डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
शिक्षक नोकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षक नोकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रशिक्षणसाठी घाईघाईने जाणाऱ्या 30 शिक्षकांच्या वाहनाचा अपघात|educational-news-shaikashnikbatmi-teachersjob|

 टँकरची बसला धडक, 30 शिक्षक जखमी, गॅस गळतीनंतर आगीचा भडका; मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये भीषण अपघात...

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी खासगी बस एलपीजी टँकरच्या जोरदार धडकेने 30 फूट खोल दरीत कोसळली. यात बसमधील 30 शिक्षक आणि चालक असे 31 जण जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

रत्नागिरीजवळील निवळी-बावनदी घाटात रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. अपघातग्रस्त टँकरमधून गॅसगळती झाल्याने आगीचा भडका उडाला. त्यात दोन घरे खाक झाली तर दोन वाहनेही जळाली. अपघातानंतर महामार्ग 9 तास ठप्प होता. वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी लगतचा परिसर रिकामा केला.



शिक्षक प्रशिक्षणासाठी बसने रत्नागिरीत येत होते. सकाळी आठच्या सुमारास बावनदी येथील रस्त्यावर बसला मागून भरधाव येणाऱया टँकरने धडक दिली. त्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 30 फूट खोल दरीत कोसळली, तर टँकर पलटी झाला. एलपीजी टँकर जयगड येथून मुंबईकडे चालला होता. बावनदीच्या अलीकडील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या खासगी बसला टँकर धडकला. खासगी बसमधून प्रवास करणारे 15 शिक्षक आणि 16 शिक्षिका असे एकूण 31 जण अपघातात जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जखमी महिला प्रवाशांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पाली, संगमेश्वरमार्गे वळवली वाहतूक 

एलपीजी टँकर रस्त्यावर पलटी झाल्यानंतर गॅस गळती होऊन परिसरात आग लागली. त्यात काही झाडे व रिकामी घरे जळाली. गॅस गळतीचे वृत्त समजताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः हजर राहून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. येथील वाहतूक पाली आणि संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली.

जखमींची नावे

अमोल कोतवाल, राजेश यादव, धर्मेंद्र देरुगडे, दिलीप डोंगरे, संकेत जागुष्टे, कमल महाडिक, विराज सावंत, निशिकांत वानरकर, मंदा खाडे, वृषाली यादव, श्वेता चव्हाण, स्मिता पाटील, जयश्री गावडे, मीना घाडगे, नेहा मेस्त्री, मनीषा कांबळे, प्रियांका जाधव, रुपाली भुवड, उषा खुडे, नीता बांद्रे, हर्षाली पाकळे, सुलक्षणा पाटील, मालिनी चव्हाण आणि मिता शिरकर अशी जखमींची नावे आहेत.

प्रशिक्षण मधील सक्ती   ; शिक्षक संघटनेचा आरोप

प्रशिक्षणाला वेळेपूर्वी हजर राहण्यासाठी घाईने येणाऱया शिक्षकांच्या गाडीला निवळी बावनदी येथे अपघात झाला. या अपघाताला शिक्षण विभाग जबाबदार आहे. प्रशिक्षणास हजर राहण्यास पाच मिनिटे उशीर झाला तरी शिक्षकांना प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यास प्रशासनाचा नकार होता. त्यामुळे प्रशिक्षणाला लवकर पोहोचण्यासाठी शिक्षकांना खासगी बसने प्रवास करणे भाग पडले, असा आरोप कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी व रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केला.

रखडलेल्या महामार्गावर चाकरमान्यांची रखडपट्टी, माणगावात वाहनांच्या रांगा 

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गेलेले चाकरमानी येत्या 16 जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुंबईत परतत आहेत. या परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे चाकरमान्यांची जागोजागी रखडपट्टी होत आहे. महाड ते वडखळदरम्यान महामार्गाचे बरेचसे काम अर्धवट स्थितीत पडले आहे. कोलाड येथील पुलाचे काम मागील काही वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. त्यामुळे या परिसरात शनिवारपासून मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. रविवारीही वाहतूककोंडीचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागला.

महामार्गाच्या जागोजागी रखडलेल्या कामांमुळे चाकरमान्यांचा कोकण ते मुंबई प्रवासातील वेळ चार ते पाच तासांनी वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 13 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. अजूनही ते पूर्ण झालेले नाही.


शिक्षक बदली संवर्ग १ व २ बाबत महत्त्वाचे....

शिक्षकांची पदसंख्या घटणार आता विशेषज्ञ शिक्षकांची होणार कंत्राटी नियुक्ती | teachers-jobs-sainiki-school|

 राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांसाठी केलेल्या सुधारित धोरणानुसार या शाळांतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. 

सद्यस्थितीत असलेली शिक्षकांची १ हजार १४ पदे कमी होऊन ७५६ पदे करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सैनिकी शाळांमध्ये सध्या रिक्त असलेल्या आणि भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवरील शिक्षक भरती सेवाप्रवेश विषयक प्रचलित नियमांनुसार, तसेच पवित्र प्रणालीमार्फत करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



सद्यस्थितीत सैनिकी शाळांमध्ये १९९५च्या शासन निर्णयानुसार सहावी ते दहावीसाठी प्रति तुकडी दोन शिक्षक, तर २००२च्या शासन निर्णयानुसार अकरावी ते बारावीसाठी प्रति तुकडी ५.५ शिक्षक लागू आहेत. त्यानुसार सध्या सहावी ते दहावीसाठी ८२६ शिक्षक, अकरावी-बारावीसाठी १८८ शिक्षक मंजूर आहेत. मात्र, या ऐवजी आता संचमान्यतेच्या निकषांनुसार राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व सैनिकी शाळांमध्ये सातारा सैनिकी शाळेप्रमाणे सहावी ते दहावीसाठी प्रति तुकडी १.५ शिक्षक पदे मंजूर करावी, तर अकरावी, बारावीसाठी प्रति वर्ग प्रति तुकडी दोन या प्रमाणे एकूण चार पदे मंजूर करण्यात येतील. त्यामुळे सहावी ते दहावीसाठी ६२० शिक्षक, तर अकरावी-बारावीसाठी १३६ अशी एकूण ७५६ पदे अशी रचना करण्यात येणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास प्रचलित कार्यपद्धतीनुसार सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाची मान्यता घेतली जाणार आहे.

सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत अधिक वाचा...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अंतिम केल्यावरही इतर विषयांच्या अध्यापनासाठी आवश्यकता भासल्यास विशेष शिक्षकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालकांची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत तीन विशेषज्ञ शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.

🏮🎉🪄 *दिवाळी अभ्यास*🪄🎉🏮


*डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व ॲक्टिव्ह गुरुजी  आपणासाठी खास दिवाळी सुट्टीसाठी  घेऊन आला आहे. मोफत दिवाळी अभ्यास 🎊🎉*


🪭🎁 *इयत्ता १ ली दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/22g3lbgf

🪭🎁 *इयत्ता २ री दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2cpczadq

🪭🎁 *इयत्ता ३ री दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/28k4a442

🪭🎁 *इयत्ता ४ थी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/23xnep3g

🪭🎁 *इयत्ता ५ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2y2tabla

🪭🎁 *इयत्ता ६ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/27o9n3rn

🪭🎁 *इयत्ता ७ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/235nzptd

🪭🎁 *इयत्ता ८ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2ckalusr

🪭🎁 *इयत्ता ९ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/29cel6nv

🪭🎁 *इयत्ता १०वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/24k9xyc6

🖼️🎈🎁 *दिवाळी स्पेशल पेन्टीग👇*🎁🎈🖼️

https://tinyurl.com/299nxezb

           *संकलन*

   *प्रकाशसिंग राजपूत*

*📺 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🖥️*


*जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा...*


शिक्षकांना ड्रेस कोड लागू /teacher dress code/

 राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत.

शासन परिपत्रक:-

दिनांक: १५ मार्च, २०२४.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-

) सर्व १ शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.

२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

शासन आदेश पहा....

१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

डी.एड.ला नंबर लागणे होती नोकरीची हमी | d.ed job | teacher jobs | d.ed colleges |

 एकेकाळी डी.एड.ला d.ed college  नंबर लागणे होती नोकरीची हमी....

राज्यातील सव्वालाख शाळांमध्ये सध्या ५० हजारच्यावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या दशकात भरती झाली नाही, त्यामुळे अनेक भावी शिक्षकांनी इतर पर्यायी रोजगार स्वीकारलेला दिसून येतोय.

तरुण-तरुणींनी शिक्षक होण्याचा नाद सोडून दिला. त्यामुळे प्रवेशा अभावी १० वर्षांत राज्यातील तब्बल १२५० डीएड महाविद्यालयांना टाळे लागल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

पंधरा वर्षांपूर्वी इयत्ता बारावीमध्ये ९०-९५ टक्के जरी गुण मिळाले, तरीदेखील बहुतेक विद्यार्थी विशेषत: मुली 'डीएड'साठी इच्छुक असायचे. त्यावेळी प्रवेशाची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवरच असायची.

२०११-१२ नंतर राज्यात नियमित शिक्षक भरती झाली नाही, नोकरीच्या प्रतिक्षेत अनेक तरूणांचे वय निघून गेले. विनाअनुदानित शाळांवर १०-१२ वर्षे बिनपगारी काम करणारे अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आले, तरी त्यांना पगार सुरु झाला नाही.

नोकरीसाठी 'डीएड'नंतर टेट, टीईटी बंधनकारक आहे. नोकरीला लागल्यावर पटसंख्या घटल्यास अतिरिक्तची भीती, समायोजनासाठी संघर्ष, जुनी पेन्शन योजना लागू नाही, अशा कटकटीच नको म्हणून अनेकांनी 'डीएड'कडे पाठ फिरविल्याची वस्तुस्थिती आहे.

teacher job


त्यामुळे आता ५० टक्के जरी गुण असले तरीदेखील त्यांना 'डीएड'साठी प्रवेश दिला जात आहे. २०२२-२३ मध्ये ३३ हजार प्रवेश अपेक्षित होते, पण १४ हजार जागांवर विद्यार्थीच मिळाले नाहीत. यंदाही १६ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. आता शिक्षक भरतीची घोषणा व सुरवात होऊन सहा महिने लोटले तरीदेखील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

राज्यातील 'डीएड'ची स्थिती

२०१२-१३ मधील महाविद्यालये - १,४०५

प्रवेश क्षमता - ९०,१२५

प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज - २,८९,६००

२०२३-२४ मधील महाविद्यालये - १५५

प्रवेश क्षमता - ३१,१५७

महाविद्यालयांतील प्रवेश रिक्त - १५,६७९

नवीन शैक्षणिक धोरणात 'डीएड' नाहीच...

conclusion -

दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या टप्प्याटप्याने सुरु असून २०३० पर्यंत ते देशभर लागू होणार आहे. त्यानुसार पाच वर्षांत विद्यार्थ्यांना बीए-बीएड, बीएस्सी-बीएड किंवा बीकॉम-बीएड अशा दोन्ही पदव्या पूर्ण करता येणार आहेत. सध्या सुरु असलेल्या सर्व बीएड महाविद्यालयांना त्यादृष्टीने बदल करावे लागणार आहेत. दरम्यान, नवीन शैक्षणिक धोरणात 'डीएड'चा कोठेही उल्लेख आलेला नसल्याने पदवी करतानाच शिक्षक होण्याची पात्रता पूर्ण करावी लागेल.

Faq :

१) डी.एड अभ्यासक्रम व काॕलेज बंद होणार का?

२) नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डी.एड. वगळण्यात येणार का?

३) डी.एड झालेले नोकरी वयोमर्यादा ओलाडल्यास देशात प्रशिक्षित शिक्षकांची कमी होणार का?