डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
breaking news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
breaking news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

५ वी पासूनच शेती विषय अभ्यासक्रमात

 महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवला जाणार आहे.



पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाणार आहे. भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील हा यामागचा हेतू असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. या निर्णयामुळं शेती सुधारेल पर्यायनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील असेही सत्तार यांनी स्पष्ट केले .

शिक्षकांना मिळणार  प्रशिक्षण ... 

सरकारने विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवण्याचे नियोजन केलं आहे. शेतीचे धडे गिरवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावामध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जाणार आहेत. शिक्षकांना देखील काही दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. बहुतेक मुलं मुली ही शेतकऱ्यांची असतात. ही मुले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यांनाचं नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळं त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा धंदा समजावा यासाठी पाचवीपासून शेतीचा विषय शिकवला जाणार असल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे.

यासबंधीची सर्व माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवू. त्यांचे समाधान झाले तर ते सांगतील. शिक्षणमंत्र्यांशी देखील याबाबत बोलणे केले जाणार आहे. शिक्षणमंत्री यामध्ये शेती विषयक एक तास कसा घेता येईल याबाबतचा निर्णय सांगतील असे सत्तार म्हणाले. याचा ढाचा आम्ही ठरवणार आहोत. पाचवी ते बारावीपर्यंत शेती विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. बेसिक विषय सोडून शेती विषय शिकवला जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सत्तार म्हणाले. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी विभागाची दोन लोक तसेच शिक्षण विभागाची दोन लोक अशी चार लोकांची समिती तयार केली जाईल. ही समिती चारही बाजूनं अभ्यास करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


आजादी का अमृत महोत्सव Azadi ka....




आजादी का अमृत महोत्सव 

  आझादी का अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध उपक्रम व स्पर्धा यांनी साजरा करणेबाबत.
आजादी का अमृत महोत्सव एका दृष्टिक्षेपात...


✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *१२ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३* या दरम्यान साजरा करण्यात येत आहे .

✍️केंद्र शासनाचा सर्वात महत्त्वकांक्षी कार्यक्रम.

✍️राज्याच्या  पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव *१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत* जिल्हास्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे निर्देश.

✍️हा अमृत महोत्सव भारताचा स्वातंत्र्य संग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती, अंमलबजावणी या बाबींचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करणे अपेक्षित.

✍️जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, छात्राध्यापक, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य, अध्यापकाचार्य, आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हास्तर यावर आयोजित या उपक्रमामध्ये सहभागी होणे अपेक्षित.

 ✍️संपूर्णतः Non budgetary असा हा कार्यक्रम.

✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.


 *जिल्हा स्तरावर करावयाची कार्यवाही-* 


✍️जिल्हास्तरावर फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कला क्रीडा विभागाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासाठी प्रत्येक डायटनिहाय एक समन्वयक अधिकारी, कला व क्रीडा विभाग यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सदर समन्वयक अधिकारी यांचे नाव https://tinyurl.com/activityreport1   या लिंक वर नमूद करण्यात यावे.


http://bit.ly/3HDVOA3

✍️ सदर समन्वयक अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत वेळापत्रकातील स्पर्धांची  दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करावी. यासंदर्भात आपल्या अधिनस्थ तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करावे .यासंदर्भात आवश्यक पत्रव्यवहार करावा. तसेच सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत कार्यालयास arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल वर सादर करावी.


आजादी का अमृत महोत्सव  

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक  तालुका स्तरावर विषय साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात यावी. जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी दरमहा तालुक्यातून राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल संबधित विषय साधन व्यक्ती यांच्याकडून जिल्हास्तर यावर  संकलित करावा. आणि हा संकलित अहवाल

  https://tinyurl.com/activityreport1

या लिंक वर दर महिना अखेरीस भरण्यात यावा.दरमहा अहवाल नियमितपणे भरण्याची जबाबदारी डायट जिल्हा समन्वयक यांची असेल.

✍️ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध नाही,हे विचारात घेऊन Non budgetary activities चा समावेश करण्यात आला आहे,याची नोंद घ्यावी.त्यामुळे खर्चिक उपक्रमांचा समावेश करण्यात येवू नये .

✍️ज्या स्पर्धा या अंतर्गत राबवल्या जातील ,त्या स्पर्धेतील विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात यावे .

✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.तसेच वेळापत्रकातील स्पर्धा  नियोजित महिन्याच्या कोणत्याही तारखेला घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा समन्वयक अधिकारी यांना असेल.

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रमांची  समाजमाध्यम याद्वारे जसे facebook, twitter,Instragram,whats app याद्वारे  व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी .या पोस्टची लिंक  अहवाल लेखनात नमूद करावी .

✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत उपक्रमआयोजन,नियोजन,अंमलबजावणी व सनियंत्रण  यांची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची असेल तर प्रशासकीय समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक ) यांची महत्वाची जबाबदारी असेल.