डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2021 #jobs

 इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहू शकतात.  केंद्रीय विद्यालय औरंगाबाद औरंगाबाद भरती 2021 बद्दल अधिक तपशील खालील प्रमाणे  आहे.





  केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2021


  पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) पदासह इतर पदे भरण्यासाठी केंद्रीय विद्यालय औरंगाबादने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. 

 इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलाखत करिता उपस्थित राहू शकतात. केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती बद्दल अधिक माहिती खालील वेबसाईटवर दिली आहे.

https://googleweblight.com/sp?u=https://aurangabadcantt.kvs.ac.in/administration/teacher-vacancy&grqid=MWpKPUMI&hl=en-IN

  इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी केंद्रीय विद्यालय   कडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.  KVS औरंगाबाद भर्ती 2021 साठी पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदांसाठी भरती आयोजित केली आहे.  वरील पदे भरण्यासाठी रिक्त पदे उपलब्ध आहेत.  या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण औरंगाबाद आहे.  पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर  उपस्थित राहू शकतात आणि मुलाखतीला जाण्यापूर्वी त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात. मुलाखत वेळापत्रक 18 डिसेंबर 2021 आहे.


पत्ता 
केंद्रीय विद्यालय  छावणी परिसर 
औरंगाबाद

पहिली विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार #newtextbook

 इयत्ता १ ली साठी सृजन बालभारती एकच पुस्तकाची रचना केलेली आहे. 



  • भाग-1 हा मी व माझे कुटुंब या वरती घेण्यात आलेला आहे.
  •  भाग-2 जो आहे हा भाग दोन पाणी यावरती घेण्यात आलेला आहे. 
  • भाग-3 जो आहे हा प्राणी ॲनिमल यावर घेण्यात आला आहे.
  •  ४ था भाग   तो वाहतूक (ट्रान्सपोर्ट) आणि आपल्याला मदत करतात त्यांच्या संदर्भातला भाग 4 असणार आहे.

पहिली विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार 

 शाळापूर्व तयारी आपण तयार करून घेतली आणि आपण असं वाटलं की तंत्रज्ञानाचा  वापर करताना हाच मुख्य उद्देश लक्षात घेतला आहे की चित्र पाहून त्याला ती संकल्पना कळेल उदाहरणात आपण पाहिला तर चित्र काढ पहिला आहे आणि ते पाहून त्याला पटकन समजेल की चित्र आपल्याला या ठिकाणी काढायचा शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2022 - 2023 पासून हे धोरण संपूर्ण राज्यभरातील मराठी माध्यमातील इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्याचा सरकारचा निर्णय असणार आहे .


त्याचबरोबर इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील असाच एकात्मक पुस्तकाचा जो काही भाग आहे तो यावर्षी पायलट प्रोजेक्ट च्या माध्यमातून सुरू होणार आहेत आणि त्याचे निष्कर्ष अशाच स्वरूपाचे जर आले तर इयत्ता एक आनंददायी प्रवासाची सुरुवात असणार आहे .

समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारी भाग्यरेषा ठरणार आहे #samruddhi highway

 


🛣️


*महाराष्ट्राचे भाग्योदय करणारा एक्प्रेस महामार्ग यावर लिहिलेले गीत......*


https://youtu.be/0rlAzmKBOs0


समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारी भाग्यरेषा ठरणार आहे. यावर लिहिलेले माझे गीत व्हिडीओ स्वरूपात सादर.....
कृपया मराठी गीत अलंकार चॕनलला सबस्क्राईब करून आपले प्रेम व्यक्त करावे.




गीतलेखन

प्रकाशसिंग राजपूत 

औरंगाबाद 

9960878457 


गीतगायन

कल्पना मोडक


#motivational, #marathi

दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार

 दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार....



वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. याबाबतची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, दिव्यांग आयुक्तालयाच्या सहायक आयुक्त, आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख यावेळी म्हणाले की, दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 नुसार सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र राज्यभरात विशेष प्रयत्न केले जाणार असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुरेपूर सहकार्य करणार आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करतील.

महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असून संबंधित विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे यावेळी खासदार श्रीमती सुळे यांनी यावेळी सांगितले.

