डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

संपूर्ण मराठवाडयातील संवर्ग १ ची तपासणी होणार

 जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळावं म्हणून बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या घटनेची विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून बीडच्या धर्तीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्वच जिल्हा परिषद यांना पत्र पाठवण्यात आले आहे. 







ज्यात संवर्ग 1 मधून बदली वा सूट मिळविलेल्या गुरुजींची वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवर्ग 1 मधून बदली झालेले तसेच सूट मिळविलेल्या गुरुजींची स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एवढेच नाही तर प्रमाणपत्रांची पडताळणीही करण्यात आली. यातून तब्बल 70 हून अधिक शिक्षक दोषी ठरविण्यात आले आहेत. 

यानंतर त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. एवढेच नाही तर विभागीय चौकशीही प्रस्तावित केली आहे.

 दरम्यान बीडच्या धर्तीवर संवर्ग 1 मधील शिक्षकांची  वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी करावी, असे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाने काढले आहेत. संबंधित कार्यवाहीअंती जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही नमूद केले आहे.

पंजाबचे शिक्षक अशैक्षणिक कामे करणार नाहीत

 

पंजाबचे शिक्षक  शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याची घोषणा पंजाबचे  मुख्यमंत्री  भगवंत मान यांनी केली आहे.



निवडणूक आयोगानं  नुकतीच पंजाब शासनाकडे जनगणनेसाठी 68 हजार शिक्षकांची मागणी केली होती. पण या कामासाठी  शिक्षक दिले तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा सवाल मुख्यमंत्री  यांनी उपस्थित करत  जनगणनेच्या कामाला शिक्षकांना लावण्यास नकार दिले. राज्यात शिक्षकांची दिली जाणारी शिक्षणबाह्य कामे बंद करावी ही मान यांची प्रमुख मागणी आहे.

महाराष्ट्रात  अशैक्षणिक कामांचा बोजा....

अनेकदा शिक्षकांना शाळेबाहेरील अशैक्षणिक कामे दिली जातात. 

 शिक्षकांना जनगणना, निवडणूक मतदार नोंदणी यासारखी 150 हून अधिक प्रकारची कामे करावी लागतात. त्यामुळं शिक्षकांवरील अतिरीक्त कामाचा ताण कमी करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून अनेकदा  करण्यात आलेली आहे. 

शिक्षक आणि त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. राज्य शासनाकडून शिक्षकांवर अशी कामे लादली जातात. शिक्षक संघटना त्यास विरोध करतात. अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकतात, काही वेळा शासन निर्णय बदलते किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात. शिक्षकांवर शालाबाह्य कामांचा भार नेहमीच अधिक असल्याचे दिसून येते.

शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार नाहीत, असे परिपत्रकही शासनाने 2013 मध्ये काढले होते. त्यावेळी शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. 

किमान यापुढे तरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळ देता येईल आणि मुलांचा विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, शासनाचा हा निर्णय फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच निर्णय बदलत शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावीच लागतील असे परिपत्रक काढण्यात आले. शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, निवडणूक, सर्वेक्षण अशी विविध अशैक्षणिक कामे करणेही भाग पडते. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहणे, लसीकरण मोहिम राबवणे, सरकारी खात्यातील विभागांना मदत करणे यासारखी कामांचाही समावेश आहे.




बदली अपडेट

बदली अपडेट महत्त्वाचे ....


  *संवर्ग ०४ मधील शिक्षकाना कळविण्यात येते की , संवर्ग ०४ मधील  फेरी ०१ मधील विस्थापित शिक्षकाना फेरी २ मध्ये अर्ज करण्यासाठी १ दिवस वाढवून देण्यात आलेला असून  आपले बदली अर्ज ऑनलाइन करुन घ्यावेत.


*आता दि १२-०२-२०२३  रोजी रात्री ठीक १२:०० वाजता बदली पोर्टल बंद होत आहे .*

*आपण आपला अर्ज ऑनलाइन केला असेल आणि जर आपणास आपला अर्ज चुकला आहे असे वाटत असेल किंवा पसंतीक्रमामध्ये बदल करायचा असेल तर आपला ऑनलाइन केलेला अर्ज विड्रॉ करुन परत पसंतीक्रम अद्ययावत करुन आपला अर्ज सबमिट करु शकता.



  *जर आपण अर्ज केला नाही तर आपली बदली याच फेरीमध्ये  रॅंडम राउंड ने दुर्गम क्षेत्रातील रिक्त पदावर होवु शकते याची गंभिर्याने नोंद घ्यावी.*