डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे हे अन्नपदार्थ... #Foods,

 रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न

अन्न शरीराचे सामर्थ्य देणारे व सजीव शरीरास कार्यान्वित ठेवणारे मुख्य जीवनावश्यक घटक आहे. याचा योग्य संयोग आणखीन उपयोगी कसा पडू शकतो हे आज जाणून घेणे आपल्यासाठी रंजक व माहिती वर्धक ठरणार आहे. मी आपला डिजिटल मित्र प्रकाशसिंग राजपूत या लेखात ही माहिती घेऊन आलो आहे. 

शेवगा (Drumstick) - 

शेवगा हे सुपरफूडपैकी एक आहे जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि कोणत्याही व्हायरसच्या वाढी विरोधात एक ढाल म्हणून काम करते.


लिंबू सह नारळ पाणी - नारळाचे सेवन

पाणी नेहमी ताजे असावे. ताज्या नारळाच्या पाण्यात अर्धा लिंबू घातल्यास व्हिटॅमिन सी 10 पट वाढते. दररोज एकदा, पुढील काही दिवस, लिंबू सह नारळ पाणी घेणे आवश्यक आहे. (टीप: किडनीच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये)




लसूण, कांदा आणि हळद

लसूण, कांदा आणि हळद हे तिन्ही नैसर्गिक सुपरफूड आहेत जे आपल्यामध्ये वाढणारे वाईट बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात. अनेक रोगांना होण्यापासून नियंत्रित ठेवतात.


भोपळ्याच्या बिया - 

दररोज फक्त 3-4 चमचे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला निरोगी , मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात मिळू शकतात जे रोगप्रतिकारक कार्यांसाठी आवश्यक आहेत.



लाल शिमला मिरची - 

लाल शिमला मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी संत्र्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन सीपेक्षा 3 पट जास्त असते. आठवड्यातून  जेवणामध्ये लाल शिमला मिरची असण्याची खात्री करा.

१५ ते १ वयोगटातील लसीकरणबाबत जाणून घ्या...

तुमचा ब्राऊझर वर सेव्ह पासवर्ड ही धोक्याचा ठरु शकतो.... #Password, browser

 आपल्या फोनमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. फोनमध्ये आपण आपले अनेक पासवर्ड देखील सेव्ह करतो.


 हे पासवर्ड गुगल क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज सारख्या ब्राउझरवर सेव्ह होतात आणि आपल्यापैकी प्रत्येकजण ते करतंच. परंतु तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.




काही IT संशोधकांनी इंटरनेट वापरकर्त्यांना, विशेषत: घरून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एक चेतावणी दिली आहे, की ब्राउझरवर सेव्ह केलेला त्यांचा लॉगिन-पासवर्ड हॅक होऊ शकतो. अलीकडेच, सुरक्षेच्या उल्लंघनामुळे एका कंपनीचा डेटा लीक झाला आहे. 

या कंपनीत काम करणारे कर्मचारी घरून काम करायचे. काम करण्यासाठी ते एक उपकरण वापरत होते, जो इतर लोक देखील वापरत होते. या उपकरणात रेडलाइन स्टीलर नावाचा मालवेअर लपलेला असल्याची माहिती त्यांना नव्हती.

मालवेअर कंपनीच्या व्हीपीएनमध्ये प्रवेश करण्यासाठी संवेदनशील खाते तपशील आणि पासवर्ड चोरतो. त्यानंतर हॅकर्स या डेटाचा वापर कंपन्यांच्या खासगी डेटाची हेरगिरी करण्यासाठी करतात.

अँटीव्हायरस देखील काम करत नाही

यामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असले तरीही हा मालवेअर कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश करु शकतो. मालवेअरबद्दल बोलताना तज्ज्ञांनी सांगितले की, खाते ब्राउझरमध्ये क्रेडेन्शियल्स सेव्ह करणे खूप सोयीचे असले तरी, जर हा मालवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये घुसला तर खाते क्रेडेंशियल्स धोक्यात येईल.

यापासून बचाव करता येईल ....

  • अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी सामान्य वापरकर्त्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांनी नेहमी अधिकृत ऍप्सचाच वापर करावा.
  • अॕण्ड्राईड वर्जन अपडेट करत राहणे. जेणे करून फोन सुरक्षितता भक्कम राहते.
  •  त्यांनी आपल्या अधिकृत कामासाठी असे कोणतेही उपकरण वापरू नये, जे इतर लोकही वापरत असतील जसे पेनड्राईव्ह.
  •  अनेक वेळा असे अॕप्स प्ले स्टोअरवरही आढळतात, ज्यामध्ये मालवेअर दडलेले असते.
  •  अॕप डाउनलोड करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी अतिरिक्त काळजी घ्यावी आणि त्याची पार्श्वभूमी तपासावी.

नविन वर्षात होणार मेगाभरती....jobs, state government

 राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण 34 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. 

काही पदांची भरती 'एमपीएससी'च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. 




त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे. वित्त विभागाने  विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे Covid राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला.

 त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारच्या   काळात जवळपास 70 हजार पदांची मेगाभरती  होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्‍तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केलेला आहे.

'एमपीएससी'कडे प्राप्त मागणीपत्र...

  • विभाग : भरती होणारी पदे

  • सार्वजनिक आरोग्य : 937

  • कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924

  • उद्योग, ऊर्जा, कामगार : 279

  • अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62

  • पाणी पुरवठा व स्वच्छता : 16

  • सामान्य प्रशासन : 957

  • मराठी भाषा : 21

  • आदिवासी विभाग : 7

  • बृन्हमुंबई महापालिका : 21

  • पर्यावरण : 3

  • गृह : 1159

  • वित्त : 356

  • वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572

  • उच्च व तंत्रशिक्षण : 35

  • शालेय शिक्षण, क्रीडा : 105

  • सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32

  • कौशल्य विकास, उद्योजकता : 171

  • महसूल व वन : 104

  • ग्रामविकास व पंचायतराज : 32

  • नगरविकास : 90

  • मृदा व जलसंधारण : 11

  • जलसंपदा : 323

  • विधी व न्याय : 205

  • नियोजन : 55


नववर्षात होणाऱ्या मेगाभरतीचे नियोजन...

  • राज्य शासनाच्या 25 विभागातील 15 हजार 511 रिक्‍त पदांची होणार भरती

  • सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील रिक्‍त पदे

  • सामान्य प्रशासन विभागाकडून 'एमपीएससी'कडे सात हजार 460 पदांचे मागणीपत्र

  • गट अ, ब आणि क प्रवर्गातील पदांची होणार भरती; तीन महिन्यात पदभरती होईल पूर्ण

  • राज्य सरकारच्या घोषणेनुसार अजून 8 हजार 61 पदांचे जाणार आयोगाला मागणीपत्र

ओमिक्राॕनच्या पार्श्वभूमीवर नविन नियमावली लागू.... #Covid restrictions

 कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने खुल्या किंवा बंद जागांवर मेळाव्यातील उपस्थितीची मर्यादा 50 केली आहे.

राज्य सरकारने गुरुवारी रात्री नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि या कार्यक्रमातील उपस्थितांची संख्या 50 लोकांपर्यंत मर्यादित केली.   




नवीन आदेशात असेही नमूद केले आहे की अंतिम संस्कारासाठी फक्त 20 लोक उपस्थित राहू शकतात.  अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यापासून सावधगिरी बाळगली आहे.  मास्क आणि सॅनिटायझरच्या वापरावर विशेष लक्ष दिले पाहिजे, सामाजिक अंतर काटेकोरपणे पाळले जावे, असे आदेशात म्हटले आहे.


 दरम्यान, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सीआरपीसीच्या कलम 144 अन्वये आदेश जारी केला, ज्यामध्ये लोकांना 15 जानेवारीपर्यंत दररोज संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्र किनारे,उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यास मनाई करण्यात आली आहे.  सध्याच्या कोरोनाव्हायरस परिस्थितीबद्दल.डीसीपी (ऑपरेशन्स) एस चैतन्य यांनी हा आदेश जारी केला, जो शुक्रवारी दुपारी 1 वाजल्यापासून अंमलात आला आणि पूर्वी मागे न घेतल्याशिवाय 15 जानेवारीपर्यंत लागू राहील.  आदेशात म्हटले आहे की, “कोविड-19 साथीच्या आजाराने शहराला सतत धोका निर्माण झाला आहे आणि नवीन ओमिक्रॉन प्रकाराचा उदय झाला आहे.”  मानवी जीवन, आरोग्य आणि सुरक्षेला धोका टाळण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला होता, असेही त्यात म्हटले आहे.

नविन वर्षात मेगाभरती सविस्तर पहा....

 राज्यभर लागू करण्यात आलेले पुढील निर्बंध पुढीलप्रमाणे आहेत.

(covid new restrictions )

 • हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल, बार, पब, ऑर्केस्ट्रा, रिसॉर्ट्स, क्लब आणि छतासह कोणत्याही बंद किंवा मोकळ्या जागेत सर्व नवीन वर्ष साजरे, कार्यक्रम, कार्ये आणि मेळावे.


 • नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान एकापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी नाही.


 • प्रेक्षणीय स्थळे आणि जेथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमते त्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे.  गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी नागरिकांना गर्दी करण्याची परवानगी नाही.


 • मुंबईत, BMC ने रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे.


 • नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही.


 • खुल्या किंवा बंद जागांवर विवाह किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही.


 • अंत्यसंस्कार, अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांना परवानगी आहे.