या अभियानामुळे राज्यस्तरावरील दिव्यांगाना विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना कार्यान्वित करणे सोयीचे होईल.


 तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे, विविध प्रोत्साहनपर योजना राबविणे, विविध प्रकारचे साहित्य, साधने आणि उपकरणांचा पुरवठा करणे सोयीचे होणार आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, परीक्षेतील सवलती मिळणे याबरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन देय लाभा बाबत #retirement


सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन देय लाभा बाबत


नियम 118


नुसार प्रत्येक सहामाहीत (माहे | जानेवारी व 1 जुलै) पुढील 24 ते 30 महिन्यात सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांची यादी तयार करून कार्यालय प्रमुखांकडे सादर करणे आवश्यक राहिल.



नियम 119


शासकिय निवास स्थान नियत केले असल्यास 2 वर्ष आगोदर कार्यालस प्रमुख कार्यकारी अभियंत्याला वाटपप्राप्त कर्मचा-याच्या सेवा निवृत्ती पूर्वीच्या 8 महिण्याच्या कालावधीत त्यांचे बेबाकी प्रमाणपत्र देणे आवश्यक राहिल.


नियम 120 नुसार सेवा निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रके तयार करणे.



सदर नियमानुसार पुढील 2 वर्षात सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांची (इतर प्रकारे सेवा समाप्त झाल्यास तात्काळ) सेवा पुस्तकेतील सेवा विषयक सर्व बाबी तपासून तपासणी सुची प्रमाणे योग्य असल्याची खात्री करून वित्त विभागाकडे सादर करणे आवश्यक राहिल. तसेच नमुना 6 मधिल निवृत्ती वेतन विषयक कागद पत्रे तयार करणे (जसे प्रथम पृष्ठा वरील नोंदीची पुर्तता पडताळणी, स्थायी, अहर्ताकारी सेवा, सेवा विषयक परीक्षा निवृत्ती वेतन लाभाची परीगणना, नामनिर्देशन, कुटुंबाचा तपशील व्यक्तीगत ओळख इ.)


नियम 121 नुसार सेवा निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रके तयार करण्या संबंधिचे टप्पे


निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे 2 वर्षा पूर्वी तयार करणे आवश्यक आहे तसेच या 2 वर्षाच्या कालावधीत कार्यालय प्रमुखानी संबंधित कर्मचा-याचे सेवा पुस्तीका मधिल सर्वनोंदी तपासणी सुची प्रमाणे पडताळुन वित्त विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे


1 पहिला टप्पा :


कार्यालय प्रमुखानी संबंधित कर्मचा-याचे सेवा पुस्तीका मधिल सर्वनोंदी तपासणी सुची प्रमाणे पडताळुन ते योग्य  असल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन प्रस्ताव वित्तविभागाकडे पाठविणे आवश्यक आहे.


-उदा कार्यमुक्ती उपस्थिती  सेवा खंड शिक्षा इ. बाबीच्या नोंदी.



2 दुसरा टप्पा:


सेवा पुस्तीकेतील उणीवा सर्व नोंदीच्या अनुषंगाने त्या पुराव्या सह पडताळून सेवा निवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन लाभास योग्य असल्या बाबत पात्र ठरवीणे. तसेच म.ना.से. नियम 120 बी 3 नुसार मागिल 24 महिन्यातील वेतनाची तपासणी करणे


3 तिसरा टप्पा:


कार्यालय प्रमुखांनी 8 महिने आगोदर न. 5 मधिल नोदी (अग्रिमे, रजावेतन, वेतनातील कपाती, शासकिय वसुली) इ बाबत कार्यवाही करुन घेणे आवश्यक आहे.


नियम 123


निवृत्ती वेतन विषयक प्रस्ताव किमान 6 महिने अगोदर नमुना 5,6,7 च्या प्रती प्रमाणित करन विभागाकडे सादर कराव्यात.


नियम 124


वित्त विभागात संचिका प्रस्तावित असेल तेंव्हा सदर कालावधीत निवृत्ती वेतनावर परीणाम होणारी घटना पडली असेल तर ती नियम 124 नुसार वित्त विभागास तात्काळ कळविणे आवश्यक राहिल.


नियम 125


सबंधिता कडील वसुलपात्र रक्कमा किमान 2 महिने आगोदर वित्त विभागास कळविणे आवश्यक राहिल.


