डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

काव्यरंग पुस्तका विषयी....

 🏵️🌼💐🙏🙏💐🌼🏵️

*कविमनाचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या काव्यरंग कवितासंग्रहाविषयी थोडसं* ...............

...................... *श्री एन बी वाघ.* 

.........................औरंगाबाद




मन असावे,,,,,,, 

तेलासारखे तरल, 

पाण्यासारखे पतळ,

बीजा सारखे संवेदनशील, 

आरशासारखे निर्मळ,

जिथं जातं तिथं एकरूप होतं मग

नुसत्या कल्पनेनं हेलावुनी जातं.

हे सगळं करतांना.........

त्यानं मातृभाषेशी इतकं समरस व्हावं की मायबोलीलाही आपला आभिमान वाटावा.

आसंच काहीसं..............

 *काव्यरंग* या कविता संग्रहाच्या रूपानं मनाच्या भावणेच्या विविध छटा शब्दबध्द करणारे *कविमनाचे शिक्षक आदरणीय प्रकाशसिंग राजपुत सर* .............

तसं पाहीलं तर वाचुन पाहण्यातील उशिर प्रतिक्रियेला दिरंगाई करून गेला त्याबद्दल क्षमस्व.

परंतु जेव्हा प्रत्यक्ष वाचन झाले आणि मग मन भरून आले.व मी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल लिहिता झालो.

 *अनेकाविध कविंच्या प्रतिभाशक्तितुन साकारलेल्या काव्यानं मराठी कविता समृध्द झाली हे सर्वास अवगत आहेच.* पण *बालमनाला आकार देतांना आपल्यातील काव्यगुण या कवितासंग्रहाच्या रूपाने एकरूप झाला हे विशेष म्हणावे लागेल.* शिक्षणासारख्या पवित्रा क्षेत्राशी आपली नाळ घट्ट ठेवतांना आपण केलेली निर्मिती कौतुकास्पद व विद्यार्थी प्रेरक राहील यात शंका *नसावी.

काव्यरंग हे पुस्तक खरेदी करण्यासाठी click here...

मन मारून जगण्यापेक्षा मनात आलं की व्यक्त होणं हीच खरी प्रतिभा* ती आपण जपली व आपल्या करिअरला साजेसं काम हाती घेतलं *छोट्यातला मोठा आशय शब्दबद्ध केलात* ही जमेची बाजु असुन आशीच नवनिर्मिती आपल्या हातुन होत राहो.हीच अपेक्षा ठेऊन *आपल्या यापुढील निर्मितीला भरभरून शुभेच्छा देतो.* 

असंख्य कामामुळे मला आजतागायत वेळ भेटला नाही.परंतु आज नांदेडशहरी मुक्कामास आसतांनाही न राहुन आपल्या काव्यसंग्रहाबद्दल मला थोडं व्यक्त होणं क्रमप्राप्त वाटलं.

.................. *आपला स्नेहांकित* 

..................... *श्री एन बी वाघ* 

.............................औरंगाबाद

🏵️🌼🙏🙏💐💐🙏🙏🌼🏵️

माझ्या मना.... नविन गाणे

 आपल्या बांधवाने कला क्षेत्रात या गीताच्या रुपाने पदार्पण  केलेले आहे. नक्कीच त्यांच्या यशस्वी भवितव्याचे आपण सारे साक्षीदार होऊ या. सर्वांना विनंती जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व सरांचे युटूब चॕनल सबस्क्राईब अवश्य करा.





https://youtu.be/ZUEfdqtdp00

 

मी प्रताप गीते माझे पहिले रोमँटिक सॉंग घेऊन आलेलो आहे तरी गाणं नक्की *like* करा माझं चॅनेल *subscribe*  आणि   व्हिडीओ जास्तीत जास्त *share* करा.


