समुदाय प्रतिबद्धता असेल. विद्यापीठाच्या परिभाषेत बहुविध संस्था येतील ज्यात संशोधन-केंद्रीत विद्यापीठे ते शिक्षण-केंद्रीत विद्यापीठे आणि स्वायत्त पदवी-प्रदान करणारी महाविद्यालये असा विस्तार असेल.

महाविद्यालयांची संलग्नता 15 वर्षांत टप्प्याटप्प्याने समाप्त केली जाणार आहे आणि महाविद्यालयांना पातळी-आधारीत यंत्रणेच्या माध्यमातून श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्यात येईल. कालांतराने प्रत्येक महाविद्यालय एकतर स्वायत्त पदवी देणारे महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून विकसित होईल.

प्रेरित, उत्साही आणि सक्षम अध्यापक

एनईपीने प्रेरित, उत्साही आणि क्षमता निर्माण करणाऱ्या अध्यापकांच्या नियुक्तीसाठी स्पष्टपणे परिभाषित, स्वतंत्र, पारदर्शी पद्धतीने नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. अभ्यासक्रम/अध्यापनाचे स्वातंत्र्य, उत्कृष्टतेला उत्तेजन देणे, संस्थात्मक नेतृत्वाला मदत केली जाईल. मुलभूत निकषांप्रमाणे काम न करणाऱ्या अध्यापकांना जबाबदार ठरवले जाईल.

शिक्षकांचे शिक्षण

एनसीटीई एनसीईआरटीशी सल्लामसलत करून शिक्षक शिक्षणासाठी एक नवीन आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, एनसीएफटीई 2021 तयार करेल. 2030 पर्यंत, शिक्षणासाठी किमान पदवी पात्रता ही 4-वर्षांचा एकात्मिक बी.एड. पदवी असेल. गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या नियमनबाह्य शैक्षणिक संस्थांविरोधात (टीईआय) कडक कारवाई करण्यात येईल.

मार्गदर्शक मोहीम

एका राष्ट्रीय मार्गदर्शक मोहिमेची (नॅशनल मिशन फॉर मेन्टॉरिंग) स्थापना करण्यात येईल-यात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ/निवृत्त अध्यापकांचा समावेश असेल. भारतीय भाषांमध्ये शिकवणारे शिक्षकही यात असतील-जे थोड्या आणि दीर्घ काळासाठी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठ/महाविद्यालयीन शिक्षकांना मदत करतील.

विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

एससी, एसटी, ओबीसी आणि एसईडीजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलचा विस्तार करुन शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जाईल. खासगी संस्थांना देखील मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

मुक्त आणि दूरस्थ शिक्षण

पटनोंदणी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी याचा विस्तार केला जाईल. ऑनलाईन कोर्सेस आणि डिजिटल कोष, संशोधनासाठी निधी, सुधारित विद्यार्थी सेवा, विशाल मुक्त ऑनलाईन कोर्सेसची पत-आधारित मान्यता इत्यादी उपायांची अंमलबजावणी वर्गखोल्यांमध्ये उच्च दर्जाच्या गुणवत्तेबरोबरच निश्चित केली जाईल.

ऑनलाइन शिक्षण आणि डिजिटल शिक्षण:-

सध्या संपूर्ण देशामध्ये कोविड-19 झालेला झालेला प्रसार लक्षात घेवून शिक्षण धोरण तयार करताना पर्यायी शैक्षणिक पद्धतींचा व्यापक विचार करण्या आला आहे. त्यामुळे सर्वंकष ऑनलाइन शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी आलेल्या शिफारशी विचारात घेवून शैक्षणिक सज्जता सुनिश्चित केली जाणार आहे. सध्याच्या महामारीच्या काळामध्ये वैयक्तिकरितीने परंपरागत पद्धतीने शिक्षण देणे शक्य नाही, त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी पर्याय शोधण्यात आले आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयामध्ये ई-शिक्षणाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शालेय आणि उच्च शैक्षणिक वर्गांसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, शैक्षणिक सामुग्री तयार करणारे विभाग आणि डिजिटल शिक्षणासाठी समर्पित विभाग तयार केले जातील.

