डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...#अक्षरगट

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...


इयत्ता पहिली 

विषय- मराठी


अक्षरगट निहाय निर्मित शैक्षणिक साहित्य विषयीं थोडसं ...


मित्रांनो, अक्षरगट का असावी याची माहिती देण्यापूर्वी थोडं माहिती करून घेऊया. पुर्वी शिक्षक वर्णमालेतील वर्णाच्या क्रमाने मुलांना शिकवित असत. काहीतर वर्णमालेचं तक्ता भिंतीला टांगून ठेवायची आणि मुलांना अ अननस आ-आगगाडीचा या पद्धतीने शिकवायची. याप्रमाणे संपूर्ण वर्णमालेतील अक्षरे शिकवून झाल्यावर स्वरचिन्ह लावून अक्षरं शिकविली जात असे. तेव्हा बाराखडी. त्यामुळे मुले उशिरा शब्द वाक्य वाचायला शिकायची.




अक्षरगट का असावी याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजनानुसार अक्षरगटातील काही अक्षरे व काही स्वरचिन्ह परिचय करून मुलांना प्रारंभिक स्तरावरच स्वरचिन्हविरहित शब्द, वाक्ये व स्वरचिन्हयुक्त शब्द, वाक्य वाचनाचा सराव व्हावा यासाठी अक्षरगट असावे लागते. एका दृष्टीक्षेपात शब्द वाचन करता येणं हे खूप महत्त्वाचे असते. तसेच वाक्यांचा सुद्धा आहे. मुले वाक्य वाचन करताना एका दृष्टीक्षेपात वाक्य वाचायला हवं, असं जर होत नसेल तर वाक्य वाचन करताना त्या वाक्याचा अर्थ निसटून जाण्याची शक्यता असते त्यामुळे समजपुर्वक वाचनात अडथळा निर्माण होत असते. एक दोन अक्षरगट झाली की, त्यावर तयार होणारे वाचन पाठ वाचता यावे हेसुद्धा अपेक्षित आहे त्यानुसार पाठ्यपुस्तकात वाचनपाठाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता पहिलीत ४ वाचनपाठात एकूण ९ अक्षरगट आहेत. जसजसे पुढे जाऊ तसतसे मुलांचे शब्द ज्ञान वाढत असते. त्या त्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह व पुर्वीच्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह घेऊन शब्द वाक्य तयार करून मुलांना वाचन व लेखन सराव करावा हे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकात वाचन लेखनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मोजके शब्द वाक्यांचा समावेश असतो. पण शिक्षकांना भरपूर शब्द व वाक्यांचा वाचन लेखन सराव द्यावे लागते.

आपण यासाठी गडचिरोलीसह महाराष्ट्रातील पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नवोपक्रमाने दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती करून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे वाचन लेखन विकास व्हावा यासाठी अक्षरगट निहाय शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. सदर साहित्य शिक्षक लॅपटॉप, प्रोजेक्टर, संगणक, टॅब, स्मार्ट मोबाईल व मुद्रित साहित्य वापरता येईल.

शैक्षणिक साहित्य निर्मिती
 
श्री. वाल्मीक वन्नेवार
जि.प.प्रा. शाळा, कसुरवाही पं.स.- जि. गडचिरोली



 इयत्ता १ ली अक्षरगट डाऊनलोड करा....


अ.क्र.अक्षरगट क्रमांक डाऊनलोड 

1

अक्षरगट १   

Download  


2

अक्षरगट २  

Download


3

अक्षरगट ३  

Download


4

अक्षरगट ४  

Download


5

अक्षरगट ५ 

Download


6

अक्षरगट ६ 

Download


7

अक्षरगट ७  

Download










इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे....#school open



आता इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६




२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी असे आदेश काढण्यात आले. 



(i)  शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.


ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. 


iii) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.


(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.


(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे  विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविंडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.


२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.


२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 


२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.


३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील •अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.


४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशा सुचना देण्यात आल्या  आहे.


५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करण्याच्चे सुचविले आहे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावयाचा आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावयाचे आहे. 


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६



HammerHead अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित आहे का.....

 अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित  आहे का..... 


हॕमरहेड  Hammerhead worm हा एक विषारी प्राणी आहे परंतु याचा मानवाला थेट धोका नाही,


पृथ्वीवर करोडो जीव आहेत असे काही जीव आहेत त्यांना आपण कधीच पाहिलेले नसते  किंबहुना अचानक पहिल्यांदा नजरी पडल्यास आपण त्याबद्दल माहित करून घेण्यासाठी फार उत्सुक होऊन जातो. 
तर आज आपली उत्सुकता व माहिती वाढवणारी पोस्ट घेऊन आलो आहोत.




