डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
5g लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
5g लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अबब 30 सेकंदात 1 जी.बी. डाऊनलोड तुफान वेग असणार....#5 G,

 आत्तापेक्षा दहा पटीने इंटरनेट स्पीड -

भारतात 5G तंत्रज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर दहा पटीने इंटरनेटचा स्पीड जास्तीचा होणार आहे .

एअरटेलची टेस्टिंग -

नुकत्याच झालेल्या 5G च्या चाचणीत मोठं यश मिळालं. यामध्ये अवघ्या तीस सेकंदात एक जीबीपर्यंतचा डेटा डाऊनलोड करता आला. 



यावरुनच तुम्ही 5G तंत्रज्ञान कसं असू शकतं, याचा अंदाज लावू शकतात. नव्वदच्या दशकात भारतामध्ये तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले. सुरुवातीला 2 जी, त्यानंतर 3 जी आणि 4 जी तंत्रज्ञान आलं, ज्यानं संपूर्ण जग मोबाईलच्या माध्यमातून हातात आणून दिलं. आता यामध्ये आणखी अमुलाग्र बदल होत असून 4 G ला मागे टाकून नव्या वर्षात 5G तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात करणार आहोत.

 त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. सध्या असलेल्या 4G इंटरनेटचा स्पीड इतका चांगलाय. विचार करता 5G तंत्रज्ञानात इंटरनेटचा वेग खूप असणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 5G चा स्पीड हा 4G च्या तुलनेत दहा पटीने जास्त असणार आहे.

 आतापर्यंत फक्त मोठ्या शहरांपर्यंत मर्यादीत असणाऱ्या गोष्टी गाव-खेड्यातही उपलब्ध होतील. ज्यामध्ये ई-मेडिसीन, शिक्षण या क्षेत्रांचा समावेश असेल. त्याशिवाय 5G तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. 5G तंत्रज्ञानामुळे डिजिटल क्रांतीला नवी दिशा नक्कीच  मिळणार आहे. त्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स, उद्योग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानातही मोठे बदल होणार आहेत.

 5G तंत्रज्ञानामुळे नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही खूप मोठा फायदा होणार आहे. 5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्र, दुकानदार, शाळा, महाविद्यलय, कॉलेज, इतकेच नाही तर शेतकरीही याचा फायदा घेतील. कोरोना महामारीच्या काळात आपण सगळे जवळपास इंटरनेटवरच अवलंबून होतो, हे पाहाता आपण इंटरनेटवर खूप निर्भर असल्याचं दिसतेय. हे सर्व पाहाता 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 5G तंत्रज्ञानामुळे हेल्थकेअर, व्हर्चुअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी नवीन रस्ते खुले होतील. तसेच विनाचालक गाडी सुरु होण्याच्या दिशेनेही पावले उचलली जातील.

कसे व नेमके काय आहे 5G नेटवर्क?


पुढील काही दिवसांत इंटरनेटच्या पाचव्या पिढीची सुरुवात होणार आहे. हे 4G नेटवर्कच्या तुलनेत अधिक वेगवान आहे. 4जी नेटवर्कवर इंटरनेटवर सरासरी स्पीड 45 एमबीपीएस असते. पण 5जी नेटवर्कवर इंटरनेटचा स्पीड 1000 एमबीपीएसपर्यंत पोहचणार आहे. ज्यामुळे इंटरनेटचं विश्व पुर्णपणे बदलेल. म्हणजेच 4जीच्या तुलनेत 10 ते 20 पटीने वेगानं डेटा डाऊनलोड स्पीड मिळणार आहे. एक चित्रपट डाउलोड करण्यासाठी 4 जीमध्ये सात ते आठ मिनिटं लागतात, पण 5G मध्ये फक्त 20 सेकंदात तुम्ही चित्रपट डाऊनलोड करु शकता. सराकारद्वारा स्थापन केलेल्या एका कमिटीच्या रिपोर्ट्सनुसार, 5G मुळे 2035 पर्यंत भारतात एक लाख कोटी डॉलरचा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. एरिक्शनच्या रिपोर्ट्सनुसार, 5G मुळे भारत सरकारकडे 2026 पर्यंत 27 अरब डॉलरपेक्षा जास्त महसूल जमा होईल. एरिक्शनच्या अन्य एका रिपोर्ट्सनुसार, 2026 पर्यंत जगभरात 3.5 अरब 5जी कनेक्शन होतील, तर भारतात याची संख्या 35 कोटींपर्यंत असेल. 5G सेवा सुरू करण्यासाठी एअरटेल पूर्णपणे तयार आहे. इंटरनेट वापरकर्त्यांसाठी लवकरच 5G सेवा उपलब्ध होईल, त्यानंतर लोकांची जीवनशैली बदलेल.