डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वाॕटर पार्क येथे अपघात शिक्षिकेचा मृत्यू

 पिकनिकसाठी आले होते विद्यार्थी आणि शिक्षक...



 हरियाणाच्या अंबालामध्ये आज वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात घडला. येथे एका खासगी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी पिकनिकसाठी आले होते. यादरम्यान वॉटर पार्कमध्ये तयार केलेल्या झोपाळ्यावर शिक्षक आणि विद्यार्थी बसले तर केबिनचा ग्रिल तुटला. 23 वर्षीय शिक्षिकेसह 3 विद्यार्थी खाली पडले.


खाली पडल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली, शिवाय विद्यार्थ्यांनाही जबर मार लागला आहे. हे ही जी आई होऊन जेवू घालत होती, तिचीच केली हत्या; व्यसनापायी तरुणाने सर्व संपवलं,

वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी केली अटक... 


अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. त्यावेळी 23 वर्षीय रिया गर्ग हिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अधोई गावातील जय पब्लिक शाळेत काम करीत होती. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा अपघात H2O पार्कमध्ये झाला. शिवाय वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराज वरील भाषण...

 संस्कृती अवघ्या साडे तीन वर्षाची. तिचे पुर्ण नाव संस्कृती प्रशांत दळवी असून ती रायगड येथे राहते.

 इतक्या लहान वयातील तिची वकृत्वशैली नक्कीच तिला खूप यशस्वी करणार....




शिवराय..... राजं हे दैवत ....नविन गीत...

 स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्रातील तमाम जनमनात ज्यांचा आदर्श आहे, क्षत्रिय कुलावंतस, जनकल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले माझे गीत .... शिवजयंती निमित्त राजेंना गीत वंदना 🚩🚩🚩





*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*


*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां सारेच गडकिल्ले....*

*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*

*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*


*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*

*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*

*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*

*ताठ उभा मराठी मुलख  आजवर..*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*उभारला आदर्श...राज्य  कल्याणकारी,*

*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*

*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*

*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*

*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*

*आई भवानीचा,मिळून  आशीर्वाद ,*

*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*

 *संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*

*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा  झुकविलात,*

*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


   *✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️

           *औरंगाबाद*

         9960878457

एप्रिलमध्ये होणार 'शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२२'

 एप्रिलमध्ये होणार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२

शिक्षक भरतीसाठी (teachers appointment )  उमेदवारांना 'शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' २०१७ मध्ये बंधनकारक करण्यात आली. 

                         

त्याचवर्षी ही परीक्षा (examination)  झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. 



शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२' एप्रिलमध्ये घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) सांगण्यात आले आहे.

 त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडत चालली आहे. 

प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी अनेकजण मागणी  करत आहेत.

बदलीबाबत अवघड क्षेत्रा बाबतीत महत्त्वाचा बदल

 अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकाना बदली

 करुन घ्यावयाची आहे त्यांच्या जागा सुद्धा रिक्त जागा म्हणुन दाखवण्यात येणार आहेत.


 हा नविन बदल झालेला आहे.ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकास बदली हवी आहे त्यांनी आपले नाव आगोदरच द्यावयाचे आहे. आपन बदलीसाठी नाव दिल्यास आपले पद रिक्त दाखवण्यात येणार आहे.

(उणीव संवर्ग ०१/०२ मधील एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील जागा मागितली आणि त्या शिक्षकाची बदली पसंतीक्रमात दिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत झाली तर त्या अवघड क्षेत्रातील शाळेतील बदली इछुक शिक्षक बदली अर्ज करण्या आगोदर विस्थापित होइल. आणि बदली इछुक शिक्षकाने बदलीमध्ये पसंतीक्रम देवुन सुद्धा पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाहीतर तो परत विस्थापित होइल. आणि त्याची जागा भरल्यामुळे त्याला प्रशासनामार्फत शाळा द्यावीच लागेल. इथ थोडा गोधळ उडणार आहे. ही या बदली धोरणातील उणिव राहणार आहे. अवघड क्षेत्रातील शिक्षकाने दिलेल्या पसंतीक्रमामधील शाळा मिळेलच असे काही नाही आणि तो बदली इछुक आसल्यामुळे त्याची जागा रिक्त दाखवल्यामुळे तो बदलीच्या आगोदरच विस्थापित होइल हा शिक्षक विस्थापित झाल्यानंतर या विस्थापित शिक्षकास पदस्थापना कशी द्यायची याचा उलगडा कोठेही नाही कारण हा शिक्षक बदलीच्या आगोदरच विस्थापित होणार आहे त्यामुळे बदली इछुक यादीमध्ये नाव द्यावे की नाही याच विचारात तो राहु शकतो.)