डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रतिक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ

 RTE प्रवेश बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत ऑनलाइन राबवण्यात येणाऱ्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या पहिल्या फेरीमध्ये नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील बालकांचे प्रवेश प्रक्रियेची मुदत 10 मे 2022 रोजी पर्यंत होती. निवड झालेल्या 90 हजार 685 विद्यार्थ्यांपैकी 62 हजार 155 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. याआधी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

शालेय शिक्षणाचे हायब्रीड माॕडेल विकसित व्हावे... नरेंद्र मोदी

 त्यामुळे प्रतीक्षा यादीसाठी 39 हजार 751 जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यानंतर 19 ते 27 मेपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. यावेळी प्रतीक्षा यादीतील 7 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र अनेक पालकांना प्रवेश घेण्यासाठी शाळांमध्ये जाण्यात अडचणी येत असल्याने प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीतील बालकांच्या प्रवेशासाठी 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाचे संचालक  यांनी घेतलेला आहे.


30 जून बदली स्थगितीचा तो आदेश केवळ प्रशासनासाठीचा...

30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये.

  30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये.


याबाबतचे आज शासन आदेश निर्गमित झालेले असून आता बदलांवर सर्व प्रकारच्या बदलांवर निर्बंध शासनाने लावलेले आहे.

नविन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार हे साहित्य ...


 आर्थिक वर्ष  2022 2023  मध्ये कोणतेही प्रकारच्या बदल्या करण्यात येऊ नये असे या आदेशात म्हटलेले आहे.



 



शिक्षक मतदारसंघातून कार्यरत शिक्षकालाच उमेदवारी मिळावी

 राज्य विधानपरिषदेच्या सात शिक्षक आमदारांच्या जागांवर शिक्षकांना डावलून संस्थाचालक अथवा राजकीय पुढारी करीत असलेल्या घुसखोरीला भविष्यात लगाम लागण्याची चिन्हे आहेत.


शिक्षण तज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी शिक्षक मतदारसंघातून कार्यरत शिक्षकालाच उमेदवारी मिळावी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल आयोगाने घेतली असून डॉ. खडक्कार यांचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अग्रेषित केले आहे.


राज्य विधान परिषदेसाठी पदवीधर मतदारसंघाला सात आणि शिक्षक मतदारसंघाला सात जागा मिळतात. यातील शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूरचा समावेश आहे. सध्या शिक्षक आमदारांच्या या जागांवर राजकीय पुढाऱ्यांनी ताबा मिळवला आहे. गैरशिक्षक आमदार मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विदर्भातील दोन आमदारांमध्ये एक शिक्षक तर दुसरे संस्थाचालक आहेत. शिक्षक मतदारसंघातून यापूर्वीदेखील राजकीय पुढारी अथवा संस्थाचालकांनी उमेदवारी मिळवली आहे. हे आमदार शिक्षकांच्या मूळ प्रश्नांना बगल देत केवळ राजकारण करतात, असा आरोप नेहमीच केला जातो. शिक्षक मतदारसंघात होणारी राजकीय घुसखोरी रोखण्यासाठी डॉ. संजय खडक्कार यांनी २०१९ पासून सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत राज्य सरकार, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला. आतापर्यंत राज्यात झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आणि त्यातील विजयी उमेदवारांसदर्भातील वस्तुनिष्ठ माहिती त्यांनी सादर केली. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डॉ. खडक्कार यांच्या पत्राची दखल घेतली असून त्यांचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून यावर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास भविष्यात राज्यातील शिक्षक मतदारसंघात कार्यरत शिक्षकालाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

गैरशिक्षकांना विरोध का ?

