डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

चांद्रयान 3 #mission moon,

  भारत परत एकदा नव्याने एक मोठा मिशन घेऊन आलेला आहे चांद्रयान तीन म्हणून हे मिशन आपणास माहीत असणार आहे.  

 आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी ठीक  दुपारी दोन वाजून 34 मिनिटांनी हे अवकाशात चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित होणार आहे.

 या इतिहासाच्या नोंदीचे आपणही साक्षीदार होऊ शकतात हे आपल्या विद्यार्थ्यांनाही आपण दाखवून दाखवू शकता व भारताने साधलेली आजवरची एकूण प्रगतीची एक गौरवास्पद बाब आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकता मित्रांनो निश्चितही पोस्ट सर्व विद्यार्थ्यांना पालकांना गावकऱ्यांना आणि शैक्षणिक गटावर आपण पोहोचवावी ही आपणास नम्रपणे विनंती आहे.

आपणास दोन वाजून 34 मिनिटांनी लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आपण क्लिक करावे किंवा व्हिडिओ बॉक्सला आपण क्लिक करावे.


१ वाजून ५० मिनिटांनी Live पहा...




इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे

 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकूणच प्री स्कूल ते बारावीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

सेमिस्टर पॅटर्न, १५० विषयांची पाठ्य पुस्तके, जादुचा पेटारा आदींचा समावेश या बदलात असणार आहे.

खासकरुन नववी ते बारावी या तीन वर्षाच्या शैक्षणिक कार्यक्रमात मोठा बदल होणार आहे.

पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही पूर्णपणे बदलणार आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा एकूणच आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५० विषयांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना यातूनच आपले पर्याय निवडायचे आहेत. विशेष म्हणजे अकरावी व बारावीसाठी विज्ञान, वाणिज्य व कला अशा तीनच शाखा होत्या. आता संगीत, क्रीडा, हस्तकला व व्यावसायिक शिक्षणांनाही गणीत, विज्ञान, मानव्य शाखा, भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांप्रमाणे दर्जा मिळणार आहे.



नववी ते बारावीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) तयार करण्यात आला आहे. प्री-स्कूलमध्ये मुलांना पिशव्याशिवाय शिकवले जाईल. तीन ते आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना शाळेत दप्तर आणण्याची गरज नसेल. या मुलांचा जादुचा पेटारा मिळणार असून यामध्ये ५३ प्रकारचे खेळ, पोस्टर खेळणी, बोर्ड, बिल्डींग ब्लॉक, प्लेईंग कार्ड आदींचा समावेश असणार आहे. याचाच आधार घेऊन मुलांना शिकविले जाणार आहे.

थोडक्यात स्वरूप असे असणार...

सेमिस्टर पद्धतीचा अवलंब
इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे. तिन्ही वर्गांमध्ये प्रत्येकी १६ विषयांची परीक्षा द्यावी लागेल. नववीचा निकाल दहावीच्या निकालात जोडला जाईल व अकरावीचा निकाल बारावीच्या निकालाशी जोडला जाणार आहे.

स्थानिक भाषेचा वापर
इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक भाषेत असणार आहे. इयत्ता तिसरीमध्ये ८ ते ११ वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार असून प्रथमच त्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. पाचवीच्या वर्गात दुसऱ्यांदा मूल्यमापन होईल.

चार टप्प्यांमध्ये विभागणी
इयत्ता पहिली ते दुसरी फाऊंडेशन स्टेज, तिसरी ते पाचवी तयारी टप्पा, सहावी ते आठवी मध्यम आणि नववी ते बारावी माध्यमिक टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे. स्थानिक भाषेच्या वापराने विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडून घेणे सोपे होणार आहे.






pavitra portal पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती... आता 1 : 10 ऐवजी 1 : 3 उमेदवार..

 मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येईल pavitra portal.


संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करावयाची आहे. त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करावी.


२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७०६१७५९४७१६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



pavitra portal


conclusion-pavitra portal

Da hike

 राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात


सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.


२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरुन ४२% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.


महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे


३. यापुढे लागू राहील.


शासन आदेश पहा...




setu सेतू अभ्यासक्रम व पुर्वचाचणी


सेतु अभ्यासक्रम सन २०२३ -२४ 

अनु. क्र.इयत्तामराठी माध्यमउर्दू माध्यम
1.इयत्ता २ रीDownload Download 
2.इयत्ता ३ रीDownload Download 
3.इयत्ता ४ थीDownload Download 
4.इयत्ता ५ वीDownload Download 
5.इयत्ता ६ वीDownload Download 
6.इयत्ता ७ वीDownload Download 
7.इयत्ता ८ वीDownload Download 
8.इयत्ता ९ वीDownload Download 
9.इयत्ता १० वीDownload Download 

  सेतु पुर्वचाचणी मराठी माध्यम परीक्षा 2023

अनु. क्र.इयत्तागणितमराठीइंग्रजीविज्ञानसामाजिक शास्त्र
1.इयत्ता २ रीDownload Download Download 
2.इयत्ता ३ रीDownload Download Download 
3.इयत्ता ४ थीDownload Download Download 
4.इयत्ता ५ वीDownload Download Download 
5.इयत्ता ६ वीDownload Download Download Download Download 
6.इयत्ता ७ वीDownload Download Download Download Download 
7.इयत्ता ८ वीDownload Download Download Download Download 
8.इयत्ता ९ वीDownload Download Download Download Download 
9.इयत्ता १० वीPart 1  | Part 2 Download 

सेतू अभ्यास पूर्व चाचणी : उर्दू माध्यम

अनु. क्र.इयत्ताइंग्रजी
1.इयत्ता २ रीDownload 
2.इयत्ता ३ रीDownload 
3.इयत्ता ४ थीDownload 
4.इयत्ता ५ वीDownload 
5.इयत्ता ६ वीDownload 
6.इयत्ता ७ वीDownload 
7.इयत्ता ८ वीDownload 
8.इयत्ता ९ वीDownload 
9.इयत्ता १० वीDownload 

शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबत

 शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबत


राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळांच्या शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबतचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रकरणी खालील मुद्द्यांची माहिती शासनास आजच सादर करावी. असे आदेशात निर्गमित करण्यात आलेले आहे.



१. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या इ. १ ली ते इ. ४ थी, इ. १ ली ते इ. ७ वी, इ. ५ वी ते इ. ७ वी च्या किती शाळांना

इ. ५ वी / इ. ८ वी चा वर्ग जोडावयाची कार्यवाही अद्यापपर्यंत प्रलंबीत आहे. 

२. तसेच राज्यातील किती जिल्हा परिषद शाळा संबंधीत नगरपालिका/ महानगरपालिका/ कटकमंडळे यांच्याकडे स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत,

   अशी माहिती ही शिक्षण संचालकांना विचारण्यात आलेली आहे. 


संपुर्ण शासन आदेश पहा....

Jumping In shapes

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.

 या शाळेचा परिसर अगदी हिरव्यागार झाडांनी(मियावाॕकी घनवनाने) व्यापलेला आहे .शाळा अत्यंत दुर्गम डोंगर भागात असून शाळेचा परिसर फारच सुंदर आहे.

आंनददायी शिक्षणाचा सदैव वापर येथे होत आहे. शाळेतील दोन्हीही शिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण घेत आहे.

शाळेतील नाविण्यपुर्ण उपक्रम हे शाळेच्या एकूणच प्रगतीची उंची वाढवितात. 

आज विद्यार्थ्यांना learning shapes ही activity ही jumping in shapes या आनंददायी कृतीतून घेण्यात आली. प्रकाशसिंग राजपूत यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना त्यांच्या चप्पलचा वापर करून आखलेल्या भौमितिक  आकारात लावण्यात सांगितले तेव्हा आकाराची प्रत्यक्ष निर्मिती ते करु शकले व आनंद घेत खेळाच्या माध्यमातून शिक्षकांनी सांगितलेल्या  आकारात उडी घेण्याचे एकूणच कसब ते शिकले.

सूचना ऐकून ठराविक आकार ओळखून उडी घेणे बौद्धिक व शारीरिक कसब वाढविणारे ठरले.

   प्रकाशसिंग राजपूत व  दिलीप आढे 

सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी ,

कें करमाड , ता/जि. छ. संभाजीनगर 






 https://youtu.be/qRDGiAa3DL4

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नोंदणीसाठी लिंक सुरू झाली आहे. इच्छुकांनी लाभ घ्या.

https://nationalawardstoteachers.education.gov.in/

23 जून ते 15 जुलै 2023 ऑनलाइन अर्ज आमंत्रित करण्यासाठी आणि शिक्षकांकडून स्व-नामांकनासाठी वेब पोर्टल उघडणे


16 जुलै ते 25 जुलै 2023


जिल्हा / प्रादेशिक निवड समितीचे नामनिर्देशन होणार आहे

राज्याकडे पाठवले जातील.




26 जुलै ते 3 ऑगस्ट 2023 

राज्य निवड समिती संघटना निवड समिती निवड यादी स्वतंत्र राष्ट्रीय ज्युरीकडे पाठवली जाईल


4 आणि 5 ऑगस्ट 2023

राष्ट्रीय ज्युरीसमोर सादरीकरणे करण्यासाठी सर्व निवडलेल्या उमेदवारांना शिक्षण मंत्रालयाकडून सूचना जारी केल्या जातील (एकतर सामान्य वर्षांप्रमाणे NCERT मधील भौतिक पद्धतीने किंवा कोविड  मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ऑनलाइनद्वारे)

7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 ज्युरीद्वारे निवड प्रक्रिया नावांचे अंतिमीकरण

शिक्षक बदली नविन धोरण

14 ऑगस्ट 2023

स्वतंत्र राष्ट्रीय ज्युरीद्वारे


16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023 माननीय शिक्षा मंत्री यांच्या मान्यतेनंतर निवडलेल्या उमेदवारांना सूचना


4 आणि 5 सप्टेंबर 2023 तालीम आणि पुरस्कार सोहळा


अर्ज आणि निवड प्रक्रिया:


सर्व अर्ज ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे प्राप्त होतील.

