डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नोकरी मिळत नसल्याने डी.टी,एड कडे पाठ फिरवली

 अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हमखास नोकरीची हमी देणाऱ्या डीटीएड (डिप्लोमा इन टीचिंग एज्युकेशन -डी.एड.) मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नसल्याचे चित्र आहे.



मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांची शासकीय भरती रखडल्याने या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यासोबतच खासगी शाळांमध्ये शिक्षकांची परवड, शासनाचे उदासीन व वारंवार बदलणारे धोरण अशा अनेक कारणांमुळे परिस्थिती विपरीत झाली आहे.

 शिक्षकी पेशासाठी आवश्यक डीटीएड. प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करण्याची 21 जुलैपर्यंत होती. मात्र जिल्ह्यात असलेल्या डीएलएडच्या  2600 जागांसाठी केवळ 689 अर्ज मान्य झाले आहेत.
डीटीएड अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनायचे. मात्र, नंतर नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा टीईटी ही स्पर्धा देणे बंधनकारक आहे. दरम्यान, टीईटीमध्ये होणारे घोळ पाहता ती देऊनही नोकरीसाठी ताटकळत राहावे लागत असल्याने डीटीएड प्रवेशाची संख्या घटली आहे. नोकरीसाठी बराच काळ थांबावे लागते, थांबूनही नोकरीची शाश्वती नसते. सध्या शिक्षक भरती बंद आहे. नोकरीच्या सुरक्षिततेअभावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात घट झाली.

शिक्षकांनी काढला भव्य मोर्चा

काही वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यात डीएड कॉलेजची संख्या 100 हून अधिक होती, त्यातील 70 हून अधिक संस्था बंद पडल्याने केवळ 30 महाविद्यालये शिल्लक आहेत. त्यात 1 शासकीय, 8 अनुदानित व इतर विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या आहे. यातल्या काहींनी अधिकृतपणे बंद केली नसल्याने त्यांना गृहीत धरले जात आहे. 2004 पूर्वी संपूर्ण राज्यात डीएड 113 महाविद्यालये होती. 2004 नंतर ही संख्या 450 वर गेली आणि 2008 मध्ये राज्यात 1156 डीएड संस्था होत्या. 2012 नंतर भरती बंद झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने महाविद्यालये बंद पडली. विभागात 117 डीटीएड संस्था आहेत.

स्थिती

  • जागा - 2600
  • संस्था - 30
  • अर्ज - 900
  • मान्य अर्ज -689

शिक्षकभरती नसल्याने...

  • 8 वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शाश्वती नसल्याने अनेकांनी इच्छा असूनही हा अभ्यासक्रमात प्रवेशाचा विचार सोडला.
  • शिक्षकांच्या नोकरीसाठी आवश्यक असलेला बीएबीएड 4 वर्षीय नव्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाकडे कल वाढला.
  • डीएड झाल्यावर शासकीय शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा पास करणे आवश्यक, खासगी शाळा बी.एडला मागणी.
  • नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी, शिक्षण संस्थाही बंद, महाविद्यालयातील प्राध्यापकही झाले बेरोजगार


आंतरजिल्हा बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

 🚨 *Transfer Portal Alert.*🚨


आंतरजिल्हा बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे 11 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता संपणार आहे.


तरी, सर्व अंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज उद्या संध्याकाळी 05.00 वाजेपूर्वीच बदली पोर्टल वर भरून घ्यावे.


*यापुढे मुदतवाढ अथवा Rejection - Correction ची संधी मिळणार नाही.*






आंतरजिल्हा बदली अपडेट

 ऑनलाइन आंतर जिल्हा बदली संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे बदलीच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

 आता बदलीच्या तारखा या खालील प्रमाणे असणार आहे.


> मंजूर रोस्टर अपलोड करणे: 02 ऑगस्ट ते 03 ऑगस्ट, 2022

> रोस्टर प्रकाशित करणे: 04 ऑगस्ट, 2022


> रोस्टर पहाण्यास: 04 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, 2022


आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणे: 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट, 2022


प्रक्रिया सुरुवात : 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022


> इंटर ट्रान्सफर ऑर्डर तयार करणे: 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022




डिजिटल चॕनलला सबस्क्राईब  करा व अपडेट मिळवा...





आंतरजिल्हा बदली संदर्भात महत्त्वाची सुचना...

 महत्वाची सूचना


शिक्षकाना आज पासून सेल्फ अॅप्लिकेशन फॉर्म विड्रॉ (self-application form withdraw facility) उपलब्ध करून दिली आहे.