नियम 130


अन्वये विभागाकडुन प्रस्तावित न्यायालयीन प्रकरणात तात्पुरते निवृत्ती वेतन दुस-या सहामाही नंतरीही ते निकाली निघत नसल्यास विभागाने सदर प्रकरण अंतिम होईपर्यंत समायोजन करण्याची जबाबदारी सह संधिका प्रस्तावित करणे आवश्यक राहिल.

आहरण व संवितरण तथा नियंत्रण अधिकारी यांचे स्तरावर निवृत्ती वेतन प्रकरण तयार करून संबंधित मंजुरीस्तव सादर करतांना समवेत जोडावयाचे 


(सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन देय लाभा बाबत)

   पडताळणी प्रपत्र-1


1) सर्वसाधारण माहिती.


(1)  सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांचे नांव

२) हुद्दा         पदनाम

कार्यालयाचे नांव

3)सेवानिवृत्तीचा दिनांक व प्रकार 


(4)सेवानिवृत्तीचा आदेश जोडला आहे काय?


ब) सेवा पुस्तिकाविषयक माहिती.


5) सेवा पुस्तिकाची पहिल्या पानावरील सर्व माहिती भरली आहे काय? त्यावर खातेप्रमुखाची स्वाक्षरी आहे.

 6) कर्मचाऱ्याची जन्मतारिख पडताळणी आवश्यक त्या प्रमाणपत्रावरून नोंद सांक्षाकित केली आहे काय ?

 7) सेवापुस्तिकेच्या पहिल्या पानावर कर्मचारीची स्वाक्षरी आहे का?

8) रजा वेतनवाढ मंजूरी नोंद घेऊन सांक्षाकित केल्या आहेत का?

9) दिनांक 1.1.1986.  1.1.1996  1.1.2006, 2016 व वरिष्ठ वेतनश्रेणी निश्चितीची पडताळणी केली काय? वेतन निश्चितीचे सर्व विकल्प तक्ते पडताळणी करतांना सेवा पुस्तकाला जोडण्यात आले का?


(10) सेवेत वैदयकिय पात्र आसल्या बाबत दाखला सेवा सोबत जोडला आहे काय? 

11)  सेवा पुस्तकात सेवेत कायम झाल्याबाबत नोंद घेतली आहे काय? 

12) सेवा पुस्तिकेत बदली पदोन्नती बाबत, वाटचाल बाबत नियमित नोंद घेतली आहे का?

(13) सेवा पुस्तका सोबत  फॉर्म न 3 व न 5 जोडले आहे काय?

 14) सेवानिवृत्तीच्या आदेशाची क्रंमाकासह सेवा पुस्तकात नोंद घेतली आहे काय? 

15) सेवा आरंभाच्या तारखेपासून सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सेवा पडताळणी झालेली आहे काय ?


(क) अनियमितता


(16) एखादा कर्मचारी निलंबित असेत तर रूजु झाल्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये केली आहे काय? तसेच निलंबन कालावधी नियमित करुन देय रजा व निलंबीत काळातील सेवा त्याबाबत योग्य  नोंदी सेवा पुस्तिकेस घेतलेल्या आहेत काय? 

(17) विना वेतन रजेमुळे वेतनवाढ पुढे गेली असल्यास तशी नोंदवण्यात आलेली आहे काय?

 (18) सेवा भरतीच्या वेळी वय विहीत मर्यादेपेक्षा जास्त असल्यास नादा वय क्षमापित करणे बाबत परवानगी घेवून तशी सेवा पुस्तिकेत आलेली आहे काय ?


19) दक्षता रोध  पार करण्यास परवानगी देण्यात आली काय? असल्यास कोणत्या दिनांका पासून व कोणत्या कोणत्या आदेशान्वये यांची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्यात आली काय ?


ड) शिक्षका विषयी (खाजगी शाळेतील सेवा, सेवानिवृत्तीसाठी, वेतनवाढीसाठी धरणे बाबत)

20) मान्यताप्राप्त खाजगी  संस्था  शिक्षकांसह ताब्यात घेतली असेल तर शिक्षक स्वेच्छानुसार सेवानिवृत्त झाला असेल तर त्याची खाजगी शाळेच्या व्यवस्थापनाची खाजगी शाळेतील सेवा बाबतचा दाखला सेवा पुस्तकात जोडला आहे का?

सेवानिवृत्तीच्या लाभाकरिता धरणे बाबत आदेश काढून त्याची नोंद सेवा अशी आहे काय ? 

21) खाजगी शाळेतील सेवा बाबत शिक्षकास भविष्य निर्वाह निधी च्य संस्थेच्या हिस्याची रक्कम अदा केली अशी किती रक्कम व केव्हा मिळाली या बाबतचा दाखला व्याजाचे रकमेसह जोडला आहे काय ?


ई) निवृत्ती वेतन आकारणी बाबत.


22) निवृत्ती वेतनाची आकारणी करताना 10 महिन्याची सरासरी विचारात घेवून निवृत्ती वेतन आकारणी आकारणी बरोबर केलेली आहे काय ? सुधारित शासन निर्णयानुसार शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के या प्रमाणे आकारणी करण्यात आली आहे काय ?


23) मृत्यू-नि-सेवा उपदान आकारणी बरोबर केली आहे काय? व नामनिर्देशन पत्र आकारणी पत्र जोडलेली आहे काय? 

24) प्रकरणा समर्पत निवृत्ती वेतनाचे 40 टक्के भाग अंशराशीकृत करणेबाबतचा प्रस्ताव जोडला आहे काय?


25) प्रकरणी तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन देवून उपदान मंजूर केलेले असल्यास कोणत्या आदेशान्वये व कोणत्या दिनांका पासून व किती रक्कम आदेशाची प्रत जोडली आहे काय ?


ई) संकीर्ण


26) निवृत्ती वेतन प्रकरणात सोबत अंतिम वेतन प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे काय?


27) निवृत्ती वेतन धारकाकडून जादा अदाई (जादा पगार, घरबांधणी कर्म सोसायटी किंवा इतर येणे बाकी असल्यास) यायचे असल्याप्रकरणी स्वतंत्र प्रस्ताव सोबत जोडला आहे काय ?

28) प्रकरणा सोबत निवृत्ती वेतनधारकावर चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसल्याचा दाखला जोडलेला आहे काय?

 29) प्रकरणा समवेत निवृत्ती वेतन धारकांचा सेवा निवृत्ती नंतरचा संपूर्ण पत्ता निवृत्ती वेतनधारकांचे हस्ताक्षरात जोडला आहे काय?


नियंत्रण अधिकाऱ्यांचा  अभिप्राय     

31) शासनाचे निवृत्ती वेतन प्रकरणी वेळोवेची निर्गमित झालेले आदेश व परिपत्रके यांचे अधिनस्त प्रस्तुत प्रकरणी उक्त 1 ते 31 मुखाची माहिती योग्य तो पडताळणी करून कागदपत्रे समवेत सेवा पुस्तिकासह जोडलेले आहेत तसेच प्रकरण कार्यालयात डेवलेल्या नोंदवहीत नोंदवलेले आहे.


(32) सर्व प्रकारच्या वसुलपात्र रक्कमा नमुद करून वसुलो बाबत संबंधिताचे संमतीपत्र घेणे आवश्यक राहिल

     


   विभाग प्रमुख

दोस्ती नविन काव्यरचना #friendship

 *दोस्ती*




भेटतात ज्याला येथे अंगी मस्ती,

सोबत असलो तर उत्साह जास्ती,



कळत नाही काय असतं या दोस्तीत,

पण करमत नाही सोडून राहून या वस्तीत,



विराम बनतो दुःखाला एकदाचा,

हर्ष कसा आणतो आपलेपणाचा,



दोस्त तुझ्यासाठी काहीपण म्हणत,

भांडण साऱ्या जगाशी करत,



संकटातून सोडविण्यास बनतो संकट मोचन,

रुसवा आला तरी परत बनत जखमेवरचे लोशन....



     😃 माझ्या तमाम दोस्तांसाठी☺️

   


    *✒️ प्रकाशसिंग राजपूत✒️*

             औरंगाबाद

एक विचार अर्थक्रांती आणेल..... #motivational #ideal #home loan

 गृहकर्ज सरसकट सर्व भुखंडावर मिळावे कर्ज घेणाऱ्याच्या क्रयशक्ती तथा क्षमतेवर मिळावे ना की भुखंड .....


थोडक्यात पार्श्वभूमी 

आपण २०२० हे वर्ष ओलांडून आता खूप दिवस झाले . आर्थिक महासत्ता बनण्यासाठी आपले प्रयत्न निश्चितच प्रगतीला गवसणी घालणारे आहेत. सर्वसामान्य जनता सदैव एक स्वप्नं कुटुंबासाठी पहाते. ते म्हणजे स्वतः चे घर असावे. इथपर्यत अनेकांची घोडदौड सुरु असते. किंबहुना या स्वप्नं साकारण्यासाठी दिवस रात्र धडपड सुरु असते.



        आज सांगायचे गेले तर बॕकेचे गृहकर्ज हे फार कमी व्याजदराचे जवजवळ ७ % आसपास म्हणजेच खूप परवडणारे असेच म्हणता येईल. 

नगररचना व ग्रीन झोन -

हल्ली आपल्याकडे ग्रीन झोन व येलो झोन हे ठरवून त्यानुसारच त्या भागातील जमिनीला NA दिल्या जाते. खरं तर ही अट आपल्या विकासाला बाधा आणणारी  ठरली. ग्रीन झोन ३३% असणे आवश्यक आहे . परंतु शहराचा हाच भाग असावा हा नसावा असे करत करत एकूणच नगररचना विभाग हे त्या आधारित परवानगी देत त्यावर भुखंड अस्तित्वात येतात. येलोझोन मधील NA44 तर ग्रीन झोन हे गैर NA किंवा गुंठेवारी चे बनून जातात.



         एक ठराविक भाग हरीत क्षेत्र न करता जर प्रत्येक भुखंडजमिनीतील एकूण जमिनीतील काही भाग ज्याप्रमाणे ओपन स्पेस म्हणून सोडल्या जातो त्या ऐवजी हरित क्षेत्र करून त्यावर घनवन तयार केल्यास . हरित क्षेत्राचे लक्ष्य पुर्ण होऊन सर्वत्र हिरवी अंगणे निर्माण होतील.           

गृहकर्ज ( Home loan)

राष्ट्रीयकृत बॕकेच्या गृहकर्ज ( Home loan) घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. बॕकेच्या उत्पनाचा सर्वाधिक मार्ग या कर्जाचा आहे. परंतु येथे मोठी अडचण येथे ती प्लाॕट कायदेशीर की बेकायदेशीर  वास्तविक  बॕक कर्ज देते त्यावेळी कर्ज घेणाऱ्याची क्रयशक्ती किंवा क्षमता विचारत घेत कर्ज दिले जावे.

वरील NA अट काढल्यास बॕक तथा पर्यायाने देशाला कसा फायदा होईल ते खालीलप्रमाणे पहा....

१) बॕक कर्ज वाटप वाढून बॕकेचे उत्पन्न वाढून त्या आणखी भक्कम होत देशाच्या विकासाला हातभार लावतील.

२) NA नसलेल्या भुखंडावर घर बनते परंतु महाग कर्ज घेऊन किंवा उत्पन्न येईल त्याप्रमाणे थोडे थोडे बांधकाम. यामुळे घर बांधता बांधता संबंधित व्यक्ती खूपच कर्जात जाऊन त्याच्या क्रयशक्तीची हानी होत .  पुढील अनेक वर्ष तो कुठलीही उलाढाल करु शकत नाही.

३) NA नसलेल्या भुखंडावर घर बनून जातेच. मग अशा वेळी बॕक अशा घरांना कर्ज देत नाही. हे कर्ज व्यक्तीच्या क्रयशक्तीवर बॕकेने दयावे ना तर भुखंडावर. 

४) हल्ली पर्सनल लोन साठी बॕक फोन करून ग्राहक शोधत बसते व एकीकडे गृहकर्जाच्या शोधात व्यक्ती फिरत अखेर तो सावकाराचे न परवडणारे असे टक्केवारीचे कर्ज घेतो. किती मोठी ही विषमता? म्हणता येईल या सर्वा प्रकारास.

५)प्रत्येक भुखंड जमिनीवर काही भाग वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करुन ग्रीन येलो झोन यात बदल होऊन NA सुलभ करत बॕकेला ही मोकळीक मिळावी. जेणे करुन त्या ही सुलभ कर्जवाटप करुन चांगल्या स्थितीत येतील.