 *गीतकार /गायक* - *प्रताप्  गिते सर* 


 *संगीत संयोजन* - संजय पाठक 

 *सिनेमॅटोग्राफी* - कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


 *एडिटिंग* -कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


Lyrics – Pratap Gangadhar Gite

Music Director : Pratap Gangadhar Gite

Music Arranging & Recording Studios : Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Singer - Pratap Gangadhar Gite

Direction - Kailas Bhalekar 

Cast : Pratap Gite , Asha Gite , Athang Gite , Ojaswi Gite

Special Thanks : Sagar Labade ,  Naresh Sonawane , Mahesh Muke , Yogesh Khandagle , AC collection 

Music Credits Music Composer & Arranger : Pratap Gite - Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Video Credit - Direction - Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

DOP -  PRAPTI  PHOTOS & FILMS , Rushi Shinde , Mayur Gaikwad , Suyog More 

Editing – Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. 



मुलांच्या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी मंडळाच्या वतीने शिक्षकांना प्रश्न विचारले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी आणि याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यभरातील शिक्षकांकडून त्यांची मतं जाणून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तकातच लिहिण्यासाठी वह्यांची पानं लावण्याच निर्णय घेण्यात आला होता.

यामध्ये इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रमुख विषयांसाठी किती पानांच्या वह्या लागतात याची माहिती शिक्षकांना भरायची आहेत. त्यासोबतच आणखी प्रश्न या संदर्भात शिक्षकांची मत जाणून घेण्यासाठी विचारले आहेत.

शिक्षकांना खालील  प्रश्न विचारले जात आहेत...

कोणत्या इयत्तेपासून पाठाच्या नोंदी वह्यांमध्ये काढतात ?

वह्याची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यात विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल ?

वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यास वहीचा वापर थांबेल का ?

या योजनेचा लाभ वर्गातील किती टक्के विद्यार्थ्यांना होईल ?

वर्गात शिकत असताना विद्यार्थी या पानांवर महत्त्वाच्या नोंदी नोंदवतील का ?


या योजनेबद्दल आपण आपले मत नोंदवावे ?

आपण ही याबाबत आपला अभिप्राय नोंदवा...लिंक वरील माहिती भरण्यासाठी click here


याबाबत शासनाचा उद्देश -

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने

वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केली


चलो आझाद मैदान .... आदर्श समितीचे आंदोलन

 राज्यव्यापी लक्षवेधी धरणे आंदोलन'


प्रमुख मागण्या : 

दि. १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये. राज्यातील शिक्षकांना मुख्यालय वास्तव्याची अट रद करावी. 



राज्यातील उपशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक रिक्त पदे पदोतीने तात्काळ भरावे. 

राज्यातील डी. एड., बी. एड्.. उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी संधी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.

 राज्यातील सर्व इयतेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात याव्यात. 

वस्तीशाळा शिक्षकांची मुळे नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा. 

सर्व प्रकारच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. 

सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी.

 शिक्षकांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( १०:२०:३० ) लागू करावी. 

विहित मुदतीत MSCIT उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांकडून होत असलेल्या वसुली थांबवावी.

वसुलीस तात्पुरती स्थगिती न देता MSCIT चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावी व विनाविलंब पद निर्मिती करून सर्व पात्र शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी. 

सर्व प्रकारचे अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना शिकवू द्या, मराठी शाळा टिकवू द्या. 

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा. नगर पालिका शाळांमध्ये कला / क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्वा तात्काळ करण्यात याव्यात. 

विधान परिषदेतील शिक्षक आमदार मतदार या संघात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा.

 जिल्हा परिषद प्रशालेतील माध्यमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात याव्यात. 

केंद्रीय शाळांची नव्याने पुनर्रचना करून प्रत्येक केंद्रीय शाळेत संगणक ऑपरेटर. लिपीक व शिपाई पदे भरण्यात यावीत.

 सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ मिळावा.



 राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी. 

उपशिक्षण अधिकारी पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या मुलाखती घेऊन नियुक्त्या देण्यात याव्यात.

 राज्यातील आंतर जिल्हा बदली प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करावी व जिल्हा अंतर्गत बदली करिता जिल्हा स्तरावर सॉफ्टवेअर कार्यान्वीत करून प्रक्रिया राबवावी, वर्ष वर्षभर सुरू असलेला माहितीचा गोंधळ थांबवावा. राज्यातील शिक्षण विभागाला या कामी वर्षभर गुंतवून ठेवून नये. पूर्वी प्रमाणे जिल्हा स्तरावर प्रक्रिया राबवावी.

