डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

थोरांच्या आठवणी लोकमान्य टिळक

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️



🇮🇳 *अमृत महोत्सवी स्वातंत्र्य  निमित्त ....*🇮🇳



*थोरांच्या आठवणी....*


           भाग १


🔮  *लोकमान्य टिळक*🔮




https://youtu.be/XORH0lm1oNE



*वाचक स्वर  - श्रीमती भारती डहाळे*

     ठाणे


*व्हिडीओ व प्रसारण*


*प्रकाशसिंग राजपूत*

     औरंगाबाद 


*विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा....👍🏻*

Gpf पहा घरी बसल्या digitalgpf

 आता आपल्याला छ. संभाजीनगर   जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला ज्याचा त्याचा जी.पी.एफ कधीही कुठे ही पहाता येणार आहे.  ही पोस्ट संग्रहित ठेवा.

digitalgpf असे सर्च करुन कधीही आपण Gpf पाहू शकता. 

जीपी.एफ पहाण्यासाठी खाली क्लिक करा...



या लिंकवर क्लिक करा व आपला जिपीएफ नंबर टाका...जसे आपला भनीनि E......टाकून प्रिंट ला क्लिक करणे.

तसेच मागील वर्षाच्या पावत्या वर्ष बदलून काढू शकता.

Digitalgpf

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या 

सौजन्याने आपल्यास GPF पहाण्यास उपलब्ध  



http://gpfzpaurangabad.in/



शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल

 देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.



देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या आणि शहिदांच्या आत्मत्यागाला सलाम करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

संरक्षण मंत्रालयासोबतच्या सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शिक्षण मंत्रालय शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथांचा समावेश करेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भारतातील वीरांचा सन्मान करण्यापेक्षा अमृत महोत्सवाचा दुसरा चांगला उत्सव असू शकत नाही. वीरगाथा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. ते म्हणाले की देशभक्तीची तीव्र भावना आणि आपल्या शूरवीरांप्रती कृतज्ञतेची भावना विकसित करण्याची ही गुरुकिल्ली आहे.

आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून, मुलांना शौर्य कृत्यांची प्रेरणा आणि माहिती देण्यासाठी वीर गाथा आयोजित करण्यात आली होती. 


21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना रेखाचित्रे, निबंध, कविता आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यामधून 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि मूल्यांकनाच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांना “सुपर 25” म्हणून घोषित करण्यात आले.

मुलांमध्ये लहानपणापासूनच ‘राष्ट्राप्रती जबाबदारी’ची भावना दृढ करण्यासाठी शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून आपल्या सैनिकांचे शौर्य आणि गेल्या 75 वर्षांतील भारताची वीरगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे काम करेल असंही केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. त्यामुळे आता लवकरच विविध वीरांची यशोगाथा मुलांना लवकरच शालेय अभ्यासक्रमात शिकायला मिळणार आहे.

राज्याचे मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर..#maharashtra,

 राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.



त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

श्री  राधाकृष्ण विखे-पाटील - 

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

------------------------------------------------------------

सुधीर मुनगंटीवार- 

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

------------------------------------------------------------

चंद्रकांत पाटील- 

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

------------------------------------------------------------

डॉ. विजयकुमार गावित- 

आदिवासी विकास

------------------------------------------------------------

गिरीष महाजन- 

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

------------------------------------------------------------

गुलाबराव पाटील-

 पाणीपुरवठा व स्वच्छता

------------------------------------------------------------

दादा भुसे-

 बंदरे व खनिकर्म

------------------------------------------------------------

संजय राठोड- 

अन्न व औषध प्रशासन

------------------------------------------------------------

सुरेश खाडे- 

कामगार

------------------------------------------------------------

संदीपान भुमरे- 

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

------------------------------------------------------------

उदय सामंत- 

उद्योग

------------------------------------------------------------

प्रा.तानाजी सावंत- 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

------------------------------------------------------------

रवींद्र चव्हाण - 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

------------------------------------------------------------

अब्दुल सत्तार-

 कृषी

------------------------------------------------------------

दीपक केसरकर-

 शालेय शिक्षण व मराठी भाषा

------------------------------------------------------------

अतुल सावे-

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

------------------------------------------------------------

शंभूराज देसाई- 

राज्य उत्पादन शुल्क

------------------------------------------------------------

मंगलप्रभात लोढा- 

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर...