डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा (Teachers march)

 🚩🚩👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

🚩🚩

औरंगाबाद येथे समन्वय समिती आयोजित राज्य व जिल्हास्तरावर वरील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांचा(Teachers march)   प्रचंड भव्य मोर्चा प्रत्येक मुद्दयांचा परामर्श घेत अन्याय कारकधोरणावर प्रचंड रोष!



 महिला भागिनींची प्रचंड उपस्थिती!!!

तर हजारो शिक्षक भरपावासात रस्त्यावर,...


 त्यांनी शाळेतून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदविला, घोषणा दिल्या , जिल्ह्यातील सात ते आठ हजार शिक्षक मोर्च्यातील न्याय हक्काच्या मागण्या सोबत तन मन धनाने होते हे विशेष मोर्चेकरी यांनी तुगलकी कारभाराचा निषेध निवेदनाद्वारे नोंदवला*

शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा 



*आता फ़क्त एकच लक्ष्य.....!*

*अन्यायविरहित शिक्षण क्षेत्र....!!*

*आम्हला फक्त शिकवू द्या; (Let us just teach) सरकारी शाळा टिकवू द्या.... (Let government schools survive) या प्रमुख मागणी सह सुमारे 39 न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लक्षवेधी मोर्चा काढून राज्य सरकार व शिक्षण व्यवस्था प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यात आले !!*



*खऱ्या अर्थाने मोर्चाचे नेतृत्व उपस्थित सर्व  शिक्षिका व शिक्षक यांनी केले , यापुढे कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी पडणार नही , असा निर्धार मोर्चेकरी यांनी ,समन्वय समिती माध्यम होती, समारोप प्रसंगी समन्वय समितीचे सर्व समन्वयक यांनी सांगितले की न्याय  मिळवून देण्यासाठी ,अन्यायकारक विषयावर यापुढे  तीव्र आंदोलन करू , आजचा मोर्चा   यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार*    *धन्यवाद!!!!* 

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻


मैत्री दिनाची काव्यभेट

 आज मैत्री दिनाच्या माझ्या  तमाम  मित्रांना काव्यमय शुभेच्छा देत आहे ,

माझी एक रचना  सोबती याच मैत्री विषयावर लिहिलेली काव्यरचना आपल्यासाठी व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे.

 जर काव्यरचना आवडल्यास माझ्या या यूट्यूब चैनल ला आपण सबस्क्राईब करा आपली मैत्री अशीच घट्ट राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणारा प्रत्येक दिवस माझ्या मित्रांसाठी आनंदाचा क्षण घेऊन येणारा असावा.

 आपण ही आपल्या  मित्रांना ही रचना पाठवावी मैत्रीतील भाव यातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

      प्रकाशसिंग राजपूत 

       औरंगाबाद 




15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन


 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक ..


*1)*  15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा     *फडकवतात*  तर ...   26 हे जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात. 


कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

 


                                                                 

2)  15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)*  म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला*  जातो. त्याला *(flag unfurling)*  म्हणतात. 



3) 15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.       

  तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                                  



*4)*  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर *ध्वजारोहण* होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा *फडकवला* जातो.               *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे._

 *वंदे मातरम*👏👏👏👏👏👏👏👏👏

दांडी बहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई

 
भरमसाठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना आता धडा मिळणार....


 दांडी बहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत.



यापुढे  प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकवणारे शिक्षकांची छायाचित्र लावण्याचे ही आदेश देण्यात आले .


शाळेत न जाता गले लठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना आता धडा मिळणार असल्याचे  बोलले जात आहे . 

दांडीबहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी  तातडीने सूचना दिल्यात  शिक्षण क्षेत्रातील  ही सर्वात  मोठी  बातमी पुढे आलेली आहे. 




  यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकवणारे शिक्षकांची छायाचित्र लावण्याचे हे आदेश देण्यात आले

जिल्हा व तालुका मुख्यालय येथे येण्यास निर्बंध


 जिल्हा किंवा तालुका मुख्यालयामध्ये फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलाय.अनेक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामूळे विविध देयके, जी.पी.एफ प्रकरणे हस्तक्षेप न होता नियमाने निघणार आहे.


 या संदर्भात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी याबाबत पत्र काढलेले आहे.

  जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी एका कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी असे या पत्रामध्ये म्हटलेले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं असेल तर मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्वपरवानगी घ्यावी आणि जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात 

आल्यानंतर परवानगीच पत्र दाखवून विजिट बुकला नोंद करावी लागणार आहे.



अनेक  मंडळी ही फाईल काढण्याची  कामे करण्याची जबाबदारी स्वीकारत ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून बऱ्याच वेळेला पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेला फेऱ्या मारत असतात .

बऱ्याच वेळेला स्वतःची काम करून घेत असतात आणि त्यामुळे हे असे निर्बंध शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालय किंवा पंचायत समिती मुख्यालयात विनापरवानगी फिरू नये अशा स्वरूपाचे पत्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एक ऑगस्ट रोजी निर्गमित केलं. 

अनेक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामूळे विविध देयके, जी.पी.एफ प्रकरणे हस्तक्षेप न होता नियमाने निघणार आहे.