डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डिजिटल परिपाठ दिवस १२१ वा

 चला सोपा करूया परिपाठ

परिपाठ

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

८ डिसेंबर २०२३

वार:शुक्रवार

तिथी:-कार्तिक कृ ११ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "



Today's almanac

 Date - 8 December 2023

          Friday

 Tithi-kartik kru 11 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शुक्रवार, 08 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:00, 

खगोलीय दुपार: 12:30, 

सूर्यास्त: 18:01, 

दिवस कालावधी: 11:01, 

रात्र कालावधी: 12:59.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.


Good Thought

“Every journey begins with a single step.”

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९८५: सार्क परिषदेची स्थापना.


आजची म्हण

म्हणी व अर्थ

आधी शिदोरी मग जेजुरी – आधी जेवण केले कि मग देवाचे दर्शन घेणे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

दोन अक्षरांचे माझे नाव

 डोके झाकणे माझे काम

:-टोपी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

वडिलांना मदत

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.


ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.


तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.

आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥प

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४.१२.२०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहे.

१. प्रत्येक जिल्ह्याला २ फाइल्स अद्ययावत करून पाठवायच्या आहेत. सदर फाईल्स व्हिन्सीस कंपनीकडून आपणास ईमेल वर पाठवलेल्या असून त्या अद्ययावत करून पाठवाव्या.

२. पहिल्या फाइल मध्ये जे शिक्षक २०१९ मध्ये रुजू झाले आहेत, अशा शिक्षकांची माहिती अद्ययावत करायची आहे.

३. दुसऱ्या फाइल मध्ये २०२२ मध्ये बदली झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती असेल. त्या फाइलमध्ये २ कॉलम अद्ययावत करायचे आहेत.

(अ) Is Relieved - येथे yes किंवा no हे पर्याय भरायचे आहे. जर बदली शिक्षकाला त्या जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर yes निवडा नाहीतर no निवडा.

(आ) Status - येथे ड्रॉपडाउन मध्ये ४ पर्याय दिले आहेत.

१. Relieved -जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर निवडा.

२. Non relieved - जिल्ह्यातून मुक्त केले नसेल. संकलन-सतीश कोळी, शिक्षक समिती MSP

३. Rejected - शिक्षकाने बदली नाकारली असेल तर.

४. Court case - एखाद्या शिक्षकावर court case चालू असेल.

४. ईमेल मध्ये एक टेबल दिले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्याने बिंदुनामावली मध्ये खुल्या वर्गातील (एकूण) रिक्त पदांची जी संख्या भरली आहे ती टेबल मध्ये नमूद करावी त्यातील खुल्या वर्गातील संख्या व EWS संवर्गातील संख्या वेगवेगळ्या नमूद कराव्यात.

वरीलप्रमाणे माहिती व्हिन्सीस कंपनीस तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

याबाबतचा आदेश पहा...


Inter district


आजचा परिपाठ | शालेय परिपाठ | school assembly |

 चला सोपा करूया परिपाठ

शालेय परिपाठ

शाळेच्या वेळा नक्कीच बदलणार का


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

७ डिसेंबर २०२३

वार:गुरूवार

तिथी:-कार्तिक कृ १० शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "


Today's almanac

 Date - 7 December 2023

          Thurssday

 Tithi-kartik kru 10 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

गुरुवार, 07 डिसेंबर 2023

सूर्योदय 06:59, 

खगोलीय दुपार: 12:29, 

सूर्यास्त: 18:00, 

दिवस कालावधी: 11:01, 

रात्र कालावधी: 12:59.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.

Good thought

“Be the reason someone believes in the goodness of people.”


दिनविशेष

भारतीय लष्कर ध्वजदिन


आजची म्हण

कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी

:-चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.


Proverb

 A stitch in time save nine -वेळीच केलेल्या उपायांमुळे संभाव्य हानी टळते. 

 

कोडे

कोडे

असे कोणते फळ आहे ज्याला आपण न धुता खाऊ शकतो?

:-केळी

बोधकथा

सोन्याची अंडी देणारी कोंबडी

एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री आपल्या कोंबडीने सोन्याचे अंडे दिलेले दिसून येते. जादूची कोंबडी आहे ही तिच्या लक्षात येते आणि ती सोन्याची अंडी देते.


