डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत.

 रोना काळात राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढून अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत.



शैक्षणिक संचांसाठी अभ्यास गट स्थापन केला होता. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, मराठी या विषयांचे, तर तिसरी आणि चौथीसाठी इंग्रजी, गणित, मराठी, परिसर अभ्यास या विषयांतील महत्त्वाच्या संकल्पनांचे स्वतंत्र संच तयार करण्यात आले.

 हे संच शिक्षकांना अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाही हे संच उपयुक्त होतील. पाठय़पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हे संच दिले जातील. त्यामुळे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता येईल.


त्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वर्गातील वातावरण उत्साही, आनंदी आणि क्रियाशील ठेवणारे असावे, वर्गात केवळ श्रवणावर भर न देता शैक्षणिक साहित्याद्वारे प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यात येतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ होत असल्याचे दिसून आले. 

निष्ठा प्रशिक्षण शेवटची संधी उपलब्ध .....


मात्र गेल्या दोन वर्षांत करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बराच काळ बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेपासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेशी एकरूप ठेवणे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक असल्याने अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करणे, अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट आणि दृढ होतील असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांनी एप्रिलमध्ये सादर केला होता. त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून देण्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

शिक्षक बदली संदर्भात मार्गदर्शक व्हिडीओ

 Vinsys या कंपनीद्वारे शिक्षक बदली पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. बदली संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शक व्हिडीओ आपणांसाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रचा समूहनिर्माता व मुख्यप्रशासक प्रकाशसिंग राजपूत घेऊन येत आहे.


शिक्षक बदली पोर्टल विषयक माहिती ....




आॕनलाईन बदली प्रक्रिया फेज 1 माहिती 




पोर्टलवर लाॕगिन कसे करायचे....




CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत

 CBSE बोर्डाच्या परीक्षा  रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा  दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.



यावेळी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा होणार की पुन्हा एकच परीक्षा  होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. 

आता मात्र CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. 

काय आहेत हे बदल जाणून घ्या....

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने 10वी, 12वी परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठा बदल केलेला आहे.

सीबीएसई 10वी, 12वी बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे.

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाबतीत अपडेट...

 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाबतीत अपडेट...


Vinsys (सॉफ्टवेअरचे प्रोग्रामर) मधील 100 पेक्षा जास्त अभियंत्यांची टीम आणि द्वारे समर्थित



 सायफ्युचर क्लाउड सर्व्हिसेसच्या 10 अभियंत्यांनी सॉफ्टवेअरच्या पहिल्या टप्प्यासाठी वापरकर्ता चाचणी घेतली. 

लॉजिक विरोधाभास (सॉफ्टवेअर "हँग" नसावे), 

शून्य आयटम आणि लॉगिनमध्ये डेटा अपडेटसाठी सॉफ्टवेअरची चाचणी घेण्यात आली. 

सॉफ्टवेअर सर्व पॅरामीटर्सवर यशस्वी झाले. हे आता आगाऊ सुरक्षा चाचणीसाठी जाईल जेणेकरून ते हॅक होऊ शकत नाही. टप्पा 2 विकास देखील पूर्ण आहे.

टीचर ट्रान्सफर सॉफ्टवेअर हे सर्वात क्लिष्ट सॉफ्टवेअर्सपैकी एक आहे जे सरकारी अधिकार्‍यांद्वारे वापरले जाईल कारण विविध प्रकारच्या टेकहर्सना देण्यात आलेल्या सूट, पोस्टिंगच्या स्थानांची संख्या 1.5 लाखांच्या पुढे जाऊ शकते, 

प्रत्येक शिक्षक आणि स्थान परिभाषित केले आहे. अनेक अटींनुसार. कोणत्याही सॉफ्टवेअरप्रमाणे, तर्काने सुसंगतता दर्शविली पाहिजे आणि ती देखील सांख्यिकीयदृष्ट्या योग्यरित्या कार्य करण्यासाठी परिस्थितीशी जुळली पाहिजे. आम्ही विविध सूट काळजीपूर्वक कॅलिब्रेट केल्या आहेत. सॉफ्टवेअर योग्यरित्या कार्य करू शकेल याची खात्री करण्यासाठी आम्ही बदल करण्यासाठी गेल्या 14 महिन्यांत दबावाचा प्रतिकार केला. पॉलिसी स्थिरता सुनिश्चित केली गेली आहे की सिस्टम चांगले कार्य करते.

आरोग्य खात्यात मेगाभरती.... पहा...

सॉफ्टवेअर देखील अद्वितीय आहे कारण प्रथमच निर्णय घेणे स्वयंचलित केले गेले आहे आणि मानवी इंटरफेसशिवाय सॉफ्टवेअरमध्ये स्थानांतरित केले गेले आहे. शिक्षक बदली प्रक्रिया पूर्णपणे नियमबद्ध असेल आणि त्यात पारदर्शकतेची सर्वोच्च पातळी असेल जिथे प्रत्येक क्लिक आणि टेकहर्सद्वारे प्रत्येक बदल रेकॉर्ड केला जाईल आणि सर्व डेटा सर्व शिक्षकांना दृश्यमान असेल.


निवडलेल्या आयटी कंपन्यांना SIGMA 6 प्रमाणपत्र आहे - उच्च क्षमतेचे.



भोजनावर शिक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत तुटून पडले...

 शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावली होती, पण बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्स वर तुटून पडले. 



 अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. व्हिडीओमध्ये सूटमध्ये एक पुरुष दिसत आहे, जो रिसॉर्टचा कर्मचारी असावा, त्याने घाईघाईने प्लेट्स एका कोपऱ्यात नेल्या आणि शिक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून एक एक वाटू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. 


बैठकी नंतर तेथील मोफत भोजनावर शिक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत तुटून पडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासंदर्भात मुख्यमंत्री मान यांनी पंजाबमधील एका रिसॉर्टमध्ये सरकारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. शिक्षकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सभा संपताच शिक्षक जेवणासाठी निघाले. यावेळी जेवणाचे ताट मिळवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आश्वासित प्रगती योजना खाजगी शिक्षकांना मिळावी अशी शिफारस ....

विशेष म्हणजे शिक्षकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी पंजाब सरकारने एसी बसची व्यवस्था केली होती. 


व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा....



ही फक्त शिक्षक समूहात पोस्ट झाली व ती अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शिक्षक सावधगिरी बाळगतील.


Only for their  Social behaviour awareness .





पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक

  आता दप्‍तराचा भार हलका करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. 




या पुस्तकामध्ये सर्व विषयांचा पहिल्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना दररोज वर्षभराच्या अभ्यासाची सर्वच पुस्तके शाळेत घेऊन येण्याची गरज पडणार नाही.

 वर्षातील चार शैक्षणिक सत्रांसाठी केवळ चार पुस्तके असतील, असे प्रा. गायकवाड म्हणाल्या.

शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इयत्ता 1 ली ते दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'मल्टी लँग्वेजेस इंटिग्रेटेड बुक' असतील. या वर्षात यश मिळाल्यानंतर त्यापुढील वर्षापासून 3 री आणि 4 थी च्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा अभ्यासक्रम लागू होईल.

२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची अपेक्षा

 २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांला शिक्षण दर्जेदार मिळावे म्हणून चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे त्याने थेट चांगले शिक्षणाकरिता सैनिकी  शाळेत भरती करून द्या अशी मागणी केली आहे .



 सरकारी शाळेत मला पाहिजे तेवढे शिक्षण मिळत नाही मला IAS बनायच आहे, त्यासाठी मला चांगल्या शाळेत प्रवेश करून द्या अशी इच्छा व्यक्त करत त्याने एक प्रकारे 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणा च्या बाबतीत असलेल्या आकांक्षा आणि अपेक्षा व्यक्त केलेले आहे.

 थेट बीबीसी मराठी कडून घेण्यात आलेल्या त्या विद्यार्थ्यांची मुलाखत आपण खालील व्हिडीओत  पाहू शकता.




https://fb.watch/d5yHjAkyF5/


पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ

थोडक्यात शिक्षक बदल्यांचे टप्पे...


पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ देण्यात आली.


पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना ८-१० दिवसांत भरावी लागणार वैयक्तिक माहिती


दरवर्षी अंदाजित अडीच लाख शिक्षक करतात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज


जात प्रवर्गानुसार रिक्त जागांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे घ्यावे लागते ना हरकत प्रमाणपत्र...


एकाच जिल्ह्यात तीन ते पाच वर्षांपर्यंत काम केलेले शिक्षकच बदल्यांसाठी पात्र


 दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्याने त्यात पारदर्शकता नसल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे त्यासंदर्भातील कार्यवाही झाली नाही. शाळा सुरु होताच पोर्टल निर्मितीची तयारी सुरु होणे अपेक्षित होते, पण त्यासाठी विलंब लागला. त्याचवेळी 'एनआयसी'ने पोर्टलचे काम करण्यास नकार कळविला. त्यानंतर नवीन खासगी संस्था नेमण्यात आली. 

आश्वासित प्रगती योजना १०/२०/३० खाजगी शिक्षक बाबत शिफारस

आता सरकारकडून त्या कंपनीला सर्व डेटा देण्यात आला असून अजूनही ३० टक्के काम राहिलेले आहे. त्यामुळे शिक्षकांची प्राथमिक माहिती भरणे (नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक, जात प्रवर्ग, शाळा, जिल्हा, बदली कुठे पाहिजे ज्याची माहिती) अपेक्षित आहे. सध्या पोर्टल अर्धवट स्थितीत असल्याने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडेच ती माहिती ऑफलाइन द्यावी लागत आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दोन्ही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते आणि त्यानंतर ऑनलाइन पध्दतीने त्या शिक्षकांच्या बदल्या होतील. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अंदाजित दोन महिने लागतील, असा अंदाज आहे.

आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस ..

 राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत.


संदर्भ:- 

१. आयुक्त शिक्षण कार्यालयाकडील पत्र क्र. अंदाज-२०१/ सुसेआप्रया/ २०२२/२२१६ दिनांक १३.०४.२०२२

 २. आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक २७.०४.२०२२ राजीच्या बैठकीतील निर्देश,



शासन निर्णय दिनांक ३१.०७.२०१९ अन्वये राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना याप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना लागू करणे व शिक्षकांच्या वेतनश्रेणीशी संबंधित इतर बाबींच्या अनुषंगाने शिफारस करण्याकरीता मा. आयुक्त (शिक्षण) याच्या अध्यक्षतखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


अभ्यास गटाचा अहवाल शासनास दिनांक ०६.०५.२०२० रोजी सादर केलेनंतर शासन पत्र दिनांक २३.११.२०२१ नुसार सदर अहवालामध्ये अनुक्रमे १ ते ६ त्रुटी असलेबाबत कळविण्यात आलेले होते.

 त्यानुषंगाने मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे कडून शासन पत्रात नमूद असलेल्या ६ मुद्द्यांपैकी अनुक्रमे १ ते ४ मुद्द्यांचा पूर्तता प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आलेला होता.


मुद्दा क्र. ५ व ६ बाबतची सविस्तर माहिती शिक्षण संचालक, प्राथमिक व शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना दिनांक २७.०४.२०२२ रोजीच्या बैठकीत सादर करणेबाबत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही सदर मुद्यांबाबतची सविस्तर माहिती अप्राप्त आहे. तरी सदरील माहिती तात्काळ सादर करणेबाबत  विनंती करण्यात आलेली आहे.


 सदरील शिफारस पत्र पहा....

बदली प्रक्रिया .... माहितीस्तव

 शिक्षक बदली- 2022  update...


शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार

1) Phase 1 : शिक्षक माहिती updation

2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली

3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली





आता लवकरच *Phase 1* सुरू होत आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2    व 3 सुरू होईल.


*Phase 1*.मध्ये खालील प्रकारे प्रक्रिया असेल

शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं व OTP ने लाँगीन करावं लागेल

 तिथे आपणास शिक्षक माहिती चे दोन भाग दिसतील

I) Personal Information 

ii) Employee Information 

Personal Information *read only* Mode मध्ये असेल तिथे आपणास बदल करता येणार नाही.

 Employee information मध्ये माहिती बरोबर असल्यास माहिती accept करावी. व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती करावी व submit करावी.


 Submit केलेली माहिती BEO level ला जाईल. BEO सेवापूस्तकां नुसार माहिती तपासून approved करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरुस्ती करतील.

 सदर माहिती शिक्षक लाँगीन ला दिसेल. ती माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी accept करावी.

BEO यांनी दुरुस्ती केलेली माहिती योग्य असल्यास Accept करावे. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपली माहिती मध्ये बदल करुन EO कडे अपील करु शकतील.

 EO कडे आलेली माहिती, EO योग्य पुराव्यानिशी माहिती approved किंवा बदल करतील.

 EO नी मंजूर केलेली माहिती आता final असेल.

तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा प्रत्येक शिक्षकांना आपल्या login मध्ये बघता येईल. एखाद्या शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहिती मध्ये दोष दिसल्यास त्यांच्या विरोधात CEO कडे Social अपील करता येईल.

 CEO योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये योग्य बदल करतील.


अशा प्रकारे Phase 1 प्रत्येक शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे आहे. 

@ अंतिम दिनांक पर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept न केल्यास BEO आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व शिक्षकांची माहिती approved करतील. त्यांनंतर शिक्षकांना आपली माहिती update करण्याची संधी असणार नाही.

@ प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती update करतांना OTP आवश्यक असणार आहे.

@ बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय कसे बदल केले याची संपूर्ण माहिती शिक्षकांना email वर तसेच login मध्ये कळेल.


बदलीबाबत महत्त्वाची पीडीएफ डाऊनलोड करा...


👆 फक्त माहितीस्तव