उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत
१० वी नंतर डिप्लोमा प्रवेश | diploma course after 10th|
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदविका प्रवेशप्रक्रिया जाहीर....
अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून; अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला होणार प्रदर्शित... (diploma admission)
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वास्तूकला प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवारपासून ता. २९ मे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तूकला पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशासाठी ई-स्क्रूटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटीनी याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 'कॅप' अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तसेच 'कॅप'व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे, या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ) सुरू ठेवल्या जाणार आहेत.
प्रत्यक्ष स्क्रूटीनी पद्धतीसाठी सुविधा केंद्रांची यादी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही केंद्रे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
राज्यमंडळामार्फत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना शैक्षणिक पात्रता तपशीलात स्वतःचा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा, राज्य मंडळातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले गुण राज्य मंडळाकडून थेट घेण्यात येतील आणि ते संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येतील.
प्रवेशाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे
ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.
कालावधी
२९ मे ते २५ जून
कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे
२९ मे ते २५ जून
विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २७ जून
तात्पुरत्या यादीवर तक्रार व हरकती नोंदविणे २८ ते ३० जून
अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २ जुलै
अर्ज सादर करण्यासाठी सुविधा -
संकेतस्थळ :
https://poly24.dtemaharashtra.gov.in/
- मोबाइलवर 'DTE Diploma Admission' हे अॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येईल
इयत्ता पहिलीत प्रवेश वय|1st standard admission age|
इयत्ता पहिलीत प्रवेश...वाचा नर्सरी ते इयत्ता पहिली पर्यंत प्रवेशासाठी आवश्यक वयोमर्यादा...
शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले गेले असून या वयोगटातील बालकांवर अभ्यासाचा किंवा इतर शैक्षणिक गोष्टींचा जास्तीचा ताण येऊ नये याकरिता 31 डिसेंबर 2024 रोजी ज्या बालकांचे वयाचे सहा वर्ष पूर्ण होणार आहेत अशा बालकांना यावर्षी पहिलीमध्ये ऍडमिशन करता येणार आहे.
![]() |
१ ली प्रवेश नंतर पहिल्याच दिवशी आनंदी बालके |
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अशा बालकांना आता दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. विशेष म्हणजे आरटीईनुसार बघितले तर अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची मुख्य जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार
आहे.कारण जर आपण पाहिले तर कमी वयामध्ये जर विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश केला गेला तर त्यावर शैक्षणिक गोष्टींचा अभ्यासाचा जास्त ताण येतो
व त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासूनच ते वंचित राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता त्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना खाजगी असो किंवा शासकीय शाळा असो त्यामध्ये प्रवेश देता येणार आहे.
कोणत्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना यावर्षी
मिळेल पहिलीत प्रवेश?
या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देताना सर्व शाळांना एक जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत ज्या बालकांचा किंवा ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्यांनाच यावर्षी पहिलीत प्रवेश देता येणार आहे. कारण या कालावधीप्रमाणे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संबंधित विद्यार्थी हे सहा वर्षाचे होतील व त्यांना पहिलीत प्रवेश देता येणे शक्य आहे.
नर्सरी ते इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळण्याचे वय -
1- नर्सरीकरिता वयाची तीन वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.
2- जूनियरकेजीकरिता वयाचे चार वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.
3- सिनियरकेजीकरिता वयाची पाच वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.
4- इयत्तापहिलीकरिता 31 डिसेंबर २०२४ पर्यंत वयाचे सहा वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.
शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....
10 वी निकाल ssc result | sscresult 10th result|
आता दहावीच्या निकालाची (10th result) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे घोषणा केली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर निकाल पाहता येणार :
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.or
शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....
जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....
अतिशय प्रेरणादायी नक्कीच वाचा...
इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश |Maharashtra Education News|
Maharashtra Education News: राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमाबाबत (School Syllabus) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश करण्यात येणार आहे. भाषा विषयात यांचा समावेश करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात अनेक माध्यमांच्या शाळा आहेत. आपल्या मुलांना परंपरेची ओळख करुन त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने आक्षेप आणि सूचना मागविल्या आहेत. SCERT ने (State Council of Educational Research & Training) विद्यार्थ्यांना भगवत गीता आणि मनाचे श्लोक यांचा पाठ करायला लावावे असे सूचवले आहे.
SCERT ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना (Student) देशाची परंपरा आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक आणि
भगवत गीतेचा बारावा अध्याय पाठ करायला लावावा असे एससीईआरटीने सुचविले होते. त्यानुसार आता इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 ते 25 मनाचे श्लोक, 6 वी ते 8 वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9 वी ते 12 वीसाठी भगवत गीता पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. भगवत गीतेमधील बारावा अध्याय विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी द्यावा असे सांगितले आहे.
भगवत गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. तो शाळांमध्ये शिकविण्यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांचा विरोध होऊ शकतो.
आराखड्या नमूद केले आहे की...
भारतीय ऋषींची दिनचर्या, भगवतगीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, गुरुशिष्य परंपरा, ऋषींचा आहार कसा होता याची ओळख विद्यार्थ्यांना करुन द्यावी. तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश गणित व विज्ञान विषयात करावा असे एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्यात म्हटले आहे.