शिक्षणामध्ये तंत्रज्ञान

‘नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम’(एनइटीएफ) म्हणजेच ‘राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच’ या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात येणार असून याव्दारे विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ- मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मंचाव्दारे शैक्षणिक मूल्यवर्धन, मूल्यांकन, तसेच नियोजन, प्रशासन यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो, यासाठी स्वतंत्रपणे विचारांचे आदान-प्रदान केले जाणार आहे. वर्गातील शिक्षणात सुधारणा व्हावी, शिक्षकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे , वंचित घटकांना शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त मिळाव्यात आणि शैक्षणिक नियोजन, प्रशासन तसेच व्यवस्थापन सुनियोजित पद्धतीने व्हावे, यासाठी सर्व स्तरावरच्या शिक्षण कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण केले जाईल.

भारतीय भाषांचा प्रसार

सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, त्यांचा प्रसार व्हावा तसेच त्यांच्यामध्ये एक प्रकारे चैतन्य निर्माण व्हावे याची सुनिश्चिती करण्यात येणार आहे. यासाठी ‘एनईपी’ने दिलेल्या शिफारशींनुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन (आयआयटीआय) म्हणजेच राष्ट्रीय अनुवाद आणि भाष्य संस्था तसेच नॅशनल इंन्स्टिट्यूट (किंवा इन्स्टिट्यूटस्) फॉर पाली, पर्शियन अँड प्राकृत, म्हणजेच पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी राष्ट्रीय संस्था यांची स्थापना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संस्कृत आणि इतर भाषा विभागांच्या सुदृढीकरणाची शिफारस करण्यात आली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक मातृभाषेचा किंवा स्थानिक भाषेचा उपयोग शिकवण्याचे माध्यम म्हणून केला जावा, असेही सुचवण्यात आले आहे.

शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण संस्थात्मक सहकार्यातून करण्यात येवू शकते. तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या देवाणघेवाणीचा विचार करून करता येवू शकतो. त्यामुळे आपल्या देशामध्ये जगामधल्या अव्वल क्रमांकाच्या विद्यापीठांना प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. बाहेरच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांना आपल्या देशात कॅम्पस उघडता येणार आहेत.

व्यावसायिक शिक्षण

उच्च शिक्षण प्रणालीमध्ये व्यावसायिक शिक्षण हा अनिवार्य आणि अविभाज्य भाग असेल. जी तंत्रज्ञान विद्यापीठे, आरोग्य विज्ञान विद्यापीठे, विधी-कायदा आणि कृषी विद्यापीठे आहेत, त्यांना आता बहुउद्देशीय संस्था बनवण्याचे उद्दिष्ट असणार आहे.

प्रौढ शिक्षण

शंभर टक्के तरूण आणि प्रौढ साक्षरता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट या धोरणाचे आहे.

शिक्षणासाठी वित्तपुरवठा

शैक्षणिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वृद्धीसाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रित काम करणार आहेत. शक्य तितक्या लवकर ही गुंतवणूक जीडीपीच्या 6 टक्क्यांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश यामागे आहे.

जागतिक हात धुवा दिवस..

 हात धुण्‍याचा शोध....इतिहास 


"स्वच्छ धुवून वारंवार हात...
       रोगांची येणार नाही साथ..."


    जगात हात धुण्याचे महत्त्व करोनानंतर नक्कीच सर्वत्र पटलेले आहे. परंतु याबाबतीत जगात नेमकी केव्हा कशी ओळख झाली हे पाहणे आपल्यासाठी रंजकदार होणार आहे.
      युरोपमध्‍ये सन इ.स.1840 मध्‍ये डॉ.ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्‍यू होत होता. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना स्‍त्रीला हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळ-जवळ 50% नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍याच्‍या मार्फत घरा-घरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
     हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे.

हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू...




       आमच्या मुरुमखेडावाडी शाळेने सन २०२० मध्ये तर करोना परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन फॉर चेंज अंतर्गत शाळेच्या समोर वाडीच्या लोकांना बाहेरून आल्यावर हात धुण्यासाठी व्यवस्था केली व हात धुण्याबाबतीत सतत प्रात्यक्षिक ही दिले. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या दिड वर्षात करोना वाडीत आलेला नाही.


पुष्‍कळ लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहितीच नाही. हात धुण्‍याचे पाच टप्‍पे आहेत. सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्‍हणजे नखे ही स्‍वच्‍छ होतील व पाणी वापरुन हात धूवून घ्‍यावेत.
   