देशाला गतीमान करणारा हा विचार अर्थक्रांती आणून भरभराट नक्कीच आणेल . आपल्याला कार वाटते काॕमेंट व ही पोस्ट शेअर करा. आमच्या सोबत राहण्यासाठी या साईटला follow करा....


प्रकाशसिंग राजपूत 



हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग #samruddhi mahamargh

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्दिष्ट 


लोकांच्या आणि वस्तूंच्या जलद आणि सुलभ वाहतुकीसाठी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक सुविधांसह शेवटच्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी निर्माण करणे आहे. 


 द्रुतगती मार्गामुळे महाराष्ट्रातील मोठ्या लोकसंख्येला स्वयंरोजगार आणि मजुरीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, व्यापार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये सहज प्रवेश मिळेल.


   



   मुख्य 10 जिल्हे


   नागपूर

   वर्धा
   अमरावती
   वाशिम
जालना
   नाशिक
   ठाणे

बुलढाणा

औरंगाबाद

अहमदनगर


   इतर  जिल्हे


   चंद्रपूर

  गोंदिया

   गडचिरोली

   यवतमाळ

   अकोला

   हिंगोली

   परभणी

   नांदेड

   बीड

   धुळे

   जळगाव

   पालघर

   रायगड

   नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांतून एक्स्प्रेस वे जाणार आहे.  हे नागपूरला मुंबईशी जोडेल आणि देशातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्ट - जेएनपीटीशी थेट संपर्क स्थापित करेल.  यामुळे राज्याचा अबकारी (निर्यात-आयात) व्यापार वाढेल.  मार्गातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी परस्पर जोडलेले महामार्ग आणि फीडर रस्ते बांधले जातील.  यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड असे आणखी १४ जिल्हे जोडले जातील.  अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्हे या एक्स्प्रेस वेशी जोडले जाणार आहेत.

  •    राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळेही एक्स्प्रेस वेने जोडली जातील.

  •    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची क्षणचित्रे

  •    हा द्रुतगती मार्ग 701 किमी लांबीचा असेल, जो 10 जिल्हे, 26 तालुके आणि सुमारे 392 गावांना थेट जोडेल.

  •    त्याची वेगमर्यादा 150 किमी प्रतितास असेल जी नागपूर आणि मुंबई 8 तासात पोहोचेल.  त्यामुळे मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास जास्त असेल.

  •    हे अनेक औद्योगिक क्षेत्रे, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC), वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट्स आणि मुंबईचे JNPT यांना जोडेल.

  •    22.5 मीटरच्या मध्यभागी एकूण 120 मीटर रुंदीचा एक्स्प्रेस वे डिझाइनच्या आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करेल.  प्रत्येक बाजूला 4,8 लेन असतील.  द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी दोन्ही बाजूंच्या लेनचे रुंदीकरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.  त्यामुळे भविष्यात विस्तारासाठी जमिनीची गरज भासणार नाही.

  •    अंडरपासला जोडणारे सर्व्हिस रोड दोन्ही बाजूला असतील.

  •    हे मोक्याच्या ठिकाणी सुमारे 50+ उड्डाणपूल, 24+ इंटरचेंज, 5 पेक्षा जास्त बोगदे, 400+ वाहने आणि 300+ पादचारी अंडरपास प्रदान करेल.  हे अंडरपास आणि उड्डाणपूल वाहतुकीला अडथळा न होता वाहने वेगाने जाण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी फायदेशीर ठरतील.  स्थानिक लोकांना कोणताही अडथळा न येता प्रवास करणे आणि अपघातांना आळा घालणे देखील फायदेशीर आहे.

  •    एक्स्प्रेस वेच्या संपूर्ण लांबीमध्ये विस्तृत लँडस्केपिंग, बोगद्याची प्रकाश व्यवस्था, पुलाचे सुशोभीकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल संकेत असतील.

  •    द्रुतगती मार्गाच्या बांधकामात शक्यतो स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य, फ्लाय अॅश आणि प्लास्टिकचा वापर केला जाईल.  एक्स्प्रेस वेवरूनही पावसाचे पाणी बाहेर काढले जाईल.

  •    एक्स्प्रेस वेचा प्रवेश आणि निर्गमन व्यवस्थापित केले जाईल आणि कव्हर केलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जाईल.  टोल वसुली स्वयंचलित करण्याचा प्रस्ताव आहे.

  •    द्रुतगती महामार्ग हा शून्य अपघाती महामार्ग असेल;  कोणत्याही अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीची तक्रार करण्यासाठी प्रत्येक 5 किमीवर सीसीटीव्ही निगराणी आणि विनामूल्य टेलिफोन बूथ असतील.

  •    ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन, पॉवर लाईन्स इत्यादींसाठी एक्सप्रेसवेसह उपयुक्तता महामार्ग प्रदान केले जातील.

  •    कोणतीही आणीबाणी, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारखी परिस्थिती उद्भवल्यास, द्रुतगती मार्गावर विमानांचे लँडिंग सुलभ करण्यासाठी द्रुतगती मार्गाचे तात्पुरत्या धावपट्टीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे.

तुमचे wifi राऊटर धोक्यात तर नाही .... हॕकरची नजर त्यावर.... #Wifi, #router

 एका रिसर्चनुसार वायफाय राऊटरच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे. काही कंपन्यांचे वायफाय राऊटर हॅकर्ससाठी सोपं लक्ष्य बनले आहेत.



 यामुळे वायफाय नेटवर्कच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. आयओटी इन्स्पेक्टर आणि चीप मॅगझिनला सुरक्षा संशोधकांच्या चमूने ही माहिती दिलेली आहे.

 

 यामुळे विविध कंपन्यांचे लाखो वायफाय राउटर धोक्यात असल्याचे मानल्या जात आहेत. . इंटरनेट सुरक्षा कंपन्यांच्या राऊटरमधील जुन्या आवृत्त्यांमधील काही घटक हे देखील याचं कारण असू शकतं. यामुळे हॅकर्सना हे राऊटर हॅक करणे सोपं होतं, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.



    

जाणून घ्या कोणकोणत्या बाबतीत धोका असू शकतो.... 

विविध  ब्रँडचे लाखो वायफाय राऊटर धोक्यात येऊ शकतात. या नव्या संशोधन Edimax,Asus Netgear,  Synology,AVM D-Link, , TP-Link आणि  यासह मोठ्या ब्रँडमधील अनेक WiFi राऊटरच्या सुरक्षेबाबत धोक्यांची घंटा दिली आहे.

घरबसल्या स्पेस बद्दल सर्व काही शिकण्यासाठी फ्री सर्टिफिकेट कोर्स..... आणला आहे

 इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आता विद्यार्थ्यांना  घर बसल्या स्पेस बद्दल सर्व काही शिकण्यासाठी  फ्री सर्टिफिकेट कोर्स आणला आहे.


 मुलांना अवकाश संशोधनाची माहिती किंवा अवकाशामध्ये वैज्ञानिक संशोधनात रस निर्माण होण्यासाठी .  अवकाशात बाबतीत कार्य करण्याकरिता तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इसरो या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी मोफत कोर्स आणलेला आहे.



 मग या कोर्स बद्दल या लेखामध्ये माहिती आपणासाठी घेऊन आलो आहोत,   याबाबतीत या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला https://www.iirs.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यावर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे.


 सध्यातरी या ऑनलाइन अॕप्लीकेशन ची विंडो बंद आहे. पण लवकरच यामध्ये सुरु अर्ज भरणे सुरू होणार  आहे . असा हा कोर्स करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज असणार नाही . हा कोर्स  पूर्णपणे मोफत  आपणास करता येणार आहे. याबाबतीत  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही सर्व कोर्स सुद्धा प्राप्त होणार आहे . 



आणि आय आर एस देहरादून चे अधिकृत वेबसाईट नुसार आय आर एस यूट्यूब चॕनल वर माहिती मिळणार आहे . उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चोवीस तासानंतर उपलब्ध असलेल्या ऑफलाइन सत्रात त्यांची उपस्थिती नोंदणी अनिवार्य असणार आहे. इस्रोच्या मते या ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रमातील प्रत्येक अभ्यासक्रम वेगळा कालावधीमध्ये विभागलेला असणार आहे चार ते बारा दिवसांचा तो असणार आहे. विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी आहे.