डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शैक्षणिक कर्ज काढले तर हे वाचा....

 अलीकडच्या काळात फक्त गुणवत्तेच्या आधारावर पैशाअभावी शिक्षण घेणे कठीण झाले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या महागड्या अभ्यासाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. 



त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही यापासून दूर राहावे लागते. मात्र शैक्षणिक कर्ज हा यावरचा एक एकमेव  उपाय आहे. शैक्षणिक कर्ज घेऊन तुमचे चांगल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे या कर्जामध्ये प्राप्तिकरात विशेष सूट देण्याची तरतूद आहे. बरेच लोक त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतात मात्र हे त्यांना माहिती नसते की शैक्षणिक कर्जाद्वारे ते प्राप्तिकरातदेखील सूट किंवा वजावट मिळवू शकतात. 


प्राप्तिकरात सूट कशी मिळवायची?

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80E आणि 80C अंतर्गत शैक्षणिक कर्जाला सूट मिळू शकते. या नियमानुसार जे लोक प्राप्तिकर भरतात, त्यांनी जर आपल्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर अशांना प्राप्तिकरात सूट मिळते. आयटीआर भरताना प्राप्तिकर भरणारे यामध्ये सूट मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच, जर तुम्ही शैक्षणिक कर्ज किंवा एज्युकेशन लोनवर व्याज देण्यासाठी पैसे खर्च केले असतील तर तुम्हाला कमी प्राप्तिकर भरावा लागेल.


कोणाला मिळतो या सवलतीचा लाभ

ज्यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज घेतले आहे ते पालक शिक्षण कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्ही प्राप्तिकरदाता असणे आवश्यक आहे. कारण ही सूट तुम्हाला थेट प्राप्तिकरात मिळणार नाही.

किती रुपयांची वजावट मिळते

प्राप्तिकर कायद्यानुसार शैक्षणिक कर्ज घेऊन वर्षभरात दीड लाखांपर्यंतचा लाभ घेता येतो. जर पती आणि पत्नी दोघेही प्राप्तिकर भरणारे असतील तर दोघेही स्वतंत्र परताव्यासाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त मुले असतील आणि तुम्ही दोन मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर असे होऊ शकते.

खेळ जुना युग नवा... पहा...

शैक्षणिक कर्जावरील वजावटीसाठीटा अर्ज

यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र किंवा आयटीआर साठी अर्ज करावा लागेल. तुम्ही व्याज जमा करता तेव्हा तुमची बँक तुम्ही भरलेल्या रकमेचे प्रमाणपत्र देते. हे प्रमाणपत्र ITR सोबत जोडावे. जर तुमच्या पगारातून कर्जाचे व्याज (TDS) कापले गेले असेल तर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र किंवा आयटीआरसाठी अर्ज करताना परतावा म्हणजे रिफंड मागू शकता. पण टीडीएस कापला जाऊ नये म्हणून आधी तुम्ही ज्या कंपनीत काम करत असाल तिथल्या एचआरला याबद्दल सांगणे जास्त योग्य ठरेल.

अंगात रक्त कमी चीडचीड जास्त...

 शिक्षकाविरुद्ध  चुकीच्या आरोपांवर आता जनशक्ती शिक्षकासोबत उभी राहणार आहे .

जनशक्ती शेतकरी संघटना असून याचे अतुल खूपसे यांनी झी 24 तास शी बोलताना शिक्षकांच्या विरोधात घेतलेल्या प्रशांत बंब यांच्या भूमिकेला आता जनशक्ती शेतकरी संघटना विरोध करणार असून त्यांच्या  या विरोधात आंदोलन छेडणार आहे.

खुपसे यावेळी म्हटले की अनेक शिक्षक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले आहेत व त्यांना पाठिंबा आम्ही देणार आहोत.


न भुतो ना भविष्य असा मुक मोर्चा click here...


अतुल खुपसे काय म्हणाले खालील व्हिडीओ पहा....


डिजिटल समूहाच्या अधिकृत युटुबचे सदस्य बना join now...




प्रचंड शिक्षक मुक मोर्चा

 औरंगाबाद जिल्ह्यातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे शिक्षकांमध्ये जो संतोष निर्माण झालेल्या आहे .


त्याच्याविरोधामध्ये आज निघालेल्या मूक मोर्चाचा भव्य रूप पाहण्यात आलेले आहे.शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे हे ही दिसून येत आहे.
 आपल्याला खालील व्हिडिओमध्ये विराट असा मोर्चा दिसून येईल..

 शिक्षण क्षेत्रातील चालू अपडेट करीता youtube channel subscribe करा....




खाजगी इंग्रजी शाळेतील शिक्षक मुख्यालयी न राहता ही गुणवत्ता येतेच...

 मुख्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हा मुद्दा आज संपूर्ण राज्यभर गाजत आहे.

यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रशांत बंब यांच्या मुख्यालय व गुणवत्ता यांच्या परस्पर संबंधाशी केलेल्या विधानावरून राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तथा एक उत्तम व्याख्याते असलेले श्री बाळासाहेब गरुड यांनी मुख्यालय व गुणवत्ता याचा काही संबंध नाही. हे उदाहरणावरून सिद्ध करून दाखवलेले आहे.

 जिल्हा परिषद शिक्षकांना शाळाबाह्य असलेली कामे, शाळेत असलेल्या भौतिक सुविधांचा अभाव, शाळेतील रिक्त पदांची संख्या या सर्व बाबी गुणवत्ता  बाबतीत जबाबदार आहे .

 प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक मुख्यालय राहायला नसतो  तरी त्यांची गुणवत्ता ही उत्तम असते हे तर्क श्री बाळासाहेब गरुड यांनी मांडलेले आहे. 

त्यांचा संपूर्ण याविषयीचे  त्याचे विचार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऐकू शकतात

http://bit.ly/3RCwLBS



शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....


जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....


डिजिटल समूहासोबत सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा.... 


जिल्हातंर्गत बदली बाबत महत्त्वाचे

 जिल्हांतर्गत बदली 2022 प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीची कार्यवाही...

बदली पात्र शिक्षक TBR चा टप्पा पार पडल्यानंतर सुधारीत रिक्त जागांपैकी अवघड किंवा सर्वसाधारण कोणतीही शाळा 30 पसंतीक्रम मध्ये मागू शकतात.


 जिल्हातंर्गत बदली सुरूवात ११ सप्टेंबर....