डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नवोदय विद्यालय समिती महाराष्ट्र मार्फत 1616 जागेसाठी भरती

 नवोदय विद्यालय समिती महाराष्ट्र मार्फत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. 

यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.



प्राचार्य, पीजीटी, टीजीटी, टीजीटी (3री भाषा), संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी पुरुष, पीईटी महिला, ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राचार्य ,पीजीटी , टीजीटी , टीजीटी ( TGT Third Language) संगीत शिक्षक , कला शिक्षक , पीईटी पुरुष , पीईटी महिला, ग्रंथपाल इ. 

 एकूण जागा - 1616 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राचार्य - 

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master Degree + B.Ed. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 पीजीटी -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 टीजीटी (TGT) -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B.Tech. Computer Science / IT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

टीजीटी ( TGT Third Language) - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Education of NCERT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 संगीत शिक्षक  - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Degree Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

कला शिक्षक (Art Teacher) - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी any discipline of Fine Arts. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

पीईटी पुरुष  - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 पीईटी महिला -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

ग्रंथपाल (Librarian) -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी one year Diploma in Library Science पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

ही कागदपत्रं आवश्यक

  बायोडेटा,दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो भरती शुल्क प्राचार्य पदासाठी- रु. 2000/- पीजीटीसाठी- रु.1800/- टीजीटी आणि इतर शिक्षकांसाठी (संगीत, कला इ.)- रु. 1500/- 


JOB TITLENavodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राचार्य (Teaching Staff posts like Principal) पीजीटी (PGT) टीजीटी (TGT) टीजीटी ( TGT Third Language) संगीत शिक्षक (Music Teacher) कला शिक्षक (Art Teacher) पीईटी पुरुष (PET Male) पीईटी महिला (PET Female) ग्रंथपाल (Librarian) एकूण जागा - 1616
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राचार्य (Teaching Staff posts like Principal) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master Degree + B.Ed. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पीजीटी (PGT) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. टीजीटी (TGT) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B.Tech. Computer Science / IT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. टीजीटी ( TGT Third Language) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Education of NCERT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संगीत शिक्षक (Music Teacher) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Degree Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कला शिक्षक (Art Teacher) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी any discipline of Fine Arts. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पीईटी पुरुष (PET Male) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पीईटी महिला (PET Female) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ग्रंथपाल (Librarian) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी one year Diploma in Library Science पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
भरती शुल्कप्राचार्य पदासाठी- रु. 2000/- पीजीटीसाठी- रु.1800/- टीजीटी आणि इतर शिक्षकांसाठी (संगीत, कला इ.)- रु. 1500/-
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://navodaya.gov.in/nvs/en/Recruitment/Notification-Vacancies/ या लिंकवर क्लिक करा.

CBSE ने 'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

 CBSE च्या विद्यार्थ्यांना तसंच शाळांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलेले आहे.




 CBSE इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी टर्म 2 चे निकाल जाहीर करण्याआधी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने  'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी हे निकष आपण पुर्ण करत आहात का?

हे पोर्टल सर्वांसाठी OSD (one stop destination)  म्हणून काम करेल अशी माहिती बोर्डाकडून स्पष्ट  करण्यात आलेली आहे. यात टर्म 2 च्या निकालासह परीक्षेशी संबंधित सर्व क्रियाकलापांचा समावेश आहे. CBSE च्या परीक्षा संगम पोर्टल parikshasangam.cbse.gov.in वर प्रवेश करता येईल. त्याचे 3 भाग आहेत - 

शाळा (गंगा), 
प्रादेशिक कार्यालय (यमुना) 
आणि 
मुख्य कार्यालय (सरस्वती).

शालेय विभागात, अभ्यासक्रम, परिपत्रक, नमुना प्रश्नपत्रिका इत्यादी परीक्षा साहित्याचा पर्याय आहे. OASIS, परीक्षा नोंदणी इ. सारख्या पूर्व परीक्षा उपक्रम. यासह, अंतर्गत क्रमांक आणि पुनर्मूल्यांकन इत्यादीसारख्या परीक्षेनंतरच्या क्रियाकलापांसाठी अर्ज करण्याचे पर्याय आहेत. परिक्षा संगम पोर्टलद्वारे डायरेक्ट डिजीलॉकरमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

ही आहे सीबीएसई परीक्षा संगम पोर्टलची थेट लिंक इथेच जाहीर होणार CBSE टर्म 2 निकाल 2022 CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चा निकाल जाहीर होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलैमध्ये निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in
व cbse.gov.in निकाल पाहू शकणार आहेत.

असे पास होणार विद्यार्थी...

विद्यार्थ्यांना प्रत्येक अटी स्वतंत्रपणे उत्तीर्ण करण्याची गरज नाही आणि अंतिम निकालात 33 टक्के गुण मिळवणे हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असेल. 
     टर्म 1 चा निकाल जाहीर करताना, CBSE ने किती विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले किंवा होऊ शकले नाहीत याचा डेटा जारी केला नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण विचारात न घेता टर्म 2 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बोर्डाने तेव्हा जाहीर केले होते की अंतिम गुणांच्या आधारे उत्तीर्णतेची टक्केवारी मोजली जाणार आहे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या (FLN) सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत.

 आपल्या मेंदूचा बहुतेक विकास बालपणात होतो.   बालपणात काळजी आणि शिक्षण, जे खरोखरच सर्वसमावेशक आहे,  सर्वांगीण विकास आणि आरोग्याला चालना देण्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक आहे.

 म्हणूनच शासन लहानपणापासूनच शिकण्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर सुधारण्यावर भर देत आहे.  2025 पर्यंत, उद्दिष्ट आहे की 3-9 वयोगटातील प्रत्येक मुलाकडे गणिताची क्रिया वाचण्याची, लिहिण्याची आणि करण्याची मूलभूत क्षमता असणे आवश्यक आहे.  यासाठी शाळेतील आणि शाळेबाहेर लक्ष्यित हस्तक्षेप आवश्यक आहेत

  मुलांच्या पहिल्या शिक्षिका असलेल्या मातांचे सामुदायिक सहभाग आणि सक्षमीकरण हे उच्च दर्जाचे बालपण काळजी आणि शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून शासन या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

  पहिले पाऊल मिशनमध्ये 2.5 लाखांहून अधिक मातांचे गट सामील झाले.  असे आणखी गट तयार केले जातील आणि त्यांना घरबसल्या आणि मजेदार क्रियाकलापांसह मुलांच्या मूलभूत शिक्षणाला पूरक म्हणून संसाधने प्रदान केली जातील. ते त्यांच्या मुलाच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आठवड्यातून एकदा भेटतील.

 शाळा, शिक्षक आणि गाव गट त्यांना या उपक्रमात मदत करतील.  दर महिन्याला, मातांच्या गटांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल चर्चा करण्यासाठी शाळेत बोलावले जाईल.  या मातांच्या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा वेळोवेळी मेळावे आणि कार्यशाळा आयोजित करतील.








 #mothersgroups #education 

जिल्हांतर्गत बदली शासनाचे आजचे परिपत्रक..

  जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आज राजकीय शासनाने शासन आदेश काढलेला आहे ,

या शासनादेशामध्ये बदली प्रक्रिया संबंधी संपूर्ण वेळापत्रक स्पष्ट करण्यात आलेला आहे.


राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निकष

राज्य आदर्श पुरस्कार सविस्तर पहा...

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यातील समर्पित शिक्षकांचे सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निकषांना अधिक शिक्षकाभिमुख केले आहे. तसेच या सन्मानाला घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्याचे ठरविले आहे. 



राज्य पुरस्कार मार्गदर्शक व्हिडीओ पहा...▶️ चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा


   संपूर्ण निकष खालीलप्रमाणे 











#thankyouteachers

सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत अभ्यास करण्याकरिता समिती स्थापन.*

 राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी ) च्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करुन शिफारस करण्याकरिता पुढीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात येत आहे.


१) आयुक्त, शिक्षण    अध्यक्ष


(२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य    सदस्य


३) संचालक, विद्याप्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सदस्य

४) सह सचिव / उप सचिव (शिक्षक व शिक्षकेतर), मंत्रालय, मुंबई   सदस्य


५) सह सचिव / उप सचिव (ग्रामविकास विभाग), मंत्रालय, मुंबई   सदस्य


६) सह संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे   सदस्य सचिव








शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा

 बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील एका शाळेतील तब्बल 15हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे.



यांतील दोघेजण गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.खिचडीत (पुलाव) शनिवारी दुपारी भोजनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटात पाल आढळून आली.

ही बाब समजेपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्‍ली होती. ज्याच्या ताटात पाल आढळली, तो सातव्या वर्गातील पृथ्वीराज वाघमारे यास उलट्या, चक्‍कर आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्याने पालकांनी त्यास लोहगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तद्नंतर एकामागून एक विद्यार्थी येत गेल्याने संख्या 15 च्या वर गेली.

कोल्हेबोरगाव येथील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना मळमळ होणे, उलट्या होणे व चक्‍कर येण्याचा त्रास होत असल्याने सदरील विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना जास्तीचा त्रास असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.


