डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

चलो आझाद मैदान .... आदर्श समितीचे आंदोलन

 राज्यव्यापी लक्षवेधी धरणे आंदोलन'


प्रमुख मागण्या : 

दि. १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये. राज्यातील शिक्षकांना मुख्यालय वास्तव्याची अट रद करावी. 



राज्यातील उपशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक रिक्त पदे पदोतीने तात्काळ भरावे. 

राज्यातील डी. एड., बी. एड्.. उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी संधी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.

 राज्यातील सर्व इयतेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात याव्यात. 

वस्तीशाळा शिक्षकांची मुळे नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा. 

सर्व प्रकारच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. 

सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी.

 शिक्षकांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( १०:२०:३० ) लागू करावी. 

विहित मुदतीत MSCIT उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांकडून होत असलेल्या वसुली थांबवावी.

वसुलीस तात्पुरती स्थगिती न देता MSCIT चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावी व विनाविलंब पद निर्मिती करून सर्व पात्र शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी. 

सर्व प्रकारचे अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना शिकवू द्या, मराठी शाळा टिकवू द्या. 

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा. नगर पालिका शाळांमध्ये कला / क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्वा तात्काळ करण्यात याव्यात. 

विधान परिषदेतील शिक्षक आमदार मतदार या संघात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा.

 जिल्हा परिषद प्रशालेतील माध्यमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात याव्यात. 

केंद्रीय शाळांची नव्याने पुनर्रचना करून प्रत्येक केंद्रीय शाळेत संगणक ऑपरेटर. लिपीक व शिपाई पदे भरण्यात यावीत.

 सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ मिळावा.



 राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी. 

उपशिक्षण अधिकारी पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या मुलाखती घेऊन नियुक्त्या देण्यात याव्यात.

 राज्यातील आंतर जिल्हा बदली प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करावी व जिल्हा अंतर्गत बदली करिता जिल्हा स्तरावर सॉफ्टवेअर कार्यान्वीत करून प्रक्रिया राबवावी, वर्ष वर्षभर सुरू असलेला माहितीचा गोंधळ थांबवावा. राज्यातील शिक्षण विभागाला या कामी वर्षभर गुंतवून ठेवून नये. पूर्वी प्रमाणे जिल्हा स्तरावर प्रक्रिया राबवावी.

अशा प्रमुख मागण्या मांडत आदर्श शिक्षक समिती धरणे आंदोलन घोषीत केलेले आहे.

औरंगाबाद खंडपीठाने सचिवांना बजावली नोटीस

 गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शासन निर्णयास आव्हान देणारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र व्ही.घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए देशमुख यांनी राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.



 याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी अॅड. सईद एस शेख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

 तर मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल साडेआठ हजार शिक्षकांचे घरभाडे भत्ता थांबवण्यात आला आहे.

 म्हणून याप्रकरणी शिक्षक संघटनेने न्यायालयात धाव घेतली असून, शिक्षकांवर तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असल्याचं याचिकेत म्हटले त्यामुळे आता याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

बदली सुधारित आदेश पहा....

त्यामुळे आता याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

सणावर आधारित निबंध लेखन

 *निबंध लेखन नमूना*




*माझा आवडता सण ....दिवाळी*



दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी येताच लोक आपल्या घराची साफसफाई करायला लागतात. नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खातात, दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी व गणपतीची पूजा केली जाते.


दिवाळी या सणाची हिंदू धर्माचे लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडता सण आहे. दिवाळी हा भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला पूर्ण देशात प्रत्येक वर्षी साजरे केले जाते. रावणाला पराजित केल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान राम आपले राज्य अयोध्येला परत आले होते. त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी दिवाळी साजरी करून त्यांचे स्वागत केले होते. 




आज सुद्धा लोक या दिवसाला त्याच उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा दिवस एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. शीख धर्माच्या लोकांद्वारे हा सण त्यांचे सहावे गुरू श्री हरगोविंदजी यांची जहांगीर बादशहाच्या कैद मधून सुटका झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो.



या दिवशी बाजाराला नववधू सारखे सजवले जाते. अनेक प्रकारचे लाईट, कंदील, फटाके, घर सजावटीचे साहित्य, मिठाई, मेणबत्या, गिफ्ट इत्यादी गोष्टींना विशेष प्रमाणात विकले जाते. बाजारात पण या सणादरम्यान विशेष गर्दी असते. लोक आपल्या घराला स्वच्छ करतात. आणि उत्सव येण्याच्या काही दिवस आधी रंगबिरंगी उजेडाने सजवतात. 

हिंदु कॅलेंडर नुसार सूर्यास्त नंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणेश भगवान ची पूजा करतात. ते आशीर्वाद, आरोग्य, धन आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. गोड मिठाई बनवल्या जातात. लोक या दिवशी चांगले संकल्प करतात व वाईट सवयींना त्यागतात.

दिवाळी चा पहिला दिवस धनत्रयोदशी चा असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी ची पूजा केली जाते. लोक सोन्याची खरेदी देखील करतात. देवी लक्ष्मी ची पूजा व आराधना केली जाते. दिवाळी चा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो. या दिवसाला भगवान कृष्ण ची पूजा केली जाते. भगवान कृष्ण ने याच दिवशी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. 

तिसरा दिवस दिवाळी चा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला संध्याकाळी नातेवाईक, मित्र, शेजारी व जळणाऱ्या फटाक्या सोबत मिठाई आणि भेट वस्तू देत देवी लक्ष्मी ची पूजा करत साजरे केले जाते. चौथ्या दिवशी भगवान कृष्ण ची पूजा करून गोवर्धन पूजेचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर पूजा करून शेनापासून गोवर्धन पर्वत बनवतात. पाचवा दिवस भाऊबीजचा असतो. या दिवसाला भाऊ बहीण साजरा करतात. बहिण आपल्या भावाला आरती ओवाळते व भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तु देतो. 


आशा पद्धतीने अतिशय आनंदात, संपूर्ण कुटुंबासोंबत दिवाळी चा हा सण साजरा केला जातो. दिवाळी च्या काळात शाळा कॉलेज ला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या असतात. ज्यामुळे दिवाळी सणाचा आंनद आणखीनच वाढून जातो. आणि म्हणूनच इत्यादि अनेक कारणांमुळे माझा आवडत सण दिवाळी आहे.