डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा

 इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून याबाबत आवेदन पत्र शाळेमार्फत मागविण्यात येत आहे.

 यासाठी तारीख ही जाहीर झालेले आहे .

इयत्ता आठवी इयत्ता पाचवी या वर्गासाठी विद्यार्थ्यांची करावयाचे प्रवेश पत्र भरावयाच्या कार्यवाहीचे  माहिती खालील पत्रकामध्ये आपणास समजून येईल.


आवेदन भरण्यासाठी व साईटवर जाण्यासाठी ...






पुणे झेडपी गो बॕक

  पुणे जिल्हा परिषदेकडून गेल्या दीड वर्षांपासून वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला लक्ष्य केल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा राग व्यक्त करीत ग्रामस्थांनी थेट शाळेपुढेच 'पुणे झेड पी गो बॅक' असे लिहिलेला भला मोठा फलक लावून शाळेवरील हक्क सोडून देण्यासाठीची मागणी केली आहे. 



'आम्ही आमच्या पद्धतीने आमची मुले शिकवू. आमचा तुम्हाला कोपरापासून नमस्कार!' असा आशय असलेला हा फलक नेमका शाळाप्रवेशद्वाराजवळच लावला आहे.

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती वेळापत्रक

शाळेची चौकशी करण्याचा अर्ज चौकशी सुरू केल्यानंतर मागावून घेतलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळा बदनामीच्या षडयंत्रानंतर



शाळेला गेल्या दीड वर्षात नियमित मुख्याध्यापकही देता आला नाही. ग्रामस्थांवरच संशय उपस्थित केला गेल्याने शाळेतील अभ्यासक्रमासोबत सुरू केलेले १० उपक्रम पूर्ण बंद झालेत. त्याचाच परिणाम शाळेतील २२० विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. गेल्या नऊ वर्षात ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून कोट्यवधी रुपयांची


कामे केली असताना जिल्हा परिषदेने फक्त शौचालयापलिकडे काहीच योगदान नाही. त्याचाच राग व चिड ग्रामस्थांमध्ये धगधगत असून, त्याचा परिणाम म्हणून सोबतचा फलक ग्रामस्थ व पालकांनी लावल्याची प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सुरेखा वाबळे, सतीश कोठावळे यांनी दिली.

गृहकर्ज आता महागणार

 

आरबीआयने आपल्या पतधोरणाची घोषणा केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.


त्यानंतर रेपो दर आता 6.25 टक्के इतका झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे.



रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक सोमवारपासून सुरू होती.

 त्यानंतर आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत देसाई यांनी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. त्यांनी म्हटले की, आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत. 

सध्या देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. जगातील भूराजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आव्हाने निर्माण झाले असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले.

रिझर्व्ह बँकेने आपल्या मागील तीन पतधोरण बैठकीत रेपो दरात एकूण 1.90 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. जून आणि ऑगस्टमध्ये 50-50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या या बैठकीआधी रेपो रेट 5.90 टक्के इतका होता. आज 0.35 टक्क्यांच्या दरवाढीनंतर रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे.