डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

If combined Child orphan and old age home

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.




     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.



          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....



        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....

जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा... #4k #Ultra hd

🍂🍁🥀🌺🌸☘️🌿🥀🍁🍂

*🔮 सोशल मिडियावर पहिल्यांदा  अशी पोस्ट येत आहे .....*🔮


*_जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा..._*




*Ultra Hd असा रेझ्युलेशन फाॕरमॕट ज्याला आपण 4k फाॕरमॕट म्हणून ही ओळखत असतो. 

आज Led tv घेतांना किंवा महागडे फोन घेतांना हा सपोर्ट आहे की नाही हे पाहिल्या जाते.*



    *आपल्या जिल्हा परिषद शाळा या डिजिटल युगात मागे नाहीत ..... जास्तीत जास्त शेअर करा....*

      *प्रकाशसिंग राजपूत*
              सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,

कें. करमाड, ता/ जि,औरंगाबाद 

व्हिडीओ पहातांना Quality - advance setting 1080 + पुढे पहा......

आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?... #school opening #digital portal.

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥



आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....



आपल्याला काय वाटते ते वर नोंदवा.......   

हा फक्त एक  समावेशक विचार आहे. हा कुठलाही निर्णय नाही किंवा त्या निर्णयास कारण नाही .
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....

            डिजिटल समूह हा अनेक  वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालवत आला आहे. हा फक्त जनमनाचा कौल आहे. हा फक्त समूहाच्या शैक्षणिक कार्यास पुरक असणार आहे.

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

Digital seva ज्याने कोणी लिहिलं त्याला २१ तोफांची सलामीच....

लेख खूपच आवडण्यासारखा......


*ज्यांचा जन्म १९५५,१९५६, १९५७,१९५८, १९५९, १९६०, १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९ १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५  ,१९८६ , १९८७ , १९८८ , १९८९ , १९९० साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख*



ही पीढ़ी आता 3० ओलाडून ६२ कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....


१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.


ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....


*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. 


*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. 


कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला  नव्हता. 


*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. 


*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि 

कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते. 


*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी. 


वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी* ही पिढी. 


दोन दिवस जरी मित्र 

शाळेत नाही आला तर 

शाळा सुटल्या सुटल्या

दप्तरासकट 

त्याच्या घरापर्यंत जाणारी

ती पीढी..


कुणाचेही बाबा शाळेत 

आले की..मित्र कुठेही

खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने *"तुझे बाबा आलेय चल लवकर* "

ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी


पण गल्लीत *कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी. 





*कपील, सुनिल गावसकर  , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते  राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख  माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*


भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.


*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी. 


कितीही शिकलं तरी *'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'* यावर विश्वास असणारी

ज्याने कोणी लिहिलं त्याला २१ तोफांची सलामीच....

*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी. 


ज्यांच्या  शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी.  हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.      कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...


ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी. 


पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी, 


दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी


लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.


पुन्हा डोळे झाकुया ?


दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ 


*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण  आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार  असं  मानणारी ही पिढी ?*


धन्य ते जीवन जे खर आपणच  जगलोय !!!


 *सर्व मित्रांसाठी*....✍

रसायन जगण्याचे..... सुंदर कविता नक्कीच वाचा.... #Song #poem

 रसायन जगण्याचे..... सुंदर कविता



*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*





*रसायन जगण्याचे...*



आयुष्य  हे निर्भर नात्यांवर,
बनत रसायन जगण्याचे,
फौल ठरते कधी सार्थक,
निभाव होऊन साफल्याचे,


तरीही कोणी कसं जगावं,
अजबं ठरत हे रसायन,
पीडा या मनाच्या कशाच,
सरत्या क्षणावर अच्छादन,


तोडगा नसे गुंतागुंतीचा,
प्रभाव तुमचा विसरून,
जगी हिनवावं का? कुणाला,
तुमच्या प्रगतीस अडवून..,


शल्य कधी वलय नवे जीवनी,
विसंगत नातं हे जुळवून,
चित्कार ना येत काळजाचा,
घडतोय जीवन असं विसंबून,


भावनेला ही का सारावं,
विनाव नवा बंध  रंगवून,
नात्याबाहेर ही मन रमावं,
जगावं जरा दुःख  हरवून.....



   *प्रकाशसिंग राजपूत*

          औरंगाबाद 
       9960878457 

*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*