काही आठवडे चालू राहिले व तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला.शेतकऱ्याच्या बायको अत्यंत लोबी होती ती एक दिवस घरात शेतकरी नसताना कल्पना सुचते की आपण हिला कापून पोटातील सर्व अंडे काढले तर खूप मोठे श्रीमंत ठरू. ती त्या कोंबडीला कापते परंतु तिचा पोटामध्ये काहीच निघत नाही व कोंबडी मरण पावते.


तात्पर्य :-अति तिथे माती


सामान्य ज्ञान

1 सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सव महाराष्ट्रात कोणी सुरू केले?

:-लोकमान्य टिळक

2भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?

:-इंदिरा गांधी


3 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?

:-सरदार वल्लभभाई पटेल


4 इंदिरा गांधीजी यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?

:-जवाहरलाल नेहरु आणि कमला नेहरू


5 इंदिरा गांधी यांच्या मुलांची नावे काय होती?

:- राजीव गांधी आणि संजीव गांधी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती । करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शाळेची वेळ बदलणार ? | school time change |

 

विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळावी यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. school time change 

चिंता व्यक्त करताना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या झोपेची पद्धत बदलली आहे.

school time


 विशेषत: जे मुले मध्यरात्रीनंतरच झोपतात, परंतु त्यांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागते, त्यामुळे त्यांच्या झोपेचा किमान कोटा नष्ट होतो. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी शाळा आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याबरोबरच 'पुस्तक नसलेल्या' शाळा, 'ई-क्लासेस' आणि शाळांना गुणवत्तेनुसार दर्जा देण्याबरोबरच विद्यार्थी वर्गावरील शिक्षणाचा भार कमी करण्याचे आवाहन केले. करायला बोलावले.

अनेक नवीन उपक्रम सुरू केले

राजभवन येथे शालेय शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी ही माहिती दिली. बैस यांनी या गोष्टी सांगितल्या तेव्हा या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा आणि गिरीश महाजन, प्रधान सचिव शिक्षण रणजितसिंह देओल हेही उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित शाळेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करताना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी संयुक्तपणे माय स्कूल, ब्युटीफुल स्कूल, स्टोरी-टेलिंग सॅटर्डे, एन्जॉयेबल रिडिंग, अॕडॉप्ट स्कूल अ‍ॅक्टिव्हिटी, माय स्कूल, माय बॅकयार्ड आणि क्लीननेस मॉनिटर यासारखे उपक्रम सुरू केले.

ग्रंथालयाचा अवलंब करण्याची गरज आहे

राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत परंतु बहुतांश जुनी आहेत, त्यामुळे त्या सर्वांचे पुनरुज्जीवन करून त्या जागेवर संगणक व इंटरनेट उपलब्ध करून 'लायब्ररी दत्तक' सुरू करण्याची गरज आहे, अशी खंतही राज्यपालांनी व्यक्त केली. बैस यांनी आवर्जून सांगितले की हे आवश्यक आहे कारण विद्यार्थी त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकांद्वारेच नव्हे तर इंटरनेट, सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांद्वारे देखील प्राप्त करतात जे त्यांचे IQ पातळी सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे शिक्षकांनीही शैक्षणिक बाबतीत नवनवीन गोष्टी शिकत राहायला हव्यात. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कमी शैक्षणिक गृहपाठ आणि "खेळ आणि सर्जनशील क्रियाकलापांवर भर देऊन शिक्षण अधिक आनंददायी बनवण्याचे" आवाहन केले.


सर्वाच्च न्यायालयाचा नागरिकांसाठी मोठा निर्णय | social media posts|

 सोशल मीडियावर social media वर  पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही..... सुप्रीम कोर्ट 


माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (अ) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे यापुढे सोशल माध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांना कलम (६६) 'अ' नुसार कारवाई करता येणार नाही.
social media


फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, व्हॉट्सअॕप यासारख्या सोशल माध्यमांवर कोणतीही पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार त्यांच्यावर कारवाई केली जात होती. याप्रकरणी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आयटी कायद्यातील कलम ६६ 'अ' आव्हान दिले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विधी आयोगाचे सदस्य अॕड. विजय सावंत यांनी माहिती दिली.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे कलम नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा निष्कर्ष नोंदविला. सोशल माध्यमांवर मत मांडणाऱ्या काही नागरिकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार होता.

हे कलम स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या कलम १९(१) 'अ'चे उल्लंघन करणारे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम राहणार आहे. सोशल माध्यमांवर व्यक्त होणे हा गुन्हा ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही,

तसेच अटकही करता येणार नाही. - अॕड. विजय सावंत, सदस्य, विधी आयोग