डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू... #unicef covid

 राष्ट्रीय स्तरावरील आयोजित स्पर्धेत...

 जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी , केंद्र / बीट करमाड , ता/ जि. औरंगाबाद  या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना या संकटापासून वाडीला वाचविण्यासाठी शोधलेला हा उपाय खूपच महत्त्वाचा व वाडीच्या लोकांना आरोग्य व स्वच्छतेचा संदेश देणारा ठरणार आहे. 



जगभरामध्ये पसरलेल्या करणामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे . लोकांचा बाहेर जाणे येणे  थांबवता येत नाही. पण घरी येताना त्यांनी जर स्वच्छतेची काळजी घेतली तर निश्चित या संकटापासून वाचण्यासाठी पूरक असा उपक्रम मुरूमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे .त्यांना या कामासाठी शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलेले आहे.



वर स्टोरी पहा 

 शालेय जीवनात मुलांना मिळालेला हा अनुभव पुढील आयुष्यामध्ये त्यांना निश्चितच आरोग्यदायी दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. समाजाविषयी एक नागरिक म्हणून आपले काय देणे असते याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांना टाळता येते याची जाणीव सुद्धा त्यांना यामुळे होणार आहे. हे करत असतांना विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस याबाबतीत विचार करण्यास सुरुवात केली त्यांना मुख्यतः खालील समस्या या सतावत होत्या.




१) लोक वारंवार बाहेरगावी जातात.
२) हात पाय न धुता तसेच घरात येतात.
३) लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहीत नाही.
४) डोंगर खोर्‍यात वाडी असल्याने सुरक्षित आहे पण सतत जाणारे-येणारे धोका वाढवीत आहे.

       या सर्व समस्यांवर विचार करत त्यांनी *🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू...*

    या उपक्रमाची स्वतः आखणी केली . वाडीतील मोठया मुलांच्या सहकार्याने वाडीत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर त्यांनी शाळेसमोर हात पाय धुण्यासाठी नळ व वटा निर्माण केला व तेथे हँण्डवाँश लिक्विड उपलब्ध करुन दिले. 

             एक प्रकारचा थांबा निर्माण करत लोकांना बाहेरून येतांना हात पाय धुवून वाडीत येण्याविषयी प्रबोधन केले व हात धुण्याची योग्य पद्धत ही समजावली.

       "small things make big change"

       याप्रमाणे या उपक्रमाचा फायदा खालीलप्रमाणे होणार आहे.

१) लोक बाहेरून येतांना हात पाय स्वच्छ करुन येणार असल्याने कुटूंबाला तसेच पर्यायाने समाजाचा कोरोना पासून बचाव होणार आहे.

२) हात धुण्याची योग्य पद्धत ही लोकांना माहित होणार आहे.

३) जेव्हा शाळा उघडातील तेव्हा शाळेत येतांना व शाळेतून जातांना विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.


           *विद्यार्थी सहभागी टीम*


जयपाल बालोद,पार्थ बचाटे,  साक्षी बचाटे , कल्याणी बचाटे, सागर बालोद, प्रतिक्षा बचाटे.*

                *मार्गदर्शक*

        *प्रकाशसिंग राजपूत*

            

               *सहकार्य*

    *श्री दिलीप आढे*

*अर्जून बालोद व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य*


Share for care....

▶️ *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🎞️


आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....

 आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....


जगभरात आलेले संकट हे खरंच आव्हानात्मक आहे. भारत देश विकसनशील राष्ट्र असून आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या संमातर बाबी आहेत. पण अशा परिस्थितीत दोन्हीही संकटात आहे. 

       शिक्षण व्यवस्थेत आपण कधीच या परिस्थितीचा विचार केलेला नाही. एकवेळ आरोग्य साधने आपण लवकर निर्मित करुन उभारणी करु शकतो ,परंतु  शिक्षणात असे करणे आवाहनात्मक असणार आहे.

       तरी पण सोशल मिडिया व डिजिटल साधने सर्वत्र पसरले असल्याने आपण बहुतांशी कार्य किंवा  शैक्षणिक आव्हान पेलु शकतो.माञ १००% प्राप्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल .




       आपली शिक्षण पद्धती  ही आजवर शाळा व शिक्षण या स्वरुपातच बंधिस्त राहीलेली आहे. 

शाळेतच शिक्षण होईल याच पद्धतीने आपण राहीलो आहे त्यामुळे पण अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून लांब झालेले दिसतात. शिक्षक हा गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या पद्धतीने कार्य करत आलेला आहे. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर शिक्षण प्रवास सुरु होतो तर पुढे त्याची शैक्षणिक प्रगती व आर्थिक परिस्थिती यावर त्याचे शिक्षण कसे होईल हे अवलंबून असते.साधारणतः हीच परिस्थिती  पुढे त्याला त्याच्या क्षमतेचा, कौशल्याचा व आवडीचा विचार न करत वाहत नेत असते. 

         कोरोना विषाणूने आलेला आजार एकूणच संपुर्ण शिक्षण प्रवाहाला थांबवून टाकतोय, खरं तर अशा परिस्थितीचा कोणत्याही शैक्षणिक धोरणात किंवा अभ्यासक्रम निर्मितीत विचार केलेला नाही. त्यामूळे आज समोर येऊन ठेपलेला हा कोरोना राक्षस आपल्या शैक्षणिक प्रगतीला थांबवून मागे आणू शकतो. आपण पुस्तक छापायचे व तोच अभ्यास विद्यार्थ्यांनी आत्मसात करत त्या आधारे गुणवत्ता तपासणी करायची हे ही त्या विद्यार्थ्यांची आवड किंवा अभिरुची न बघता. पुस्तकात बंद असलेले ज्ञान हेच त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार.

     गेल्या काही दिवसात दिक्षा अँप निर्मिती झाली व पुस्तकात क्यु आर कोडचा समावेश झाला व आपली पुस्तके छपाई सह डिजिटल स्वरूपात बनु शकली आहे.

        *डिजिटल व आँनलाईन शिक्षण स्वरूप*

📄 डी.एड /बी.एड शिक्षणात आदर्श पाठ सादरीकरण केल्या जाते ,त्याचप्रमाणे पाठयघटकातील प्रत्येक प्रकरणाचे आदर्श अध्यापनाचे व्हिडीओ जर पुस्तकात क्यु आर कोड स्वरुपात करण्यात आले तर फक्त अशा संकटातच नव्हे तर अनेकदा विद्यार्थी आजारपणाने गैरहजर राहीला किंवा पालकांचे अंशकालीन स्थलांतर होत असेल तर या नविन पद्धतीने त्या घटकांचे ज्ञान प्राप्त करु शकेल. व अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे अध्यापन सहज उपलब्ध होईल. पाठयक्रम रचना करतांना संबंधित अभ्यासगट अथवा राज्यातील विद्या प्राधिकरण यामार्फत १००% आदर्श पाठ त्या संपुर्ण घटकांचे बनवत क्यु आर कोडच्या साहाय्याने समाविष्ट करणे खूप हिताचे ठरेल.




🌐 बालक - पालक या स्वरूपात  व्हाटसअप समूह अथवा ब्राँडकास्ट लिस्ट बनवून एकञित इ कन्टेट देवाण घेवाण करणे.

▶️ अध्ययन निष्पती आधारित व्हिडीओंचे संकलन इयत्ता निहाय करत ते विद्यार्थ्यांना अध्ययन करिता नियोजनबद्ध पोहोच करणे.


📲दिक्षा अँपचे नियोजनबद्ध वापर तसेच अनेक शैक्षणिक  बोलो अँप, खुट इ. प्रभावी वापर करणे.


📲   क्लाऊड मिटींग, झुम अँप किंवा स्कायपी गुगल मीट या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी व्हिडीओ काँन्फरिंग करत अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतीमान करणे.


🧾 आँनलाईन टेस्टचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी प्राप्त क्षमतेचे मुल्यमापन करत आवश्यक असलेले अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करत वरील माध्यमातून तयारी करणे.

📱 मोबाईल एस.एम.एस पद्धतीने ज्यांच्याकडे अँण्ड्राईड किंवा मल्टिमिडिया फोन नाहीत अशा विद्यार्थ्यांना अध्ययन स्वरूप समजावत स्वयंअध्ययनास प्रवृत्त करत लघुत्तम कन्टेट एस एम एस द्वारे पाठवणे.

📱आँडीओ काँन्फरस काँल माध्यमातून शिक्षक एकञित सुचना अथवा श्राव्य अध्यापन ही शक्य होऊ शकते.

या सर्व क्रिया जलद होण्यात काही अडचणी आहेत त्या म्हणजे ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन नसणे, मोबाईल नेटवर्क जलद नसणे, नेटवर्क असले तरी महागडे इंटरनेट पँक, पालकांचा विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यातील उदासिनता.

       याबरोबरच या संपूर्ण प्रक्रियेत शाळा, तालुका व जिल्हा समन्वय राहण्यासाठी  शिक्षक बहुतांशी तंञस्नेही नसल्याने निर्माण होणारी अडचण, तथा पालकांचे पुर्ण सहकार्य या सर्व गोष्टी  आँनलाईन व डिजिटल शिक्षण यावर प्रभाव टाकणारे आहेत.


     *प्रकाशसिंग राजपूत*

          सहशिक्षक 

जि.प.प्रा,शा.मुरुमखेडावाडी

  


    आँनलाईन व डिजिटल शिक्षण - तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे.


If combined Child orphan and old age home

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.




     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.



          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....



        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....

जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा... #4k #Ultra hd

🍂🍁🥀🌺🌸☘️🌿🥀🍁🍂

*🔮 सोशल मिडियावर पहिल्यांदा  अशी पोस्ट येत आहे .....*🔮


*_जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा..._*




*Ultra Hd असा रेझ्युलेशन फाॕरमॕट ज्याला आपण 4k फाॕरमॕट म्हणून ही ओळखत असतो. 

आज Led tv घेतांना किंवा महागडे फोन घेतांना हा सपोर्ट आहे की नाही हे पाहिल्या जाते.*



    *आपल्या जिल्हा परिषद शाळा या डिजिटल युगात मागे नाहीत ..... जास्तीत जास्त शेअर करा....*

      *प्रकाशसिंग राजपूत*
              सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,

कें. करमाड, ता/ जि,औरंगाबाद 

व्हिडीओ पहातांना Quality - advance setting 1080 + पुढे पहा......

आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?... #school opening #digital portal.

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥



आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....



आपल्याला काय वाटते ते वर नोंदवा.......   

हा फक्त एक  समावेशक विचार आहे. हा कुठलाही निर्णय नाही किंवा त्या निर्णयास कारण नाही .
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....

            डिजिटल समूह हा अनेक  वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालवत आला आहे. हा फक्त जनमनाचा कौल आहे. हा फक्त समूहाच्या शैक्षणिक कार्यास पुरक असणार आहे.

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

Digital seva ज्याने कोणी लिहिलं त्याला २१ तोफांची सलामीच....

लेख खूपच आवडण्यासारखा......


*ज्यांचा जन्म १९५५,१९५६, १९५७,१९५८, १९५९, १९६०, १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९ १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५  ,१९८६ , १९८७ , १९८८ , १९८९ , १९९० साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख*



ही पीढ़ी आता 3० ओलाडून ६२ कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....


१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.


ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....


*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. 


*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. 


कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला  नव्हता. 


*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. 


*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि 

कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते. 


*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी. 


वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी* ही पिढी. 


दोन दिवस जरी मित्र 

शाळेत नाही आला तर 

शाळा सुटल्या सुटल्या

दप्तरासकट 

त्याच्या घरापर्यंत जाणारी

ती पीढी..


कुणाचेही बाबा शाळेत 

आले की..मित्र कुठेही

खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने *"तुझे बाबा आलेय चल लवकर* "

ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी


पण गल्लीत *कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी. 





*कपील, सुनिल गावसकर  , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते  राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख  माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*


भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.