शिक्षक मंडळी मतदानाद्वारे आपला शिक्षक आमदार निवडतात. या आमदाराने शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या विधिमंडळात मांडणे आणि त्याची सोडवणूक करणे अपेक्षित असते. मात्र, या शिक्षक मतदारसंघांवर संस्थाचालक आणि राजकीय पुढाऱ्यांनी ताबा मिळवला असून गैरशिक्षक प्रतिनिधी शिक्षकांच्या समस्या सोडवत नाही, असा आरोप आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघात एकीकडे मतदार हा कमीत कमी माध्यमिक शिक्षक असतो. पण उमेदवार हा तीस वर्षे पूर्ण झालेला आणि शिक्षक नसला तरी चालतो, ही बाब निश्चितच चुकीची व तर्कशून्य वाटते. विविध निवडणुकीत महिला प्रवर्गामध्ये उमेदवार म्हणून महिलाच उभी राहू शकते, राखीव मतदारसंघात राखीव प्रवर्गाचा उमेदवारच उभा राहू शकतो. मग, शिक्षक मतदारसंघातही उमेदवार शिक्षकच असायला हवा.

डॉ. संजय खडक्कार शिक्षणतज्ज्ञ.

कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठिय्या धरणे आंदोलन....

 


अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आव्‍हानावरुन संपूर्ण देशभर केंद्र व राज्य सरकारच्या श्रमिक कामगार आणि कर्मचारी हितविरोधी धोरणांविरुद्ध आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठिय्या धरणे आंदोलन ....




प्रमुख मागण्या -

नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, वेतनत्रुटींचे निवारण करावे आणि सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत यासाठी हे ठिय्या धरणे होणार असून सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि मुंबईत सर्व शासकीय कार्यालयासमोर होणार आहे.


शिक्षक बदली पोर्टल संदर्भात मार्गदर्शक व्हिडीओ... 

 प्रमुख मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात येईल अशी माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.

उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदस्थापना

 महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळसेवेने (एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- ५ द्वारे) रूजू झालेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत शासन आदेश...




नविन गटशिक्षणाधिकारी यादी खालीलप्रमाणे 








विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत.

 रोना काळात राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढून अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत.



शैक्षणिक संचांसाठी अभ्यास गट स्थापन केला होता. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, मराठी या विषयांचे, तर तिसरी आणि चौथीसाठी इंग्रजी, गणित, मराठी, परिसर अभ्यास या विषयांतील महत्त्वाच्या संकल्पनांचे स्वतंत्र संच तयार करण्यात आले.

 हे संच शिक्षकांना अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाही हे संच उपयुक्त होतील. पाठय़पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हे संच दिले जातील. त्यामुळे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता येईल.


त्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वर्गातील वातावरण उत्साही, आनंदी आणि क्रियाशील ठेवणारे असावे, वर्गात केवळ श्रवणावर भर न देता शैक्षणिक साहित्याद्वारे प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यात येतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ होत असल्याचे दिसून आले. 

निष्ठा प्रशिक्षण शेवटची संधी उपलब्ध .....


मात्र गेल्या दोन वर्षांत करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बराच काळ बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेपासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेशी एकरूप ठेवणे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक असल्याने अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करणे, अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट आणि दृढ होतील असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांनी एप्रिलमध्ये सादर केला होता. त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून देण्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

शिक्षक बदली संदर्भात मार्गदर्शक व्हिडीओ

 Vinsys या कंपनीद्वारे शिक्षक बदली पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. बदली संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शक व्हिडीओ आपणांसाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रचा समूहनिर्माता व मुख्यप्रशासक प्रकाशसिंग राजपूत घेऊन येत आहे.


शिक्षक बदली पोर्टल विषयक माहिती ....




आॕनलाईन बदली प्रक्रिया फेज 1 माहिती 




पोर्टलवर लाॕगिन कसे करायचे....




CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत

 CBSE बोर्डाच्या परीक्षा  रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा  दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.



यावेळी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा होणार की पुन्हा एकच परीक्षा  होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. 

आता मात्र CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. 

काय आहेत हे बदल जाणून घ्या....

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने 10वी, 12वी परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठा बदल केलेला आहे.

सीबीएसई 10वी, 12वी बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे.

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाबतीत अपडेट...

 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाबतीत अपडेट...


