*शालेय पोषण आहार मागील माहिती भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तरी सर्व मुखयाध्यापकांनी पाठीमागील राहिलेली माहिती ऑनलाइन भरून घ्यावी .
*त्यासाठी गुगल क्रोम वरून MDM हे नाव सर्च करावे त्यानंतर एमडीएम लॉगिन करून केंद्रप्रमुख लॉगिन आयडी टाकून पासवर्ड टाकावा त्यानंतर कॅपच्या कोड टाकून लॉगिन करावे.*
*त्यानंतर केंद्रप्रमुख लॉगिन ओपन होईल.*
*ओपन झाल्यानंतर तारखे वरती जाऊन ज्या तारखेची माहिती भरावयाची राहिली आहे त्या तारखेला टच करावे व रिझल्ट या बटनाला टच करावे.*
*त्यानंतर थोड्याच वेळात त्या दिवसाची केंद्रातील सर्व शाळांची संख्या माहिती येईल.*
*त्यानंतर केंद्राच्या नावावर आहे किंवा केंद्राच्या नंबर वरती टच करावे सर्व शाळांची नावे येतील.*
*ज्या शाळांची माहिती भरलेली आहे त्यांच्यापुढे View व ज्या शाळांची माहिती भरली नाही त्या पुढे Add ही चौकट येईल*
*त्या Add या चौकटीवर टच करावे. शाळेची माहिती भरण्यासाठी ओपन होईल .त्या तारखेला असलेला पट आणि उपस्थिती भरून त्या दिवशीचे जो धान्यादी माल/ दाळ टाकावी व अपडेट Update महणावे त्या दिवसाची माहिती अपडेट झालेली असेल.Data saved Successfuly मेसेज येईल. त्यानंतर परत ज्या तारखेची माहिती राहिली आहे तो महिना ती तारीख टच करावी दिनांक राहिली आहे त्या तारखे वरती जाऊन परत एकदा रिझल्ट Result बटन दाबावे व आलेल्या माहितीत वरील प्रमाणे मागील राहिलेल्या दिवसांचे तांदळाची माहिती भरावी. सदर मुदत ही 4 तारखेपर्यंत असून त्यानंतर बिल जनरेट होईल त्यामुळे सर्व शाळांनी लवकरात लवकर Back dated माहिती भरून घ्यावी. त्यासाठी आपापल्या केंद्राचा लॉग इन आयडी व पासवर्ड केंद्रप्रमुख यांचेकडून घ्यावा .राहिलेली तांदळाची माहिती भरून घ्यावी.*
विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील कौशल्य प्राप्त करणे शिक्षण प्रणालीचे उद्दिष्टे झालेले आहे.
आपण सहजच अनेक कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यांना जोपासणी करु शकतो, जसे क्रिटिकल थिंकिंग ,कोलाब्रेशन, क्रिएटिव्हिटी या सर्व सहज घडून येणाऱ्या कृतीतून विद्यार्थ्यांना आत्मसात होणाऱ्या बाबी असून इ कौशल्य आत्मसात झाल्यास उद्याच्या युगासाठी सक्षम असे विद्यार्थी आपले तयार होणार आहेत.
आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडा वाडी येथे आम्ही असंच विद्यार्थ्यांना एकजुटीने काम करण्यासाठी आणि स्वच्छतेचे महत्त्व लक्षात राहण्यासाठी ज्ञानरचनावादी साहित्याची साफसफाई व व्यवस्थित मांडणी करण्याचे काम सोपविले .
तेव्हा पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची फौज ही सर्व कामे करताना त्यांची होणारी तारांबळ परत पुन्हा पुन्हा करण्यात येणारा प्रयत्न व एकमेकांशी होणारा संवाद हा काही अजबच अनुभव देणारा ठरलेला आहे .
आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकतात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे स्वच्छता करत साहित्याची व्यवस्थित मांडणी केलेली आहे.
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमधील गटशिक्षणाधिकारी यांनी रिक्त पदाची यादी भरण्यासंबंधीचा आज व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे .
तयार केलेल्या बदली पोर्टलच्या संदर्भात रिक्त पदांची यादी कशी भरायची यासंबंधीचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे .
हा मार्गदर्शक व्हिडिओ असून या व्हिडिओ मधून नेमकी यादी तयार होणार आहे एक प्रकारे जिल्हा अंतर्गत बदलीचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झालेला आहे.
एका अर्थाने बदली प्रक्रिया आता वेग घेणार आहे. आपण खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये बदली प्रक्रियेच्या संबंधित हा व्हिडिओ पाहू शकतात डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या youtube चॅनलला आपण सबस्क्राईब करा व अद्यावत राहण्यासाठी गुगलवर डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या नावाने सर्च करावे.
औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झालेले मुख्यालय संबंधित विषयावर कन्नड सोयगांव चे आमदार आदरणीय उदयसिंग राजपूत यांनी शिक्षकांच्या समर्थनार्थ पत्र दिलेले आहे .
त्यांच्या या कार्याबद्दल पैठणच्या एका शिक्षिकेने त्यांना फोनवर आभार मानलेले आहे आपण खाली दिलेली व्हिडिओ क्लिप ऐकू शकतात अशा प्रकारे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून शिक्षकांचा सन्मान राखण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी या जागतिक विश्वावर आपल्या विचारांचा प्रभाव पाडण्याची संधी घेऊन येत आहे .
डिजिटल स्कूल समोर महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर आपले विचार , कल्पकता प्रकाशित करण्याची ही नामी संधी आपणासाठी घेऊन येत आहे.
आपला आपणास आवश्यक वाटलेला एखादा शैक्षणिक विचारावर आपण लेख लिहायचा आहे .500 ते 700 शब्द मर्यादा असलेल्या या लेखांमध्ये आपण नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्यपूर्ण शाळेतील बदल तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक विचारांचा लेखाजोखा यामधून मांडू शकतात .
यामुळे अनेक शिक्षकांना आपल्या विचारांचा ,नवीन नवीन कल्पकतेचा उपयोग होत प्रगत महाराष्ट्र घडण्यामध्ये आपले हातभार लागू शकतो.
आपणास आपला लेख प्रकाशित करण्यासाठी आपण संपर्क करावा
प्रकाशसिंग राजपूत
समूहनिर्माता
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र
व्हाट्सअप क्रमांक 9960878457
या नंबरवर आपण आपला लेख व त्या संबंधित फोटो पाठवू शकतात जर आपणास व्हिडिओ पाठवायचा असेल तर वैयक्तिक व्हाट्सअप वर पाठवण्यात यावा ...
राज्य सरकारने वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
तसे झाल्यास जिल्ह्यातील सुमारे 447 मराठी शाळांवर संकट येण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे 1516 शाळा असून त्यापैकी 447 शाळांमध्ये 20 व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी, यासाठी शासनस्तरावरुन विविध कार्यक्रम राबवण्यात येते. यासोबतच शाळांमध्ये विद्यार्थी टिकून राहावा, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तक व माध्यान्ह भोजन आदी पुरवण्यात येते. मात्र, यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्याचे नाव घेत नाही. सध्या असलेली पटसंख्याही दिवसेंदिवस घसरत चालली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी राज्यातील कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता.
शून्य ते वीस पटाच्या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, अशी विचारणा शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निर्गमित केलेल्या पत्रात केली आहे.