MOE पोर्टलमध्ये वेळेवर प्रवेश करण्याबाबत आणि पोर्टल डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे पोर्टलमध्ये डेटा एंट्री करताना तांत्रिक आणि ऑपरेशनल समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्ये/यूटीएसशी समन्वय सुनिश्चित करेल.

*राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नोंदणीसाठी लिंक....

https://nationalawardstoteachers.education.gov.in/

शिक्षक बदलीने संपूर्ण गाव रडले

 पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी बारा वर्षांपूर्वी लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले होते.

 पण त्यांची बदली झाल्यानंतर प्रत्येकाचे अंत:करण भरून आले होते. गेल्या बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत वेळेचे भान न ठेवता या शाळेसाठी आणि तेथील मुलांसाठी एक प्रेरणास्थान, एक आदर्श शिक्षक म्हणून एक गुरु म्हणून अनेकांना मार्गदर्शन केले.



शिक्षक बदलीचे कसे आहे नविन धोरण....

TAIT अंतर्गत शिक्षक भरती नविन अटी

 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी

परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारीत अटी लागू करणेबाबतचा शासन निर्णय ...

राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या नियुक्त्यांसाठी खालीलप्रमाणे सुधारीत अटी लागू करण्यात येत आहेत:-


१) ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तथापि, सदर बदल्यांमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधिन ठेऊन जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी. त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी. तसेच, अवघड क्षेत्राच्या निकषांचे पुनर्विलोकन करुन सुधारीत निकषांचा समावेश बदली धोरणामध्ये करावा.


२) जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी. ३) उपरोक्त प्रमाणे बदलीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणित संचमान्यतेनुसार


रिक्त असणाऱ्या पदांची मागणी पवित्र प्रणालीवर करण्यात यावी. मागणी करण्यात


आलेल्या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे बिंदूनामावलीप्रमाणे भरण्याकरीता पवित्र


प्रणालीव्दारे शिक्षक उपलब्ध करण्यात येतील.


४) नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. ५) तथापि, नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रीयेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहील.


६) जिल्हाअंतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत इ. अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे.


७) पवित्र प्रणालीव्दारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाव्दारे पुढील कार्यपध्दतीप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती करावी.


(अ) जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांची यादी तयार करण्यात यावी.


सदर यादीमध्ये अवघड क्षेत्रातील सर्व रिक्त पदांचा समावेश राहील याची


खात्री करावी.

(आ) प्रथम दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता


चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे


वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी. (इ) त्यांनतर महिला उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती


देण्यात यावी.


(ई) त्यानंतर उर्वरित उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी.


८) वरील ४ ते ७ मधील नमुद मुद्दयांच्या आधारावर अटी व शर्ती जाहीरातीमध्ये व नियुक्ती


पत्रामध्ये संबंधित प्राधिकारी यांनी नमूद करावे. ९) शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाच्या परिविक्षाधीन कालावधीतील त्याच्या सेवेचे मूल्यमापन करण्यासाठी “मूल्यमापन चाचणी" घेण्यासाठी तसेच त्याचे वर्तन याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्यात यावी.


१०) सदर मूल्यमापन चाचणीचे स्वरुप तसेच इतर आवश्यक नियमावली राज्य शैक्षणिक


संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व आयुक्त (शिक्षण) यांनी संयुक्त रित्या


निश्चित करावी.


११) सदर समितीने सादर केलेल्या अहवालास अनुसरुन जर काही शिक्षकासंदर्भात कर्तव्यात कसूर केल्याचे वा शिक्षकांसाठी विहीत आचारसंहितेचा भंग केल्याचे निष्पन्न होत असल्यास अशा शिक्षकास बदली करणे ही शिक्षा ठरत नसल्याने त्यास प्रथमतः वर्तणुकीमध्ये स्वत:हून सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतर • वर्तणुकीमध्ये सुधारणा न आढळल्यास त्यास ६ महिन्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. त्यानंतरही वर्तणूक न सुधारल्याचे निदर्शनास आल्यास त्यास ६ महिन्यासाठी ५० टक्के वेतनावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आणखी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. यानंतरही संबंधित शिक्षकाचे वर्तणूक न सुधारल्यास सदर शिक्षकावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये विहीत केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी कारवाई करावी,


१२) शाळेमध्ये व शाळेच्या आवारामध्ये मद्य, तंबाखू तसेच तंबाखुजन्य पदार्थ बाळगणे व सेवन यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. असे करताना कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.


शासन निर्णय डाऊनलोड करा...