डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षण सेवा पंधरवडा यापुढे दरवर्षी

 शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी "शिक्षण सेवा पंधरवडा अभियान " राबविणेबाबत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मा. मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या संकल्पनेस अनुसरुन "शिक्षण सेवा पंधरवडा' आयोजित करावयाचा आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या कारणासाठी त्यांना संबंधित कार्यालयात वारंवार भेटी द्याव्या लागत आहेत आणि या कारणामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. त्यांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सेवा विहित कालमर्यादेमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे.

तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने "शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान व पारदर्शक पद्धतीने सेवा विहित कालमर्यादित देण्याच्या अनुषंगाने दि. ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस "शिक्षण सेवा पंधरवडा यापुढे दरवर्षी राबविण्यात येणार आहे. शासन आदेश पहा....





जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची सभा गुंडाळली

 जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची आमसभा निर्णय विना गुंडाळली...


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण आमसभा रविवारी दि. १० सप्टेंबर रोजी आयोजित   करण्यात आली होती. मात्र, गोंधळामुळे एकही ठराव मंजूर न करता ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे अनेक सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा टीव्ही सेंटर येथील गुलाब विश्व हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. सभेच्या पहिल्या सत्रात विभागीय सहायक संचालक रवींद्र वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सत्कार  करण्यात आला. 

दुसऱ्या सत्रात संचालक मंडळाने तीन ठराव ठेवले...

१) पतसंस्थेतील ठेव एक हजार रुपयांवरून १२०० रुपये करण्यात यावी, 

२)कल्याण निधी २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात यावा आणि

३) पतसंस्थेतील संचालक १३ वरून १७ करण्यात यावे या ठरावांचा समावेश होता.

त्याचवेळी सभासदांच्यावतीने दोन ठराव मांडले. 

 व्याजदर आठ टक्के करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळाने साळकर यांनी मांडलेल्या ठरावांना विरोध केला. त्यामुळे सभासदांनी संचालक मंडळाच्या ठरावांनाही जोरदार विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाल्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली.

  एकही ठराव मान्य न होता आमसभा आटोपली याची खंत सर्वच सदस्य व मागणीकर्ते श्री  विजय साळकर श्री गणेश सोनवणे आर.आर.पाटील यांनी व्यक्त  केली.

मराठा योद्धा मनोज पाटील यांच्यावर लिहिलेली सुंदर कविता...

 मराठा योद्धा मनोज पाटील....

🚩🚩🚩🚩🚩

कवी: दत्ता टरले 9420219159

😊🚩🚩🚩👏🏻


करून जिवाचं रान

बसला वाघ जिद्दीने..

लोटले भले भले ते

आपुल्या हुशार बुद्धीने

😇😇🚩🚩🚩🚩🚩


मग जागली सूड बुद्धी

केला क्रूर  खाकी हल्ला

मग पेटला अजुन सूर्य

गोडीत दिला सल्ला

🚩🚩🚩🚩😊

त्या लाठ्या कट्या छेरे

त्या किंकाळ्या गाजल्या

मग जागला अजुन मराठा

गावोगावी तुताऱ्या वाजल्या

🚩🚩🚩🚩💪💪


आजी माजी दमले

जो तो येऊन झटला..

पण वाघ तो मराठा

एक कण मागे न हटला

🚩🚩🚩🚩🚩


ना द्वेष केला कुणाचा

ना मान ही तिथे कुणाला

द्या माझ्या हक्काचे मज

एका स्वरात म्हणाला

🚩🚩🚩😊😊


मरणाला सामोरे जावे

हे प्रेम किती जातीचे..

हा मावळा खरा शिवबांचा

नाते महाराष्ट्र मातीचे

🚩🚩🚩🚩😊😊


हाच सूर्य आहे मराठा

हा आरक्षणाचा दाता

उठा जागे व्हा ओळखा

हा खरा मराठा नेता

😊🚩🚩👏🏻👏🏻🤝🤝


कवी: दत्ता टरले 9420219159

🚩🚩🚩🚩🚩🚩



 

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती स्थापण्याबाबत

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये 


आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत.. शासन निर्णय पहा....



शिक्षक दिनी आंदोलन #teachersday

 शिक्षकांना शिकवू द्या जिल्हा परिषद शाळा टिकू द्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक दिनी  लक्षवेधी आंदोलन teachersday

         जिल्हा परिषद शिक्षकांना कायमच असणारी अशैक्षणिक कामे, विविध सर्व्हे, ऑनलाईन माहिती, परीक्षेचा भडिमार, बी एल ओ ची कामे अशी विविध अशैक्षणिक कामे बंद करून "शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या!"असे लक्षवेधी बॅच लावून  उद्या शिक्षक दिनी शिक्षकांनी काम करावे असे आवाहन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





         शिक्षक दिनानिमित्त देशभर शिक्षकांचा सन्मान होत असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शाळा सध्या बदनाम करण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शिक्षकांना अशी  अशैक्षणिक काम लादून ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप समन्वय समिती च्या वतीने करण्यात आला आहे. शिक्षकांना वेगवेगळी उपद्रवी उपक्रमामुळे व मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहे.

           याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने एकत्र येऊन शासनापर्यंत रोष व्यक्त होण्यासाठी व आपल्या भावना पोहोचवण्यासाठी सर्वांनी शिक्षक दिनी "आम्हाला शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या" अशा आशयाचे घोषवाक्याचे टॅग लावून शिक्षक काम करणार असल्याचे शिक्षक समन्वय समिती तर्फे आवहान करण्यात आले आहे.