डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक प्रेरणा परीक्षा विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून

 शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याबाबतचे आदेश मा. विभागीय आयुक्त मराठवाडा  मा. सुनिल केंद्रेकर यांनी निर्गमित केले असून यामागे शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी. विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी.



 या हेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची संदर्भान्वये प्रस्तुत कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुत सभेत विविध शिक्षक संघटनांनी आपली भुमिका विषद करत शिक्षक प्रेरणा परीक्षेस अनुमोदन दिले होते.


त्याअनुषंगाने औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करावे असे आदेश काढण्यात आलेले आहेत.


विभागीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष - विभागीय आयुक्त

सदस्य सचिव संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद -

सदस्य - उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

सदस्य - विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग

सदस्य - विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग


जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष जिल्हाधिकारी

सहअध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)

सदस्य - अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -

सदस्य - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद

सदस्य - प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था


आर्थिक नियोजन समिती (जिल्हा स्तर) :-


अध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य- मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य - लेखाधिकारी वर्ग-1 वित्त विभाग, जिल्हा परिषद

सदस्य - शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


परीक्षा स्वरूप कसे असणार...


प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरुपाची व 50 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नास 01 गुण दिला जाईल.

चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.

परीक्षेची वेळ ही प्रत्येक विषयासाठी 01 तासांची असेल. परीक्षेकामी पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांची नियुक्ती जिल्हा संनियंत्रण समिती करेल.

उत्तरपत्रिका या ओएमआर मशीनवर तपासल्या जातील अशा स्वरुपाच्या असतील. सदर उत्तरपत्रिकांची छपाई ही जिल्हास्तरावर केली जाईल.

उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे आसन क्रं. नोंदवून घेतला जाईल.

उत्तराच्या योग्य पर्यायावर गोल करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा.

उत्तर पत्रिकेवर उत्तर नोंदवितांनाच्या व इतर नोंदीच्या सूचना उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर देण्यात याव्यात.

परीक्षा संपन्न झाल्यानंतर परीक्षार्थीची उपस्थिती यादी, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या पर्यवेक्षक केंद्रसंचालकांकडे जमा करतील. केंद्रसंचालक या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उपस्थिती अहवाल स्वतंत्ररित्या सीलबंद करुन जिल्हाकक्षाकडे सुपूर्द करतील.

परीक्षा संपन्न झाल्यानंतर जिल्हा कक्ष प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करेल. तसेच ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी करुन परीक्षार्थीनी संपादन केलेल्या गुणांची विषयनिहाय यादी तयार करेल. ( गुणांची यादी करत असतांना ऋण गुण मिळालेल्या गुणांमधून

वजा केले जातील व अंतिम निकाल तयार केला जाईल. )

परीक्षेमध्ये अंतिम गुणांच्या आधारे एकुण गुणांपैकी 50% व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यांस उत्तीर्ण ठरविले जाणार आहे.

अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थ्याच नावे, उत्तीर्ण परीक्षार्थ्यांची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषीत करण्यात येणार .

गुणानुक्रमे जिल्ह्यातुन प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थीना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करुन CSR / सेस फंडातून भेटवस्तु देऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.


परीक्षेसाठी अभ्यासक्रम :-


इ. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या SCERT / NCERT पाठ्य पुस्तकांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील.

उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे. तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.

परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित मुख्य जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालुन परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील..


   विश्लेषण 

प्रकाशसिंग राजपूत 



आदेश पहा....👇


परीक्षा आदेश डाऊनलोड करा


शिक्षक भरती (Teachers recruitment)

 शिक्षक भरती (Teachers recruitment) 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया  जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार  आहे. त्यासाठी लवकरच शिक्षक भरतीसाठी असलेले पवित्र पोर्टल हे अॕक्टिव्ह होणार आहे.



🔘 विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे.

🔘 शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहायवितरण 20 मे पर्यंत होणार आहे.


🔘   या संच मान्यतेतील मंजूर पदांनुसार पद भरतीची(Teachers recruitment)  कार्यवाही सुरु होईल.

 

🔘  संबंधित शाळा व्यवस्थापनांना शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर 15 जुलै पर्यंत रिक्त पदे नोंदवून पोर्टलवर जाहिरात दिली जाईल.

 

🔘   शिक्षण संचालनालयाकडून 17 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची (Teachers recruitment) कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याचं प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.

नॉन क्रिमिलिअर ची अट महिला उमेदवारांसाठी रद्द वाचा सविस्तर...

🔘  20 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे आधी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.


या ब्लाॕगला  खालील Follow  बटणने follow करा व अपडेट रहा....


 

Rte प्रवेश आता नव्याने मुदतवाढ

 खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

    प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.



     या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ प्रवेशांच्या जागा उपलब्ध झाल्या. या जागांसाठी तीन लाख ६४ हजार ४१३ बालकांच्या पालकांनी अर्ज केले. प्रवेशासाठीच्या सोडतीनंतर ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली. 

    १३ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरू झाल्यापासूनच या प्रक्रियेत पालकांचा थंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रवेशाबाबतच्या तक्रारी आणि अपील अर्जांबाबत सुनावणी घेऊन प्रकरणे १५ मेपर्यंत निकाली काढण्यात येणार आहे. 




नर्सरी सुरू करण्यापूर्वीदेखील आता घ्यावी लागणार शिक्षण विभागाची परवानगी

 प्री-प्रायमरी, केजी अन् नर्सरी सुरू करण्यापूर्वीदेखील आता घ्यावी लागणार शिक्षण विभागाची परवानगी....




गल्लीबोळातील प्ले स्कूल, प्री-प्रायमरी, केजी, नर्सरी शाळांवर आतापर्यंत कुणाचेही नियंत्रण नव्हते. मात्र, आता यापुढे अशा शाळा मनमानी पद्धतीने चालवता येणार नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्ले स्कूल  या शाळा सुरू करताना शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार असून या सर्व  शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण  राहणार आहे. निपुण वर्ग, शाळा, क्षमता याअंतर्गत  नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

आता नाॕन क्रिमिलेअर अट रद्द

 खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत.

या बाबतचा शासन निर्णय दि. ४/५/२०२३ खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकतात.




अशीच नवनवीन माहिती साठी या साईटला follow करा व नविनतम पोस्टची अपडेट मिळवा...


शासन निर्णय पहा....




राजर्षी शाहू महाराज यांचे विचार

 🌺🌺 *राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षक व शिक्षणविषयी विचार....🌸🌷*


https://youtu.be/ObMV9NHHkik


*जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व शैक्षणिक समूहात शेअर करा... डिजिटल स्कूल चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...*





मानवा राख शिष्टाचार newsong,

 *कोविड आजार आता जरी जागतिक महामारी नसली तरी मानव जातीचे खूप मोठे नुकसान त्या आजाराने केलेले आहे.... लाॕकडाऊन काळातील यावर,  लिहिलेले माझे गीत व्हिडीओ स्वरूपात सादर...*



*मानवा तु राख शिष्टाचार ....*





https://youtu.be/7tapQzxJrOs



आता गुगल खाते होणार अधिक सुरक्षित

 पासवर्डरहित भविष्य यातील Google चे पुढचे पाऊल म्हणजे पासकीज — एक नवीन क्रिप्टोग्राफिक की सोल्यूशन ज्यासाठी पूर्वप्रमाणित डिव्हाइस आवश्यक आहे.



सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवरील Google खात्यांवर येत आहेत.  आजपासून, Google वापरकर्ते पासकीजवर स्विच करू शकतात आणि साइन इन करताना त्यांचे पासवर्ड आणि द्वि-चरण सत्यापन कोड पूर्णपणे काढून टाकू शकतात.

 पासकीज हे Google, Apple, Microsoft आणि FIDO अलायन्सशी संरेखित इतर तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे पुश केल्या जाणाऱ्या पासवर्डसाठी एक सुरक्षित, अधिक सोयीस्कर पर्याय आहेत. 

 ते पारंपारिक पासवर्ड आणि इतर साइन-इन सिस्टम जसे की 2FA किंवा SMS पडताळणी स्थानिक पिन किंवा डिव्हाइसचे स्वतःचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण - जसे की फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी बदलू शकतात. 

 हा बायोमेट्रिक डेटा Google (किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्ष) सह सामायिक केला जात नाही आणि पासकी फक्त तुमच्या डिव्हाइसवर अस्तित्वात राहील, जे फिशिंग हल्ल्यात चोरीला जाऊ शकणारा कोणताही पासवर्ड नसल्यामुळे अधिक सुरक्षा आणि संरक्षण प्रदान करते.

असे असणार पासकी....

जेव्हा तुम्ही Google खात्यामध्ये पासकी जोडता, तेव्हा तुम्ही साइन इन करता तेव्हा किंवा अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता असलेल्या संभाव्य संशयास्पद गतिविधी शोधल्यावर प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी सूचित करेल.  

Google खात्यांसाठी पासकी कोणत्याही सुसंगत हार्डवेअरवर संग्रहित केल्या जातात — जसे की iOS 16 वर चालणारे iPhone आणि Android 9 वर चालणारे Android डिव्हाइस — आणि iCloud सारख्या सेवा वापरून OS वरून इतर डिव्हाइसेसवर किंवा Dashlane आणि 1Password (येणे अपेक्षित आहे  "2023 च्या सुरुवातीस").