*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी. 


कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी

ज्याने कोणी लिहिलं त्याला २१ तोफांची सलामीच....

*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी. 


ज्यांच्या  शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी.  हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.      कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...


ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी. 


पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी, 


दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी


लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.


पुन्हा डोळे झाकुया ?


दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ 


*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण  आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार  असं  मानणारी ही पिढी ?*


धन्य ते जीवन जे खर आपणच  जगलोय !!!


 *सर्व मित्रांसाठी*....✍

रसायन जगण्याचे..... सुंदर कविता नक्कीच वाचा.... #Song #poem

 रसायन जगण्याचे..... सुंदर कविता



*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*





*रसायन जगण्याचे...*



आयुष्य  हे निर्भर नात्यांवर,
बनत रसायन जगण्याचे,
फौल ठरते कधी सार्थक,
निभाव होऊन साफल्याचे,


तरीही कोणी कसं जगावं,
अजबं ठरत हे रसायन,
पीडा या मनाच्या कशाच,
सरत्या क्षणावर अच्छादन,


तोडगा नसे गुंतागुंतीचा,
प्रभाव तुमचा विसरून,
जगी हिनवावं का? कुणाला,
तुमच्या प्रगतीस अडवून..,


शल्य कधी वलय नवे जीवनी,
विसंगत नातं हे जुळवून,
चित्कार ना येत काळजाचा,
घडतोय जीवन असं विसंबून,


भावनेला ही का सारावं,
विनाव नवा बंध  रंगवून,
नात्याबाहेर ही मन रमावं,
जगावं जरा दुःख  हरवून.....



   *प्रकाशसिंग राजपूत*

          औरंगाबाद 
       9960878457 

*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*

digital Seva Save money on medicine #tata 1 mg #onlinemedicine

 

Save money on medicine


आप के दवाईओ पर होने वाले मे खर्च मे आप बचा सकते हो 20 - 25 % तक 



हा दोस्तो हर महिने होनेवाला आपका खर्च बचाकर आप अन्य चिजो के खरीद पर इस्तेमाल कर सकते हो.....पुरी जानकारी के लिए निचे दिऐ हुआ व्हिडीओ अवश्य देखे.


Save money on medicine


आपको पैसे बचाने के लिए Tata 1 mg app डाऊनलोड करना होंगा निचे अॕप डाऊनलोड बटण दिया है इसपर जाकर अॕप डाऊनलोड करनेपर आपको 50 रु 1 mg cash मिलनेवाला है....



दोस्तो यह आप ज्यादा से जादा शेअर कर कही परिवारो को महगाई के दौर मे राहत दिला सकते हो.....





digital portal marketing New Book launch in Global market Kavyrang #best book #poetry book

 🌈💫🪶🪶🪶💫🌈


Book launch 


*माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून तो लवकरच जगभरातील 150 देशात  30000 stores वर उपलब्ध होणार असून भारतात Amazon व Flipkart वर लवकरच 2-3 दिवसात उपलब्ध होणार आहे. सदरील काव्यसंग्रह Isbn प्रमाणित असल्याने तो उच्चतम दर्जा दर्शवितो.*

         *आज माझे खूप मोठे  स्वप्नं पुर्ण झाले . मला यासाठी सदैव प्रोत्साहन देणारे माझे कुटुंबीय तथा सर्व मित्र परिवार यांच्या शुभेच्छा मुळे हे यश मला प्राप्त होऊ शकले आहे.*

Purchase Now     

Book launch 

Amazon वर पुस्तक उपलब्ध झालेले आहे.😊🪶


 *प्रकाशसिंग राजपूत*

         औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - 2021 #awardnomination #awards

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - 2021
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम 


मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे.


महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. 21,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उपरोक्त दोन्ही क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे. 

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय 31 डिसेंबर 2021 अखेरीस 35 वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले - 9860740569 या क्रमांकावर अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे व युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

युवा सामाजिक पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/7ayCo2bEobyjjYUM7

युवा क्रीडा पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/n5AaqFdVXNZ4MtJp9