अशा प्रमुख मागण्या मांडत आदर्श शिक्षक समिती धरणे आंदोलन घोषीत केलेले आहे.

औरंगाबाद खंडपीठाने सचिवांना बजावली नोटीस

 गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शासन निर्णयास आव्हान देणारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र व्ही.घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए देशमुख यांनी राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.



 याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी अॅड. सईद एस शेख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

 तर मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल साडेआठ हजार शिक्षकांचे घरभाडे भत्ता थांबवण्यात आला आहे.

 म्हणून याप्रकरणी शिक्षक संघटनेने न्यायालयात धाव घेतली असून, शिक्षकांवर तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असल्याचं याचिकेत म्हटले त्यामुळे आता याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

बदली सुधारित आदेश पहा....

त्यामुळे आता याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

सणावर आधारित निबंध लेखन

 *निबंध लेखन नमूना*




*माझा आवडता सण ....दिवाळी*



दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी येताच लोक आपल्या घराची साफसफाई करायला लागतात. नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खातात, दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी व गणपतीची पूजा केली जाते.


दिवाळी या सणाची हिंदू धर्माचे लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडता सण आहे. दिवाळी हा भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला पूर्ण देशात प्रत्येक वर्षी साजरे केले जाते. रावणाला पराजित केल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान राम आपले राज्य अयोध्येला परत आले होते. त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी दिवाळी साजरी करून त्यांचे स्वागत केले होते. 




आज सुद्धा लोक या दिवसाला त्याच उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा दिवस एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. शीख धर्माच्या लोकांद्वारे हा सण त्यांचे सहावे गुरू श्री हरगोविंदजी यांची जहांगीर बादशहाच्या कैद मधून सुटका झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो.



या दिवशी बाजाराला नववधू सारखे सजवले जाते. अनेक प्रकारचे लाईट, कंदील, फटाके, घर सजावटीचे साहित्य, मिठाई, मेणबत्या, गिफ्ट इत्यादी गोष्टींना विशेष प्रमाणात विकले जाते. बाजारात पण या सणादरम्यान विशेष गर्दी असते. लोक आपल्या घराला स्वच्छ करतात. आणि उत्सव येण्याच्या काही दिवस आधी रंगबिरंगी उजेडाने सजवतात. 

हिंदु कॅलेंडर नुसार सूर्यास्त नंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणेश भगवान ची पूजा करतात. ते आशीर्वाद, आरोग्य, धन आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. गोड मिठाई बनवल्या जातात. लोक या दिवशी चांगले संकल्प करतात व वाईट सवयींना त्यागतात.

दिवाळी चा पहिला दिवस धनत्रयोदशी चा असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी ची पूजा केली जाते. लोक सोन्याची खरेदी देखील करतात. देवी लक्ष्मी ची पूजा व आराधना केली जाते. दिवाळी चा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो. या दिवसाला भगवान कृष्ण ची पूजा केली जाते. भगवान कृष्ण ने याच दिवशी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. 

तिसरा दिवस दिवाळी चा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला संध्याकाळी नातेवाईक, मित्र, शेजारी व जळणाऱ्या फटाक्या सोबत मिठाई आणि भेट वस्तू देत देवी लक्ष्मी ची पूजा करत साजरे केले जाते. चौथ्या दिवशी भगवान कृष्ण ची पूजा करून गोवर्धन पूजेचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर पूजा करून शेनापासून गोवर्धन पर्वत बनवतात. पाचवा दिवस भाऊबीजचा असतो. या दिवसाला भाऊ बहीण साजरा करतात. बहिण आपल्या भावाला आरती ओवाळते व भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तु देतो. 


आशा पद्धतीने अतिशय आनंदात, संपूर्ण कुटुंबासोंबत दिवाळी चा हा सण साजरा केला जातो. दिवाळी च्या काळात शाळा कॉलेज ला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या असतात. ज्यामुळे दिवाळी सणाचा आंनद आणखीनच वाढून जातो. आणि म्हणूनच इत्यादि अनेक कारणांमुळे माझा आवडत सण दिवाळी आहे.

