डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आता होणार ४ हजार बदल्या

 शिक्षक बदली प्रक्रियेमधील ऑनलाइन बदलीचा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर म्हणजे आंतरजिल्हा बदली मध्ये 4000 शिक्षकांच्या बदल्या होणार असून .




या बदलांमध्ये अनेक शिक्षकांना आपल्या स्व जिल्ह्यामध्ये जाता येणार आहे.

 उद्यापर्यंत बदल्या जाहिर होणार आहेत .

 ऑनलाइन बदली मध्ये सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेली ही मोठी बदली ठरणार आहे .

सर्व बदली प्रक्रियेमध्ये जलद करण्यात येण्याचे  प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून या बदल्यांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.

 खूप शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्व जिल्हा जाण्याची संधी त्यांना या बदली प्रक्रियेमधून प्राप्त होणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा ...

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 



विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं आज 20 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नोकरी नाही म्हणून विद्यार्थ्यांची डी.टी.एडकडे पाठ फिरवली

दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.


एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी

 एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.



या भरतीअंतर्गत प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्राध्यापकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. 

ज्यासाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत साइट esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील

या भरती प्रक्रिये अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 88 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांची 9 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 29 पदं आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 50 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

ESIC Recruitment 2022 : पात्रतेचे निकष

या भरीत अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत अधिक तपशील तपासू शकतात.

ESIC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना निकाल त्यांना ई-मेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील. तसेच, निकाल अधिकृत साइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.

ESIC Recruitment 2022 : अर्ज शुल्क

SC/ST/PDW/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना या भरती मोहिमेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 225 रुपये भरावे लागतील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार ESIC ची अधिकृत साइट पाहू शकतात.

महागाई भत्ता १ जानेवारीपासून मिळणार

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुधारणा करणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय.

 दिनांक -17 ऑगस्ट 2022

दिनांक 1 जाने्वारी 2022 पासून महागाई भता 31% वरून 34%,

 1जाने ते 31 जुलै 22 पर्यंतची थकबाकी रोखीने ऑगस्ट 22 मध्ये मिळणार 



भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन

शासकीय कर्मचाऱ्यांना 3 % DA वाढ

 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.



ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

शिंदे सरकार सत्तेवर विराजमान येताच दुसऱ्यांदा नव्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.

थोरांच्या आठवणी लोकमान्य टिळक

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️



🇮🇳 *अमृत महोत्सवी स्वातंत्र्य  निमित्त ....*🇮🇳



*थोरांच्या आठवणी....*


           भाग १


🔮  *लोकमान्य टिळक*🔮




https://youtu.be/XORH0lm1oNE



*वाचक स्वर  - श्रीमती भारती डहाळे*

     ठाणे


*व्हिडीओ व प्रसारण*


*प्रकाशसिंग राजपूत*

     औरंगाबाद 


*विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा....👍🏻*

Gpf पहा घरी बसल्या digitalgpf

 आता आपल्याला छ. संभाजीनगर   जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला ज्याचा त्याचा जी.पी.एफ कधीही कुठे ही पहाता येणार आहे.  ही पोस्ट संग्रहित ठेवा.

digitalgpf असे सर्च करुन कधीही आपण Gpf पाहू शकता. 

जीपी.एफ पहाण्यासाठी खाली क्लिक करा...



या लिंकवर क्लिक करा व आपला जिपीएफ नंबर टाका...जसे आपला भनीनि E......टाकून प्रिंट ला क्लिक करणे.

तसेच मागील वर्षाच्या पावत्या वर्ष बदलून काढू शकता.

Digitalgpf

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या 

सौजन्याने आपल्यास GPF पहाण्यास उपलब्ध  



http://gpfzpaurangabad.in/



शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल

 देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.



देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या आणि शहिदांच्या आत्मत्यागाला सलाम करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

संरक्षण मंत्रालयासोबतच्या सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शिक्षण मंत्रालय शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथांचा समावेश करेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भारतातील वीरांचा सन्मान करण्यापेक्षा अमृत महोत्सवाचा दुसरा चांगला उत्सव असू शकत नाही. वीरगाथा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. ते म्हणाले की देशभक्तीची तीव्र भावना आणि आपल्या शूरवीरांप्रती कृतज्ञतेची भावना विकसित करण्याची ही गुरुकिल्ली आहे.

आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून, मुलांना शौर्य कृत्यांची प्रेरणा आणि माहिती देण्यासाठी वीर गाथा आयोजित करण्यात आली होती. 


21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना रेखाचित्रे, निबंध, कविता आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यामधून 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि मूल्यांकनाच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांना “सुपर 25” म्हणून घोषित करण्यात आले.

मुलांमध्ये लहानपणापासूनच ‘राष्ट्राप्रती जबाबदारी’ची भावना दृढ करण्यासाठी शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून आपल्या सैनिकांचे शौर्य आणि गेल्या 75 वर्षांतील भारताची वीरगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे काम करेल असंही केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. त्यामुळे आता लवकरच विविध वीरांची यशोगाथा मुलांना लवकरच शालेय अभ्यासक्रमात शिकायला मिळणार आहे.

राज्याचे मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर..#maharashtra,

 राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.



त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

श्री  राधाकृष्ण विखे-पाटील - 

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

------------------------------------------------------------

सुधीर मुनगंटीवार- 

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

------------------------------------------------------------

चंद्रकांत पाटील- 

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

------------------------------------------------------------

डॉ. विजयकुमार गावित- 

आदिवासी विकास

------------------------------------------------------------

गिरीष महाजन- 

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

------------------------------------------------------------

गुलाबराव पाटील-

 पाणीपुरवठा व स्वच्छता

------------------------------------------------------------

दादा भुसे-

 बंदरे व खनिकर्म

------------------------------------------------------------

संजय राठोड- 

अन्न व औषध प्रशासन

------------------------------------------------------------

सुरेश खाडे- 

कामगार

------------------------------------------------------------

संदीपान भुमरे- 

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

------------------------------------------------------------

उदय सामंत- 

उद्योग

------------------------------------------------------------

प्रा.तानाजी सावंत- 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

------------------------------------------------------------

रवींद्र चव्हाण - 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

------------------------------------------------------------

अब्दुल सत्तार-

 कृषी

------------------------------------------------------------

दीपक केसरकर-

 शालेय शिक्षण व मराठी भाषा

------------------------------------------------------------

अतुल सावे-

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

------------------------------------------------------------

शंभूराज देसाई- 

राज्य उत्पादन शुल्क

------------------------------------------------------------

मंगलप्रभात लोढा- 

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर...