Rte प्रवेश करिता १० मे पर्यंत मुदतवाढ
त्यानुसार 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) 30 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे काढण्यात आली होती.
यानुसार दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS देखील पाठविण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक वर्ष सन 2022-23 या वर्षाकरीता आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संचालनालयाचे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रानुसार 29 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
याबाबत निवड यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश घेण्याकरिता आता सुधारित निर्देशांनुसार दिनांक 10 मे 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ही मुदतवाढ शेवटची मुदतवाढ असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून दिनांक 10 मे 2022 पूर्वी आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा
२०२२ सालातले पहिले सुर्यग्रहण...
2022 सालातील पहिले सूर्यग्रहण आज शनिवार, 30 एप्रिल रोजी होत आहे. हा दिवस वैशाख अमावस्या आहे.
सूर्यग्रहण 2022 वेळ - 30 एप्रिलचे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी सुरू होईल. रात्री उशिरा 12.15 वाजता सुरू होईल. हे सूर्यग्रहण 03 तास 08 मिनिटे चालणार आहे. सूर्यग्रहण 2022 मोक्ष काळ - वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा मोक्ष काळ रविवार, 01 मे रोजी सकाळी 04:07 वाजता आहे.
यावेळी सूर्यग्रहण संपेल. सूर्यग्रहण 2022 सुतक कालावधी सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे भारतातील आंशिक सूर्यग्रहण आहे, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही. सूर्यग्रहण 2022 चे स्थान - हे सूर्यग्रहण प्रशांत महासागर, अटलांटिका, दक्षिण आणि पश्चिम अमेरिका आणि अंटार्क्टिका या भागात दिसणार आहे.
हे केळी जास्त काळ चांगली राहतील; बाजारातून आणल्यानंतर करा या सोप्या ट्रिक्स सूर्यग्रहणाचा प्रभाव - भारतात आंशिक सूर्यग्रहण असल्याने त्याचा शारीरिक परिणाम होणार नाही.
उन्हाळी व दिवाळी सुट्टी औरंगाबाद जिल्हा नियोजन...
१३ जून पासून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरु होतील.
नुकतेच जिल्हा परिषद औरंगाबाद याचे याबाबत परिपत्रक प्रकाशित झालेले असून यात उन्हाळी सुट्टी व दिवाळी सुट्टीचे संपूर्ण नियोजन दिलेले आहे. उन्हाळ्याच्या सुट्या ४२ दिवस तर दिवाळीच्या २२ दिवस असणार आहे.
आरटीई प्रवेश यंदा अनेक जागा रिक्त
खाजगी इंग्रजी शाळेच्या आरटीई अंतर्गत शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांचे मोफत प्रवेश केले जातात.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा ९ हजार ८६ शाळांतील १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जवळपास ५४ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली.
आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत मंदगतीने सुरू आहे.
जागा रिक्त राहील्या असे का झाले?
आरटीई प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने किंवा ती उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने अनेक पालकांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत.
प्रवेशासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी संपत येऊनही प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांचा अद्याप प्रवेश निश्चित नाही.
मुदतवाढ परत मिळणार ?
आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशांसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार, की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
१ मे वर्धापन दिन साजरा करण्याबाबत
१ मे महाराष्ट्र दिन राज्यात सर्वत्र आनंदाने साजरा करण्याबाबतचे महत्वाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
बारावीचा निकाल 10 जून तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता
राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी स्वीकारलेच नाहीत. काहींनी तर हे गठ्ठे बोर्डाकडे परत पाठवून दिले. त्यामुळे दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर परिणाम होऊन निकाल वेळेत जाहीर होईल का, असा प्रश्न बोर्डासमोर उभा राहिला होता, मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या अचूक नियोजनामुळे पेपर तपासणीचे काम विनाअडथळा सुरू आहे.
तपासलेल्या उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळात जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानाचे बारकोडनुसार काऊंटर स्पॅनिंग करून एकूण गुण गोळा करण्यात येत आहे. त्यानंतर निकाल तयार केला जाणार आहे, असेही बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई विभागात उत्तरपत्रिकांची तपासणी स्थिती
मुंबई विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बारावीच्या एकूण 18 लाख 92 हजार 929 उत्तरपत्रिका तपासणीसाठी आहेत.
या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एकूण 1651 मॉडरेट्स असून यापैकी 1157 मॉडरेटर्सनी तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा केल्या आहेत, तर दहावीच्या 33 लाख 20 हजार 207 एकूण उत्तरपत्रिका असून 2605 मॉडरेट्सवर तपासणीची जबाबदारी आहे. त्यापैकी 2067 जणांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा केल्या आहेत