बदली सुधारित आदेश

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार निर्गमीत करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार असल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र. ४ येथील दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र रद्द करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.

सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.

आजचे सुधारित पत्र पहा.... 








बदलीचा आदेश निर्गमित

 जिल्हातंर्गत बदली बाबत आज दि २० आॕक्टोबरला पत्र आले असून बदली बाबतचे वेळापत्रक व संपुर्ण कार्यवाही स्पष्ट करण्यात आलेली आहे.

हे पत्र आपण खाली पाहू शकता.👇






बदली अपडेट

 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत डिजिटल स्कूल समूह  महाराष्ट्रावर गेल्या आठवड्यामध्ये दिलेली बातमी तंतोतंत खरी उतरली असून ग्रामविकास विभागाचे परवानगी आता बदलींसाठी प्राप्त झालेली आहे .

!

यापुढे आता बदलीची सर्व प्रक्रिया चालू होणार आहे जे बांधव 2018 19 मध्ये लांब गेले होते त्यांना जवळ येण्याची संधी आता प्राप्त होणार आहे .शैक्षणिक क्षेत्रातील  तःतोतंत बातमी भेटण्यासाठी  डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र असे वेब मध्ये सर्च करा.

याबाबत डिजिटल समूहाची बातमी पहा...

🔅Breaking News🔅

❄️ *बदली इच्छुक बंधू भगिनीसाठी आनंदवार्ता.* ❄️


*जिल्हातंर्गत बदली फाईलवर ग्रामविकास मंत्री महोदयांची स्वाक्षरी झाली असून बदली प्रक्रिया सुरू होईल.*

👉 मा.गिरीश महाजन साहेबांनी बदली फाईलवर स्वाक्षरी केली असून सचिव वळवी साहेब यांना पोर्टल सुरू करण्यास सांगितले आहे.कदाचित उद्या पोर्टल सुरू होईल.

💥 असे वृत्त हाती येत आहे.💥

वाबळेवाडीला शिक्षणमंत्री जाणार

  लोकवर्गणीतून मोठ्या दिमाखात उभ्या झालेल्या  जागतिक दर्जाच्या वाबळेवाडी शाळेवर बहिष्काराची वेळ आणणा-या पुणे जिल्हा परिषद प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणमंत्री यांनी लवकरच शाळेवरील बहिष्कार मागे घेण्यासाठी स्वत: वाबळेवाडीत येत असल्याचे आजच्या मुंबई येथील बैठकीत जाहीर केले .



दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने झालेल्या तातडीच्या बैठकीत मंत्री केसरकर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना समज दिली व आपल्या वाबळेवाडे 

दौ-यावेळी आयुष प्रसाद यांना हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे .



शुक्रवारी  वाबळेवाडी शाळेतील सर्व पालकांनी एकत्र येवून शाळेवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.

 शाळा उभारणी केलेले मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे सव्वा वर्षांपूर्वी केलेल्या निलंबनानंतर ग्रामस्थांवर कारवाई करायला निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शाळा बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तातडीने वाबळेवाडीत ग्रामस्थांची बैठक घेवून तेथूनच शिक्षणमंत्री केसरकर यांची बैठक घेतली .

शाळेत घेतलेला उपक्रम खूपच अफलातून ... पहा कोणती शाळा

संध्याकाळी सात ते रात्री नऊपर्यंत झालेल्या या बैठकीत केसरकर यांनी वाबळेवाडीकरांकडून सर्व माहिती घेतली व प्रशासनाची बाजु जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक  संध्या गायकवाड यांचेकडून फोनवर समजून घेतली. यावेळी त्यांनी लोकवर्गणी आणि वेगळे उपक्रम शाळांना प्रोत्साहनऐवजी त्रास दिला जात असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे थेट सांगितले. या शिवाय शासकीय कर्मचारी यांचे प्रतिनिधी म्हणून सीईओ आयुष प्रसाद हे असताना त्यांनी शाळेत न येताच कारवाया सुरू करणे यामुळे आपण त्यांचेवर प्रचंड नाराज असल्याचे त्यांना तात्काळ कळविण्यास सांगितले.