 शिक्षक स्वताच्या लॉगिन मध्ये जाऊन आपल्या फॉर्म वर "WITHDRAW" बटनचा वापर करून आपले अॅप्लिकेशन मागे घेऊ (withdraw ) शकतात,


 तसेच जो पर्यन्त अर्ज भरण्याची तारीख उपलब्ध आहे तो पर्यंत भरलेला अर्ज किती वेळा ही रीजेक्ट करून परत अर्ज भरू शकतील.

 एकदा तारीख उलटून गेली की अर्जावर कुठला ही बदल, रीजेक्ट किंवा सबमिट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.

आॕनलाईन बदली टप्पा क्र २

या नंतर कुठले ही बदल किंवा अर्ज घेतले जाणार नाही या नंतर फक्त बदल्या

केल्या जातील!

शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा (Teachers march)

 🚩🚩👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

🚩🚩

औरंगाबाद येथे समन्वय समिती आयोजित राज्य व जिल्हास्तरावर वरील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांचा(Teachers march)   प्रचंड भव्य मोर्चा प्रत्येक मुद्दयांचा परामर्श घेत अन्याय कारकधोरणावर प्रचंड रोष!



 महिला भागिनींची प्रचंड उपस्थिती!!!

तर हजारो शिक्षक भरपावासात रस्त्यावर,...


 त्यांनी शाळेतून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदविला, घोषणा दिल्या , जिल्ह्यातील सात ते आठ हजार शिक्षक मोर्च्यातील न्याय हक्काच्या मागण्या सोबत तन मन धनाने होते हे विशेष मोर्चेकरी यांनी तुगलकी कारभाराचा निषेध निवेदनाद्वारे नोंदवला*

शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा 



*आता फ़क्त एकच लक्ष्य.....!*

*अन्यायविरहित शिक्षण क्षेत्र....!!*

*आम्हला फक्त शिकवू द्या; (Let us just teach) सरकारी शाळा टिकवू द्या.... (Let government schools survive) या प्रमुख मागणी सह सुमारे 39 न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लक्षवेधी मोर्चा काढून राज्य सरकार व शिक्षण व्यवस्था प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यात आले !!*



*खऱ्या अर्थाने मोर्चाचे नेतृत्व उपस्थित सर्व  शिक्षिका व शिक्षक यांनी केले , यापुढे कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी पडणार नही , असा निर्धार मोर्चेकरी यांनी ,समन्वय समिती माध्यम होती, समारोप प्रसंगी समन्वय समितीचे सर्व समन्वयक यांनी सांगितले की न्याय  मिळवून देण्यासाठी ,अन्यायकारक विषयावर यापुढे  तीव्र आंदोलन करू , आजचा मोर्चा   यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार*    *धन्यवाद!!!!* 

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻


मैत्री दिनाची काव्यभेट

 आज मैत्री दिनाच्या माझ्या  तमाम  मित्रांना काव्यमय शुभेच्छा देत आहे ,

माझी एक रचना  सोबती याच मैत्री विषयावर लिहिलेली काव्यरचना आपल्यासाठी व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे.

 जर काव्यरचना आवडल्यास माझ्या या यूट्यूब चैनल ला आपण सबस्क्राईब करा आपली मैत्री अशीच घट्ट राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणारा प्रत्येक दिवस माझ्या मित्रांसाठी आनंदाचा क्षण घेऊन येणारा असावा.

 आपण ही आपल्या  मित्रांना ही रचना पाठवावी मैत्रीतील भाव यातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

      प्रकाशसिंग राजपूत 

       औरंगाबाद 




15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन


 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक ..


*1)*  15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा     *फडकवतात*  तर ...   26 हे जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात. 


कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

 


                                                                 

2)  15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)*  म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला*  जातो. त्याला *(flag unfurling)*  म्हणतात. 



3) 15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.       

  तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                                  



*4)*  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर *ध्वजारोहण* होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा *फडकवला* जातो.               *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे._

 *वंदे मातरम*👏👏👏👏👏👏👏👏👏

दांडी बहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई

 
भरमसाठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना आता धडा मिळणार....


 दांडी बहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत.



यापुढे  प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकवणारे शिक्षकांची छायाचित्र लावण्याचे ही आदेश देण्यात आले .


शाळेत न जाता गले लठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना आता धडा मिळणार असल्याचे  बोलले जात आहे . 

दांडीबहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी  तातडीने सूचना दिल्यात  शिक्षण क्षेत्रातील  ही सर्वात  मोठी  बातमी पुढे आलेली आहे. 




  यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकवणारे शिक्षकांची छायाचित्र लावण्याचे हे आदेश देण्यात आले

जिल्हा व तालुका मुख्यालय येथे येण्यास निर्बंध


 जिल्हा किंवा तालुका मुख्यालयामध्ये फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलाय.अनेक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामूळे विविध देयके, जी.पी.एफ प्रकरणे हस्तक्षेप न होता नियमाने निघणार आहे.