तुमच्या Google खात्यामध्ये तात्पुरता अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही अजूनही दुसऱ्या कोणाचे तरी डिव्हाइस वापरू शकता.  "दुसर्‍या डिव्हाइसवरून पासकी वापरा" पर्याय निवडल्याने एक-वेळ साइन-इन तयार होते आणि पासकी नवीन हार्डवेअरवर हस्तांतरित होणार नाही.  Google ने नोंदवल्याप्रमाणे, तुम्ही सामायिक केलेल्या डिव्हाइसवर कधीही पासकी तयार करू नये कारण त्या डिव्हाइसमध्ये प्रवेश आणि अनलॉक करू शकणारे कोणीही तुमच्या Google खात्यात प्रवेश करू शकतील.



जुनीपेन्शन संदर्भात जालना येथे सहविचार सभा

 _*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समनव्य समिती* ची जालना येथे सहविचार सभा संपन्न झाली._



    _या सभेमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या समिती समक्ष तथा शासनस्तरावर सर्व संघटनेच्या लेटर पॅड वर *"म.ना.से.अधि 1982 व 1984 ची जुनी पेंशन योजना पूर्ववत लागु करावी "* ही एकमेव मागणी घेऊन  मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री, व समिती अध्यक्ष यांना वरील एकमेव मागणी देणारे निवेदन द्यावे अशी विनंती उपस्थित पदाधिकारी यांना केली._

     _या बैठकीसाठी माझ्या सोबत आपल्या संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष देशपांडे व जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर उपस्थित होते._ 


_गोविंद उगले,महासचिव_

*_महाराष्ट्र राज्य राज्य जुनी पेंशन संघटना._*


🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

बदली आॕनलाईन की आॕफलाईन #transfer,

 बदली प्रक्रिया सतत बदलत परत तिथेच....

शिक्षक बदली प्रक्रिया ही दिवसेंदिवस फारच जठील होत चाललेली आहे .

यासाठी दोन वेळेस ऑनलाईन बदलीचे सॉफ्टवेअर निर्माण झालेले आहे .असंख्य सुधारित धोरणही तयार करण्यात आले परंतु परिस्थिती जर पाहिली तर ऑनलाईन बदली प्रक्रिया ही वेळखाऊ ठरत आहे .

ज्यामुळे आता पूर्ण संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. ऑनलाइन बदली प्रक्रियेत जितके न्यायालयीन प्रकरणे झाली तितके आजवर ऑफलाईन बदलीत कधी झालेले दिसून येत नाही.

 मध्यंतरीच्या काळात आलेला एलसीडी पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी मानला गेला जाऊ शकतो. कारण या बदली प्रक्रियेमध्ये बदली मागणाऱ्याला समोरच पर्याय देऊन बदली केल्या जायची आणि त्याचे समाधान त्या बदलीवर निश्चितच होऊन जायचे जवळजवळ 90% च्या वर समाधान या बदली मध्ये होऊन जायचे. परंतु आता जर विचार केला तर ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये प्रत्येक संवर्गात  प्रत्येक घटकावर अन्याय होत आहे असे दिसून येत आहे. आणि या बदली प्रक्रियेमधून खरंतर वेळ वाचवणारी प्रक्रिया हवी होती.



 तसं न होता यामध्ये अधिकार वेळ संपूर्ण प्रशासन व शिक्षकांचा जात आहे. एका हिशोबाने पाहिले तर आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन बदली प्रक्रिया ही वरदानच म्हणावी लागेल कारण आंतर जिल्हा बदलीला या प्रक्रियेने गतिमान केलेले आहे .

त्या स्वरूपात जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन बदलीनेस केल्या गेल्यास याचा निश्चितच सर्वांना फायदा होणार आहे, परंतु जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही  जर एलसीडी पॅटर्ननुसार करण्यात आली व यासाठी जो संकलित डाटा जर एका ठिकाणी घेऊन असं जर करण्यात आले तर यामध्ये असं वाटत नाही की कोणावर अन्याय होईल माहिती संपूर्णतः निपक्षपाती राहून कुणालाही फायदा अथवा अन्याय करणारी ठरणार नाही .

संवर्ग निहाय या प्रकीयेत लवकरच बदली प्रक्रिया पुर्ण होण्यास लाभ होईल.

    प्रकाशसिंग राजपूत 

समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

हे केवळ माझे वैयक्तिक मत आहे  आपणांस काय वाटते ते काॕमेंट करा.....