बदली संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक

गणिताशी गट्टी मासिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा क्र. ६

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहसदस्य श्री अजित तिजोरेसर निर्मिती असलेली ....


 *गणिताशी गट्टी मासिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा क्र. ६*


परीक्षेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://forms.gle/ruwegrKWJcp6fffe6


१) या परीक्षेत *काळ व वेग* या घटकावर दहा MCQ प्रश्न विचारले जातील.

२) परीक्षा दहा गुणांची असेल.

३) परीक्षेची वेळ : रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ७:०० ते ८:००

४) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.

५) प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या सदस्यांची नावे गणिताशी गट्टी फेसबुक पान तसेच व्हाट्सअप समूहावर प्रसिद्ध केली जातील.

६) रात्री आठनंतर येणाऱ्या प्रतिसादांचा क्रमांकासाठी विचार केला जाणार नाही.

७) परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल.


सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!💐



*#गणिताशीगट्टी*

राजर्षी शाहू महाराज जयंतीविषयी


 राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या सर्वांना  शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐 

         *जन्म : २६ जून १८७४*

(लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल)

         *मृत्यू : ६ मे १९२२*

                  (मुंबई)

        *अधिकारकाळ*

     इ.स. १८८४ - इ.स. १९२२

          *अधिकारारोहण*

          एप्रिल २, इ.स. १८९४

राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा

राजधानी : कोल्हापूर

पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले

पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)

राजाराम ३

उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले

वडील : आबासाहेब घाटगे

आई : राधाबाई

पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजघराणे : भोसले

राजब्रीदवाक्य : जय भवानी

प्रकाशसिंग राजपूत यांनी काढलेले महाराजांचे स्केच


                             शाहू महाराज भोसले  छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

💁‍♂️ *जीवन*

          शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

🔸 *कार्य*

              शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.


त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.


‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.


                  त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.


स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे


महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.


अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.


मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.


त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.


तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.


गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.


शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.


महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.


💎 *जातिभेदाविरुद्ध लढा*

         राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.


📖 *शैक्षणिक कार्य*

             शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा 


🏤 *शैक्षणिक वसतिगृहे*

       शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.


१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)


            वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.


🔮 *इतर कार्ये*

          शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. 


🤹‍♂️🎭 *कलेला आश्रय*

              राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.


🇮🇳 *स्वातंत्रलढ्यातील योगदान*

     महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.


🙋🏻‍♂️ *पारंपिरिक जातिभेदाला विरोध*

            शाहू महाराजांनी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.


📚 *शाहूंवरील प्रकाशित साहित्य*

'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)

राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)

शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).

बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.

राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)

राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)

कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)

राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)

राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)

राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)

समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)

‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)

लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)

🎞️📺 *चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका*

'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका

राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

📜 *पुरस्कार*

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

🗽 *सन्मान*

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या,  स्वरुपात दिला जातो.


          🇮🇳 जयहिंद ...जयमहाराष्ट्र... 🇮🇳


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

         

              माहिती स्त्रोत ~ Wikipedia

पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार

 राज्यात दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमांवर घेतल्या, तर प्रात्यक्षिकांसाठी ४० टक्के अभ्यासक्रम समाविष्ट होता.


 पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती, मात्र २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे.

आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली धोरण...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे शाळा सलग सुरू नव्हत्या. अनेक ठिकाणी शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले, मात्र अपुरी इंटरनेट सुविधा, नेटवर्क नसणे, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसणे, अशा विविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आल्या. यावर उपाय म्हणून एससीईआरटी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे या इयत्तांच्या परीक्षा या ७५ टक्के अभ्यासक्रमावरच घेण्यात आल्या. यंदाचे शैक्षणिक वर्ष हे वेळेवरच सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या शाळा या नियमित पद्धतीने, पूर्ण वेळ सुरू आहेत. विदर्भातील शाळाही येत्या २७ जूनपासून सुरू होणार असल्याने सद्य:स्थितीत शाळांच्या वेळेत किंवा तासिकांत कोणताही अडथळा नसून त्या त्या योग्य पद्धतीने सुरू असल्याने अभ्यासक्रम पूर्ववत म्हणजे १०० टक्के करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.


कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग मंदावला होता. शिवाय बऱ्याच कालावधीनंतर परीक्षांना सामोरे जाणार होते. 

त्यामुळे राज्य मंडळाने विशेष बाब म्हणून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार १५ ते ३० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. मात्र यापुढे परीक्षेसाठी कोणताही अधिक कालावधी राहणार नाही. त्यानुसार विद्यार्थ्यांना १०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी राहणार असल्याचे  स्पष्ट करण्यात आले आहे.