 • फटाक्यांना कडक बंदी आहे आणि ध्वनी प्रदूषण नियम पाळले पाहिजेत.


 येथे काय अनुमती आहे:


 • नवीन वर्षाच्या दिवशी, नागरिकांना योग्य सामाजिक अंतरासह धार्मिक स्थळांना भेट देण्याची परवानगी आहे.


 • BMC ने रेस्टॉरंट्स, जिम आणि सिनेमा थिएटरना मुंबईत 50 टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी दिली आहे.


 • नागरिकांनी सामाजिक अंतर आणि नियमित स्वच्छता राखल्यास समुद्रकिनारे, बागा आणि रस्त्यांसारख्या ठिकाणी जमू शकतात.



15 - 18 वयोगटातील लसीकरण जाणून घ्या....

बचतीचे ६ मार्ग जे कर वाचवतील.... #Tax saving, tax, ITR,

चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं आहे. टॅक्स वाचवून तुम्ही तुमच्या बचतीमध्ये वाढ करू शकता.


टॅक्स वाचवायचा याचा अर्थ टॅक्स चोरी करायची असा होत नाही. सध्या अशा काही सरकारी योजना उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही टॅक्स वाचवू  शकता.

 या योजना कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया. 






१)  सुकन्या समृद्धी योजना (SSY)- देशातील लहान मुलींसाठी मोदी सरकारनं सुरू केलेली ही एक छोटी बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावानं खातं उघडून टॅक्स वाचवू शकता. या योजनेत वर्षाकाठी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून आयकर सूट मिळू शकते. या योजनेवर सरकार सध्या 7.6 टक्के वार्षिक व्याज देत आहे. 

२) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)- एनपीएस National Pension System ही एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. आयकर कायद्यातील कलम 80सी नुसार, 1.5 लाख रुपयांशिवाय आणि 50 हजार रुपये व्याजावरील करामध्ये सवलत मिळवता येते. त्यासाठी फक्त तुम्हाला एनपीएसमध्ये गुंतवणूक करावी लागेल. असं केल्यास तुम्ही एकूण 2 लाख रुपयांच्या मिळकतीवर कर सवलत मिळवू शकता.18 ते 65 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खातं उघडून महिन्यालाb एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतो.   

३) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)- इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी पीपीएफ योजना ही सर्वोत्तम सरकारी योजना मानली जाते.

तुम्ही पीपीएफमध्ये वर्षाकाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक  करू शकता. सरकार पीपीएफमध्ये गुंतवणुकीची हमी देतं. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे एकदम सुरक्षित आहेत. सध्या सरकार पीपीएफवर 7.10 टक्के वार्षिक व्याज देत आहे. या योजनेमध्ये आयकर कायद्यातील कलम 80 सी नुसार तुमच्या गुंतवणुकीवरील करात सूट मिळते.

४) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)- एससीएसएस (Senior Citizen Saving Scheme) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेली चांगली बचत योजना आहे.

कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात यासाठी खातं उघडता येतं. या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेवर आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. या योजनेत तुम्ही वर्षाकाठी 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. सध्या यासाठी 7.4 टक्के व्याज मिळत आहे. 

५)जीवन विमा (Life Insurance)- युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIPs) मधील गुंतवणुकीवरसुद्धा कर बचत (Tax Saving) सवलत उपलब्ध आहे.

या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त 2.5 लाख रकमेवर सूट मिळवू शकता. त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्रीमियमवर (Premium) कोणतीही सूट मिळणार नाही. सध्याच्या आयकर कायद्यातील कलम 10 (10D) नुसार जीवन विमा पॉलिसीची म्यॅच्युरिटी करमुक्त आहे. युएलआयपीमध्ये पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी विमा आणि गुंतवणूक करता येते.

 टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता. टॅक्स सेव्हिंग एफडीमधील गुंतवणूक पाच वर्षांसाठी लॉक केली जाते. टॅक्स सेव्हिंग एफडीचे व्याज दर वेळोवेळी बदलतात.

या एफडीमधील गुंतवणूक एकदम सुरक्षित आणि रिटर्नची हमी देणारी आहे. या योजनेमध्ये वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सवलत मिळवता येते.

 ६) इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS)- ईएलएसएस Equity Linked Savings Schemeहा एक इक्विटी फंड आहे. हा असा एकमेव म्युचुअल फंड आहे ज्यामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते.

ईलएसएसमध्‍ये वार्षिक एक लाख रुपयांपर्यंतच्या रिर्टन किंवा नफ्यावर कर लागत नाही. या योजनेमध्ये कमीत कमी 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीत गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. टॅक्स वाचवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. वरील सरकारी बचत योजनांचा वापर करून तुम्ही टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. टॅक्समध्ये सूट मिळाल्यानं आर्थिक बचत होण्यास मदत होते.