१५ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस


हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
       
खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे
दुषित पाणी किवा अन्नातून ,आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास...अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास अनेक सुक्ष्म विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच फुफ्फुस्, यकृताचे  आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
               
या रोगांचा प्रसार रोखता येतो  तो म्हणजे नियमित स्वच्छ हात धुवून


   
    स्वच्छ हात धुण्याची पद्धत
१)प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी.   
२) हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा.

३)दोन बोटांमधील बेचक्या तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी.
४)हात धुतांना साबण कमीत कमी 20 सेकंदापर्येत ठेवणे आवश्यक आहे.
५)हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे.
       
          हात कितीवेळा व कधी धुवावे...




दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर
जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी
शौचालयाचा वापर केल्यानंतर
पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर
सापसफाई केल्यानंतर
आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर
बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर

हात धुण्यासाठी निश्चित संख्या नाही फक्त ती एक सवय व्हावी जेणेकरून आजारांना आळा बसून येईल.

       प्रकाशसिंग राजपूत
          औरंगाबाद 


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

Self learning kids....१ ली व २ री ला उपयुक्त अॕप

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

डिजिटल समूहाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख व टीम डिजिटलचे तंत्रस्नेही श्री प्रकाश चव्हाण सरांची उपयुक्त निर्मिती आॕफलाईन  अॕप 📲....


नमस्कार मित्रांनो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी इयत्ता पहिली दुसरी आणि बालवाडीची विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षण देण्यासाठी घेऊन आहे एक नाविन्यपूर्ण अँप Self_Learning_Kids*

 ॲप इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*


 *याची वैशिष्ट्ये म्हणजे*
 *हे ॲप एकदा डाऊनलोड केल्यानंतर पूर्णपणे ऑफलाईन चालते*

 *ॲप वर एकही जाहिरात येत नाही म्हणजे मुलांना जाहिरातीचा अर्थ अजिबात पाहिलेला नाही.*


*

 *तिन्ही विषयांची प्राथमिक ज्ञान म्हणजे मुळाक्षरे अंकज्ञान मराठी व इंग्रजी याची ओळख या ठिकाणी करून देण्यात आलेली असून प्रत्येक अक्षर कशा पद्धतीने लेखन करावे याचे ट्रेसिंग ट्रॅक चित्रात दाखवलेले आहेत त्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या बोटाने तिथं सहज लिहू शकणार आहे आणि खोडून परत  पुन्हा नवीन अक्षर तो लिहू शकणार आहे प्रत्येक अक्षराने सुरू होणारे शब्दांचा परिचय दिलेला असून त्या शब्दावर त्यांनी प्रेस केल्यावर त्या शब्दांचा उच्चार त्याला ऐकता येणार आहे*
 *हे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते एस फाउंडेशनच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रकाशित झाले होते व आजच ते प्ले स्टोअर वर सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे.




*सर्वांना विनंती आहे की आपल्या गावातील अंगणवाडी ताई आणि पहिली दुसरीच्या शिक्षक पालकांपर्यंत हे ॲप सेंड करूम मुलांना डिजिटल पद्धतीने ऑफलाइन शिक्षणासाठी देण्यात आलेल्या पर्यायाचा आपण लाभ घ्यावा.*
🙏🌹🌹🌹🌹🙏
 *श्री प्रकाश लोटन चव्हाण* *National ICT Awardee 2019*
  
नवरात्री व दसरा उत्सवच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐
      *प्रकाशसिंग राजपूत*
           *समूहनिर्माता*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
*एकमेव शाळाकेंद्रित १०१ राज्यस्तरीय समूह....*


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

राज्यात 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरू शासनाचे परिपत्रक पहा...

२०२० पासून राज्यातील सर्वच महाविद्यालय बंद होती राज्य शासनाने कोविडचे रूग्ण कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने शाळा व आता महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

          राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षांवरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील कोव्हिड-१९ बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोव्हिङ प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. सबब, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सरकारी परिपत्रकानुसार....

१. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी सलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, विद्यापीठ/महाविद्यालयांचे वर्ग ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. ज्यांनी कोव्हिड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. विद्यार्थी/विद्यार्थीनी

२.विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

      अधिक माहिती करिता खालील परिपत्रक वाचा....


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....