डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
neet exam 2022 date लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
neet exam 2022 date लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बदली बाबत नविन अपडेट पहा...

 बदली संदर्भात १५ जुलैचे पत्रक


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.

 सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत बदलीस पात्र असलेल्या/ विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


 तथापि, काही जिल्हा परिषदांकडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये शिक्षकांचे आडनाव नमूद नसल्याची बाब Vinsys IT Services (I) Pvt. Ltd यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. (प्रत सोबत)



२. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत धोरणातील तरतूदीनुसार एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास व त्यांची सेवाजेष्ठता, तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनांव प्रथम येईल, अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येणार आहे. 

त्यामुळे ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रीयेसाठी शिक्षकांचे आडनांव नमूद असणे आवश्यक आहे. सबब, सदर प्रणालीमध्ये आडनांव नमूद न केलेल्या सर्व शिक्षकांना त्यांची आडनांवे (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ. मध्ये नमूद केल्याप्रमाणे) प्राथम्याने नमूद करण्याबाबत कळविण्यात यावे व त्याप्रमाणे प्राथम्याने दुरुस्ती करुन घ्यावी, 

कर्मचारी मुख्यालयबाबत महत्त्वाची बातमी

सदर प्रणालीमध्ये आडनांवे नमूद न करणान्या शिक्षकांना बदलीसाठी इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आडनांवानुसार प्राधान्यक्रम मिळाला नाही तर, त्यास संबंधित शिक्षक जबाबदार राहतील, ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणावी, ही विनंती करण्यात आलेली आहे.

रणजित डिसले यांच्या अडचणीत वाढ

 जागतिक Global पुरस्कार  विजेते  शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ३४ महिन्यांच्या गैरहजेरीच्या कालावधीत मिळालेले वेतन त्यांनी स्वत:च मंजूर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले आहे.


जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर नेमणूक होऊनही डिसले तेथे गेले नाहीत आणि मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शाळेतही उपस्थित राहिले नाहीत. असे असताना शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जागतिक पुरस्कार मिळवून प्रकाशझोतात आलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शिक्षक डिसले हे प्रत्यक्षात ३४ महिने शाळेत किंवा प्रतिनियुक्तीवर नेमणूक झालेल्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातही गैरहजर असल्याचे उघड झाले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी अहवालात डिसलेंकडून ३४ महिन्यांचे जवळपास १७ लाख रुपये वेतन वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, मुळात गैरहजर असताना डिसलेंना वेतन मिळालेच कसे, आणि ते दिले कुणी, असे प्रश्न उपस्थित झाले. डिसले यांनी या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून गैरहजर असताना स्वत:चे वेतन स्वत:च मंजूर केल्याचे दिसते आहे. चौकशी समितीने नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका डिसले यांच्यावर ठेवला आहे.

शिक्षक बदल्या होतील का?

वेतन मंजूर कसे झाले?

डिसले यांना वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर हजर होण्यासाठी नियमानुसार परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर डिसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा संपूर्ण भार तेथील सेवाज्येष्ठ शिक्षक कदम यांना दिला. परंतु आर्थिक व्यवहार डिसले स्वत:च पाहात होते. या कालावधीत त्यांनी नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून येते. मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या अधिकारात अनधिकृतपणे त्यांनी स्वत:च्या वेतनाची उचल केल्याचे दिसून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्वाक्षरीही वेगवेगळी ..

कालावधीत परितेवाडी जिल्हा परिषद शाळा, वेळापूरची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेकडील शालेय अभिलेखे पाहता डिसले यांच्या स्वाक्षरीमध्ये अनेक ठिकाणी फरक असून त्यांनी वेगवेगळय़ा प्रकारची स्वाक्षरी केल्याचे दिसून येते. १३ नोव्हेंबर २०१७ ते ५ मे २०२० या कालावधीत परितेवाडी जि. प. शाळा, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूरचे सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री मस्टर, उपस्थिती पत्रक, शेरे बुक इत्यादीपैकी एकही अधिकृत नोंद उपलब्ध झाली नाही. तसेच डिसले हे या कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करू शकले नाहीत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नवोदय निकाल 2022 #navodayresult

नवोदय विद्यालय निकाल पहाण्यासाठी खालील दिलेल्या चित्रावर अथवा Result Tab वर क्लिक करा.







CBSE ने 'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

 CBSE च्या विद्यार्थ्यांना तसंच शाळांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलेले आहे.




 CBSE इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी टर्म 2 चे निकाल जाहीर करण्याआधी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने  'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी हे निकष आपण पुर्ण करत आहात का?

हे पोर्टल सर्वांसाठी OSD (one stop destination)  म्हणून काम करेल अशी माहिती बोर्डाकडून स्पष्ट  करण्यात आलेली आहे. यात टर्म 2 च्या निकालासह परीक्षेशी संबंधित सर्व क्रियाकलापांचा समावेश आहे. CBSE च्या परीक्षा संगम पोर्टल parikshasangam.cbse.gov.in वर प्रवेश करता येईल. त्याचे 3 भाग आहेत - 

शाळा (गंगा), 
प्रादेशिक कार्यालय (यमुना) 
आणि 
मुख्य कार्यालय (सरस्वती).

शालेय विभागात, अभ्यासक्रम, परिपत्रक, नमुना प्रश्नपत्रिका इत्यादी परीक्षा साहित्याचा पर्याय आहे. OASIS, परीक्षा नोंदणी इ. सारख्या पूर्व परीक्षा उपक्रम. यासह, अंतर्गत क्रमांक आणि पुनर्मूल्यांकन इत्यादीसारख्या परीक्षेनंतरच्या क्रियाकलापांसाठी अर्ज करण्याचे पर्याय आहेत. परिक्षा संगम पोर्टलद्वारे डायरेक्ट डिजीलॉकरमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

ही आहे सीबीएसई परीक्षा संगम पोर्टलची थेट लिंक इथेच जाहीर होणार CBSE टर्म 2 निकाल 2022 CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चा निकाल जाहीर होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलैमध्ये निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in
व cbse.gov.in निकाल पाहू शकणार आहेत.

असे पास होणार विद्यार्थी...

विद्यार्थ्यांना प्रत्येक अटी स्वतंत्रपणे उत्तीर्ण करण्याची गरज नाही आणि अंतिम निकालात 33 टक्के गुण मिळवणे हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असेल. 
     टर्म 1 चा निकाल जाहीर करताना, CBSE ने किती विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले किंवा होऊ शकले नाहीत याचा डेटा जारी केला नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण विचारात न घेता टर्म 2 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बोर्डाने तेव्हा जाहीर केले होते की अंतिम गुणांच्या आधारे उत्तीर्णतेची टक्केवारी मोजली जाणार आहे.