 Earthworm ची मोठ्या प्रमाणात शिकार करत असल्यामुळे  Earthworm हे वनस्पती साठी उपयुक्त आहे.


 आणि त्यांची संख्या hammerhead worm मूळ जर कमी झाली तर पर्यावरण संकटात येऊ शकते .


तसेच हा प्राणी संभाव्य अमर आहे. 


           याबद्दल व्हिडीओत अधिक माहिती पहा...

            

हा मला दोन चार दिवसापूर्वी सिल्लोड परिसरात आढळला होता. मला सुरुवातीला त्याची ओळख नव्हती नंतर त्याची ओळख झाली आणि त्याविषयी थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे सविस्तर माहिती आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता.


       लेखन व व्हिडीओ निर्मिती 

                श्रीकृष्ण बडकसर 

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना...#Obc student #education

 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना


ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ "शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना" सुरू होणार आहे.



   ज्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना होणार


 असून यासाठी  जवळपास ६ कोटीचा निधी तरतुद करण्यात आला आहे. याबाबत माहिती इ.मा.बहूजन कल्याण मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

   या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना राज्य अंतर्गत , देशातील तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यावरील शिक्षण करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.


या योजनेची राज्य व देश अंतर्गत शिक्षण घेण्याची कर्ज मर्यादा ही  महत्त्तम १० लाख तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिक्षण कर्ज मर्यादा २० लाख इतकी असणार आहे.


      या योजनेत बॕकेचा जास्तीत जास्त १२ % व्याज परतावा नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे.

१ ली च्या अभ्यासक्रमात होणार असा महत्वाचा बदल जाणून घ्या...... #द्विभाषिक पुस्तक

राज्यात मराठी भाषेतून शिक्षण सक्तीचे आहे.  मात्र, शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी व्हावे आणि लहानपणापासूनच इंग्रजी तसेच इंग्रजीची संकल्पना मुलांना समजावी, यासाठी राज्यातील सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये येत्या शैक्षणिक 
वर्षापासून  एकात्मिक आणि द्विभाषिक अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इयत्ता १ ली च्या अभ्यासक्रमात महत्त्वाचा बदल होणार आहे. 





      मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी  विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच मराठीचे शब्द आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  
या बैठकीत श्री  विवेक गोसावी,  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाइन उपस्थित होते.
   मा. शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, हा प्रयोग प्रथम ४८८ आदर्श विद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचा पहिल्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.  या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहून तो मराठी शाळांमध्ये राबविला जाणार आहे.  त्याचप्रमाणे राज्य पाठ्यपुस्तक विकास आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाला इतर शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि इंग्रजी भाषेतील शब्द, दैनंदिन शब्द, संकल्पना, मराठी शब्दांव्यतिरिक्त सोपे इंग्रजी शब्द आणि वाक्ये शिकता येतील. स्पष्टपणे समजून घ्या.  पाठ्यपुस्तके आकर्षक, जागतिक दर्जाची असावीत, असे ते म्हणाले

२६/११ शहीदांना काव्यमय मानवंदना....#police #brave

मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना.....





 🚨 🚓सदरक्षणाय...🚓🚨


सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,

या जन्मी होत अशी जनसेवा ,

लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा...


दिवस रात्र  सदैव उभे राहती ,

शांती समाजास तेव्हाच लाभती,

येता संकट कसलेही जेव्हा,

खाकीत शोभूनी वीर हे लढती...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


सक्त घडत यांचा असा पहारा,

वाटत कठोर जरी यांचा दरारा,

मन आतुन असतेच कोमल,

मानवी सेवेत स्वतःस ठेवे जहाल,

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


अतिरेक्यांशी लढला उभ्या छातीने,

दिसे फक्त जनकल्याण खाकीने,

धावूनी  देत जीव  ओवाळून,

प्रेम असे मायभुचे मृत्यूस कवटाळून...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


      *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*

            औरंगाबाद 

       9960878457

सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर, १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळेतील मुलांची शाळा सुरू होणार... #School open #primary open

 सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर ...

१ डिसेंबर २०२१ पासून प्राथमिक शाळेतील मुलांसह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत.


 सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.




मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.  राज्य शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच कोविड प्रोटोकॉलसह तपशीलवार मानक कार्यप्रणाली  (S.O.P) जारी केली जाणार आहे..


 ऑक्टोबरपासून, 

  • शहरी महाराष्ट्रातील शाळा 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 
  • ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु झाल्या होत्या.


 'राज्य मंत्रिमंडळाने आज राज्यभरातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ४ थी वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  बालरोग टास्क फोर्स आणि इतरांशी सलग चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  आम्ही शाळा आणि पालकांसाठी तपशीलवार एसओपी तयार करण्यासाठी काही दिवस मागितले आहेत आणि म्हणून 1 डिसेंबरपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,शिक्षणमंत्री  म्हणाल्या .  या वर्षाच्या सुरुवातीला या टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती जेव्हा तज्ञांना भीती होती की संभाव्य तिसऱ्या लहरीमुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो.

 कोविड-19 साथीच्या आजाराने राज्यात मार्च 2020 पासून शाळांमधील प्रत्यक्ष  वर्ग बंद केले होते.  12 जुलैपासून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीच्या वर्गासाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले होते. 4 ऑक्टोबर रोजी शहरी भागातील शाळा 8 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या, तर ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत.


 शिक्षणमंत्री  म्हणाल्या  की, राज्य सरकारने निर्णय घेण्यापूर्वी दिवाळीनंतर 15 दिवस कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवले.  सणासुदीनंतर राज्यातील दैनंदिन प्रकरणे वाढू शकतात, अशी चिंता होती, परंतु सुदैवाने तसे झाले नाही.


 प्राथमिक विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात येणाऱ्या अडचणी मान्य करताना गायकवाड म्हणाले की, हे एक आवश्यक पाऊल आहे.  'इयत्ता 1 ते 4 मधील विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आणि शारीरिक अंतर राखण्याची सक्ती करणे कठीण आहे कारण ते खूपच लहान आहेत.  पण त्यांना पुन्हा शाळेत आणणेही आवश्यक आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून ते घरीच असल्याने हळूहळू ते मुख्य प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता आहे,असे गायकवाड यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.  


 विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे.  हे लक्षात घेऊन एसओपीमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिकाही निश्चित केली जाईल,असेही त्या म्हणाल्या.  पुढील सहा दिवसांत, शाळा, पालक आणि मुलांना शारीरिक वर्गांमध्ये सुरक्षितपणे बदलण्यासाठी अनुकूल करण्यावर भर दिला जाईल, कारण जवळपास दोन वर्षांपासून वर्गखोल्या बंद आहेत, अशा त्या म्हणाल्या.

पेन्शन संघर्ष यात्रा दिवस ३ रा.....#pension #dcps #nps

 *जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती..!*


( *निमंत्रक : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना* )

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

( २४ नोव्हेंबर २०२१, बुधवार )





*१. सिन्नर : स्वागत* 


सिन्नर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेची आपली टीम तसेच शिक्षक संघ ( थोरात गट) यांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी संघर्ष यात्रेचे सिन्नर नगरीत स्वागत केले. 


*२. संगमनेर येथील स्वागत, पायी रॅली व सभा :* 


संगमनेर शहरातील घुलेवाडी फाटा पासून गाड्यांची रॅली पंचायत समिती पर्यंत पोहचली. तिथे रॅलीच स्वागत BDO साहेब यांनी केले. तिथून रॅली १ किमी चालत सभास्थळी पोहचली. 


संगमनेर मध्ये जोरदार, धडाकेबाज, आकर्षक नियोजन टीम ने केले होते. आमदार सुधीर तांबे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष दत्ताजी ढाकणे, लिपिकवर्गिय संघटनेचे सचिव जोर्वेकरजी यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी आपल्या टीम सह उपस्थित होते. 

या संपूर्ण उत्तम सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, सचिन नाबगे, शिवाजी आव्हाड, अमोल साळवे, विश्वस्त बाजीराव मोढवे सह सर्व तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार. सर्वच टीमचे अभिनंदन..! यासोबतच आपल्या तालुक्यातील  सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*३. राजगुरुनगर (खेड, पुणे ) येथील सभा :*


इंकलाब जिंदाबाद करून हसत फासावर लटकलेल्या ध्येयवेड्या शहीद राजगुरू यांच्या जन्मभूमीत  आजची झालेली सभा अतिशय उत्तम रित्या पार पडली.


प्राध्यापक, वन , आरोग्य आदी या सह शिक्षक संघटनेचे विविध स्तरीय पदाधिकारी, पेन्शन शिलेदार यावेळी उपस्थित होते. 