 या संदर्भात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी याबाबत पत्र काढलेले आहे.

  जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी एका कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी असे या पत्रामध्ये म्हटलेले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं असेल तर मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्वपरवानगी घ्यावी आणि जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात 

आल्यानंतर परवानगीच पत्र दाखवून विजिट बुकला नोंद करावी लागणार आहे.



अनेक  मंडळी ही फाईल काढण्याची  कामे करण्याची जबाबदारी स्वीकारत ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून बऱ्याच वेळेला पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेला फेऱ्या मारत असतात .

बऱ्याच वेळेला स्वतःची काम करून घेत असतात आणि त्यामुळे हे असे निर्बंध शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालय किंवा पंचायत समिती मुख्यालयात विनापरवानगी फिरू नये अशा स्वरूपाचे पत्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एक ऑगस्ट रोजी निर्गमित केलं. 

अनेक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामूळे विविध देयके, जी.पी.एफ प्रकरणे हस्तक्षेप न होता नियमाने निघणार आहे.




टी.ई.टी प्रकरणातील दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२१ भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६ (डी) आणि महाराष्ट्र विद्यापिठ मंडळाच्या व इतर विनिर्दोष्ट परीक्षामध्ये होणान्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम, १९९० (सुधारीत) कलम ७,८ अन्वये दि. १६/१२/२०२१ रोजी फौजदारी गुन्हा

दाखल करण्यात आलेला आहे. ज्याअर्थी दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करून घेतली


त्यात असे निष्पन्न झाले की, ७८८० उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले. ज्याअर्थी अशाच स्वरूपाच्या व्यापम घोटाळयात मा. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेत मोठया प्रमाणात गैरप्रकार झाले असतील आणि घोटाळयामध्ये सहभागी उमेदवारांना वेगळे करता येत असेल तर अशा परीक्षा रद करू नये तर, जर अशा उमेदवारांचे निकाल वेगळे काढता आले तर कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांचे निकाल रद करावेत..


असे निर्देश दिलेले आहेत. (निधी कैम वि. मध्य प्रदेश राज्य सरकार (२०१६) ७ एस.सी.सी. ६१५) ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम, १९९८ भाग दोन प्रकरण पाच मधील कलम ८ मध्ये कार्यकारी समितीचे कार्य व कर्तव्य नमूद आहे. त्यामधील उपनियम (२) (य) मध्ये दिलेल्या अधिकारानुसार कार्यकारी समिती अस्तित्वात नसल्याने राज्य परिषद समितीस शास्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, राज्य परिषद समिती सभा क्र. १२३ ठराव क्र. ३५० दि. २४/०६/२०२२


अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारीत करण्यात करण्यात आलेला आहे.


अ) परिशिष्ठ अ मध्ये नमूद ७५०० उमेदवारांच्या गुणामध्ये फेरफार करून अपात्र असतांना देखील अंतरिम / अंतिम निकालामध्ये सदर उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आलेले आहे. सचव सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.


उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.


ब) परिशिष्ठ व मध्ये नमूद २९३ उमेदवार हे अंतरिम / अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या


विहित पध्दतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत, तथापि त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे अथवा



प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सबब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित


करण्यात येत आहे. उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.


क) | परिशिष्ठ क मध्ये नमूद ८७ हे उमेदवार आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांनी निश्चित केलेले आहेत. त्यापैकी ६ उमेदवारांचा परिशिष्ठ अ मध्ये नमूद ७५०० उमेदवारांमध्ये समावेश आहे. उर्वरित ८१ उमेदवारांपैकी ७६ उमेदवार हे अंतरिम / अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत व ३ उमेदवार परीक्षेस अनुपस्थित आहेत, त्यामुळे सदर सर्व उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणान्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे, 

ड) परिशिष्ठ क मध्ये नमूद २ उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी झालेली नाही. यांची माहिती परिक्षेच्या कोणत्याही माहितीशी


जुळत नाही. यांचेबाबतीत पुढील प्रमाणे शास्ती प्रस्तावित करण्यात येत आहे.


> यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधीत करणे.


एकुण ७८८० पैकी ६ उमेदवारांची नावे दुवार असल्याने अंतिम कारवाई उपरोक्त ठरावाप्रमाणे एकूण ७८७४ उमेदवारांबाबत करणेस मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअर्थी, आत्ता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम १९९८ भाग २ प्रकरण ५ मधील कलम ८ उपनियम (२) (य) मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून सोबत दिलेल्या परिशिष्ट अ,ब,क समाविष्ट परीक्षार्थी उमेदवार यांचे विरूद


त्यांचे नावासमोर नमूद प्रमाणे शास्ती निश्चित करीत आहे.