डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

 द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवड झाली  असून  त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. 



जन्मतारीख: २० जून, १९५८ (वय ६४ वर्ष)
जन्मस्थळ: ओडिशा




त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.

त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.

स्थानिक राजकारणसंपादन करा

मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.[७]

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.[८] २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या.[९] त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.

राज्यपालपदसंपादन करा

त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.[१०][११] भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.

त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.




अवघड क्षेत्रातील जोखीम असलेली सेवा...

 महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून दुर्गम व कठीण भागातील अर्थात अवघड क्षेत्रातील सेवा करणाऱ्या शिक्षकांना २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन आदेशाने खरा न्याय मिळाला.  मात्र गेल्या २ वर्षापासून बदल्या न झाल्याने अवघड क्षेत्रात ५ वर्ष सेवा करण्याची मजबुरी या शिक्षकांवर आलेली आहे.





          निकषात वेळोवेळी बदल होत अवघड संकल्पना जरी बदलण्याचा प्रयत्न  होत असला तरी वास्तव जी भौगोलिक परिस्थिती आहे तीच सर्वाधिक परिणाम या अवघड क्षेत्रावर करत असते. ना तर राष्ट्रीय महार्मागापासूनचे अंतर ना तर फोन लागतो की नाही....

    माझी २०१८ पासून या क्षेत्रात बदली असून सतत अशा परिस्थितीत सेवा बजावतांना अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. काल झालेला परिणाम आपण फोटोत पाहू शकता हे काही पहिल्यांदा नाही गेल्या वर्षी ३ वेळेस असच काही झाले. 2 D मध्ये जग कसे दिसते हे लक्षात येथे व 3 D न पाहू शकत असल्याने टु व्हिलर वर घरी येतांना रस्त्यावरील चढ उतार व गड्डे ही लवकर न दिसल्याने सर्वांधिक जोखीम हीच म्हणावी लागेल. या भागात येत असतांना अनेकदा मधमाशी चावा घेतात. मधमाशींचा होणारा हा त्रास २ -३ दिवस फारच कष्टदायी होतो. या व्यतिरिक्त  पक्के रस्ते नसल्याने अरुंद केवळ ६ फुटाच्या वाटेवर वाहन चालवितांना दोन्ही बाजूने २ फुट उंचीचे गवत असल्याने अचानक वाहनापुढे किंग कोबरा  ते ही अगदी ६ -७ फुटाचे लांबी असलेले हे तर अंगावर शहारे आणून सोडतात ५-६ वेळा अगदी गाडीसमोर आडवे तर एकवेळेस पायाजवळ अगदी दिड फुटावर की ज्याने उसळी घेतलीच होती केवळ नशीब बलवत्तर म्हणून काही अनुचित घडले नाही. 

     सततचा खडकाळ मार्ग व तिन्ही ऋतूचा भडीमार या परिस्थितीला अतिशय बिकट बनवतात.अवघड  परिस्थितीत शिक्षण गंगा पोहचविणाऱ्या माझ्या तमाम शिक्षक बांधवांना मानाचा मुजरा....   शासन , संघटना व प्रशासन या सर्वांनी अवघड क्षेत्राचा सकारात्मक विचार करावा हीच माफक अपेक्षा ....


      प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

            सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी 

 कें करमाड, ता / जि . औरंगाबाद

    9960878457



Cbse निकाल पहा...

 CBSE 10वी 12वी निकालाची तारीख कधीही जाहीर होऊ शकते.


कधी लागणार निकाल?

परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, तो cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. 

येथे उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण 30 टक्के गुण आवश्यक आहेत. मात्र, एक-दोन विषयांत कमी गुण मिळाल्यास निराश होऊ नका, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे कंपार्टमेंट पेपरचे आयोजन केले जाते. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. CBSE लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म 2 परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.



एसएमएसद्वारे निकाल पाहता येईल
विद्यार्थी त्यांचे CBSE निकाल 2022 10वी आणि 12वीचे निकाल एसएमएसद्वारे देखील मिळवू शकतात. यासाठी तुमचा इयत्ता 10वी किंवा 12वीचा रोल नंबर टाका आणि हा एसएमएस 7738299899 वर पाठवा. 


कोणत्या माध्यमातून तुम्ही निकाल तपासू शकता

CBSE निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in आणि cbseresults.nic.in व्यतिरिक्त, विद्यार्थी UMANG अॅप, डिजीलॉकर आणि एसएमएसद्वारे देखील तपासू शकतात.

असा पहाल निकाल

-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.


आंतरजिल्हा बदली टप्पा २ असा होणार...