सदरची सभा देखील दणक्यात पार पडली. या आजच्या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सभागृहाच्या जवळपास ५०% महिला भगिनी या वेळी उपस्थित होऊन पेन्शन विरोधात एल्गार करत होत्या. 


या उत्तम सभेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, वैभव सदाकाळ, योगेश ठोसर, विनायक शिंदे, सोमनाथ कुदळे यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*४. पुणे मनपा टीम कडून प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम :*


दिवसभराच्या धावपळीतून काहीतरी वेगळे करत आपले विविध प्रेरणादायी विचार व्यक्त करणारे पुणे मनपा टीमचे जितूजी फापाळे, प्रणव काळे आदी पदाधिकारी यांनी केले.


*उपस्थित जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती सहकारी 

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

वितेश खांडेकर - राज्याध्यक्ष, मधुकर काठोळे

समन्वयक - सर्व शिक्षक संघटना, शैलेश भदाने - वनरक्षक वनपाल संघटना सचिव, गोविंद उगले - राज्य महासचिव, श्री. प्राजक्त झावरे पाटील - राज्य कार्याध्यक्ष, श्री. आशुतोष चौधरी - राज्य कार्याध्यक्ष, श्री. सुनिल दुधे - राज्य सल्लागार, श्री. शैलेश राऊत - कार्यालयीन चिटणीस, संजय सोनार - राज्य संघटक, श्रीमती दीपिका एरंडे मॅडम - राज्य मीडिया प्रमुख, श्री. नदीम पटेल - विश्वस्त, श्री. अनिल वाकडे - विभागप्रमुख नागपूर, अतुल खांडेकर - तालुकाध्यक्ष उमरेड, नागपूर, अनिल पत्रे - तालुकाध्यक्ष मौदा, नागपूर


सहकाऱ्यांनो,

भक्कम पाठबळ आणि प्रेम असेच राहू द्यात.


*कायम आपलाच,*

श्री. प्राजक्त झावरे पाटील

राज्य कार्याध्यक्ष

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

______________________________

मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...#robotics #robotcar

 


मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...


https://youtu.be/FfJ93rVAg2s



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही आता तंत्रज्ञान क्षेत्राची गोडी लागत आहे.  औरंगाबाद तालुक्यातील मुरूमखेडावाडी अतिशय दुर्गम डोंगर भागात असलेली एक प्राथमिक शाळा आहे. 





अवघड क्षेत्रात शाळा असताना सुद्धा येथे अनेक बदल पाहायला दिसून येतात.यापूर्वीही

  •  रोबोसेपियन डेमो ,
    ड्रोन प्रात्यक्षिक, 
    ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
    सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
    करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
     हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
     १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • ड्रोन प्रात्यक्षिक, 
  • ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
  • सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
  • करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
  •  हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
  •  १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • सुंदर माझी शाळा


 असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग घेण्यात आले आहे.

 याच बरोबर विद्यार्थ्यांनी श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोट कार ची जुळवणी करत ही कार ठरवलेल्या ट्रॕकववर कशी चालते याचे प्रात्यक्षिक ही सादर केले आहे.

ही कार  स्वतः ठरलेल्या मार्गावर चालते आणि लवकरच यावरच आधारित एक उपयुक्त नवीन मॉडेल तयार करणार आहे. ज्याचा उपयोग निश्चितच एक मार्गदर्शक असा ठरणार आहे. अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्ष गंगुबाई विष्णू बचाटे शाळेतील शिक्षक  श्री  प्रकाशसिंग राजपूत दिलीप आढे, , वैजिनाथ साबळे, काशिनाथ बचाटे, सुदाम बचाटे , धरमसिंग बालोद, गजानन साबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

एस टी कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी...#st #Pagar #salary

 

एस.टी. कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी ....



राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता मोठी भरघोस वाढ होणार आहे.


 ज्याच्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.

 त्यानंतरची आता ही मूळ वेतनात वाढ होणार आहे .त्याच्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

 कर्मचाऱ्यांच्या सेवा नुसार या वेतनामध्ये वाढ होणार आहे ज्याप्रमाणे

  •  एक ते दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनामध्ये 5000 ची वाढ होणार आहे.
  • १० ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मध्ये 4000 ची वाढ होणार आहे.
  •  तर 20 पेक्षा जास्त वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मधील 2500/-  ची वाढ होणार आहे.

 2021  झालेली ही वाढ एस.टी.  कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची  बातमी असणार आहे