Vinsys (सॉफ्टवेअरचे प्रोग्रामर) मधील 100 पेक्षा जास्त अभियंत्यांची टीम आणि द्वारे समर्थित



 सायफ्युचर क्लाउड सर्व्हिसेसच्या 10 अभियंत्यांनी सॉफ्टवेअरच्या पहिल्या टप्प्यासाठी वापरकर्ता चाचणी घेतली. 

लॉजिक विरोधाभास (सॉफ्टवेअर "हँग" नसावे), 

शून्य आयटम आणि लॉगिनमध्ये डेटा अपडेटसाठी सॉफ्टवेअरची चाचणी घेण्यात आली. 

सॉफ्टवेअर सर्व पॅरामीटर्सवर यशस्वी झाले. हे आता आगाऊ सुरक्षा चाचणीसाठी जाईल जेणेकरून ते हॅक होऊ शकत नाही. टप्पा 2 विकास देखील पूर्ण आहे.

टीचर ट्रान्सफर सॉफ्टवेअर हे सर्वात क्लिष्ट सॉफ्टवेअर्सपैकी एक आहे जे सरकारी अधिकार्‍यांद्वारे वापरले जाईल कारण विविध प्रकारच्या टेकहर्सना देण्यात आलेल्या सूट, पोस्टिंगच्या स्थानांची संख्या 1.5 लाखांच्या पुढे जाऊ शकते, 

प्रत्येक शिक्षक आणि स्थान परिभाषित केले आहे. अनेक अटींनुसार. कोणत्याही सॉफ्टवेअरप्रमाणे, तर्काने सुसंगतता दर्शविली पाहिजे आणि ती देखील सांख्यिकीयदृष्ट्या योग्यरित्या कार्य करण्यासाठी परिस्थितीशी जुळली पाहिजे. आम्ही विविध सूट काळजीपूर्वक कॅलिब्रेट केल्या आहेत. सॉफ्टवेअर योग्यरित्या कार्य करू शकेल याची खात्री करण्यासाठी आम्ही बदल करण्यासाठी गेल्या 14 महिन्यांत दबावाचा प्रतिकार केला. पॉलिसी स्थिरता सुनिश्चित केली गेली आहे की सिस्टम चांगले कार्य करते.

आरोग्य खात्यात मेगाभरती.... पहा...

सॉफ्टवेअर देखील अद्वितीय आहे कारण प्रथमच निर्णय घेणे स्वयंचलित केले गेले आहे आणि मानवी इंटरफेसशिवाय सॉफ्टवेअरमध्ये स्थानांतरित केले गेले आहे. शिक्षक बदली प्रक्रिया पूर्णपणे नियमबद्ध असेल आणि त्यात पारदर्शकतेची सर्वोच्च पातळी असेल जिथे प्रत्येक क्लिक आणि टेकहर्सद्वारे प्रत्येक बदल रेकॉर्ड केला जाईल आणि सर्व डेटा सर्व शिक्षकांना दृश्यमान असेल.


निवडलेल्या आयटी कंपन्यांना SIGMA 6 प्रमाणपत्र आहे - उच्च क्षमतेचे.



भोजनावर शिक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत तुटून पडले...

 शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावली होती, पण बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्स वर तुटून पडले. 



 अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. व्हिडीओमध्ये सूटमध्ये एक पुरुष दिसत आहे, जो रिसॉर्टचा कर्मचारी असावा, त्याने घाईघाईने प्लेट्स एका कोपऱ्यात नेल्या आणि शिक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून एक एक वाटू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. 


बैठकी नंतर तेथील मोफत भोजनावर शिक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत तुटून पडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासंदर्भात मुख्यमंत्री मान यांनी पंजाबमधील एका रिसॉर्टमध्ये सरकारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. शिक्षकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सभा संपताच शिक्षक जेवणासाठी निघाले. यावेळी जेवणाचे ताट मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आश्वासित प्रगती योजना खाजगी शिक्षकांना मिळावी अशी शिफारस ....

विशेष म्हणजे शिक्षकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी पंजाब सरकारने एसी बसची व्यवस्था केली होती. 


व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा....



ही फक्त शिक्षक समूहात पोस्ट झाली व ती अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शिक्षक सावधगिरी बाळगतील.


Only for their  Social behaviour awareness .