औरंगाबाद जिल्ह्यातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे शिक्षकांमध्ये जो संतोष निर्माण झालेल्या आहे .
प्रचंड शिक्षक मुक मोर्चा
खाजगी इंग्रजी शाळेतील शिक्षक मुख्यालयी न राहता ही गुणवत्ता येतेच...
मुख्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हा मुद्दा आज संपूर्ण राज्यभर गाजत आहे.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रशांत बंब यांच्या मुख्यालय व गुणवत्ता यांच्या परस्पर संबंधाशी केलेल्या विधानावरून राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तथा एक उत्तम व्याख्याते असलेले श्री बाळासाहेब गरुड यांनी मुख्यालय व गुणवत्ता याचा काही संबंध नाही. हे उदाहरणावरून सिद्ध करून दाखवलेले आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांना शाळाबाह्य असलेली कामे, शाळेत असलेल्या भौतिक सुविधांचा अभाव, शाळेतील रिक्त पदांची संख्या या सर्व बाबी गुणवत्ता बाबतीत जबाबदार आहे .
प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक मुख्यालय राहायला नसतो तरी त्यांची गुणवत्ता ही उत्तम असते हे तर्क श्री बाळासाहेब गरुड यांनी मांडलेले आहे.
त्यांचा संपूर्ण याविषयीचे त्याचे विचार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऐकू शकतात
शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....
जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....
डिजिटल समूहासोबत सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा....
जिल्हातंर्गत बदली बाबत महत्त्वाचे
जिल्हांतर्गत बदली 2022 प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीची कार्यवाही...
बदली पात्र शिक्षक TBR चा टप्पा पार पडल्यानंतर सुधारीत रिक्त जागांपैकी अवघड किंवा सर्वसाधारण कोणतीही शाळा 30 पसंतीक्रम मध्ये मागू शकतात.
जिल्हातंर्गत बदली सुरूवात ११ सप्टेंबर....
जुना खेळ .... नवं युग....
माझ्या मामाचं मोबाईल हरवलं....
जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी औरंगाबाद (aurangabad) या शाळेत आम्ही एक नवीन खेळ घेतला विद्यार्थ्यांनी पत्रव्यवहार आता काही पाहिलेलं नाही.
नवीन युगात आता मोबाईल वरील व्हाट्सअप संदेश आणि मोबाईल कॉल हे नवीन संदेशवनाचे प्रमुख साधन झालेलं आहे,
शिक्षकांची अशैक्षणिक कामातून लवकरच मुक्तता
म्हणूनच आम्ही माझ्या मामाचं पत्र हरवलं या ऐवजी आम्ही खेळामध्ये माझ्या मामाचा मोबाईल हरवला हा खेळ घेतलेला आहे. मुलांनी फार आनंदाने हा खेळ खेळून आनंद घेतलेला आहे.
प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे
सहशिक्षक
व्हिडीओ पाहण्यासाठी 👇
#mobile #games
खुलताबाद तालुक्यात घरभाडे कपातीचे आदेश
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये शिक्षकांचे घर भाडे भत्ता कपात करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले असून सप्टेंबर 2022 पासूनच्या वेतनात शालार्थ प्रणालीतून मुख्यालय राहत नसलेल्या शिक्षकांचे घर भाडे भत्ता कपात करण्याचे आदेश नुकतेच निर्गमित केलेले आहे .
यामध्ये शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचेही आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.
एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या या कारवाईमुळे सर्व शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबतीत योग्य तो निर्णय शासनाने घेऊन शिक्षकांवरील अन्याय दूर करावा अशी अनेक शिक्षकांची मागणी होत आहे .
आपला बदली प्रकार पहा....
गटशिक्षणाधिकारी यांनी काढलेले आदेश खालील प्रमाणे आहेत
सांज.... नविन कविता कवी प्रकाशसिंग राजपूत
मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे.
मराठी कविता मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ
सांज...
दिवसा थांबे धावपळ ती झांज
शांत शांत किती रे होत सांज
रंगछट्टा पसरुनी या आसमानी
पक्ष्यांची धाव घरटीच्या दिशेनी
भास्करा लृप्त होणार तळपते राज्य
पुन्हा पसरण्या सोनेरी साम्राज्य
जगास धावण्या तुझ्यापरी लावितो
कष्टानंतर विराम तुच दावितो
प्रकृती हा खेळ तुझा अजब
वर्णन करण्या न शब्द रे गजब
जसा जीवनी रेशमाचा धागा
चाली वाट सुखाची शोधून जागा
प्रकाशसिंग राजपूत
छ.संभाजीनगर
शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार
राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारी बाब .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले यावेळी त्यांनी यापुढे शिक्षकांना शिकवणीशिवाय इतर कोणतीही काम देऊ नयेत .
अशा सूचना दिलेल्या आहेत शिक्षकाची जागा कोणत्याही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही .शिक्षकांना सोपवण्यात येणारी अन्य शाळाबाह्य जी कामं आहेत हे देखील एक मोठा आव्हाने आपल्यापुढे आहे.
त्यांनी अनेक वेळा मला त्या सूचना आलेले आहेत राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारीचे काम सोडलं तर इतर शैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही,
याची काळजी देखील घेण्याच्या सूचना या ठिकाणी विभागाला देण्यात नक्की येतील .शाळाबाह्य मुलांच्या समस्या आहेत गांभीर्याने विचार करण्याचा विषय असून त्यावर देखील मार्ग काढला जाईल .
शिक्षकांना सोपविण्यात येणारी अन्य शाळाबाह्य जी कामं आहेत हे देखील एक मोठं आव्हाने आपल्यापुढे आहे ,त्यांनी यावेळेस सांगितले अनेक वेळा मला त्या सूचना आलेले आहेत राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारीचे काम सोडलं तर इतर शैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही.
आपला जिल्हातंर्गत बदली प्रकार पहा...
याची काळजी देखील घेण्याच्या सूचना या ठिकाणी विभागाला देण्यात येतील. शाळाबाह्य मुलांच्या समस्या आहे गांभीर्याने विचार करण्याचा विषय असून त्यावर देखील मार्ग काढला जाईल.